नवी दिल्ली- पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज (मंगळवार) दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
शरीफ श्रीलंकेच्या दौऱयावर आहेत. शरीफ यांनी आज दुपारी साडेतीन वाजता मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी यांनी दहशतवादाविरोधात चिंता व्यक्त करत कारवाईची मागणी केली.
दरम्यान, पठाणकोटमधील हल्यातील चौकशीला पाकिस्तानचा पूर्णपणे पाठिंबा राहील, असे आश्वासन शरीफ यांनी मोदींना चर्चेदरम्यान दिले.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा