नवी दिल्ली - बिहार विधानसभेतील पराभव तसेच नागरीकांमध्ये सरकारी योजनांच्या प्रचार-प्रसाराचा अभाव यामुळे केंद्रिय मंत्र्यांना सोशल मिडियाचा अधिकाधिक वापर करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) केली आहे.
पीएमओने केंद्रिय मंत्र्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. मंत्र्यांनी आपल्या कामकाजाचा लेखाजोखा सोशल मिडियाद्वारे मांडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांमध्ये सरकारची चांगली प्रतिमा निर्माण करून सरकारप्रती नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत असल्याचे पीएमओने म्हटले आहे. नागरिकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम माहिती आणि प्रसारण मंत्रालय आयोजित करू शकतो असेही आदेशांमध्ये म्हटले आहे. मंत्र्यांचे निर्णय आणि मंत्रालयासंदर्भातील कामकाज नागरिकांपर्यंत पोचावे आणि त्याबाबत नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देता यावे यासाठी सोशल मिडियाचा वापर करणे आवश्यक असल्याचे मोदींचे मत आहे. त्यामुळेच यापूर्वीही मोदी यांनी अशाप्रकारचे सूचना दिल्या होत्या.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा