नवी दिल्ली - माजी सैनिकांसंबंधी असलेली आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित "वन रॅंक वन पेन्शन‘ (ओआरओपी) ही योजना आमचे सरकार लागू करणारच. गेल्या 40 वर्षांत याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सांगितले.
"मन की बात‘ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना मोदी यांनी विद्यार्थ्यांनाही सल्ला दिला. परीक्षेत अपयश आले तर खचून जाऊ नका, यश - अपयश आयुष्याचा एक भाग आहे, अपयशातून आपण शिकतो. तसेच जे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, त्यांनी आपली कारकिर्दीची दिशा ठरवावी. पुढे काय करायचे, याबाबतचा योग्य निर्णय घ्यावा. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे, की मला वैमानिक व्हायचे होते. पण त्यांना अपयश आले. ते नापास झाल्याने महान शास्त्रज्ञ होऊ शकले. त्यामुळे अपयशातही यश लपलेले असते, असे आपण मानले पाहिजे. अपयशाचे रूपांतर संधीमध्ये करा, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदींनी आरोग्य, सेवा, कृषी, विज्ञान आदी विषयांवर चर्चा केली.
वन रॅंक वन पेन्शन ही योजना गेल्या 40 वर्षांपासून का रखडली आहे, हा मूळ प्रश्न आहे. यापूर्वीच्या सरकारांनी केवळ चर्चा केली, कृती नाही. मी माजी सैनिकांना आश्वासन देतो, की ही योजना लागू करण्याचे आश्वासन मी पूर्ण करणार. आम्ही आमची जबाबदारी झटकणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
देशभरात उष्णतेची लाट असून, नागरिकांनी या काळात स्वत:ची व मुक्या प्राण्यांची काळजी घ्यावी. सुटीच्या कालावधीत तुम्ही फिरायला गेला असाल त्या वेळचा अनुभव, छायाचित्रे आम्हाला #incredibleindia हा हॅश टॅग वापरून पाठवा, तुमची छायाचित्रे मी माझ्या अकाऊंटवरून शेअर करून त्या पर्यटन स्थळाची माहिती अनेकांपर्यंत पोचवेन, असेही मोदी म्हणाले.
जगापुढे मी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला जगातील 117 देशांनी पाठिंबा दिल्याने आता आमची जबाबदारी आहे, की त्याला पुढे घेऊन जाणे. योग हा रोगमुक्तीचा मार्ग आहे. त्यामुळे 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा होईल, असे मोदींनी नमूद केले.
"मन की बात‘ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना मोदी यांनी विद्यार्थ्यांनाही सल्ला दिला. परीक्षेत अपयश आले तर खचून जाऊ नका, यश - अपयश आयुष्याचा एक भाग आहे, अपयशातून आपण शिकतो. तसेच जे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, त्यांनी आपली कारकिर्दीची दिशा ठरवावी. पुढे काय करायचे, याबाबतचा योग्य निर्णय घ्यावा. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे, की मला वैमानिक व्हायचे होते. पण त्यांना अपयश आले. ते नापास झाल्याने महान शास्त्रज्ञ होऊ शकले. त्यामुळे अपयशातही यश लपलेले असते, असे आपण मानले पाहिजे. अपयशाचे रूपांतर संधीमध्ये करा, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदींनी आरोग्य, सेवा, कृषी, विज्ञान आदी विषयांवर चर्चा केली.
वन रॅंक वन पेन्शन ही योजना गेल्या 40 वर्षांपासून का रखडली आहे, हा मूळ प्रश्न आहे. यापूर्वीच्या सरकारांनी केवळ चर्चा केली, कृती नाही. मी माजी सैनिकांना आश्वासन देतो, की ही योजना लागू करण्याचे आश्वासन मी पूर्ण करणार. आम्ही आमची जबाबदारी झटकणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
देशभरात उष्णतेची लाट असून, नागरिकांनी या काळात स्वत:ची व मुक्या प्राण्यांची काळजी घ्यावी. सुटीच्या कालावधीत तुम्ही फिरायला गेला असाल त्या वेळचा अनुभव, छायाचित्रे आम्हाला #incredibleindia हा हॅश टॅग वापरून पाठवा, तुमची छायाचित्रे मी माझ्या अकाऊंटवरून शेअर करून त्या पर्यटन स्थळाची माहिती अनेकांपर्यंत पोचवेन, असेही मोदी म्हणाले.
जगापुढे मी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला जगातील 117 देशांनी पाठिंबा दिल्याने आता आमची जबाबदारी आहे, की त्याला पुढे घेऊन जाणे. योग हा रोगमुक्तीचा मार्ग आहे. त्यामुळे 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा होईल, असे मोदींनी नमूद केले.
सरकारच्या वर्षपूर्तीविषयी बोलताना मोदी म्हणाले, की सरकारच्या वर्षपूर्तीनंतर देशभरात याचे विविध प्रकारे विश्लेषण करण्यात आले. प्रगतीसाठी प्रशंसा करणे व टीका करणे आवश्यक आहे. गेल्या महिन्यात सरकारने पंतप्रधान सुरक्षा योजना, जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना सुरू केल्या. देशभरातून आठ कोटी 52 लाख लोकांनी या योजनेत आपली नोंदणी केली आहे. गरिबांना सशक्त बनविण्यासाठी या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. किसान वाहिनी हा उपक्रम माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होता आणि हे शेतकऱ्यांसाठीही फायद्याचे आहे. शेतकऱ्यांसाठी हे खुले विद्यापीठ असणार आहे. प्राण्यांच्या तुलनेत आपल्या देशात दूध उत्पादन होत नाही. पशुप्राण्यांचे कसे पालन केले पाहिजे, याची माहिती किसान वाहिनीच्या माध्यमातून देण्यात येईल.
मोदींची "मन की बात‘ - उन्हाच्या काहिलीने पशु-पक्ष्यांचे हाल; त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा
- अपयशी विद्यार्थ्यांनी खचून न जाता ते पचविण्याची क्षमता निर्माण करा
- गरिबांना सशक्त बनविण्यासाठी सुरू केलेल्या तीन योजनांना चांगला प्रतिसाद
- योगाने जगाला जोडण्याचे काम केले; आता आम्ही योगाचे दूत झालो पाहिजे
- किसान चॅनेल म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा
- शेती, सिंचन आणि पशुपालन यातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल
- अपयशी विद्यार्थ्यांनी खचून न जाता ते पचविण्याची क्षमता निर्माण करा
- गरिबांना सशक्त बनविण्यासाठी सुरू केलेल्या तीन योजनांना चांगला प्रतिसाद
- योगाने जगाला जोडण्याचे काम केले; आता आम्ही योगाचे दूत झालो पाहिजे
- किसान चॅनेल म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा
- शेती, सिंचन आणि पशुपालन यातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल
[पीटीआय]