बेळगाव - काश्मीर असो वा डोकलाम देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास भारतीय सेना सक्षम आहे. कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास आम्ही सज्ज आहोत, असे मत लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी (ता. 3) बेळगावात व्यक्त केले.
बेळगाव - काश्मीर असो वा डोकलाम देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास भारतीय सेना सक्षम आहे. कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास आम्ही सज्ज आहोत, असे मत लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी (ता. 3) बेळगावात व्यक्त केले.
मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या 23 आणि 24 बटालियनला मानाचा ध्वज प्रदान कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
रावत म्हणाले, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याठिकाणी शांतता प्रस्तापित करण्याचे काम सुरूच आहे. पाकिस्तानकडून या शांततेला तडा देण्याचे काम वारंवार होते. प्रक्षोभक भाषणातून तरुणांना भडकविण्याचे प्रयत्न होत असतात. सोशल मीडियामुळे शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात व्यत्यय येत असतो. पण आम्ही देशाच्या सुरक्षेततेसाठी प्रसंगी कठोर पावले उचलतो. लष्कराकडून कोणत्याही प्रकारे मानवाधिकारांचे उल्लंघन होत नाही. ती एक कारवाई असते.
श्री. रावत म्हणाले, डोकलाममध्ये भारतीय आणि चीनी सैन्यात समोरासमोर खडाखडी झाली नाही. आमच्या जवानांचे मनोबल जबरदस्त असल्यामुळे कोणत्याही परिस्थितिला आम्ही सामोरे जाऊ शकतो. जवानांनाही ताण असतो. घरगुती समस्यांमुळे काही जवानांनी आत्महत्या केली. पण आम्ही सर्व एक कुटुंबच असल्याची वागणूक जवानांना मिळत असते. त्यामुळे आमच्या पराक्रमाबाबत कोणीही बोट रोखू शकत नाही.
यावेळी रावत यांनी मराठा लाईट इन्फंट्रिच्या कामगिरीबाबत माहिती सांगितली.
उत्तर कोरिया ही त्यांची समस्या
उत्तर कोरियाने घेतलेल्या अणू चाचणीबाबत लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना विचारले असता ते म्हणाले, उत्तर कोरियाने घेतलेली अनुचाचणी आणि त्याला असलेला अमेरिकेचा विरोध याबाबत मी अधिक बोलू शकत नाही. ही त्यांची बाब आहे. त्यावर आपले सरकार, परराष्ट्र खाते निर्णय घेतील.