५ डिसेंबर १९७१ची सकाळ :-
४ डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानी लष्कराने लोंगेवाला चौकीवर हल्ला केला होता. २००० पाकिस्तानी जवानांची एक ब्रिगेड सुसज्ज रणगाड्यांसह तिथून भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होती आणि या सर्वांचा मुकाबला करत होती आपली अवघी १२० जणांची तुकडी.
यावेळी रणगाड्यांवर हल्ले करण्यासाठी भारतीय जवान हवाई दलाची वाट पहात होते आणि हवाई दल सकाळ होण्याची.जणु काही शिवकालातील बाजीप्रभू मूठभर मावळ्यांनिशी लढता लढता विशाळगडावरील तोफ़ांचे आवाजाची वाट पहात होते. रात्रभर कुलदीपसिंग चांदपुरी आणि त्यांच्या १२० जवानांनी सकाळपर्यंत लोंगेवाला चौकी लढवत ठेवली होती. रात्रभर चाललेल्या या लढाईत पाक लष्कराला भारतीय जवानांची एक जीप उद्ध्वस्त करण्यात यश मिळाले होते. त्यापलिकडे पाकिस्तानी रणगाडे जास्त नुकसान करू शकले नाहीत.
आणि एकदाची ५ डिसेंबरची सकाळ उजाडली. काही वेळातच विंग कमांडर बावा आपले हंटर विमानांचे पथक घेऊन लोंगेवाला येथे पोचले आणि त्यांनी एकेक रणगाडा टिपायला सुरुवात केली. इतक्या अचूक आक्रमणाचा सामना करणे पाक लष्कराला भलतेच कठीण गेले. त्यांना उघड्या वाळवंटात कुठलेच संरक्षण मिळाले नाही. इतकेच नाही तर काही वेळातच भारतीय गोटातील आणखी एक दलही आले आणि त्यांनी किशनगंजकडे वळलेल्या पाक रणगाड्यांचा समाचार घेतला.
काही रणगाडे हवाई हल्ले चुकवण्यासाठी स्वतःभोवती गिरक्या मारत होते,पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. १० रणगाडे निकामी झाले होते आणि ५० हून अधिक भारतीय लषकराच्या ताब्यात आले होते. पाकिस्तानच्या २००० च्या सैन्यांपैकी तब्बल २०० जण यात मारले गेले तर भारतीयांच्या १२० पैकी फक्त २ जण यात शहीद झाले; तरी त्या २ वीरांचे बलिदानसुद्धा महत्वाचे होते. "सुबह का नाश्ता लोंगेवाला में,दोपहर का खाना रामगढ़ में और रात का खाना जैसलमेर में" करण्याच्या पवित्र्यात असलेली पाकिस्तानी सेना आता बचावाचे साधन पाहू लागली आणि वाट मिळेल तिकडे पळू लागली होती, त्यांना जैसलमेरच काय पण साधी लोंगेवालाची छोटीशी चौकीसुद्धा नशिबी नव्हती;कारण त्यांच्या अंदाजानुसार लोंगेवालाची पोस्ट म्हणजे फक्त काही तासांचा खेळ होता म्हणून त्यांनी पाकिस्तानी वायुदलाची सुद्धा मदत मागितली नव्हती, त्यामुळे या लढाईत ते सर्वस्वी एकाकी पडले व त्यांचा पराभव अटळ होता.
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत जे.पी.दत्ता यांनी "बॉर्डर" हा चित्रपट अतिशय रोमांचकारी आणि स्फ़ूर्तीदायक असाच बनवला होता.
या विजयाचे खरे शिल्पकार होते अवघ्या ३१ वर्षे वयाचे मेजर कुलदीपसिंग चांदपुरी आणि त्यांचे १२० बहाद्दर जवान; ज्यांनी रात्रभर लोंगेवाला चौकी लढवत ठेऊन आपले काम चोख बजावले होते आणि शत्रूवर विजय हा युद्धाभूमीवर जीव देऊन नव्हे तर शत्रूला खतम करूनच मिळवता येतो हे सिद्ध केले.
मेजर कुल्दीपसिंग चांदपुरी आणि त्यांच्या १२० बहाद्दर जवांनाना आमचा सलाम 🙏🏼🙏🏼💐💐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा