For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार नाही- पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था रविवार, 30 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.30) 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी देशाच्या सैनिकांबाबत आजच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या.

गेल्या काही दिवसात सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानी सैन्यावर आपण स्वतःहून कधीही हल्ला केला नाही. कारण आपण शांततेवर विश्वास ठेवतो, मात्र असे असले तरी देशाच्या सन्मानाशी आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार केली जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्करानं पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या आठवणींनाही मोदींनी यावेळी उजाळा दिला आणि सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीला सलामही केला. सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाली, याबाबत सर्व देशवासीयांनी 29 सप्टेंबर हा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला असल्याचेही त्यांनी सांगितले. जे देशातील शांतता आणि प्रगती नष्ट करण्याचा प्रयत्न करतील, त्या सर्वांना आमचे जवान सडेतोड उत्तर देतील. आमच्या देशातील शांतता भंग करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. देशाच्या सन्मानासोबत कोणताही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त देशभरात कार्यक्रम विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. गांधीजी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आजपासून पुढील 2 वर्षांसाठी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महात्मा गांधींच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले आहे. गांधीजींच्या विचारांनी प्रत्येकाला शक्ती मिळली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, पंतप्रधान मोदींनी नौदल अधिकारी अभिलाष टॉमीसंदर्भातही चर्चा केली, 'अभिलाष यांचा जीव कसा वाचवला जाणार, याबाबत संपूर्ण देश चिंतेत होता. ते खोल समुद्रात अडकले होते. न खाता-पिता मृत्युशी झुंज देत होते. अभिलाष हे धाडसी सैनिक आहेत. त्यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला तेव्हा त्यांनी पुन्हा असा पराक्रम करण्याचा संकल्प व्यक्त केला, असे त्यांनी सांगितले.

सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

माजी सैनिकांनी हाती घेतलेली वृक्षरोपण चळवळ लोककल्याणकारी -राम महाराज घुले

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांनी हाती घेतलेली वृक्षरोपणाची चळवळ लोककल्याणकारी आहे. वृक्षरोपण व संवर्धन काळाची गरज बनली असून, भावी पिढीच्या कल्याणासाठी प्रत्येकाने वृक्षरोपण करण्याचे आवाहन ह.भ.प. राम महाराज घुले यांनी केले.
माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने तपोवन येथील दत्त मंदिर परिसरात राबविण्यात आलेल्या वृक्षरोपण अभियान कार्यक्रमाप्रसंगी राम महाराज घुले बोलत होते. प्रारंभी राम महाराज घुले, मा.नगरसेवक निखील वारे, ह.भ.प.आव्हाड महाराज, उद्योजक प्रशांत कोळपकर, निवृत्त तहसिलदार संजय परदेशी, उद्योजक मारूती कराळे यांच्या हस्ते वृक्षरोपणाने या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, निवृत्ती भाबड, संतोष शिंदे, भाऊसाहेब देशमाने, संजय पाटेकर, बन्सी दारकुंडे, प्रभू म्हस्के, सुनिल गुंजाळ, लेंडाळ, गणेश पालवे, आनंदा गिते, बळवंत पालवे, बाबासाहेब आव्हाड, भिवाजी डमाळे, बाबासाहेब चौधरी, मंदिर ट्रस्टचे अर्जुन बडे, आश्‍विन गडाख, दत्तात्रय डांगे, गामे सर, याशिम शेख, प्रविण म्हस्के, बबन वाबळे, अमिन इनामदार, सुमित अकोलकर, बाजीराव भालेराव, बाळासाहेब जाधव, विठ्ठल पवार आदिंसह माजी सैनिक उपस्थित होते.
पुढे राम महाराज घुले म्हणाले की, वाढते शहरीकरण व औद्योगिकरणाने मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली. यामुळे निसर्गचक्र बिघडले असून, निरोगी व आनंदी जीवणासाठी वृक्षरोपण करणे अत्यावश्यक आहे. माजी सैनिकांनी हाती घतेलेली वृक्षरोपण चळवळ कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
निखील वारे म्हणाले की, सैनिकांच्या रक्तातच देशभक्ती भिनलेली असते. जिवावर उदार होऊन ते देश रक्षणाचे कार्य करीत असतात. देश रक्षणाचे कर्तव्य बजावून सामाजिक कार्यात माजी सैनिकांनी घेतलेल्या पुढाकाराने मोठा बदल घडणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. भाऊसाहेब देशमाने यांनी फाऊंडेशनच्या विविध सामाजिक कार्याची व वृक्षरोपण, संवर्धन उपक्रमाची माहिती दिली. दत्तात्रय डांगे यांनी कॉलनी मधील सर्वाना वृक्ष दत्तक देऊन त्याचे संवर्धन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. मेजर संजय पाटेकर व सुमित अकोलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

विद्यार्थी दशेमध्ये विचार बहुआयामी असावे - लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर

image

हवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं; वैमानिक सुखरुप

अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: September 4, 2018 09:55 AM | Updated: September 4, 2018 10:09 AM

Indian Air Force MiG 27 crashes near Rajasthans Jodhpur | हवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं; वैमानिक सुखरुपहवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं; वैमानिक सुखरुप

जोधपूर: हवाई दलाचं मिग-27 विमान राजस्थानातील जोधपूरमध्ये कोसळलं आहे. या अपघातातून वैमानिक सुखरुप बचावल्याची माहिती मिळते आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पूर्व जयपूरमधील बनाड पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या देवलिया गावाजवळ हवाई दलाचं विमान कोसळलं. विमान कोसळण्याच्या आधी वैमानिक सुरक्षित बाहेर आला.

Indian Air Force MiG 27 crashes near Rajasthan's Jodhpur, Pilot safe; More details awaited. pic.twitter.com/bVa9LiTZgv

— ANI (@ANI) September 4, 2018


हवाई दलाचं मिग-27 विमान मोकळ्या जागेत कोसळलं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. विमान जमिनीवर कोसळताच आगीचे लोट उसळले. यानंतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि हवाई दलाचे अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. तांत्रिक कारणामुळे या विमानाचा अपघात झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता हवाई दलाकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र या घटनेची चौकशी करुन अपघाताचं नेमकं कारण शोधण्यात येईल, अशी माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे.

दोघा नाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली डेथ रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: September 3, 2018 06:55 PM | Updated: September 3, 2018 06:56 PM

Two Nashikar cyclists completed their death race | दोघा नाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली डेथ रेसदोघा नाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली डेथ रेस

नाशिक : नाशिककर सायकलीस्ट्स किशोर काळे, संगमनेरचे विजय काळे यांनी जगातील अवघड स्पर्धांपैकी एक समजली जाणारी तथा डेथ रेस असे टोपण नाव मिळालेली भूतान - टूर आॅफ द ड्रॅगन ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. एकाच वर्षात चार भारतीय सायकलीस्टसने स्पर्धा पूर्ण करण्याची ही पहलीच वेळ आहे. उत्तराखंड मधील दोघांनीही ही रेस पूर्ण करण्यात यश मिळवले आहे.
1 सप्टेंबर रोजी झालेल्या टूर आॅफ ड्रॅगनच्या नवव्या आवृत्तीत जगभरातून एकूण 35 सायकलीस्ट्सने सहभाग नोंदवला. किशोर काळे यांनी 17 तासात तर विजय काळे यांनी 18 तासात ही स्पर्धा पूर्ण केली. यावेळी स्पर्धा पूर्ण करणार्या दोघा सायकलीस्ट्सचा सत्कार भूतान आॅलिम्पिक कमिटीचे चेअरमन यांच्या हस्ते करण्यात येतो.
सायकलिंगचे कॅपिटल होऊ बघणार्या नाशिक शहरातील चार सायकलीस्ट्सने ही स्पर्धा पूर्ण केली आहे हे विशेष. या आधी 2012 मध्ये डॉ. महेंद्र महाजन तर गेल्या वर्षी 2017 मध्ये डॉ. हितेंद्र महाजन यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तर आता 2018 मध्ये किशोर काळे ,विजय काळे यांनी ही किमया साधली आहे.हिमालयाचे विहंगम दृश्यांची अनुभूती अनुभवण्याची संधी स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर मिळते. एकूण चार घाट चढून उतरायचे असतात. त्यातील शेवटचा घाट सलग 40 किमीच्या चढायचा असल्याचे शेवटपर्यंत स्पर्धेतील आव्हान जिवंत असते. त्यामुळे सहकार्यांचा तगडा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नव्हते.

शारीरिक, मानसिक संयमाची परीक्षा पाहणारी स्पर्धा - डॉ. रवींद्र सिंघल

प्रचंड थंडीच्या वातावरणात सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात झाली होती. शरीरासह मनाच्या संयमाची ही एक कसोटीच समजून मी स्पर्धेत उतरलो. दैनंदिन सराव जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर या स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे मी निर्धारित वेळेपेक्षा २२ मिनिटे अगोदर पूर्ण करण्यास यशस्वी ठरलो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: September 3, 2018 07:17 PM | Updated: September 3, 2018 07:20 PM

 Competitive Examination for Physical, Mental Retardation - Dr. Ravindra Singhal | शारीरिक, मानसिक संयमाची परीक्षा पाहणारी स्पर्धा - डॉ. रवींद्र सिंघलशारीरिक, मानसिक संयमाची परीक्षा पाहणारी स्पर्धा - डॉ. रवींद्र सिंघल

ठळक मुद्देनाशिककरांच्या वतीने सिंघल यांचे भव्य स्वागत स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे निर्धारित वेळेपूर्वी ४७ मिनिटे आधीच पार

नाशिक : फ्रान्समध्ये झालेली जागतिक स्तरावरील ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा शारिरिक-मानसिक संयमाची कसोटी पाहणारी होती; मात्र आयुष्यातील हा अत्यंत वेगळा अनुभव देणारा क्षण होता, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पाथर्डीफाटा येथे करण्यात आलेल्या जाहिर सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
स्पर्धा जिंकल्यानंतर नाशिकला सिंगल यांचे सोमवारी (दि.३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आगमन झाले. शहराच्या वेशीवर नाशिककरांसह पोलीस आयुक्तालयातील अधिका-यांच्या उपस्थितीत सिंगल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. यावेळी सिंघल म्हणाले, प्रचंड थंडीच्या वातावरणात सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात झाली होती. शरीरासह मनाच्या संयमाची ही एक कसोटीच समजून मी स्पर्धेत उतरलो. दैनंदिन सराव जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर या स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे मी निर्धारित वेळेपेक्षा २२ मिनिटे अगोदर पूर्ण करण्यास यशस्वी ठरलो. वयाची पन्नाशी गाठल्यानंतर अशा प्रकारची खडतर स्पर्धेत विजेतेपद पटकाविणे हे मोठे आव्हान होते; मात्र दैनंदिन व्यायाम, सायकलिंगची सराव असल्यामुळे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मी स्पर्धा जिंकू शकलो.
पाथर्डीफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आवारात
नाशिक पोलीस आयुक्तालय व तमाम नाशिककरांच्या वतीने सिंघल यांचे पोलीसांच्या बँण्ड पथकाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सिंघलयांच्यासमवेत त्यांचे वडील झिलेसिंग सिंगल, आई कांतादेवी सिंगल तसेच ‘आयर्नमॅन’ स्पर्धेतील स्पर्धक राहिलेली त्यांची कन्या रविजासह पत्नी विनिता सिंघल यादेखील उपस्थित होत्या. यावेळी उपआुयक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त बापू बांगर, शांताराम आडके, अशोक नखाते, शांताराम पाटील, मोहन ठाकूर, अजय देवरे, पोलीस निरिक्षक सोमनाथ तांबे, मधुकर कड यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

तळेगाव रोहीत दत्तू भोकनळचे स्वागत

तालुक्यातील तळेगाव रोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा लष्करातील जवान दत्तू बबन भोकनळ संघाने सांघिक सुवर्णपदक मिळविल्याबद्दल त्याचे सोमवारी जन्मगावी जंगी स्वागत करण्यात आले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: September 4, 2018 01:40 AM | Updated: September 4, 2018 01:41 AM

 Welcome to Talegaon Rhee Dattu Bhokanal | तळेगाव रोहीत दत्तू भोकनळचे स्वागत

तळेगाव रोहीत दत्तू भोकनळचे स्वागत

चांदवड : तालुक्यातील तळेगाव रोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा लष्करातील जवान दत्तू बबन भोकनळ संघाने सांघिक सुवर्णपदक मिळविल्याबद्दल त्याचे सोमवारी जन्मगावी जंगी स्वागत करण्यात आले.  सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांचे आगमन होताच फटाक्याची आतषबाजी, तर पार्थ अ‍ॅकडमीच्या वतीने तळेगावरोही व परिसरात उघडया जीपवरुन भोकनळची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर तळेगावरोही येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात सत्कार समारंभ पा पडला. अध्यक्षस्थानी राधाजी पाटील भोकनळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ.राहुल अहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संजय पवार,अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, उपसभापती अमोल भालेराव, बाजार समितीचे उपसभापती नितीन अहेर, अशोक भोसले, बाळासाहेब वाघ, सुनील शेलार, जिल्हा परिषद सदस्य डॉ.सयाजीराव गायकवाड, अरुण न्याहारकर, वर्धमान पांडे, अनिल काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, विलास ढोमसे, शहाजी भोकनळ, देवीदास अहेर, विश्वासराव देवरे,निवृत्ती घुले, सरपंच साधना पाटील,अनिल पाटील आदिसह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दत्तु भोकनळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन, स्वागतगीत विद्यालयातील संगीत चमुने सादर केले तर प्रास्तविक दीपक काळे यांनी केले. शिवाजीराव पाटील यांनी अनेक किस्से सांगत त्यास आर्थिक मदत करावी असे आवाहन केले. यावेळी पार्थ अ‍ॅकडमीच्या विद्यार्थ्यांनी गीत व नृत्यात दत्तूची गाथा सादर केली . तिरंगी ध्वजाच्या रंगाचे पोशाख परिधान करुन विद्यार्थ्यांनी मनोरा रचला तसेच लाठी काठीचे प्रदर्शनही केले.  सत्काराला उत्तर देतांना दत्तू भोकनळ याने भविष्यात भारताचे नाव येत्या आॅलिम्पिकमध्ये पुढे नेणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. या समारंभास तालुक्यातील नागरीक उपस्थित होते.
सेवा-सवलतीसाठी पाठपुरावा करू : चव्हाण
च्खासदार चव्हाण यांनी तळेगावरोही सारख्या दुष्काळी भागात पाणी नसतांना दत्तुने भारताचे नाव पाण्याशी संलग्न खेळातुन मिळविले. याचा सार्थ अभिमान असून मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दत्तूच्या मानधन व सेवा सवलतीसाठी पाठपुरावा करु असे आश्वासन दिले. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दत्तूने आॅलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचवावे यासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. तर नाईक यांनी दत्तूला शासकीय नोकरी तसेच दहा लाखाचे बक्षिस देणार असल्याचे सांगीतले. आमदार अहेर यांनीही दत्तूच्या यशाबद्दल कौतुक केले.

अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून राजस्थानमधील कन्येची नियुक्ती

जयपूर - अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून राजस्थानमधील जयपूर शहरातील कोटपुतली या छोट्याशा भागातील मंजरी चावला हिची नियुक्ती करण्यात आली आहे. ती कॅलिफोर्नियाच्या सर्वोच्च न्यायालयात सॅन फ्रान्सिस्को बार न्यायालयात न्यायाधीश म्हणून रुजू झाली आहे.

२४ जुलै १९७७ला प्रागपुरा येथे मंजरीचा जन्म झाला होता. तिचे आजोबा चंदूलाल शिक्षक व समाजसेवक होते. तिचे वडील डॉ. संतप्रकाश चावला हे कॅन्सर रोगतज्ज्ञ आहेत. तिने परदेशातच शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासूनच मंजरी अभ्यासात हुशार होती. तिचे काका महेंद्र चावला कोटपुतली गावात बीडीएम रुग्णालयामध्ये डॉक्टर आहेत. मंजरी न्यायाधीश झाल्याची बातमी तिच्या गावात पसरताच तिच्या यशासाठी गावात मिठाई वाटून सर्वांनी आनंद व्यक्त केला.

Dailyhunt

राफेलवरून गदारोळ होत असतानाच 3 विमाने हिंदुस्थानात दाखल

सामना ऑनलाईन । ग्वाल्हेर

हिंदुस्थानी हवाईदलासाठी फ्रान्सकडून विकत घेण्यात यायच्या राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून देशात मोठा गदारोळ होत आहे. विरोधकांनी सत्ताधारी एनडीएला या प्रकरणी टीकेचे लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी फ्रान्सचे वैमानिक तीन राफेल घेऊन ग्वाल्हेरमध्ये दाखल झाल्याने सर्वच थरात आश्चर्य व्यक्त होत आहे. फ्रेंच वैमानिक ग्वाल्हेरच्या महाराजपूर हवाई स्थानकावरून हिंदुस्थानी लढाऊ वैमानिकांना राफेल उड्डाणाचे आणि त्यातील तांत्रिक सुविधा वापरण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. त्याबदल्यात हिंदुस्थानी वैमानिक फ्रांसच्या वैमानिकांना मिरज-2000 या लढाऊ विमानांच्या उड्डाणासह तांत्रिक प्रशिक्षण देणार आहेत. देशात आलेली तीन राफेल 3 दिवस येथे मुक्काम करणार आहेत.

संसदेत आणि संसदेबाहेर विरोधकांनी राफेल विमान खरेदी करारावरून केंद्रातील एनडीए सरकारला घेरले आहे. तरीही राफेल विमानाचा ताफा हिंदुस्थानात दाखल झाल्याने उच्च स्तरीय परवानगीनेच फ्रान्स आणि हिंदुस्थानी वैमानिकांनी प्रशिक्षण व तंत्रज्ञान आदानप्रदानाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा महाराजपूर एअर बेस हा हिंदुस्थानी हवाई दलाचा प्रमुख तळ मानला जातो. रविवारी राफेल आणि मिराज प्रशिक्षण मोहिमेची प्राथमिक तयारी पूर्ण करण्यात आली. राफेलच्या कार्यप्रणालीशी परिचित होण्यासाठीच हिंदुस्थानी वैमानिक फ्रेंच वैमानिकांकडून उड्डाण व तांत्रिक प्रशिक्षण घेणार आहेत.राफेल हिंदुस्थानात थांबण्याचे कारण खराब हवामान असे सांगितले जात असले तरी हा प्रशिक्षण कार्यक्रम सरकारच्या राफेल खरेदीच्या ठाम धोरणाचाच भाग असल्याचे उघड झाले आहे.

हिंदुस्थानी लढाऊ वैमानिकांना प्रशिक्षणासाठी फ्रान्सला पाठवणार
हिंदुस्थानी हवाई दलात 36 राफेल विमाने सामील करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यानुसार हिंदुस्थानच्या निवडक प्रशिक्षित लढाऊ वैमानिकांना राफेलच्या प्रशिक्षणासाठी फ्रान्सला पाठवले जाणार आहे. या विमानांच्या दोन स्क्वाड्रन हवाई दलात सामील होणार आहेत. त्यांची तैनाती हरियाणा आणि पश्चिम बंगाल राज्यात करण्याबाबत संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्थानी हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतिम चर्चा होत आहे.

36 राफेल टप्प्याटप्प्याने येणार
59 हजार कोटी रुपयांच्या राफेल खरेदी करारानुसार नोव्हेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत 36 राफेल विमाने हिंदुस्थानात येणार आहेत.ती टप्प्याटप्प्याने हिंदुस्थानी हवाई दलात सामील होणार आहेत. इंडो -फ्रान्स संरक्षण सहकार्य करारानुसार हिंदुस्थान आणि फ्रान्स एकमेकांना लढाऊ विमानांच्या उड्डाणाचे व तांत्रिक प्रशिक्षणाची देवाणघेवाण करणार असल्याचे फ्रांसच्या हिंदुस्थानातील राजदूतांनी स्पष्ट केले आहे. फ्रान्स त्यांच्याच मिराज- 2000 या हिंदुस्थानी ताफ्यात सामील झालेल्या विमानाचे नूतनीकरण कार्यही पार पाडणार आहे. त्याबदल्यात फ्रेंच वैमानिकांना मिराज उड्डाणाचे प्रशिक्षण हिंदुस्थानी वैमानिक देणार आहेत.

हिंदुस्थान -फ्रान्स लष्करी सहकार्य कराराला 20 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने फ्रांसच्या राफेल टीमने हिंदुस्थानात तीन दिवस मुक्काम करायचे ठरवले आहे. या मुक्कामात विमान उड्डाण व तांत्रिक माहिती देवाण घेवाणीचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले जाणार आहे.
-हिंदुस्थानातील फ्रेंच राजदूत

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

पोस्टमन देणार ग्राहकांना आता घरपोच बँकिंग सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: August 31, 2018 10:51 PM | Updated: September 1, 2018 12:18 AM

 Now the door to door banking services to customers | पोस्टमन देणार ग्राहकांना आता घरपोच बँकिंग सेवापोस्टमन देणार ग्राहकांना आता घरपोच बँकिंग सेवा

नाशिक : शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह दिंडीरी येथील उप टपाल कार्यालय व त्याच्या अखत्यारीतील आणखी तीन अशा विभागातील एकूण पाच केंद्रांवर शनिवारी (दि.१) इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या कामकाजाचा शुभारंभ होत आहे. नाशिक विभागात सध्या ३२ पोस्ट आॅफिस असून, सुमारे ३३२ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही पोस्टाची बँक गावागावांमध्ये ग्राहकांच्या दारात पोहोचणार असून, ग्राहकांना घरपोच बँकिंगची सेवा मिळणार आहे. देशभरातील तब्बल १ लाख ५५ हजार कार्यालये आणि भारतीयांचा विश्वास असणाºया टपाल खात्यावर अधिकाधिक नागरिकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने प्रत्येकापर्यंत बँकिंग पोहचविण्याच्या मोहिमेला खºया अर्थाने बळ मिळणार आहे.
भारत सरकारने बँकांचे राष्ट्रीयीकरण केले त्याला गेल्या १९ जुलै रोजी ४९ वर्षे पूर्ण झाली. शेती क्षेत्राला पुरेसा पतपुरवठा करता यावा, देशात बँकिंगचा वेगाने प्रसार व्हावा, शहरांसोबत ग्रामीण भागाला बँकिंगचे लाभ मिळावेत आणि त्यावेळी ७० टक्क्यांपेक्षाही अधिक नागरिक बँकिंगच्या बाहेर होते, त्यांना बँकिंगमध्ये आणता यावे, असा या ऐतिहासिक निर्णयाचा उद्देश होता.  गेल्या ४९ वर्षांत देशातील अर्थव्यवस्थने बँकिंगचा एक मोठा पल्ला गाठला असला तरी हे उद्देश अद्याप पूर्णपणे साध्य झालेले नाही. राष्ट्रीयीकरणातून बँकिंगचा विस्तार झाला आणि त्या उद्देशाच्या दृष्टीने कामही झाले, मात्र प्रत्येक भारतीय नागरिकाला बँकिंगमध्ये लाभ अद्यापही मिळू शकलेला नाही.  त्यामुळेच २०१४ मध्ये जनधन बँक खात्याची योजना सुरू झाली. या योजनेअंतर्गत विक्रमी साडेबत्तीस कोटी नागरिकांनी बँकेत जनधन खाते काढले असले तरीही काही नागरिकांना हा लाभ अजूनही मिळालेला नाही, तर ज्यांनी खाती काढली त्यांना बँक गावा बाहेर असल्याने तसेच बँकचे व्यवहार करण्यास भीती वाटल्याने यासारख्या वेगवेगळ्या कारणांनी बँकिंग करता येत नाही. सबसिडीचे वाटप जनधन खात्यातून करण्याचा आणि गरजू नागरिकांना सर्व मदत याच खात्यांतून देण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण त्यानंतरही सबसिडी आणि इतर मदत खात्यात जमा करून घेण्यापलीकडे या खात्यांचा वापर होत नाही, असेही लक्षात आले. या प्रश्नाचे एक चांगले उत्तर सरकारला सापडले असून, इंडिया पोस्ट पेमेंट््स बँकेची शनिवारी होणारी सुरुवात हा त्याचाच एक भाग आहे.
या सेवा देणार पोस्ट बँक
एका लाखापर्यंतच्या ठेवी स्वीकारणे, मोबाइल पेमेंटस, रिटन्स सेवा, डेबिट कार्ड, नेट बँकिंग अशा सर्व सेवा ती देईल. परंतु, या बँकेतून क्रेडीट कार्ड मिळणार नाही. असंघटित कामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना बँकिंग सुविधा मिळावी, हाच या बँकेचा उद्देश असल्याने त्यानुसार सेवा पुरविण्याची योजना या बँकने केली आहे. बँक सेवा शुल्क आकारून नागरिकांना घरपोच सेवा देणार आहे. मात्र ग्राहकांची क्षमता किती आहे, हे मात्र तपासून त्यात सरकारला फेरफार करावे लागणार आहेत. उदा. रोख काढणे, रोख जमा करणे यासाठी १५ रुपये (घरपोच सेवा) तर काही केंद्रांवर जाऊन या सेवा घेण्यासाठी २५ रुपये द्यावे लागणार आहेत. पण इंटरनेट व्यवहार करणाºयास कोणतेही शुल्क ठेवण्यात आलेले नाही. क्यूआर कोडमार्फ त आपल्या खात्यात व्यवहार करण्याची सोयही बँक देणार आहे. त्यामुळे बँक खाते लक्षात ठेवण्याचीही गरज पडणार नाही.
१०० टक्के बँकिंगकडे वाटचाल
भारतातील निरक्षर नागरिक, वयस्कर नागरिक आणि बँकेची भाषा न समजणारे सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. टपाल किंवा पोस्ट खात्याशी सर्वसामान्य नागरिकांचे असलेले परंपरागत नाते आणि पोस्ट खात्याचा देशभर असलेला प्रचंड विस्तार, यामुळे हा बदल आपल्या देशाला १०० टक्के बँकिंगकडे घेऊन जाणार आहे.
४सरकारची १०० टक्के मालकी असलेल्या पोस्ट खात्याने ही जबाबदारी घेतली असल्याने बँकेसाठी जागा, कर्मचारी आणि विस्तार याबाबी सोप्या झाल्या आहेत. पोस्टाकडे असलेली अतिरिक्त जागा, इमारती आणि साधने नव्या बँकेसाठी वापरली जातील. नाशिक विभागात शहरातील मुख्यालयाअंतर्गत ३२ टपाल कार्यालयांमध्ये पोस्टमन, क्लार्क एमटीएस व अधिकारी मिळून जवळपास ३३२ कर्मचाºयांचे मनुष्यबळ पोस्टाकडे आहे. सध्या पोस्टाचे बचत खाते, अल्पबचत, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक, समयबद्ध एक, दोन-तीन वर्षांसाठी व पाच वर्षांसाठीची योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) व सुकन्यासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून चार लाख ७५ हजार ग्राहक आहेत. आता पोस्ट पेमेंट बँके च्या माध्यमातून विभागातील घराघरापर्यंत पोहचण्याचे लक्ष असल्याची माहिती वरिष्ठ पोस्टमास्टर एम. एस. अहिरराव यांनी दिली आहे.

संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे : रिअर अ‍ॅडमिरल व्ही. एम. डॉस

मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशांतर्गत उत्पादनामुळे आयातीद्वारे बाहेरच्या देशात जाणारी गंगाजळी रोखता येऊ शकेल. नाशिकमधील उद्योगांची उच्च क्षमता असून, संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असे आवाहन नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल व्ही. एम. डॉस यांनी केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: September 1, 2018 01:00 AM | Updated: September 1, 2018 01:00 AM

To participate in the production of protection literature: V. M. Dos | संरक्षण साहित्याच्या  उत्पादनात सहभागी व्हावे : व्ही. एम. डॉससंरक्षण साहित्याच्या  उत्पादनात सहभागी व्हावे : व्ही. एम. डॉस

सातपूर : मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशांतर्गत उत्पादनामुळे आयातीद्वारे बाहेरच्या देशात जाणारी गंगाजळी रोखता येऊ शकेल. नाशिकमधील उद्योगांची उच्च क्षमता असून, संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असे आवाहन नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल व्ही. एम. डॉस यांनी केले आहे.  निमात आयोजित नेव्हल एव्हिएशन इंडस्ट्री इंटरॅक्शन या महत्त्वाकांक्षी उपक्र मात ते बोलत होते. डॉस यांनी पुढे सांगितले की, १९९० नंतरच्या मुक्त धोरणामुळे संरक्षण क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादनास चालना मिळाली आहे.नाशिक हे एचएएल मिग विमान उत्पादनाचे प्रमुख केंद्र असून, नौदलातील रशियन बनावटीची विमाने, हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.  कमांडर राजेश बाबू यांनी सांगितले की, देशांतर्गत उत्पादनाविषयी आढावा  घेऊन उत्पादनक्षम साहित्याची  यादी व अपेक्षति उत्पादन याची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.  दुसºया सत्रात नौदलातर्फे पॉवर पॉइन्ट प्रेझेंटेशनद्वारे देशांतर्गत उद्योगातून साहित्याची खरेदी, डिझाइन, डेव्हलपमेंट, देखभाल, असा संबंधित सेवा देशातून उत्पादित करून घेण्यात येणार असून, त्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कमांडर एन. बालकृष्णन यांनी सांगितले. यावेळी कॅप्टन चेतन घाग, कमांडर जी. एस. संदीप, कमांडर जी. प्रभाकर आदींनी मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक भाषणात निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी नाशिकमधील औद्योगिक वातावरण व उद्योगांची क्षमता याची माहिती दिली. मेक इन नाशिक समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव यांनी स्वागत केले.  यावेळी शशिकांत जाधव, कैलास अहेर, सुधाकर देशमुख, संजय सोनवणे, उदय रकिबे,  मनीष रावळ, हर्षद ब्राह्मणकर, राजेश गडाख, श्रीपाद कुलकर्णी, कमलेश नारंग, तेजपाल बोरा, गौरव धारकर आदींसह उद्योजक उपस्थित होते.
निमाच्या पुढाकाराने उपक्रम
खासगी क्षेत्रातील उद्योगांना व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नौदलातर्फे विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. नाशिकमध्ये निमाच्या पुढाकाराने प्रथमच हा उपक्र म राबविण्यात येत असून, नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या वाटचालीस चालना मिळणार आहे. नाशिकच्या उद्योगांमध्ये संरक्षण सामुग्री उत्पादनाची क्षमता असल्याने या उद्योगांनी संरक्षण साहित्य उत्पादनात सहभाग घ्यावा. देशातून बाहेर जाणारी गंगाजळी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉस यांनी केले आहे.

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

दत्तू

खेडेगावात लहानाचा मोठा झालेला दत्तू. रिओ आॅलिम्पिकचं त्याचं पदक केवळ सहा सेकंदानं हुकल्यामुळे साऱ्या जगाला तो माहीत झाला.

By राकेशजोशी | Follow | Published: August 31, 2018 02:01 AM | Updated: August 31, 2018 02:06 AM

Dattu | दत्तू

दत्तू

ठळक मुद्देअंगात जिगर आणि मनात ऊर्मी ऐन स्पर्धेच्या वेळी तो आजारी मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर लष्करात नोकरीआता त्याचं लक्ष लागलं आॅलिम्पिककडे..

दत्तू
- राकेश जोशी
खेडेगावात लहानाचा मोठा झालेला दत्तू.
रिओ आॅलिम्पिकचं त्याचं पदक
केवळ सहा सेकंदानं हुकल्यामुळे
साऱ्या जगाला तो माहीत झाला.
आत्ताही आशियाई स्पर्धेत
आजारपणामुळे त्याचं वैयक्तिक पदक हुकलं;
पण सांघिक प्रकारात त्यानं
जिद्दीनं सुवर्ण पटकावलंच.
त्याच्या जिद्दीचा प्रवास सोपा कधीच नव्हता..
दत्तू भोकनळ. अंगात जिगर आणि मनात ऊर्मी असली की काय घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दत्तू. हातातोंडाची गाठ घालता घालता आणि परिस्थितीशी झगडताना मेटाकुटीला येत असताना गरीब घरातील दत्तू आंतरराष्टÑीय पातळीवर काही कामगिरी करील असं कोणाच्याच ध्यानीमनी नव्हतं. त्याच्या गावातल्याच काय, पण घरातल्यांनाही तसं कधी वाटलं नव्हतं. कोणाला माहीत होता हा दत्तू? पण २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये नौकानयनात त्याचं पदक सहा सेकंदांनी हुकलं आणि दत्तू अख्ख्या दुनियेला माहीत झाला. त्यामुळेच आत्ता आशियाई स्पर्धेतही साºया नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या; पण त्याचं वैयक्तिक पदक हुकलं. सहाव्या क्रमांकावर तो फेकला गेला. अर्थात याचं कारण होतं त्याची तब्येत. ऐन स्पर्धेच्या वेळी तो आजारी पडला होता. त्याच्या अंगात ताप होता. यशानं त्याला हुलकावणी दिली.
याच कारणामुळे दत्तूला सांघिक प्रकारातूनही संघाबाहेर ठेवण्यात येणार होते, पण जिद्दी दत्तू हार मानायला तयार नव्हता आणि संघ व्यवस्थापनाचाही त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे दुसºयाच दिवशी झालेल्या सांघिक नौकानयन स्पर्धेत दत्तूला सहभागी करून घेण्यात आलं आणि दत्तूनंही आपल्यावरील विश्वासाला मग तडा जाऊ दिला नाही. या संघानं सुवर्णपदक जिंकलं आणि भारताच्या खात्यावर आणखी एका सुवर्णाची नोंद झाली.पण दत्तूला कोणतंच यश सहजासहजी मिळालं नाही. त्याचा आजवरचा प्रवास कायमच संघर्षानं भरलेला राहिला आहे.
तळेगाव रोही हे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील जेमतेम दहा हजार लोकसंख्येचं गाव. गावात कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत. अशा वातावरणात वाढलेल्या दत्तूचा एकमेव आधार म्हणजे त्याचा स्वत:वरचा विश्वास. आत्मविश्वास. त्याच बळावर त्यानं लहानपणीच आपल्या अंगावर पडलेल्या जबाबदाºया केवळ समर्थपणे पेलल्याच नाहीत, तर या आत्मविश्वासाचं, जिद्दीचं रूपांतर यशातही केलं.
त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झालं. पाचवी ते बारावीपर्यंतचं शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालयात झालं. दहावीत असतानाच वडील वारले. कर्तेपणाची जबाबदारी अंगावर आलेल्या दत्तूनं मग ‘ज्येष्ठाची’ भूमिका पार पाडताना आईच्या मदतीने घरगाडा हाकला. मिळेल ते आणि पडेल ते काम करत घराचा गाडा हाकताना मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर २०१२ मध्ये लष्करात नोकरी मिळवली.
त्यावेळी त्याचं फारसं शिक्षणही झालेलं नव्हतं. सैन्य दलात असतानाच त्यानं बारावीची परीक्षा लासलगाव येथून दिली. लष्करात कठोर परिश्रम, चिकाटी, जिद्दीच्या बळावर त्यानं नुसते प्रशिक्षणच नव्हे तर पुणे येथे नौकानयनाचे धडेही तितक्याच एकाग्रतेने गिरवले.
खरं तर लष्करात सरावाचा भाग म्हणून दत्तू बास्केटबॉल खेळायचा. मात्र त्याची उंची आणि शरीरयष्टी पाहून वरिष्ठांनी त्याला नौकानयन संघात समाविष्ट केले. इथूनच त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं. नौकानयन म्हणजे काय, ते कसं करतात, त्याचं तंत्र काय, यातलं ओ की ठो दत्तूला माहीत नव्हतं, पण लवकरच त्यानं ते सारं आत्मसात केलं. अंगातील शिस्तीमुळे थोड्याच काळात त्यानं त्यावर वर्चस्व मिळवलं आणि तो त्यात चांगलाच रमलाही. या खेळातील बारकावे, तांत्रिक गोष्टी त्यानं मेहनतीनं शिकून घेतल्या. त्याचा अर्थातच अपेक्षित परिणाम झाला आणि भल्याभल्यांना मागे टाकत २०१४ साली त्याने राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यानंतर २०१५ साली चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदक पटकावलं. २०१८च्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले.
आपल्या कर्तबगारीमुळे आज दत्तू सगळ्यांना माहीत झाला आहे; पण त्याचं बालपण फारच कष्टात आणि गरिबीत गेलं.
५ एप्रिल १९९१ रोजी तळेगाव रोही येथील गरीब शेतकरी कुंटुबात त्याचा जन्म झाला. वडील बबन. विहिरी खोदाईचे काम करायचे. आयुष्यभर काबाडकष्टाचेच दिवस पाहिल्याने ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. दत्तू आणि आई आशा. यांच्यावरच मग साºया कुटुंबाची जबाबदारी आली. त्यासाठी लवकरात लवकर काहीतरी कमाई करणं, घराला हातभार लावणं गरजेचं होतं. शारीरिक कष्टात कधीच माघार न घेतलेल्या दत्तूनं लष्करात प्रवेश मिळवला. आता आर्थिक आणि मानसिक चिंता मिटेल असं वाटत होतं; पण नशीब हात धुऊन दत्तूच्या मागं लागलं होतं.
आॅलिम्पिक स्पर्धेसाठी दत्तूची तयारी सुरू होती. दत्तू कोरिया येथे फिसा अशिया अ‍ॅण्ड ओशियाना कॉण्टिनेण्टल आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशन स्पर्धेसाठी रवाना झाला होता. त्याचवेळी आई (आशाबाई ऊर्फ अक्का) घरात पाय घसरून पडली. अपघात वरवर किरकोळ वाटत असला तरी तसं नव्हतं. मेंदूला मार लागल्याने आईला स्मृतिभंश झाला. कोणालाच ती ओळखू शकत नव्हती.
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्याच्या आनंदात दत्तू जेव्हा आईला पेढा भरविण्यासाठी घरी पोहोचला तेव्हा आईनं दत्तूला ओळखलेच नाही. ज्या आईवर दत्तूचं जीवापाड प्रेम, वडील गेल्यानंतर जिनं आपलं पालनपोषण केलं, ती आई आपल्याला ओळखू शकत नाही याचं दत्तूला खूप दु:ख झालं. हे दु:ख उराशी बाळगत आॅलिम्पिक स्पर्धेसाठी दत्तू रवाना झाला. ऐन आॅलिम्पिक स्पर्धेदरम्यान ही घटना घडल्यामुळे नाही म्हटलं तरी दत्तू विचलित झाला. अर्ध लक्ष सरावाकडे, स्पर्धेकडे आणि अर्ध लक्ष आईकडे, अशी त्याची अवस्था झाली होती. स्पर्धा संपल्या संपल्या दत्तू परत घरी आला. पण लवकरच आई वारली.
जागतिक रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत अवघ्या ६ सेकंदांच्या फरकाने पदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडावं लागल्याचं दु:ख होतंच, त्यात आई गेली. पण त्यातून सावरत दत्तूने नव्या उमेदीने सुरुवात केली. यंदाच्या आशियाई क्र ीडा स्पर्धेत एकेरीच्या पदकानं त्याला हुलकावणी दिली; पण त्यामुळेच जिद्दीनं पेटून उठलेल्या दत्तूनं सांघिक प्रकारात देशाला सुवर्ण मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. हे पदक माझ्या आईसाठी आहे असं दत्तू सांगतो. या पदकानं त्याला पुन्हा नवी उमेद मिळवून दिली आहे. आता त्याचं लक्ष लागलं आहे ते आॅलिम्पिककडे..

रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

निवृत्त सेनाधिकाऱ्यांचे पुनर्वसन योग्यप्रकारे व्हावे

सध्या वन रँक वन पेन्शनची चर्चा सुरू असली तरी निवृत्तांच्या पुनर्वसनाकडे अधिक गांभीर्याने बघायला हवे.

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: August 25, 2018 06:26 AM | Updated: August 25, 2018 06:28 AM

Retired Army officers should be rehabilitated properly | निवृत्त सेनाधिकाऱ्यांचे पुनर्वसन योग्यप्रकारे व्हावेनिवृत्त सेनाधिकाऱ्यांचे पुनर्वसन योग्यप्रकारे व्हावे

- वरुण गांधी
भारतीय लष्करात सध्या काम करीत नसलेल्या पण अत्यंत प्रशिक्षित आणि उच्च प्रतीचे कौशल्य असलेल्या २५ लाख अनुभवी व्यक्ती या त्यांना राष्ट्राच्या उभारणीत संधी मिळेल याची सध्या वाट बघत आहेत. या संख्येत दरवर्षी ६०,००० सैनिकांची भर पडत असते. ते एक तर निवृत्त होतात किंवा त्यांच्यातील कौशल्याचा जेथे वापर होत नाही अशा तºहेची कामे करीत असतात. या साºया ३५ ते ४५ वयोगटातील व्यक्ती असतात. सेनादलातून निवृत्त झालेल्या अधिकाºयांपैकी ८४ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना पुनर्वसन कार्यक्रमाचा कोणताच लाभ मिळाला नाही. याशिवाय सेनादलातून निवृत्त झालेल्या ८२ टक्के लोकांच्या अभ्यासातून हे दिसून आले की, त्यांनासुद्धा पुनर्वसन योजनेचा लाभ मिळाला नाही.
सेनादलात कार्यरत असणाºया अधिकाºयांसाठी निवृत्त हा शब्द वापरणेही भ्रममूलक आहे. हे अधिकारी निवृत्तीनंतर स्वत:च्या करियरमध्ये बदल करीत असतात. आयुष्याच्या मध्यंतरात त्यांना मुलकी जीवनाकडे वळावे लागते. एकूणच सेनादलातील सुरक्षित जीवनाकडून ते अशा जीवनाकडे वळतात जेथे भविष्याची अनिश्चिततता असते आणि तणावपूर्ण वातावरण असते. सैनिकी जीवनाकडून नागरी जीवनाकडे परतल्यावर असे अधिकारी अधिक काळ घरच्या वातावरणातच घालवतात. कारण बाह्य जीवनाशी जुळवून घेणे त्यांना कठीण होते. सध्या वन रँक वन पेन्शनची चर्चा सुरू असली तरी निवृत्तांच्या पुनर्वसनाकडे अधिक गांभीर्याने बघायला हवे. अनुभवी व्यक्तींकडे कोणतीही संस्था लक्ष देत नाही, अशी स्थिती नाही. त्यांच्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्डाच्या अधिपत्याखाली काम करणारी जिल्हा सैनिक बोर्ड अस्तित्वात आहेत. ही बोर्डस् एक्स सर्व्हिसमेनच्या कल्याणाकडे लक्ष देत असतात. सीएसडी (कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट)च्या माध्यमातून या निवृत्तांना शासकीय मदतीतून धान्य, घरगुती उपकरणे आणि दैनंदिन वापराचे सामान दरमहा मिळत असते.
सेवानिवृत्त अधिकाºयांना प्रशासकीय सेवेचा लाभ मिळतो तर आर्म्ड फोर्सेस वाईव्हज् वेल्फेअर असोसिएशनतर्फे पूर्वसैनिकांच्या पत्नींना आणि मुलांना विविध प्रकारचे वित्तीय आणि गैरवित्तीय साहाय्य मिळत असते. सेनादलातील निवृत्त अनुभवी व्यक्तींना आरोग्य योजनांचाही लाभ मिळतो तसेच ईसीएचएस पद्धतीतून त्यांना कॅशलेस वैद्यकीय सोयीही मिळतात.
वायुदलाचे प्लेसमेंट सेलही कार्यरत आहे (पण ज्यांची लाभ मिळवून देण्याची क्षमता असमाधानकारक समजली जाते.) तसेच केंद्र सरकारचे रोजगार केंद्रसुद्धा त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देत असते. सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये एक्स सर्व्हिसमेनसाठी राखीव जागा असतात. पण प्रत्यक्षात त्याचा लाभ १६ ते १८ टक्केच लोकांना मिळतो. त्याचे कारण अशातºहेच्या संधी उपलब्ध आहेत. याची माहितीच अनेकांना नसते, तसेच त्यासाठी घेतल्या जाणाºया योग्यता परीक्षा उत्तीर्ण करणे काहींना शक्य होत नाही. या व्यक्तींच्या समायोजनाची व्यवस्था सेनादलाने केली असून, त्याचा लाभ काही व्यक्ती घेत असल्या तरी केंद्रीय सुरक्षा दलाने याबाबतीत आपल्या क्षमतेचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. खासगी क्षेत्रात सेनादलातील निवृत्तांचा उपयोग सिक्युरिटी म्हणूनच करण्यात येतो. कॉर्पोरेट वातावरणात सेनादलातील अनुभवी व्यक्तींना सन्मानपूर्वक वागणूक जरी मिळत असली तरी त्यांना सेवेत घेण्याबाबत कॉर्पोरेट जगत मागे-पुढे बघत असते. कारण त्यांना अधिक चांगल्या व्यक्ती बाहेरून मिळू शकतात. तेव्हा अनुभवी व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देणे हा चिंतेचा विषय बनला आहे. अशास्थितीत केंद्राच्या रोजगार केंद्रांनी त्यांना प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. इतकेच नव्हे तर निवृत्त कर्मचाºयांना खासगी क्षेत्रात आपोआप नोकरी मिळाली पाहिजे.
महासंचालक पुनर्वसन यांच्याकडे अनुभवी व्यक्तींच्या दुसºया करियरसाठी प्रशिक्षणाचे काम सोपवलेले असते. ते नामवंत संस्थांमध्ये विविध कोर्सेसचे आयोजन करून अनुभवी व्यक्तींना शिकवण्याचे काम करीत असतात. पण या कोर्सेसचा व्यवहाराशी संबंध नसल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही. तेव्हा महासंचालकांनी उद्योगांशी संपर्क साधून त्यांना उपयुक्त ठरतील अशा कोर्सेसचे नियोजन केले पाहिजे. एकूणच नियोजन अशा पद्धतीने केले पाहिजे जेणेकरून कुशल अनुभवी व्यक्तींचा योग्य उपयोग होऊ शकेल. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ या कार्यक्रमांचा उपयोग सेनादलातील निवृत्त पण अनुभवी व्यक्तींसाठी करता येईल. ब्रिटनच्या सरकारने सेनादलातील निवृत्तांसाठी ज्या तºहेचा कार्यक्रम आखला आहे त्याच पद्धतीचा कार्यक्रम आखून सेवानिवृत्तांना आरोग्य सेवा आणि राहण्यासाठी घर देत असताना रोजगारही मिळण्याची व्यवस्था करावी लागेल. निवृत्तांना स्वत:साठी उपजीविकेचे साधन शोधण्याची पाळी येऊ नये. नागरी समाजात एकरूप होण्याच्या दृष्टीने सरकारने खासगी संस्थांच्या भागीदारीत काम करायला हवे. परिणामकारक पुनर्वसनाशिवाय सेनादलातील अनुभवी व्यक्तींचे नीतीधैर्य टिकून राहणार नाही. तसेच तरुणांना लष्करात सामील होण्याची प्रेरणाही मिळणार नाही.

(लेखक भाजपचे खासदार आहेत.)

बॅँक शाखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा: सुभाष भामरे

बिकट आर्थिक परिस्थितीला कंटाळून मृत्यूला कवटाळलेल्या उत्राणेच्या दिव्यांगाला मरणोपरांतही न्याय मिळत नसल्याने छावा क्र ांतिवीर सेना आणि संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी भामरे यांनी पगार कुटुंबीयाला दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली, तसेच चौकशी करून संबंधित बॅँक शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: August 25, 2018 12:21 AM | Updated: August 25, 2018 12:22 AM

 Substitute complaint against bank branch officer: Subhash Bhamare | बॅँक शाखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा: सुभाष भामरे 

बॅँक शाखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा: सुभाष भामरे

ठळक मुद्देउत्राणे येथील युवकाच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत

सटाणा : बिकट आर्थिक परिस्थितीला कंटाळून मृत्यूला कवटाळलेल्या उत्राणेच्या दिव्यांगाला मरणोपरांतही न्याय मिळत नसल्याने छावा क्र ांतिवीर सेना आणि संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी भामरे यांनी पगार कुटुंबीयाला दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली, तसेच चौकशी करून संबंधित बॅँक शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.
२० आॅगस्ट रोजी उत्राणे येथील प्रवीण कडू पगार या ३५ वर्षाच्या दिव्यांग मराठा तरुणाने सेंट्रल बँक आॅफ इंडिया (शाखा म्हसदी, जिल्हा धुळे)च्या शाखाधिकाºयाने सतत ७ महिने केलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती़
सबळ पुरावा उपलब्ध असूनही प्रशासनाने बँक शाखाधिकाºयाविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. प्रवीणच्या कुंटुंबीयांना आर्थिक मदतही दिली गेली नसल्याची कैफियत यावेळी भामरे यांच्यापुढे मांडण्यात आली. यावेळी भामरे यांनी दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली. तसेच चौकशी करून शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी करण गायकर यांच्या समवेत प्रा. उमेश शिंदे, शिवाजी मोरे, संतोष माळोदे,भूषण आहेर, सागर शेजवळ, सतीश नवले, भारत आहेर, योगेश सोनवणे, विकास काळे या छावा
क्र ांतिवीर सेनेच्या कार्यकर्त्यांसह संभाजी ब्रिगेडचे सचिन अहिरराव, चारुदत्त खैरनार, निकिता सावंत, परेश भामरे, मयूर पगार, अक्षय पगार, विशाल धोंडगे, ऋषिकेश शिरसाठ, मोहन पगार, सुनील पगार, सतीश कापडणीस, विजय अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पात्रता असूनही कर्ज मिळत नाही, लोकप्रतिनिधींना सांगूनही न्याय मिळत नाही म्हणून नैराश्याने ग्रासलेल्या प्रवीणने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. आत्महत्येपूर्वी प्रवीणने आपली कैफियत सांगणारी चिठ्ठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून ठेवली होती. इतकेच नव्हेतर बँक शाखाधिकाºयाने प्रवीण आणि त्याच्या वृद्ध आईचा छळ केल्याची चित्र- ध्वनीफीतही उपलब्ध आहे.

सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

शिक्रापूरच्या यशकीर्तीकडून सैनिकांना राख्या

शिक्रापूर- येथील यशकीर्ती सामाजिक संस्थेच्या महिलांनी सैनिकांसोबत नाते जोडले असून त्यांनी सीमेवर भारताचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने एक हजार राख्या आणि शुभेच्छा पत्र पाठविले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील यशकीर्ती सामाजिक संस्था सैनिकांना एक हजार राख्या पाठवून सैनिकांचे हात आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी असून बळकट केले आहेत. याप्रसंगी यशकीर्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मंगल सासवडे, सचिव वैशाली खेडकर, भाग्यश्री जाधव, कविता जकाते, सीमा भाऊसार, उषा कळमकर, संगिता तावरे, निर्मला तोडकर, वैष्णवी भाऊसार, ओवी जाधव तसेच माहेर संस्थेच्या कार्यकर्त्या सुरेखा थिटे यांसह आदी उपस्थित होते.
या महिलांनी सैनिकांना राख्या पाठविताना सिमेवरील सैनिकांना पत्राद्वारे तुम्ही सिमेवर रक्षण करणारे आमचे खरे भाऊ आहात. त्यामुळे आम्ही तुमच्या बहिणी म्हणून तुम्हाला राखी पाठवत आहोत. तुम्ही आमचे रक्षण करो, अशी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही तुमच्या सख्ख्या नाहीत परंतु पक्क्‌या बहिणी असल्याचे महिलांनी पत्राद्वारे सांगितले आहे. यावेळी शिक्रापूर येथील माजी सैनिक संघाच्या माध्यामतून या राख्या टपालने सीमेवरील सैनिकांना पाठविण्यात आल्या आहेत.

रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

सैनिकांमुळे आपण सुरक्षित : आमदार औटी

because of soldiers we are Safe says MLA Auti

टाकळी ढोकेश्वर : दिवसरात्र देशाच्या सेवेसाठी व आपल्या संरक्षणासाठी सिमेवर सैनिक दिवसरात्र उभा असतो म्हणुन आपण सुरक्षित वावरत आहोत त्यांचे उपकार कधीच विसरता येणार नाही प्रत्येक सैनिक कौतुकास पात्र आहे, असे मत आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले.

अळकुटी (ता.पारनेर) येथे सेवानिवृत्त सैनिक विलास परंडवाल यांच्यासह परीसरातील सैनिकांचा सत्कार आमदार औटी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, शिवसेनेचे उपप्रमुख रामदास भोसले,तालुकाप्रमुख विकास रोहकले,सैनिक दिलीप डेरे,माजी सभापती कुंदन साखला उपस्थित होते.

टाकळी ढोकेश्वर : दिवसरात्र देशाच्या सेवेसाठी व आपल्या संरक्षणासाठी सिमेवर सैनिक दिवसरात्र उभा असतो म्हणुन आपण सुरक्षित वावरत आहोत त्यांचे उपकार कधीच विसरता येणार नाही प्रत्येक सैनिक कौतुकास पात्र आहे, असे मत आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले.

अळकुटी (ता.पारनेर) येथे सेवानिवृत्त सैनिक विलास परंडवाल यांच्यासह परीसरातील सैनिकांचा सत्कार आमदार औटी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, शिवसेनेचे उपप्रमुख रामदास भोसले,तालुकाप्रमुख विकास रोहकले,सैनिक दिलीप डेरे,माजी सभापती कुंदन साखला उपस्थित होते.

औटी म्हणाले, सीमेवर दिवसरात्र सैनिक उभा असतो. तो आपल्या सेवेसाठीच,कोणता शत्रु कधीही हल्ला करेल,त्याचा हल्ला परतुन लावण्याची ताकद आपल्या सैनिकांत आहेत. म्हणून आपण सुरक्षित आहोत. सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक सैनिकांचे कौतुक करावे त्यांना मान सन्मान द्यावा. देशसेवेतून परंडवाल निवृत्त होत असताना त्यांचा मुलानेही सैनिक व्हायचे ठरवून तो देशाच्या सेवेसाठी भरती होऊन प्रशिक्षण घेत आहे.

सनी सोनावळे शनिवार, 18 ऑगस्ट 2018

http://www.esakal.com/paschim-maharashtra/because-soldiers-we-are-safe-says-mla-auti-138322

चार ठिकाणी लवकरच वैमानिक प्रशिक्षण संस्था

अमरावती, धुळे, कराड आणि शिर्डी येथे लवकरच खासगी सहभागातून वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) दिला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: August 18, 2018 11:34 PM | Updated: August 18, 2018 11:35 PM

Aeronautical training institute at four places soon | चार ठिकाणी लवकरच वैमानिक प्रशिक्षण संस्थाचार ठिकाणी लवकरच वैमानिक प्रशिक्षण संस्था

- यदू जोशी
मुंबई : अमरावती, धुळे, कराड आणि
शिर्डी येथे लवकरच खासगी सहभागातून वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्रविमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) दिला आहे.
वैमानिक तसेच
विमानतळावर आवश्यक अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्रातच देण्याबाबतचे धोरण एमएडीसीने तयार केले, त्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत पहिली प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येईल, असे एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी लोकमतला सांगितले. वैमानिक, क्रू मेंबर आदींचे प्रशिक्षण देणाºया कंपन्या/संस्थामार्फत हे प्रशिक्षण दिले जाईल. कंपन्या राज्य सरकारला विशिष्ट मोबदला देतील, प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा स्वत:च निर्माण करतील. स्थानिकांना रोजगार मिळेल आणि प्रशिक्षित हवाई वाहतूक कर्मचारीही उपलब्ध होतील. चारपैकी फक्त शिर्डीतून सध्या प्रवासी वाहतूक चालते. प्रशिक्षणाचे काम निविदा काढून दिले जाणार आहे.
शिर्डी विमानतळाची सध्याची धावपट्टी २५०० मीटर इतकी आहे. ती आता ३२०० मीटर लांब बनविण्याचे काम सुरू आहे. तसेच नाईट लँडिंग सुविधाही तेथे लवकरच सुरू होणार आहे. दोन्ही कामे तातडीने पूर्ण झाली नाहीत तरी आॅक्टोबरपासून शिर्डी विमानतळावरून दिल्ली, इंदूर, बंगळुरू, भोपाळ, नागपूर, चेन्नई या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या शिर्डीतून
मुंबई व हैदराबादसाठी विमानसेवा
सुरू आहे.
उडाण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच लहान शहरांमधून विमान वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील सोलापूर वगळता
कोल्हापूर, नांदेड, नाशिक व जळगावमधून विमान वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
अकोला, चंद्रपूरलाही संधी
अकोला विमानतळ बंद असून त्याचा ताबा देण्याची मागणी एमएडीसीने प्राधिकरणाकडे केली आहे. तसे झाल्यास अकोला विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल.
चंद्रपूर जिल्ह्यात राजुरानजीक नवे विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूसंपादन प्रक्रियेस एक महिन्यात सुरूवात होईल. विमानतळ उभारणीसाठी सल्लागाराची नियुक्ती १५ दिवसांत होईल.

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

मंचरमध्ये आज माजी सैनिकांचा मेळावा

मंचर - आंबेगाव तालुक्‍यातील माजी सैनिकांचा वार्षिक मेळावा रविवार (दि. 12) सकाळी 10 वाजता पिंपळगाव फाटा-एस कॉर्नर मंचर येथील गणराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती माजी सैनिक संघाचे आंबेगाव तालुक्‍याचे अध्यक्ष विलास अभंग व सचिव यशवंत गांजाळे यांनी दिली. माजी सैनिक मेळाव्यामध्ये विविध विषयावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये निवृत्तीवेतन, कॅन्टीन, वैद्यकीय सुविधा, पाल्यांच्या शैक्षणिक सवलती यावर चर्चा होईल. याशिवाय आयुर्वेदिक शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

देशाचे पहिले महिला SWAT पथक सज्ज

पथकात सर्व महिला ईशान्य भारतातील
नवी दिल्ली - देशात पहिल्यांदाच महिला स्पेशल वेपन्स अँड टॅक्‍टिस म्हणजेच SWAT कमांडो पथक सज्ज झाले आहे. 36 महिलांचे हे पथक स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी लाल किल्ल्यावर तैनात असणार आहे. तसेच इंडिया गेटवरही महिलांचे SWAT पथक तैनात असेल.

या पथकाची स्थापना सुमारे 15 महिन्यांच्या कठीण प्रशिक्षणानंतर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांचा SWAT पथकात समावेश झाला आहे त्या सर्व ईशान्य भारतातील आहेत. या पथकाला देशासह परदेशातील तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले आहे. या महिला पथकाला बॉम्ब निकामी करणे, इमारतींवर चढणे आणि ओलिसांची सुटका करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पथकाने कालच (10 ऑगस्ट) आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

याआधी या पथकासाठी पुरुषांनाच प्राधान्य होते. महिला SWAT पथक बनवण्याआधी 36 महिलांना 15 महिने कठोर प्रशिक्षण देण्यात आले. पूर्णत: तरबेज झाल्यानंतर त्यांना 'स्पेशल वेपन्स अँड टॅक्‍टिस' पथकात सामील करण्यात आले. महिला कमांडोंचे हे पथक पुरुषांच्या सर्व पाच SWAT पथकांसोबत मिळून दिल्लीत काम करणार आहे.

या महिलांनी "SWAT मधील पुरुषांचे वर्चस्व मोडले आहे. महिला हे काम करु शकत नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण महिला पुरुषांच्या बरोबरीत आहे, हे सांगताना मला अभिमान वाटत आहे, असे दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकारी प्रमोद कुशवाहा म्हणाले.

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य करणार : राजवर्धनसिंग राठोड

नवी दिल्ली : देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी पुढाकार घेतला आहे. आता 2019 सालापासून शालेय अभ्यासक्रमात 50 टक्के कपातकरुन शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. रग्बी या खेळाचा विश्‍वचषक भारतात आला आहे. या ट्रॉफीचे नवी दिल्लीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी क्रीडामंत्री बोलत होते. 2022 सालापर्यंत 'साई' (स्पोर्टस् इंडिया) च्या कर्मचार्‍यांमध्ये कपात करणार आहे. यामधून जो पैसा वाचेल तो खेळाडूंसाठी वापरणार असल्याचे यावेळी क्रीडामंत्री म्हणाले. तसेच शालेय अभ्यासामध्येही 50 टक्के कपात करणार असल्याचे संकेत राजवर्धनसिंग राठोड यांनी दिले.

तर तुमचेही खाते होऊ शकते रिकामे - स्टेट बँकेने दिला इशारा

 

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक इंडियाच्या नावाने खोटे फोन करून गंडा घालणाऱ्या टोळीला अटक करण्यात आल्यानंतर एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी इशारा जारी केला आहे. एसबीआयच्या नावाने काही लोक खोटे संदेश पसरवत आहेत आणि त्यामुळे ग्राहकांचे खाते पूर्णपणे रिकामे होऊ शकते, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला आहे.

बँकेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा संदेश जारी करण्यात आला आहे. बँकेच्या वतीने ग्राहकांना कोणतीही माहिती मागण्यात आलेली नाही. या संदर्भात काही बनावट एसएमएस पसरविण्यात येत आहेत. मात्र बँकेच्या ग्राहकांनी कोणालाही माहिती देऊ नये आणि त्यांनी ती दिलीच तर बँकेला त्वरित कळवावे, असेही बँकेने म्हटले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा रिझर्व्ह बँकेच्या नावाने फसवेगिरी करणाऱ्या एका टोळीला दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली होती. या टोळीने 2000 ग्राहकांना फोन करून 5 कोटी रुपयांचा गंडा घातला होता. या टोळीत 22 टेलिकॉलर महिलांसहित एकूण 30 जण होते. त्यानंतर बँकेने हा इशारा दिला आहे.

भारताचे दरडोई उत्पन्न 80 हजारावर

 

नवी दिल्ली - भारताचे दरडोई उत्पन्न 79 हजार 882 रूपयांवर गेले आहे. गेल्या चार वर्षातील ही उच्चांकी स्थिती आहे असे सरकार तर्फे आज संसदेत सांगण्यात आले. देशाचे दरडोई उत्पन्न सन 2011 ते 2014 या अवधीत 67 हजार 594 इतके होते.

या पार्श्‍वभूमीवर दरडोई उत्पन्नात झालेली ही वाढ लक्षणीय आहे असे सांख्यकी विभागाचे मंत्री विजय गोयल यांनी लोकसभेतील लिखीत उत्तरात सांगितले. गेल्या चार वर्षात 4.6 ते 6.9 टक्के या टप्यांमध्ये नागरीकांच्या दरडोई उत्त्पन्नात वाढ झाल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. देशाच्या दरडोई उत्पन्नाबाबत सदस्यांनी सरकारकडे प्रश्‍न विचारले होते त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी ही आकडेवारी दिली.

शहीद पोचीराम कांबळेंना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

सातारा,दि.8(प्रतिनिधी) - मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोचीराम कांबळे यांना 4 ऑगस्ट रोजी टेंभुर्णी ता. नायगाव जि. नांदेड येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी स्मृती स्तंभाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या पत्नी धोंडामाई आणि परिवाराच्या उपस्थित पार पडला. यावेळी प्रबुद्ध रंगभूमीचे निर्माते भिमपुत्र टेक्‍सास गायकवाड, क्रांती थिएटर्सचे अमर गायकवाड, डी. एस. नरसिंगे, लेखक सुरेश पाटोळे, कीर्तीपाल गायकवाड आणि विवेक घाडगे यांनी तत्कालिन घटनेला उजाळा देताना हा स्तंभ भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले.
प्रबुद्ध रंगभूमी आणि क्रांती थिएटर्सच्यावतीने राज्यात नाटकांचे 32 प्रयोग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सादर करून मिळालेल्या मानधनातून नामांतराच्या लढ्यातील नायकाचा स्तंभ पोचीराम कांबळे यांच्या गावात उभारला. याच ठिकाणी स्मारक बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नामांतराच्या लढयात मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी पहिली आहुती 4 ऑगस्ट 1978 रोजी पोचीराम कांबळे यांना द्यावी लागली. टेंभुर्णी गावातील कार्यक्रमात स्तंभाचे लोकार्पण करताना अमर गायकवाड म्हणाले,पोचीराम कांबळेंच्या बलिदानामुळे बहुजन चळवळीला गती मिळाली.
टेंभुर्णीतील क्रांतीमुळे चळवळीतील आमदार-खासदार आणि मंत्री झाले. मात्र, गेल्या चाळीस वर्षात टेंभुर्णी दुर्लक्षित राहिली. कलाकार हा समाजाचा आरसा असतो, हे पुन्हा सिद्ध झाले. शहीद पोचीराम यांच्या पत्नी गेल्या चाळीस वर्षांपासून नवऱ्याच्या त्यागाला न्याय मिळणार कधी, या प्रतिक्षेत होत्या.
कलाकारांनी निर्माण केलेला स्मृती स्तंभ पाहून त्या गहिवरल्या. भिमपुत्र टेक्‍सास गायकवाड यांनी टेंभुर्णीत स्मारक बांधण्यासाठी कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नांदेड जिल्ह्यासह मुंबई, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे भागातील विविध सामाजिक संघटनांचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रत्येक ग्राहकाच्या नावाने एक वृक्ष लावते 'हे' हॉटेल

नवी दिल्ली - दिल्लीच्या क्लार्क्‍स ग्रुप ऑफ हॉटेलमध्ये तुम्ही जेवण करण्यासाठी गेलात हे हॉटेल पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी तुमच्या नावाने एक वृक्ष लावते. आपल्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या नावाने ज्यात ते वृक्ष लावतात. व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर)नुसार वृक्षारोपणची ही मोहीम चालवली जात आहे.

एक ऑगस्टला या हॉटेलने २०० झाडे लावून या उपक्रमाला सुरुवात केली. २०१८-१९ मध्ये १०००० झाडे लावण्याचे लक्ष्य या ग्रुपने ठेवले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हॉटेलकडून ही मोहीम चालवली जात आहे. हॉटेलने ठरवून दिलेल्या जागेवर हे वृक्षारोपण केले जाणार असून हे हॉटेलच त्याची देखभाल करणार आहे. पुढच्या वर्षासाठीसुद्धा हॉटेलने वृक्षारोपणाचे लक्ष्य ठरवले आहे. हॉटेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१९-२०मध्ये १० हजार झाडे लावण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. क्लार्क्‍स ग्रुपचे प्रबंध निर्देशक अपूर्व कुमार यांनी सांगितले, की पर्यावरण स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आमच्या हॉटेलकडून राबवला जात आहे.

संघ लोकसेवा आयोग - कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसच्या 414 पदासाठी भरती

नवी दिल्ली - संघ लोकसेवा आयोगाने युपीएसी कम्बाइन्ड सर्व्हिसेस (CDS-II 2018) साठी पदांच्या भरती साठी नोटीफिकेशन जाहीर केले आहे. एकूण 414 पदाच्या जागेसाठी भरती असणार आहे. कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर आहे. एकूण 414 पदांमध्ये इंडियन मिलिट्री अॅकडमी, (देहरादून)एकूण पद 100, इंडियन नेवल अॅकडमी(एझिमला) पद45, एअर फोर्स अॅकडमी (हैद्राबाद) पद 32, आॅफिसर्स ट्रेनिंग अॅकडमी (चेन्नई,पुरुष) पद 225, आॅफिसर्स ट्रेनिंग अॅकडमी (चेन्नई, महिला) पद 12 अशी पदसंख्या आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे जरूरीचे आहे. सर्व पदांसाठी वेगवेगळी योग्यता ठरविण्यात आलेली आहे. संबंधित पदांच्या अधिक माहितीसाठी संघ लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in पहावे.

आगामी काळात ई-लर्निंग/ई-स्कूल प्रकल्पावर भर देणे आवश्यक - मुख्यमंत्री

मुंबई : राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. माहिती व तंत्रज्ञानाची कास धरीत येणाऱ्या काळात ई-लर्निंग आणि ई-स्कूलसारखे प्रकल्प राबविण्यावर शालेय शिक्षण विभागाने अधिकाधिक भर द्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक वर्षा निवासस्थानी आज झाली. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, जानेवारी 2016 मध्ये फक्त 10हजारहून अधिक शाळा डिजिटल झाल्या होत्या. आता जून 2018 अखेर 63 हजार500 हून अधिक शाळा डिजिटल झाल्या आहेत, असे असले तरी येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना ई- लर्निंग आणि ई-स्कूल यासारख्या सोयी मिळाव्यात. यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

शाहूपुरी येथे क्रांतीदिनी हुतात्म्यांना अभिवादन

शाहूपुरी ः हुतात्म्यांना अभिवादन करताना शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी.

सातारा, दि. 9 (प्रतिनिधी)- शाहूपुरी येथील आपल्या शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्यावतीने हुतात्मा स्मारक गेंडामाळ येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शालाप्रमुख सौ. एस. एस. क्षीरसागर, अध्यापक संजय बारंगळे, जगदीश सुपेकर यांच्यासह अध्यापक, दत्तात्रय कुचेकर व विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सौ. क्षीरसागर यांनी स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेऊन अनेक अनामिकांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या अपूर्व त्यागाची जाणीव ठेवून सद्यस्थितीत लोककल्याणार्थ कार्यात निरपेक्ष वृत्तीने प्रत्येक भारतीयाने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

मिरारोड - काश्‍मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना अवघ्या 29 व्या वर्षी वीरमरण आले. कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर गुरूवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मिरारोड येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी "कौस्तुभ राणे अमर रहे'च्या घोषणा नागरिकांनी दिल्या. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील असलेले कौस्तुभ राणे हे मीरारोड येथील रहिवासी होते. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

उत्तर काश्‍मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्‍टरमध्ये दहशतवादी एलओसी (नियंत्रण रेषा) पार करुन घुसखोरी करणार असल्याची माहिती 7 ऑगस्टच्या रात्री उशिरा सैन्याला मिळाली होती. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 29 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह मनदीप सिंग रावत, हमीर सिंग, विक्रम जीत सिंग हे जवान शहीद झाले.

मिरारोड भागात कौस्तुभ राणे लहानाचे मोठे झाले. येथील हॉली क्रॉस शाळेत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. कौस्तुभ यांच्या घरातील कोणीही लष्करात नव्हते. कौस्तुभ यांचे वडील टाटा कंपनीत कार्यरत होते, तर आई ज्योती राणे मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या उत्कर्ष मंदिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आहेत. सध्या दोघेही निवृत्त आहेत.
कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका मुलाला घेऊन गावी गेल्या होत्या, तर आई-वडीलही गावी जायच्या तयारीत होते.

मात्र कौस्तुभ यांच्या शहीद झाल्याच्या वृत्ताने राणे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. यंदा कौस्तुभ यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

इतिहास जमा होणार 'पोस्टमन' हा शब्द

आतापर्यंत तुमच्याकडे टपाल आणणारे पोस्टमन यापुढे हे काम करणार नाहीत. तर टपाल घेऊन येण्याचे काम पोस्टपर्सन करणार आहेत. पोस्टमनचे नाव बदलून त्यांना 'पोस्टपर्सन' असा शब्द देण्यावर सध्या सरकार दरबारी विचार सुरू आहे.

माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीने या नामांतराची शिफारस केली आहे. त्यावर हा बदल करण्याबाबत विचार सुरू असल्याचे टपाल खात्याने समितीला कळविले आहे. तसेच पोस्टमनसाठी हिंदीत असलेला शब्द 'डाकिया' हा लिंग-निरपेक्ष असल्याचेही खात्याने सांगितले आहे.

भाजपचे खासदार अनुराग ठाकुर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. टपाल खात्याच्या अनुदान मागणीवरील आपल्या अहवालात समितीने टपाल पोचविणाऱ्या व्यक्तींसाठी वापरण्यात येणारी शब्दावली मागविली होती. त्यातच पोस्टमनला पर्याय म्हणून पोस्टपर्सन हा शब्द वापरण्याची शिफारस करण्यात आली.

मंगळवारी या समितीचा अहवाल संसदेपुढे ठेवण्यात आला. टपाल खात्यात पोस्टमन आणि पोस्टवुमेन हे दोघेही काम करतात. मात्र पोस्टमन हा शब्द केवळ पुल्लिंगवाचक आहे. त्यामुळे हा शब्द बदलण्यासाठी गरज असल्याचे समितीने म्हटले आहे. डाकिया हा शब्द लिंग-निरपेक्ष असल्याबाबतही समितीने संमती व्यक्त केली आहे.

केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय; वाहतूक पोलिसांना मूळ कागदपत्र दाखवण्याची गरज नाही

नवी दिल्ली - केंद्र सरकारने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि वाहतूक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्र घेऊ नका असा आदेश दिला असल्यामुळे यापुढे आता वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रे सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी फक्त तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे.

वाहतूक मंत्रालयाने वाहतूक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत आदेश दिला आहे की, तपासणीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत वाहतूक पोलीस चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्र जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

वाहतूक पोलीस अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवणे, वाहतूक सिग्नल तोडणे तसंच गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणी कारवाई करत कागदपत्र जप्त करतात. पण ही कागदपत्र अनेकदा पोलिसांकडून गहाळ होतात. अशा वेळी आपली कागदपत्र पुन्हा मिळवण्यासाठी लोकांनी तक्रार करुनही वाहतूक विभाग ती मिळवू शकलेला नाही. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ई डेटाबेसच्या आधारे पोलीस संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची मूळ प्रत जमा करण्याची काहाही गरज नाही.

महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली : 'भारत छोडो' आंदोलन, गोवा मुक्ती, हैद्राबाद मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे सन्मान करण्यात आला. क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या 76 व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

सन्मान झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील देवप्पा खोत, नागपूर जिल्ह्यातील गणपतराव गभणे, परभणी जिल्ह्यातील डॉ.अवधूत डावरे आणि वसंत अंबुरे, मुंबईतील गदाधर गाडगीळ आणि अनंत गुरव, पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, वसंत प्रसादे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वसंतराव माने या स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यसैनिक देवाप्पा खोत हे सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील आहेत. सध्या 99 वर्षाचे आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात श्री.खोत यांनी कुपवाड सेंटर (चावडी) येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहभाग घेतला होता. कुपवाड येथून जवळ असणारे माधवनगर येथे रेल्वेरुळ त्यांनी उद्धवस्त केले होते. तसेच तत्कालीन धुळे कोषागार कार्यालयालाही हानी पोहोचविली होती.

आता वाहनपरवाना पोलिसांना दाखविण्याची नाही गरज !

 

 

Now there is no need to show the vehicle ownership to the police

नवी दिल्ली : वाहतूक पोलिसांकडून अनेकदा वाहनांची कागदपत्रे आणि वाहनपरवानाची मागणी केली जात असे. या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास संबंधित वाहनचालकाला दंड आकारला जात असे. मात्र, आता यापुढे पोलिसांना वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करता येणार नाही.

माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल करण्यात आल्याने आता यापुढे वाहतूक पोलिसांना वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करता येणार नाही. याबाबत परिवहन मंत्रालयानेही अध्यादेश जारी केला असून, यामध्ये डिजिलॉकर किंवा एम- परिवहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत.

यापूर्वी अनेकदा वाहनांची कागदपत्रे, वाहनपरवाना, पीयूसी, इन्शुरन्स कागदपत्रेसोबत ठेवणे शक्य होत नव्हते. यामुळे वाहतूक पोलिसांनी अडविल्यास नाहक त्रास भोगावा लागत होता. तसेच भुर्दंडही भरावा लागत होता. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.

वाहन क्रमांकावरून पोलिस त्यांच्या मोबाईल अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा वाहनचालकांसह पोलिसांनाही होणार आहे.

दरम्यान, एम- परिवहन हे अॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध असून, येत्या 10 दिवसांत ते आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

वृत्तसंस्था 

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना साश्रू नयनांनी निरोप

मुंबई - काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (29) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मीरा रोडच्या वैकुंठपार्क स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

"धीरल सागर' इमारतीबाहेर हुतात्मा राणे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच रांग लागली होती. सकाळी पावणेदहाच्या सुमारास लष्कराच्या सजवलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा निघाली.

अंत्ययात्रा मार्गस्थ होत असताना चौकाचौकांत नागरिक सहभागी होत होते. शीतल नगर परिसरात पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मीरा रोड स्थानक परिसरापर्यंतचा संपूर्ण रस्ता फुलांच्या पाकळ्यांनी सजवला होता. अंत्ययात्रा मार्गस्थ होत असलेले दोन्ही बाजूंकडील रस्ते वाहनांसाठी बंद होते. दुकानदार दुकाने बंद करून अंत्ययात्रेत सहभागी झाले.

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीचे राणे कुटुंब 30 वर्षांपासून मीरा रोड परिसरात राहत आहे. कौस्तुभ यांच्या मागे आई, वडील, पत्नी, बहीण, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. गढवाल रायफल्स युनिटचे दक्षिण-पश्‍चिम कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल चेरीश माथसन यांच्या नेतृत्वाखाली राणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक नवीन बजाज, ठाणे ग्रामीण पोलिस आणि लष्कराच्या तिन्ही दलांच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली.

बहिणींकडून शेवटची राखी
मेजर कौस्तुभ राणे यांना एक लहान सख्खी बहीण व चार चुलत बहिणी आहेत. ते लष्करात गेल्यापासून बहिणी टपालाने राखी पाठवत. काही दिवसांवर आलेल्या राखीपौर्णिमेसाठी आपल्या लाडक्‍या भावाला आता राखी पाठविता येणार नसल्यामुळे त्यांनी कौस्तुभला आवडत असलेले कॅडबरी चॉकलेट व राखीची भेट देत अखेरचा निरोप दिला. ते पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले.

शुक्रवार, २० जुलै, २०१८

जमावाकडून होणारी हत्यासत्रे थांबवण्यासाठी नवीन कायदा करा

सर्वोच्च न्यायालयाची सरकारला सूचना
नवी दिल्ली - देशात जमावाकडून काही व्यक्तींना ठार मारण्याच्या घटना अलिकडच्या काळात घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी संसदेने नवीन कायदा तयार करावा अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज ही सूचना करताना असे प्रकार रोखण्यासाठी तसेच गायींच्या हत्येवरून होणारे हल्ले थांबवण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाहीं जारी केल्या आहेत.

राज्यात कोणालाही कायदा हातात घेऊ न देण्याची जबाबदारी राज्य सरकारांना स्वीकारावी लागेल व असे प्रकार त्यांनी रोखावेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणे ही सर्वस्वी राज्य सरकारांचीच जबाबदारी आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे. लोकांना कायदा हातात घ्यायला लावता कामा नये आणि लोकांनीही स्वताच कायदा असल्याच्या थाटात वागू नये असेही न्यायालयाने सुनावले आहे. जमावाकडून होणारे हल्ल्यांचे प्रकार अलिकडे वारंवार होत आहेत त्या प्रकारांना पोलादी हातानेच रोखले पाहिजे. राज्य सरकारांना या प्रकारांविषयीची जबाबदारी टाळता येणार नाही असेही न्यायालयाने नमूद केले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद असलेला नवीन कायदा संसदेनेही संमत केला पाहिजे अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.

लष्करी विधि महाविद्यालय देशात सर्वोत्कृष्ट होईल

लेफ्ट. जनरल डी.आर. सोनी : विक्रमी वेळेत सुरू झाले कॉलेज

पुणे - फक्‍त पाच महिन्यांत महाविद्यालय सुरू करणे कठीण होते. परंतु, असाध्य गोष्टीदेखील उत्कृष्टपणे साध्य करणे, हीच सैन्याची खासियत आहे. त्यामुळे विक्रमी वेळेत हे लष्करी विधि महाविद्यालय उभारणे साध्य झाले, अशा शब्दांत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी जवानांचे कौतुक केले. तसेच पुढील पाच वर्षांत हे महाविद्यालय हे देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय बनेल, असा विश्‍वासही सोनी यांनी व्यक्त केला.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे सैनिक कल्याण उपक्रमांतर्गत लोणावळा जवळील कान्हे येथे "आर्मी लॉ कॉलेज'चे लेफ्टनंट जनरल सोनी यांच्या हस्ते उद्‌घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायायाधीश डी. जी. कर्णिक, राधा कालियनदास दर्याननी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रेम दर्याननी, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, लॉ कॉलेजचे अध्यक्ष ए. के. शुक्‍ला उपस्थित होते.

सोनी म्हणाले, "मुले ही देशाचे भविष्य आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल असे शिक्षण या महाविद्यालयात दिले जाणार आहे. सुरवातीला 60 मुले याठिकाणी प्रशिक्षण घेतील. सध्या प्रत्येक क्षेत्रात "कॉर्पोरेटायझेशन' होत आहे. अशा स्पर्धेच्या युगात या महाविद्यालयाचे विद्यार्थी टिकून राहावे, यासाठी बी.बी.ए. आणि एल.एल.बी अशाप्रकारचा अभ्यासक्रम देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त संस्थेत क्रीडा सुविधादेखील उभारल्या जाणार आहेत.

कर्णिक म्हणाले, "लष्करी कुटुंबातील मुलांसाठी स्वतंत्र विधि महाविद्यालय सुरू होणे अभिमानाची गोष्ट आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी "त्यांच्या पालकांचे शस्त्र हे बंदूक आहे तर तुमच्याकडे पेन आणि भाषा हे शस्त्र आहे,' ही बाब नेहमी लक्षात ठेवावी. तसेच आपल्या शस्त्रांचा योग्य वापर करावा.'

दर्याननी म्हणाले, "सैन्य दलास उपयुक्त अशाप्रकारे पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी ही जागा देण्यात आली आहे. फक्‍त पाच महिने इतक्‍या कमी वेळात महाविद्यालयाची उभारणी करणे आव्हान होते. पण लष्कराने नियोजनबद्ध पद्धतीने कमी वेळेत काम पूर्णत्वास नेले. या माध्यमातून समाज हा लष्कराच्या सदैव पाठीशी आहे, हाच संदेश द्यायचा आहे.'

सर्वसामान्य विद्यार्थीही घेऊ शकतील प्रवेश

लष्करी विधि महाविद्यालयात सध्या फक्‍त लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. गुणवत्तेच्या आधारावर ही निवड करण्यात आली आहे. मात्र, आगामी काळात संस्थेचा विस्तार करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसोबतच प्रशासकीय पातळीवर विविध बदल केले जातील. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही या संस्थेतून शिक्षण घेऊ शकतील. मात्र त्यांची निवडदेखील गुणवत्तेच्याच आधारावर होणार आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल सोनी यांनी दिली.

Dailyhunt

लष्करात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही

 

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली - लष्करातील सर्व विभाग आणि देशभरातील तळांवर नेमून दिलेल्या शिस्तपालन उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात देशभरातील 12 लाख लष्करी जवानांशी लष्कर प्रमुखांनी संवाद साधला. त्यावेळी शिस्तभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत.

सुरक्षा दलांनी आपल्या उपलब्ध अर्थिक स्रोतांचा न्याय्य मार्गाने उपयोग व्हायलाच पाहिजे. तसेच सुरक्षा दलांना मिलीटरी कॅन्टीनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या किराणा सामान आणि मद्यसुविधेचा गैरवापर केला जाऊ नये. भ्रष्टाचार आणि नैतिक तापटपणाशी संबंधित प्रकरणांची कठोरपणे दखल घ्यायला हवी. अधिकाऱ्यांनी पदोन्नती आणि बढतीसाठी केवळ चकचकीतपणावर विसंबून रहायला नको. जे बढती आणि पदोन्नतीस पात्र आहेत त्यांना योग्य मोबदला मिळेल, अशी हमी देखील लष्कर प्रमुखांनी दिली आहे. पात्र लष्करी अधिकाऱ्यांशिवाय कोणाही निवृत्त अधिकाऱ्यासह सहायक सेवा दिली जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

लष्करातील 12 लाख जवानांच्या शारीरिक सुदृढतेवर लष्कर प्रमुखांनी विशेष भर दिला. जवानांनी आरोग्यास अपायकारक अन्नाचे सेवन करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. शिस्तीचे हे निकष गेल्या काही दशकांपासून अस्तित्वात आहे. लष्कर प्रमुख जन. रावत यांनी या निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बुधवार, १८ जुलै, २०१८

लष्कराचे काश्‍मीरात लोकाभिमुखच धोरण

लष्कर प्रमुखांचा दावा
नवी दिल्ली - जम्मू काश्‍मीरात राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर लष्कराच्या तेथील भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, आमची तेथील भूमिका नेहमीप्रमाणे लोकाभिमुख स्वरूपाचीच आहे असे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे. आमचे तेथील धोरण हे दहशतवाद्यांचा नायनाट करायचा हे आहे. तेथील सामान्य नागरीकांना त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेऊ असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यपाल राजवटीनंतर लष्कराने तेथे आक्रमकपणा स्वीकारला आहे या म्हणण्यात तथ्य नाही असेही त्यांनी आज येथे, पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की राज्यपाल राजवटीनंतर काश्‍मीरातील लष्कराचे धोरण कठोर झाले आहे असे सर्व साधारण चित्र रंगवले जात आहे पण त्यात तथ्य नाही.

लष्करप्रमुखांनी आज येथे बारामुल्ला येथील विद्यार्थ्यांशीही चर्चा केली. त्यात पाच विद्यार्थींनींचाही समावेश होता. काश्‍मीरातील दगडफेक आणि दहशतवादी कारवाया थांबल्या तर आपल्याही परिसराचा दिल्ली किंवा देशातील अन्य मोठ्या शहरांप्रमाणे विकास होऊ शकतो हा संदेश हे विद्यार्थी आता येथून काश्‍मीरात नेतील असा विश्‍वासही जनरल रावत यांनी यावेळी व्यक्त केला

सोमवार, ९ जुलै, २०१८

दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्याला 2 वर्ष पूर्ण; काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक उपाय

श्रीनगर : भारतीय लष्कराने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला 8 जुलै 2016 रोजी कंठस्नान घातले होते. या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शिवाय, इंटरनेट सेवादेखील बंद ठेवली आहे. तर दुसरीकडे, दहशतवाद्यांनी बंदची हाक दिल्यानं आज एका दिवसासाठी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक एस.पी.वैद यांनी सांगितले की, सध्या जम्म काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाहीय. त्यामुळे भाविकांना सुरक्षितरित्या अमरनाथा यात्रा करता यावी, यासाठी आम्ही सर्वेतोपरी प्रयत्न करत आहोत. दहशतवाद्यांकडून रविवारी बंदची हाक देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे एक दिवसासाठी आम्ही यात्रा थांबवली आहे. काश्मीर खोऱ्यातील तणावाची स्थिती पाहता, भाविकांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी बुरहान वानी यांच्या खात्मा करण्याच्या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाई होण्याचा धोका लक्षात घेता श्रीनगर हायवेपासून 300 किलोमीटर परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रन्ट (जेकेएलएफ) चा अध्यक्ष यासीन मलिकलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दक्षिण काश्मीरमधील एका गावात शोधमोहीमेदरम्यान शनिवारी जमावानं सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक केली. यावेळी जवानांनी प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, शोपिया, अनंतनाग आणि पुलवामामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

8 जुलै 2016ला बुरहान वानीचा खात्मा
भारतीय लष्करानं 8 जुलै 2016 ला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरात बुरहान वानीचा खात्मा केला होता. त्राल येथील रहिवासी असलेल्या बुरहान वानीला चकमकीदरम्यान कंठस्नान घालण्यात आले. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय म्हणून ओळखला जायचा. त्याच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी हिंसक निदर्शनं करण्यात आली होती.

रविवार, ८ जुलै, २०१८

दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्याला 2 वर्ष पूर्ण; काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक उपाय

श्रीनगर : भारतीय लष्कराने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला 8 जुलै 2016 रोजी कंठस्नान घातले होते. या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शिवाय, इंटरनेट सेवादेखील बंद ठेवली आहे. तर दुसरीकडे, दहशतवाद्यांनी बंदची हाक दिल्यानं आज एका दिवसासाठी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक एस.पी.वैद यांनी सांगितले की, सध्या जम्म काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाहीय. त्यामुळे भाविकांना सुरक्षितरित्या अमरनाथा यात्रा करता यावी, यासाठी आम्ही सर्वेतोपरी प्रयत्न करत आहोत. दहशतवाद्यांकडून रविवारी बंदची हाक देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे एक दिवसासाठी आम्ही यात्रा थांबवली आहे. काश्मीर खोऱ्यातील तणावाची स्थिती पाहता, भाविकांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी बुरहान वानी यांच्या खात्मा करण्याच्या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाई होण्याचा धोका लक्षात घेता श्रीनगर हायवेपासून 300 किलोमीटर परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रन्ट (जेकेएलएफ) चा अध्यक्ष यासीन मलिकलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दक्षिण काश्मीरमधील एका गावात शोधमोहीमेदरम्यान शनिवारी जमावानं सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक केली. यावेळी जवानांनी प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, शोपिया, अनंतनाग आणि पुलवामामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

8 जुलै 2016ला बुरहान वानीचा खात्मा
भारतीय लष्करानं 8 जुलै 2016 ला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरात बुरहान वानीचा खात्मा केला होता. त्राल येथील रहिवासी असलेल्या बुरहान वानीला चकमकीदरम्यान कंठस्नान घालण्यात आले. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय म्हणून ओळखला जायचा. त्याच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी हिंसक निदर्शनं करण्यात आली होती.

बुधवार, १६ मे, २०१८

मुलासाठी फौजी लढतोय अन्‌ रडतोयही!

सकाळ वृत्तसेवा

मंगळवार, 15 मे 2018

indian-army-soldier

पुणे - फौजी... फौजी... म्हणत आपण सगळे जण मोठ्या अभिमानाने ‘इंडियन आर्मी’चे गुणगान करतो. पुणे तर लष्कराचे दक्षिण मुख्यालय. अनेक पराक्रमी अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेले शहर. पण, याच शहरात एक फौजी आपल्या सात वर्षांच्या पिलाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी गेली आठ दिवस एकाकी ‘लढत’ होता अन्‌ रडतही होता.

काश्‍मीरमधल्या गुलमर्ग येथे ‘ड्यूटी’ करणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) हा सैनिक. वजा दहा अंश सेल्सिअस तापमानात, बर्फामध्ये पाय रोवून देशाची सीमा अभेद्य ठेवणारा हा जवान.

पुणे - फौजी... फौजी... म्हणत आपण सगळे जण मोठ्या अभिमानाने ‘इंडियन आर्मी’चे गुणगान करतो. पुणे तर लष्कराचे दक्षिण मुख्यालय. अनेक पराक्रमी अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेले शहर. पण, याच शहरात एक फौजी आपल्या सात वर्षांच्या पिलाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी गेली आठ दिवस एकाकी ‘लढत’ होता अन्‌ रडतही होता.

काश्‍मीरमधल्या गुलमर्ग येथे ‘ड्यूटी’ करणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) हा सैनिक. वजा दहा अंश सेल्सिअस तापमानात, बर्फामध्ये पाय रोवून देशाची सीमा अभेद्य ठेवणारा हा जवान.

सीमेवर सातत्याने होणाऱ्या ‘फायरिंग’मुळे सुटी मिळणे अवघड. कशीबशी दहा दिवस सुटी घेऊन हा जवान कोल्हापूर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी आला. घरी येताच पिलाला आपल्या छातीशी कवटाळत तो म्हणाला, ‘‘मी आलोय तुला काही होऊ देणार नाही.’’

या फौजीने मुलाच्या उपचारांसाठी पुणे गाठले. सुरवातीला ससून रुग्णालयात आला. तेथे ‘वेटिंग लिस्ट’ होती. पण, फौजीला परत ‘ड्यूटी’वर जायचे असल्याने त्याची पावले खासगी रुग्णालयाकडे वळली. ‘सेंट्रल गव्हर्न्मेंट हेल्थ स्किम’मधून (सीजीएचएस) ही शस्त्रक्रिया करता येणार होती. त्यासाठी त्याने कागदपत्रांची जुळवाजुळव केली. पुण्यातील कर्वे रस्त्यावरील रुग्णालयात तपासण्या झाल्या. तेथे ऑपरेशन करण्याचे ठरले. मुलाला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केले. पण, त्या वेळी ३५ हजार रुपये भरण्याचे फर्मान रुग्णालय प्रशासनाने सोडले. ‘सीजीएचएस’मधून पैसे मिळणार असूनही हे जास्तीचे पैसे का, या फौजीच्या प्रश्‍नाला उत्तर देताना रुग्णालय प्रशासनाने सांगितले, की ‘‘ऑपरेशनसाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च येणार आहे. ते तुमचे ३५ हजार रुपयांमध्ये करत आहोत.’’

या उत्तरावर कोणताही प्रश्‍न न करता फौजी परत गावी आला. चार-पाच दिवसांमध्ये पैशाची जुळवाजुळव केली. जमा झालेले २५ हजार रुपये घेऊन तो परत रुग्णालयात आला. रुग्णालयाने २० हजार रुपये जमा करून घेतले. त्याच्या मुलाचे ऑपरेशन आता झाले आहे. त्याची प्रकृतीही सुधारत आहे. पण, आता फौजी मात्र राहिलेली रक्कम उभारण्यासाठी ‘लढत’ आहे.

...अन्‌ तो मनोमन कोसळला
‘‘तुम्ही ऑपरेशन करा मी पैसे भरतो. मी फौजी आहे. तुमचे सगळे पैसे देतो. पण, जास्तीचे पैसे घेऊ नका.’’ या फौजीच्या वाक्‍यावर प्रशासनाचा कारभार सांभाळणारे डॉक्‍टर म्हणाले, ‘‘तू कोण आहेस हे सांगू नकोस, पैसे भर आणि मुलाचे ऑपरेशन कर.’’ शत्रूचा अचूक वेध घेणारा हा जवान या वाक्‍याने मनातून कोसळला. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. अखेर, दुसऱ्या एका डॉक्‍टरांच्या मध्यस्थीने त्याला तात्पुरता दिलासा मिळाला.

सोमवार, १४ मे, २०१८

३७ वैमानिक देशसेवेत : लष्करी थाटात एव्हिएशन विंग प्रदान

अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत कौशल्याचा वापर करत भारतीय सैन्यदलासाठी उत्कृष्ट योगदान द्यावे. लढाऊ वैमानिकापुढे आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णायक भूमिका बजावण्याचे आव्हान असते, त्यामुळे आपले महत्त्व ओळखून स्वत:ला सिद्ध करत अभिमानास्पद कामगिरी बजवावी, असा गुरुमंत्र ‘आर्मी एव्हिएशन विंग्ज’चे संचालक लेफ्टनंट जनरल कंवलकुमार यांनी दिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: May 13, 2018 12:15 AM | Updated: May 13, 2018 12:15 AM

37 Airliner Country Service: Provided Army Thackeray Avenition Wing | ३७ वैमानिक देशसेवेत : लष्करी थाटात एव्हिएशन विंग प्रदान

नाशिक : अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत कौशल्याचा वापर करत भारतीय सैन्यदलासाठी उत्कृष्ट योगदान द्यावे. लढाऊ वैमानिकापुढे आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णायक भूमिका बजावण्याचे आव्हान असते, त्यामुळे आपले महत्त्व ओळखून स्वत:ला सिद्ध करत अभिमानास्पद कामगिरी बजवावी, असा गुरुमंत्र ‘आर्मी एव्हिएशन विंग्ज’चे संचालक लेफ्टनंट जनरल कंवलकुमार यांनी दिला. ‘हॅप्पी लॅण्डिंग’ या शब्दात देशसेवेत दाखल झालेल्या लढाऊ वैमानिकांना उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.  निमित्त होते गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ हेलिकॉप्टरच्या प्रशिक्षणार्थींच्या २९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे. शनिवारी (दि.१२) सैनिकी ब्रास बॅण्डच्या ‘कदम कदम बढाये जा...’च्या धूनवर ३७ प्रशिक्षणार्थी वैमानिकांनी उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार संचलन करत उपस्थित उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कंवलकुमार यांच्या हस्ते ३७ वैमानिकांसह लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांच्या प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाºया दहा अधिकाºयांना एव्हिएशन विंग, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  यावेळी कंवलकुमार पुढे म्हणाले, धाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक नेहमीच यशस्वी ठरतो. राष्टÑसेवेसाठी ‘एव्हिएशन स्कूल’च्या उत्कृष्ट अशा व्यासपीठावरून तुमचे भारतीय सैन्यदलात आगमन झाले आहे, त्याचा अभिमान बाळगावा. नव्या हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितरीत्या उड्डाण करत चोखपणे आपली कामगिरी बजवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी उपचारार्थ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ विमानचालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थी जवानांना देण्यात आले. या प्रशिक्षणार्थी जवानांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला.
‘आॅपरेशन विजय’मधून युद्धभूमीचा थरार
युद्धजन्य परिस्थितीमध्ये भूदलावरील जवानांना महत्त्वाची मदत देण्यासाठी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे कौशल्य अधोरेखित करण्यासाठी हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी ‘आॅपरेशन विजय’ची झलक उपस्थितांना दाखविण्यात आली. चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने युद्धभूमीवर तत्काळ पॅराशूटद्वारे उतरणाºया सैनिकांसह पोहचणारे जवान, चेतक द्वारे त्यांना पुरविण्यात आलेली रसद आणि शत्रूच्या छावण्यांवर सैनिक हल्ला चढवितात. अल्पवधीत शत्रूवर विजय मिळवून सैनिक आनंदाने तिरंगा फडकावून सलामी देतात. या आॅपरेशनमध्ये जखमी झालेल्या सैनिकांना पुन्हा ‘चेतक’द्वारे सुरक्षितरीत्या युद्धभूमीवरून हलविले जाते.
प्रशिक्षण दृष्टिक्षेपात
१८ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी वैमानिक लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे धडे घेतात. युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर वापराचे कसब, शत्रूवर हवाई हल्ल्याच्या वेळी हेलिकॉप्टरचा वापर, भूदलाला वेळोवेळी विविध आव्हानांचा सामना करत रसद पुरविणे, जखमी जवानांना युद्धभूमीवरून तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविणे अशा अनेकविध बाबींचा तंत्रशुद्ध अभ्यास करत प्रत्यक्षरीत्या सरावातून वैमानिक लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे प्रशिक्षण घेत असतात.
लष्करी थाटात ३७ वैमानिकांसह दहा प्रशिक्षकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र आर्मी एव्हिएशनचे संचालक अतिविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट कंवल कुमार यांनी प्रदान केले.  चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिकांनी रंगलेला ‘कॅट्स’चा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात पार पडला. वैमानिक प्रशिक्षण कालावधीत अष्टपैलू कामगिरी के ल्याबद्दल अभिषेक सिंग यांना सिल्व्हर चित्ता, तर उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून मेजर राज सिंग यांना गौरविण्यात आले.
यांचा झाला गौरव
उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींमध्ये कॅप्टन विवेक आनंद गुप्ता, कॅप्टन बी. के. रेड्डी, कॅप्टन दत्ता यांच्यासह एव्हिएशन प्रशिक्षक मेजर प्रियांक पुरी, मेजर निखिल टेटिया, उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून मेजर राज सिंग यांना गौरविण्यात आले. त्यांना सन्मानपूर्वक विविध स्मृतिचिन्ह व पदक प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी दिली जाणारी ‘सिल्व्हर चित्ता’ ट्रॉफी कॅप्टन अभिषेक सिंग यांनी मिळविली.

रविवार, ८ एप्रिल, २०१८

जवानाकडून गरीब विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप

राजेंद्र पाटील बुधवार, 4 एप्रिल 2018

Jalgaon

देशाच्या सीमेवर उभे राहून सरक्षण करणारे अविनाश पाटील हे सुटिवर गावी आले आहेत. गावी आल्यानंतर देखील त्यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायने शाळेत येताना पाहिले. त्यांना चप्पल देण्याचा निश्यय केला.

जळगाव : नांद्रा (ता.पाचोरा) जवळील आसनखेडा येथील जि.प.मराठी शाळेत येथील सिमा सुरक्षा बलातील जवान बाबुलाल दौलत पाटील यांचे चिरंजीव अविनाश बाबुलाल पाटील (बीएसएफ) यांनी आज शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना ज्यांना चपला नाहीत. जे अनवाणी पायाने उन्हाचे चटके सहन करुण शाळेत येतात. अशा गरजु विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप केले. साधारण पन्नास विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला.

देशाच्या सीमेवर उभे राहून सरक्षण करणारे अविनाश पाटील हे सुटिवर गावी आले आहेत. गावी आल्यानंतर देखील त्यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायने शाळेत येताना पाहिले. त्यांना चप्पल देण्याचा निश्यय केला. त्यानुसार आज शाळेतील मुलाना चप्पल वाटप केल्या. चपला भेटल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहेरावरील आनंद पहाण्यासारखा होता.

यावेळी उपसरपंच कैलास पाटील, हिमंत पाटील, विजय पाटील, संभाजी पाटील, डाँ.राजेंद्र बोरसे, सयाजी पाटील, लक्ष्मण पाटील, नांद्रा ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी, पोलीस पाटील किरण पाटील, अंगणवाडी सेविका ,जि.प.शाळेतील मुख्यध्यापक संगिता पाटीलउपशिक्षक नाना पवळ, जयवंत खैरनार, निलीमा चव्हाण, वैशाली पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

http://www.esakal.com/uttar-maharashtra/jawan-distribute-chappals-jalgaon-107453

जवानांसाठी ‘भाभा कवच’ मंगेश सौंदाळकर

barc

मुंबई - डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने हलक्‍या वजनाच्या, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बुलेटप्रूफ जॅकेट्‌सची निर्मिती केली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या जॅकेट्‌सना ‘भाभा कवच’ असे नाव देण्यात आले आहे. ही जॅकेट्‌स आयात करून आणलेल्या महागड्या जॅकेट्‌सपेक्षा मजबूत असतील.

मुंबई - डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने हलक्‍या वजनाच्या, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बुलेटप्रूफ जॅकेट्‌सची निर्मिती केली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या जॅकेट्‌सना ‘भाभा कवच’ असे नाव देण्यात आले आहे. ही जॅकेट्‌स आयात करून आणलेल्या महागड्या जॅकेट्‌सपेक्षा मजबूत असतील.

सध्या जवान वापरत असलेली जॅकेट्‌स दहा किलोपेक्षा अधिक वजनाची आहेत. जड वजनाचे हे जॅकेट घालून सीमेवर दहशतवाद्यांशी दोन हात करताना जवानांना काही अडचणी येतात. हल्ली दहशतवाद्यांनी चिनी बनावटीची, अत्यंत कठीण स्टीलचे आवरण असलेली काडतुसे वापरण्यास सुरवात केली आहे. ती काडतुसे या जॅकेटना छेदून जात असल्याची बाब केंद्रीय गृह विभागाच्या निदर्शनास आली होती. दहशतवादी संघटनांनी काही दिवसांपासून  पोलिस, जवानांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षी जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे ‘जैश’च्या दहशतवाद्यांशी लढताना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पाच जवान हुतात्मा झाले होते. त्याची गंभीर दखल घेत गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जॅकेट्‌सचे वजन कमी करण्याबाबत अणुऊर्जा विभागाच्या सचिवांशी चर्चा केली.

जॅकेटची वैशिष्ट्ये
डॉ. किंशूक दासगुप्ता यांच्या चमूने लेव्हल तीनचे एक, लेव्हल तीन प्लसची दोन जॅकेट्‌स तयार केली.
लेव्हल तीनच्या जॅकेटचे वजन साडेचार किलो तर लेव्हल तीन प्लसच्या जॅकेटचे वजन साडेसहा किलो आहे.
लेव्हल तीन प्लसचे जॅकेट एके-४७ रायफलच्या गोळ्यांचा तसेच चिनी बनावटीच्या काडतुसांचा मारा रोखू शकते.
लेव्हल तीन प्लसच्या पुढील भागात बसविण्यात आलेल्या प्लेटमुळे जवानांना गोळीचा सौम्य झटका बसेल.
जॅकेटचे वजन कमी असल्याने जवानांना गोळीबार करताना अडचणी येणार नाहीत.

http://www.esakal.com/maharashtra/production-bulletproof-jackets-make-india-108117

सोमवार, २ एप्रिल, २०१८

रेशनकार्डाचीही पोर्टेबिलिटी

डॅनियल काळे :08.23 AM

कोल्हापूर - ज्याप्रमाणे मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलता येते म्हणजे पोर्टेबिलिटी करता येते, तशाच प्रकारे यापुढे कोणत्याही शिधावाटप दुकानात तुमचे रेशनकार्ड चालणार आहे. त्यामुळे या राज्यातून दुसऱ्या राज्यात अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर झाले तरीही आधीचे कार्ड रद्द करून नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.

कोल्हापूर - ज्याप्रमाणे मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलता येते म्हणजे पोर्टेबिलिटी करता येते, तशाच प्रकारे यापुढे कोणत्याही शिधावाटप दुकानात तुमचे रेशनकार्ड चालणार आहे. त्यामुळे या राज्यातून दुसऱ्या राज्यात अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर झाले तरीही आधीचे कार्ड रद्द करून नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.

या व्यवस्थेसाठी सरकार एकीकृत व्यवस्थेवर (आयएमपीडीएस) सध्या काम करत आहे. ही पद्धत महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणासह काही राज्यांत अंशतः लागू आहे. अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या माहितीनुसार येत्या दोन वर्षांत ही आयएमपीडीएस नावाची योजना सर्वत्र लागू होणार आहे. त्यासाठी १२७ कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार करणार आहे.

देशव्यापी पोर्टेबिलिटीशिवाय अतिरिक्त डुप्लिकेट रेशनकार्ड रद्द करण्याचेही काम त्याखाली केले जाईल.  सार्वजनिक वितरणप्रणाली राज्याच्या पोर्टल्सला जोडण्याबरोबरच रेशन कार्डचे व्यवस्थापन, वितरण, पुरवठा व रेशन दुकानांच्या स्वयंचलनाचे कामही याअन्वये केले जाईल.

पार्टेबिलिटी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी देशभरातील रेशन दुकानदारांची आणि कार्डांची संख्या पाहिली तर हे खूपच मोठे आव्हान आहे. यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊन गुंता निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सरकारने रेशन दुकानदार, ग्राहकांना  विश्‍वासात घेऊनच ही यंत्रणा अमलात आणावी.
- चंद्रकांत यादव,
रेशन बचाव आंदोलक

रेशन दुकानात आधार सक्तीचे
रेशन दुकानात स्वस्त धान्य मिळविण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत.ज्या कार्डधारकांकडे आधार कार्डच नाही, अशा नागरिकांना ३० जूनपर्यंतच मुदत दिली आहे. या काळात त्यांनी आधार कार्ड काढून घ्यायचे आहे. अन्यथा यापुढे आधार कार्डशिवाय रेशनधान्य मिळणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

 

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर तुमीरकसा गाव झाले प्रकाशमय

अहेरी - तुमरीकसा येथे वीजयंत्रणा सुरू करताना महावितरणचे कर्मचारी.

अहेरी - तालुक्‍यापासून २२ किमीवर असलेल्या अतिदुर्गम व संवेदनशील भागात वसलेल्या तुमीरकसा गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अथक प्रयत्नातून वीज पोहोचली आहे. यामुळे गाव प्रकाशमय झाले आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीपीटीसी)अंतर्गत २०१७-१८ या वर्षाकरिता निधी मंजूर करून अहेरी उपविभागातील गावात वीज पोहोचविण्यासाठी पालकमंत्री आत्राम यांनी पुढाकार घेतला. मागील १५ दिवसांपूर्वीच कासमपल्ली व गुर्जा या गावांत वीजजोडणी करण्यात आली. शनिवारी (ता. ३१) अतिदुर्गम व संवेदनशील भागात पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या तुमीरकसा या  गावात पालकमंत्र्यांचा सूचनेनुसार महावितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक (नागपूर परिक्षेत्र) भालचंद्र खंडाईत व चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी वीजजोडणी केली. तसेच जनतेशी संवाद साधला. या वेळी गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता अशोक मस्के, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे, उपकार्यकारी अभियंता वाशीमकर व कंत्राटदार प्रशांत टिपले उपस्थित होते. तुमीरकसा हे अविकसित गाव असून जाण्यासाठी रस्ता नाही.  पाण्याची सोय नाही. शाळा आहे पण शिक्षक नाही. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत. अशा कठीण परिस्थितीत या गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी विजेचे दर्शन झाले. अवघ्या बावीस घरांची वस्ती असलेल्या या गावातील सर्वच घरांना सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत वीजजोडणी देण्यात आली.

सर्वांना एक एलईडी बल्ब देण्यात आले. ६३ केव्हीए रोहित्र उभारून २.५ उच्चदाब व ०.९० लघुदाब विजेची व्यवस्था करण्यात आली. शंभर टक्‍के आदिवासी लोकवस्ती असलेल्या या गावातील नागरिकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून आदिवासी रेला नृत्य सादर केले. ढोल-ताशाच्या गजरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. या वेळी गावचे सरपंच, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच आलापल्ली व भामरागडचे वीज विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अनेक गावांना प्रतीक्षा
एकीकडे जग संगणक आणि इंटरनेटच्या विश्‍वाशी जोडले जात असताना जिल्ह्यातील अनेक गावांनी अद्याप विजेचा दिवा पाहिलेला नाही. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही त्यांना अंधारात जगावे लागत आहे. तुमरीकसा येथे वीज आली असली; तरी असे अनेक गावे अद्याप विजेपासून वंचित आहेत. या गावांमध्येही तत्काळ वीज पोहोचविण्याची मागणी महावितरण कंपनीकडे करण्यात आली आहे.

Web Title: aheri vidarbha news tumirkasa village electricity