नवी दिल्ली, 31-1-2016
माझ्या प्रिय देशवासियांनो, 2016 सालातील ही पहिलीच “मन की बात” आहे. “मन की बात” ने असे धरुन ठेवले आहे, असे धरुन ठेवले आहे की, कोणतीही गोष्ट दृष्टीस पडली, कोणताही विचार आला की तो तुम्हाला सांगण्याची इच्छा होते. काल मी पूज्य बापूना श्रध्दांजली वाहण्यासाठी राजघाटावर गेलो होतो. शहिदांना नमन करण्यासाठी हा दरवर्षी होणारा कार्यक्रम आहे. ठिक 11 वाजता 2 मिनिटांसाठी मौन पाळून, देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या, प्राणसर्वस्व अर्पिणाऱ्या महापुरुषांसाठी, वीर पुरुषांसाठी, तेजस्वी तपस्वी लोकांसाठी श्रध्दा व्यक्त करण्याची ही एक संधी असते. परंतु जर आपण पाहिले, आमच्यापैकी काही लोक आहेत, ज्यांनी हे केलेले नाही. तुम्हाला नाही वाटत की हा स्वभाव बनला पाहिजे, या गोष्टीला आम्ही आपले राष्ट्रीय कर्तव्य समजायला हवे ? मला याची जाणीव आहे की माझ्या “मन की बात” ने हे होणार नाही.
परंतु जे मी काल अनुभवले, वाटले की ते तुमच्याशीसुध्दा बोलावे आणि हीच गोष्ट आहे जी देशासाठी आपल्याला जगण्याची प्रेरणा देते. आपण कल्पना तर करु शकाल, प्रत्येक वर्षी 30 जानेवारी रोजी ठिक 11 वाजता सव्वाशे कोटी देशवासी 2 मिनिटांसाठी मौन पाळतात. तुम्ही कल्पना करु शकता की या घटनेत किती मोठी ताकद असू शकेल ? आणि ही गोष्ट खरीच आहे की, आमच्या शास्त्रातही म्हटले की –
“संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम”
“आम्ही सर्व एकत्र चालावे, एकत्र बोलावे, आमची वने एक होवोत”, हीच राष्ट्राची खरी ताकद आहे आणि या शक्तीला प्राण देण्याचे काम अशा संघटना करतात.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वी मी सरदार पटेलांचे विचार वाचत होतो. त्यावेळी काही गोष्टींकडे माझे लक्ष गेले आणि त्यांची एक गोष्ट मला खूपच आवडली. खादीच्या संदर्भात सरदार पटेलांनी म्हटले आहे की हिंदुस्थानचे स्वातंत्र्य खादीमध्येच आहे, हिंदुस्थानची परंपराही खादीचीच. हिंदुस्थानात जिला आम्ही परम धर्म मानतो, ती अहिंसा खादी मध्येच आहे आणि हिंदुस्थानातील शेतकरी, ज्यांच्यासाठी आपण इतकी भावना दर्शवितो, त्यांचे कल्याणसुध्दा खादीमध्येच आहे. सरदार साहेब सरळ भाषेत साधी गोष्ट मुख्यत्वाने सांगत असत.
त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे खादीचे माहात्म्य सांगितले आहे. मी काल 30 जानेवारीला पूज्य बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त देशात जेवढया खादी आणि ग्रामोद्योगाशी जोडलेल्या लोकांपर्यंत पोहचू शकतो, त्यांना पत्र लिहून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तसे पाहिले तर पूज्य बापू विज्ञानाची बाजू मांडणारे होते, त्यासाठी मी सुध्दा तंत्रज्ञानाचाच उपयोग केला आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाखो अशा बंधु-भगिनींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. खादी, आता एक प्रतीक (सिम्बॉल) बनले आहे, एक वेगळी ओळख बनले आहे. आता खादी हे युवा पिढीचेही आकर्षण केंद्र बनत आहे. आणि विशेष म्हणजे “होलिस्टिक हेल्थ केअर” आणि “ऑरगॅनिक”कडे जे लोक वळलेले आहेत, त्यांच्यासाठी तर हा एक नवा उत्तम उपाय बनलेला आहे. फॅशन”च्या रुपातही आता खादीने आपली जागा घेतलेली आहे आणि खादीशी जोडल्या गेलेल्या लोकांचे अभिनंदन करतो की त्यांनी खादीमध्ये हे नवे स्वरुप आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. अर्थव्यवस्थेतील बाजारातही तिचे आपले एक महत्त्व आहे खादीनेसुध्दा, भावनात्मक गोष्टींबरोबर बाजारातसुध्दा आपली जागा बनविणे जरुरीचे झाले आहे. जेव्हा मी लोकांना सांगितले की अनेक प्रकारची फॅब्रिक्स आपल्या जवळ उपलब्ध असली तरी खादीचा प्रसार लोक कल्याणसाठी झाला पाहिजे. ही गोष्ट लोकांच्या गळी उतरु लागली आहे की हा भाई, खादीधारी तर नाही बनू शकत, परंतु जर दहा प्रकारचे कपडे आपल्याजवळ आहेत तर आणि एक खादीचा होऊन जाऊ दे. पण त्याबरोबरच मी जे सांगतोय त्याबद्दल सरकारी पातळीवरसुध्दा एक सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. पुष्कळ वर्षांपूर्वी सरकारमध्ये खादीचा पुष्कळ उपयोग होत होता. पण हळु हळु आधुनिकतेच्या नावाखाली हे सगळे नाहीसे होत गेले आणि खादीशी जोडले गेलेले आमची गरीब लोक बेरोजगार होत गेले. खादीमध्ये कोटयावधी लोकांना रोजगार देण्याची ताकद आहे. मागील काही दिवसात रेल्वे मंत्रालय, पोलिस विभाग, भारतीय नौदल, उत्तराखंडचा टपाल विभाग अशा काही सरकारी संस्थांनी खादीच्या वापरास उत्तेजन देण्यासाठी काही चांगले उपक्रम (इनिशिएटिव्ह) घेतले. आणि मला सांगितले गेले आहे की सरकारी विभागांच्या अशा प्रयत्नांमुळे खादीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आणि सरकारच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, अतिरिक्त 18 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होईल. 18 लाख मनुष्य दिवस ही एक पुष्कळ मोठी उडी घेतलेली असेल. पूज्य बापूही नेहमीच तंत्रज्ञानाच्या (अप-ग्रेडशनसाठी) अद्यावततेसाठी पुष्कळच जागृत होते आणि आग्रहीसुध्दा होते. आणि तेव्हाच तर आमचा चरखा विकसित होत होत येथपर्यंत पोहोचला आहे. अलिकडे सौर ऊर्जेचा वापर करीत चरखा चालवणे, ती चरख्याशी जोडण्याचा पुष्कळच यशस्वी प्रयोग होत आहे. यामुळे मेहनत कमी होऊन उत्पादन वाढले आणि गुणात्मक परिवर्तनसुध्दा आले. विशेषत: सौर चरख्यासाठी लोक मला पुष्कळच पत्रे पाठवत असतात. राजस्थानातील दौसा येथील गीता देवी, कोमलदेवी आणि बिहारमधील नवादा जिल्हयातील साधना देवी यांनी मला पत्र लिहून सांगितले आहे की, सोलार चरख्यामुळे त्यांच्या जीवनात पुष्कळच परिवर्तन आले आहे. आमचे उत्पन्न दुप्पट झाले आणि आमचे जे सूत आहे, त्यांच्याबाबतीतसुध्दा आकर्षण वाढले आहे. या साऱ्या गोष्टी एक नवा उत्साह वाढवणाऱ्या ठरल्या आहेत. आणि 30 जानेवारीला, पूज्य बापूंचे आपण जेव्हा स्मरण करतो, तेव्हा मी पुन्हा एकदा सांगेन की एवढे तर अवश्य करा की आपल्या सर्व कपडयांमध्ये एखादा खादीचासुध्दा असू दे. त्याचा आग्रह धरा.
प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी हा राष्ट्रीय सण पुष्कळच उमेदीने आणि उत्साहात आम्ही सर्वांनी साजरा केला. चारही बाजूने, दहशतवादी काय करतील, या चिंतेबरोबरच नागरिकांनी हिंमत दाखवली, उत्साह दाखवला आणि (शानदाररित्या) सर्वांनी प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय सण साजरा केला. परंतु काही लोकांनी नेहमीपेक्षा वेगळया काही गोष्टी केल्या, आणि मला असे वाटते की या गोष्टींकडे लक्ष देण्यासारख्या आहेत, विशेषत: हरियाणा आणि गुजरात, या दोन राज्यांनी एक मोठा अनोखा प्रयोग केला. यावर्षी त्यांनी, प्रत्येक गावात जी सरकारी शाळा आहे, ध्वजवंदनासाठी त्या गावातील जी सर्वात शिकलेली मुलगी आहे, तिची निवड केली. हरियाणा आणि गुजरातने मुलींचे माहात्म्य वाढविले. शिकलेल्या मुलीला विशेष महत्त्व दिले. “मुली वाचवा – मुली शिकवा” हा एक उत्तम संदेश देण्याचा त्यांनी प्रयास केला. मी दोन्ही राज्यांच्या या कल्पनाशक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्व मुलींना शुभेच्छा देतो. त्यांना ध्वजवंदन, ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली. हरियाणात आणखीही एक गोष्ट झाली की, गेल्या एक वर्षात ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे, अशा कुटुंबांना 26 जानेवारीच्या निमित्ताने विशेष निमंत्रित केले गेले आणि व्हीआयपींमध्ये पहिल्या रांगेत त्यांना स्थान देण्यात आले. हा आपोआपच एक मोठा गौरवाचा क्षण होता. मला या गोष्टींचा आनंद आहे की, मी माझ्या “मुली वाचवा – मुली शिकवा” या योजनेचा प्रारंभ हरियाणातून केला. कारण हरियाणात मुलगे आणि मुलींच्या प्रमाणात पुष्कळच गोंधळाची अवस्था होती. एक हजार मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर पुष्कळच कमी होत गेलेला होता. चिंतेची गोष्ट होती. सामाजिक संतुलन बिघडलेले होते आणि जेव्हा मी हरियाणाची निवड केली तेव्हा मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, नाही, नाही साहेब, तेथे करु नका तेथे तर मोठेच नकारात्मक वातारवरण आहे. परंतु मी काम केले आणि मी आज हरियाणाचे हार्दिक अभिनंदन करतो की, त्यांनी या गोष्टीला आपलीच गोष्ट मानली आणि आज मुलींची जन्मसंख्या पुष्कळच मोठया प्रमाणात वाढत आहे. मी खरोखरच तेथील सामाजिक जीवनातील जो बदल घडून आला आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.
मागील खेपेस “मन की बात” मध्ये मी दोन गोष्टी सांगितल्या. पहिली म्हणजे एक नागरिक या नात्याने आपण महापुरुषांच्या पुतळयांची स्वच्छता उभारण्यासाठी तर आम्ही मोठे भावुक होतो, परंतु नंतर मात्र आम्ही बेपर्वाई दाखवतो. दुसरी गोष्ट मी सांगितली होती, की प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे तेव्हा आम्ही आमच्या कर्तव्यांबद्दलही जोर लावला पाहिजे, कर्तव्य करत राहायला पाहिजे, कर्तव्याबद्दलही चर्चा होणे आवश्यक आहे ! मला आनंद याचा आहे की, देशातील काही भागातील नागरिकांनी पुढकार घेतला, काही सामाजिक संस्था पुढे आल्या, काही शैक्षणिक संस्था पुढे आल्या, काही संत महात्मे पुढे आले आणि सर्वांनी जेथे जेथे पुतळे आहेत, प्रतिमा आहेत. तेथे त्यांची स्वच्छता केली, परिसराची सफाई केली. एक चांगली सुरुवात झाली, आणि हे फक्त स्वच्छता अभियान नवहे, तर हे एक सन्मान अभियानही आहे. मी प्रत्येकाचा काही उल्लेख करीत नाहीय, पण ज्या बातम्या मिळाल्या आहेत, त्या अतिशय आनंददायी आहेत. काही लोक संकोचाने बातम्या देतही नाहीत. मी त्यांना आग्रह करतोय की माय गव्हर्मेंट या पोटर्लवर आपण केलेल्या पुतळयांच्या स्वच्छतेबद्दलचे छायाचित्र जरुर पाठवा. जगातील अनेक लोक ते पाहतात आणि त्यांना अभिमान वाटतो त्याचप्रमाणे 26 जानेवारीला “कर्तव्य आणि अधिकार” याबद्दल मी लोकांचे विचार मागवले होते आणि मला आनंद आहे की हजारो माझ्या प्रिय देशबांधवांनो, एका कामासाठी मला तुमची मदत हवी आहे आणि मला विश्वास आहे की, आपण ती कराल. आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावावर पुष्कळ काही बोलले जाते, असो. मी त्या वादात पडू इच्छित नाही. पण शेतकऱ्यांवरचे सर्वात मोठे संकट आहे. नैसर्गिक आपत्ती. त्यात त्यांची सर्व मेहनत पाण्यात जाते. त्यांचे वर्ष फुकट जाते. त्यांना सुरक्षा देण्यासाठी एक उपायसुध्दा आता लक्षात येऊ लागलाय आणि मी ती भेट शेतकऱ्यांना दिली आहे. ती म्हणजे, पंतप्रधान पीक विमा योजना. या योजनेची तरफदारी व्हावी वाहवा व्हावी, पंतप्रधानांना अभिनंदनपर शुभेच्छा मिळाव्यात यासाठी ही योजना नाहीय. इतकी वर्ष पीक विमा योजनेची चर्चा होतेय पण देशात 20-25 टक्क्यांहून अधिक शेतकरी तिचे लाभार्थी झालेले नाहीत. तिच्याशी जोडले गेलेले नाहीत. येणाऱ्या एक-दोन वर्षात आम्ही देशात 50 टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेशी जोडून घेऊ? असा संकल्प करु शकतो काय ? होय. फक्त मला यासाठी आपली मदत हवीय. कारण एकदा का शेतकरी पीक विम्याशी जोडले गेले तर संकट काळात त्यांना मोठी मदत मिळू शकेल आणि म्हणूनच पंतप्रधान पीक विमा योजनेस इतकी मान्यता मिळत आहे. कारण ही योजना व्यापक तंत्रज्ञानयुक्त आणि सोपी बनवली गेली आहे, केवळ इतकेच नाही, पीक कापल्यानंतरसुध्दा, 15 दिवसातही काही झाले, तरीसुध्दा मदतीचे आश्वासन यामध्ये दिलेले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन, त्याची गती अधिक वेगवान कशी होईल, विम्याचे पैसे मिळाल्यास विलंबही होऊ नये या सर्व गोष्टींवर लक्ष दिले गेले आहे. आता सर्वात मोठी गोष्ट/पीक विमा योजनेचे “प्रिमियम” दर/इतके खाली करण्यात आलेले आहेत की, ज्याचा कोणी विचारही केला नसेल! नव्या विमा योजनेत शेतकऱ्यांसाठी प्रिमियमची अधिकतम मर्यादा खरीपांच्या पिकांसाठी 2 टक्के आणि रब्बी पिकांसाठी दीड टक्के असेल. आता मला सांगा, माझा कोणताही शेतकरी बंधु या गोष्टीपासून वंचित राहता कामा नये. तो वंचित राहिल्यास नुकसान होणार की नाही? नाही होणार! तुम्ही शेतकरी नसालही. परंतु माझी “मन की बात” ऐकत आहात ना? आपण शेतकऱ्यांपर्यंत माझी गोष्ट पोहचवाल? आणि यासाठीच माझी अशी इच्छा आहे की याचा अधिकाधिक प्रचार करावा यासाठी यावेळी मी आपल्यासाठी नवी योजनाही आणली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना लोकांपर्यंत पोहचवा आणि ही गोष्ट खरी आहे की टी.व्ही.वर रेडियोवर माझी “मन की बात” तुम्ही ऐकत असाल. परंतु नंतर ऐकायचे असेल तर काय ? आता मी आपल्याला एक नवी भेट देणार आहे. काय आपण आपल्या मोबाईल फोनवरसुध्दा माझी “मन की बात” ऐकू शकता आणि केव्हाही. ती ऐकू शकता ? होय फक्त आपल्याला एवढेच करायचे आहे. एक “मिस कॉल” करा आपला मोबाईल फोनवरुन “मन की बात” साठी मोबाईल फोनचा क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. 8190881908 (आठ एका नऊ शून्य आठ आठ एक नऊ शून्य आठ) आपण मिस कॉल केलात तर त्याच्या प्रसारणा नंतरही “मन की बात” ऐकू शकता. सध्या तर हे हिंदीत आहे परंतु आता लवकरच आपल्या मातृभाषेत “मन की बात” ऐकण्याची संधी मिळेल यासाठी सुध्दा माझी खटपट सुरु आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण तर कमाल केलीत. जेव्हा स्टार्ट अपचा कार्यक्रम 16 जानेवारीला झाला, साऱ्या देशातील तरुणांमध्ये नवी ऊर्जा नवी चेतना, नवा अंदाज, नवा उत्साह संचारल्याचा मी अनुभव घेतला. लाखोंच्या संख्येने लोकांनी या कार्यक्रमास येण्यासाठी नोंदणी केली परंतु इतकी जागा नसल्यामुळे, शेवटी विज्ञान भवनात हा कार्यक्रम झाला. आपण पोहचू शकला नाहीत, पण आपण संपूर्ण वेळ ऑनलाईन यात सहभागी झालात. क्वचितच असा कार्यक्रम आणि इतका वेळ लाखोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते, असे हे पुष्कळच दुर्मिळ असते परंतु झाले ! आणि मी हे पाहत होतो की “स्टार्ट अप” साठी किती उत्साह आहे. हा सामान्यांचा विचार आहे. स्टार्ट अप म्हणजे आयटीशी संबंधित असलेल्या त्यांच्याशी संबंधित होणाऱ्या गोष्टी पुष्कळच “सॉफिस्टीकेटेड” कारभार ! स्टार्ट अपच्या या इव्हेंट नंतर हा भ्रम दूर झाला. आयटीच्या जवळचा स्टार्ट अप तर एक लहानसा हिस्सा आहे. जीवन विशाल आहे, गरजा अनंत आहेत. (काळ अनंत आहे) स्टार्ट अपसुध्दा आता अगणित संधी घेऊन येत आहे.
मी काही दिवसांपूर्वी सिक्कीमला गेलो होतो. सिक्कीम आता देशाचा ऑरगॅनिक स्टेट बनलेला आहे आणि देशभरातील कृषी मंत्री आणि कृषी सचिव यांना मी तिथे निमंत्रित केले होते. मला तिथे दोन युवकांना भेटण्याची संधी मिळाली. आयआयएम शिकून ते आलेले आहेत. एक आहे अनुराग अग्रवाल आणि दुसरी आहे सिध्दी कर्नाणी त्यांनी “स्टार्ट अप”पर्यंत मजल घेतली आणि ते मला सिक्कीम मध्ये मिळाले. ते ईशान्य भारतात काम करीत आहेत, आणि हर्बल पिकवत आहेत. ऑरगॅनिक पिकवत आहेत, याचे “ग्लोबल मार्केटिंग” करीत आहेत आहे की नाही कमाल! मागील वेळेस मी माझ्या स्टार्ट अपशी जोडल्या गेलेल्या लोकांना सांगितले की नरेंद्र मोदी ॲपवर आपले अनुभव पाठवावेत. काहींनी पाठवले आहेत. परंतु आणखी जास्त आले तर मला आनंदच होईल. परंतु जे आले आहेत ते सुध्दा खरोखर प्रेरक आहेत कोणी विश्वास द्विवेदी नावाचे युवक आहेत, त्यांनी ऑनलाईन किचन “स्टार्टअप” केले आहे आणि अशा प्रकारचे मध्यमवर्गीय लोक जे रोजी-रोटी मिळवण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी ते ऑनलाईन नेटवर्कींगद्वारे जेवणाचे डबे पोहचवण्याचे काम करतात. कोणी मिस्टर दिनेश पाठक म्हणून आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेषत: जनावरांसाठी जो आहार असतो, ते पशुखाद्य निर्मिती करण्याची मनाची तयारी केली आहे. आपल्या देशातील पशुंना जर चांगला आहार मिळाला तर आपल्याला चांगले दूध मिळेल, आपल्याला चांगले दूध मिळाले, तर आमच्या देशातील युवक ताकदवान होईल ! मनोज गिल्दा, निखिलजी, त्यांनी ॲग्रो-स्टोरेजचे स्टाट्र अप सुरु केले आहे ते सायंटिफिक फ्रूट्स स्टोरेज सिस्टिम बरोबरच कृषी उतपादनांसाठी बल्क स्टोरेज सिस्टिम विकसित करत आहेत. असे पुष्कळ प्रकारचे प्रस्ताव आले आहेत. आपण अजूनही पाठवा, मला बरेच वाटेल आणि मला वेळोवेळी “मन की बात” मध्ये किंवा स्टार्टअपची गोष्ट करावी लागेल, ज्याप्रमाणे मी स्वच्छतेची गोष्ट करतो तशी स्टार्ट अपची गोष्टही.
माझ्या प्रिय देशबांधवानो, स्वच्छतेबरोबर च आता सौंदर्यही जोडले जात आहे. पुष्कळ वर्ष घाणीविरुध्द नाराजी व्यक्त करीत आहोत परंतु घाण काही हटली नाही आता देशवासियांमध्ये घाणीची चर्चा सोडून “स्वच्छतेबाबतची चर्चा” सुरु झाली आहे, आणि स्वच्छतेचे काम कोठे ना कोठे चालतच राहील. परंतु आता एक पाऊल नागरिकांनी पुढे टाकले आहे. त्यांनी स्वच्छतेबरोबर सौंदर्यही जोडले आहे. एक प्रकारे दूधात साखर आणि ही गोष्ट विशेषत्वाने दृष्टीस पडत आहे रेल्वे स्टेशनवर, मी पाहत आहे की, आता देशातील काही रेल्वे स्थानके जिथे तेथील स्थानिक नागरिक, स्थानिक कलाकार, विद्यार्थी हे आपापले शहर, रेल्वे स्थानके सजवण्याच्या कामास लागले आहेत. स्थानिक कला केंद्रांशी जोडून भिंतीवर पेंटिग ठेवणे, साईन बोर्ड चांगल्या स्वरुपात बनविणे, कलात्मक रुप देणे, लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी काही गोष्टीही यासाठी करायला हव्यात, न जाणे काय करत आहेत ? मला सांगितले गेले की, काहींना हजारीबाग स्टेशनवर, आदिवासी महिलांनी तेथील गोहराई हे स्थानक आणि कोहबर आर्टचे डिझाईन काढून पूर्ण रेल्वे स्टेशन सजविण्यात आले आहे. ठाणे जिल्हयातील 300 हून अधिक स्वयंसेवकांनी (कॉलेरिंयर्सनी) किंग सर्कल स्टेशन सजवले, माटुंगा, बोरिवली, खार येथून, राजस्थानातूनही पुष्कळ बातम्या येत आहेत. सवाई माधोपूर, कोटा, असे वाटू लागले आहे की आमची रेल्वे स्टेशन आपल्या परंपरेची ओळख दर्शवू लागली आहेत. आता कोणी खिडकीतून चहा भज्यांच्या गाडीला नाही शोधणार, गाडीत बसून भिंतीवर पाहून येथील वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहतील आणि हा काही रेल्वेचा (इनिशिएटिव्ह) उपक्रम नव्हता की नरेंद्र मोदींचा हा नागरिकांचा उपक्रम होता. पाहा नागरिक करतात ते कसे? हे मी पाहतो. मला काही प्रतिमाही मिळाल्या आहेत. परंतु माझ्या मनाला वाटत आहे की, आणखी काही प्रतिमा पाहाव्यात, काय आपण, रेल्वे स्थानकाबरोबरच इतर ठिकाणी स्वच्छतेबरोबरच सौदर्यासाठीही प्रयास केले आहेत? काय आपण मला पाठवू शकाल?
जरुर पाठवा. मी तर पाहिनच, बस स्थानकांवर असून शकतात, रुग्णालयात असू शकतात, चर्चच्या आसपास असून शकतात, बाग बगीच्यातही असू शकतात. किती तरी ठिकाणी असू शकतात? ज्यांच्या मनात हा विचार आला आणि ज्यांनी हा उपक्रम सुरु केला आणि ज्यांनी या गोष्टीस पुढे नेलं, त्या सर्वांच अभिनंदन. परंतु हो, आपण मला छायाचित्रे जरुर पाठवावित, मी आपण काय केलेलं आहे ते मी पाहु इच्छितो.
माझ्या प्रिय देशबंधु-भगिनींनो, आपल्यासाठी अभिमान वाटेल अशी एक गोष्ट सांगायची म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत आपला भारत देश एक मोठा समारंभ आयोजित करतो आहे. संपूर्ण दुनिया आपला पाहुणचार घ्यायला येणार आहे. जगातील कित्येक देशांचे युद्धपोत, नौसेनेची जहाजं, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणच्या समुद्र किनाऱ्यावर एकत्र येत आहेत. यावर्षी आंतरराष्ट्रीय नौका ताफा पाहणी (International Fleet Review) भारताच्या समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. जगाची सैन्यशक्ती आणि आपली सैन्य शक्ती यांचा ताळमेळ घालण्याचा हा एक प्रयत्न आहे. एक संयुक्त प्रयोग आहे. मोठी नामी संधी आहे ही. येणाऱ्या काही दिवसात टीव्ही आणि प्रसारमाध्यमांच्या द्वारे याबद्दलची माहिती आपणा सर्वांना मिळत जाणार आहे. कारण जेव्हा एखादा खूपच मोठा कार्यक्रम असतो तेव्हा त्याला सारेच पाठिंबा देतात. भारतासारख्या देशासाठी हा समारंभ महत्वपूर्ण आहे. भारताचा सामुद्रिक इतिहास सोनेरी राहिला आहे. संस्कृतमधे समुद्राला उदधि किंवा सागर म्हटले जाते. याचा अर्थ आहे अथांगता. सीमा आम्हाला वेगवेगळे ठेवत असतील, जमीन एकमेकांपासून विलग करत असेल. पण पाणी आपल्याला जोडत असतं, समुद्र आपल्याला एकमेकांशी जोडून देतो, आपण आपल्याला समुद्राशी जोडून घेऊ शकतो, कुणाशीही जोडून घेऊ शकतो. आमच्या पूर्वजांनी शतकांपूर्वी विश्वभ्रमण करुन जगाशी व्यापार करुन आपल्या या शक्तीचा परिचय करुन दिलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्रज्य असो किवा चौल साम्राज्य. चौल साम्राज्यात सामुद्रिक शक्तीच्या बाबतीत त्यांनी आपली म्हणून स्वत:ची एक नवीन ओळख बनवली होती. आपल्या देशात आजही अशी काही राज्ये आहेत की, जिथे समुद्राशी संबंधित अशा अनेक परंपरा जिवंत आहेत. त्या उत्सवांच्या रुपात साजऱ्या केल्या जातात. जेव्हा जग हे भारताचे पाहुणे म्हणून येणार आहे. तेव्हा आपल्या नौदलाच्या शक्तीची ओळख साऱ्यांना होणार आहे. एक चांगली संधी आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळणार आहे.
भारताच्या पूर्वेकडील गुवाहाटीमधेही क्रीडा स्पर्धांचे समारंभ होणार आहे. सार्क देशांचा क्रीडा समारंभ, सार्क देशांमधील हजारो खेळाडू गुवाहाटीच्या भूमीत येत आहेत. खेळांचा माहोल आणि खेळांचा जल्लोष सार्क देशांच्या नव्या पिढीचा गुवाहाटीत होत असलेला हा क्रीडा उत्सव म्हणजे सार्क देशांनी परस्परांशी नातेसंबंध दृढ करण्याची एक चांगली संधी आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, माझ्या मनात जे येतं, जे माझ्या मनात उमटतं ते खुले पणानं मी तुमच्याशी बोलत असतो, हे मी पहिल्यांदाच सांगून ठेवलंय. लवरकच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होतील. मागच्या वेळी “मन की बात” मधे मी परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी काही गोष्टी बोललो होतो. यावेळी माझी इच्छा आहे की, जे विद्यार्थी यापूर्वी परीक्षांमधे यशस्वी झालेत, त्यांनी तणावमुक्त परीक्षांच्या दिवसांसाठी काय काय केलं? त्यांच्या कुटुंबात कसं वातावरण होतं? त्यांच्या शिक्षकांनी काय भूमिका निभावली? स्वत: त्यांनी कोणते प्रयत्न केले? त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना काय काय सांगितलं? आणि त्यांनी स्वत: काय काय केलं? हे सगळे अनुभव मला पाठवावेत यावेळी अशा विद्यर्थ्यांनी आपले अनुभव मला “नरेंद्र मोदी ॲप”वर पाठवावेत. आणि मी प्रसार माध्यमांनाही विनंती करेन की, या अनुभवांमधल्या चांगल्या गोष्टी येणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये माध्यमांमधून प्रसारित कराव्यात. जेणे करुन देशभरातील विद्यार्थी त्या वाचतील, टीव्हीवर पाहतील आणि त्यांनाही तणावमुक्त परीक्षा कशा द्याव्यात? हसत-खेळत परीक्षा कशा दिल्या जातात? ह्याची एक औषधीच आपल्या हाती मिळेल. प्रसार माध्यमांचे मित्र ह्यासाठी नक्की मदत करतील, असा मला विश्वास आहे. हां – पण ते तेव्हाच मदत करतील, जेव्हा तुम्ही मला सर्व अनुभव पाठवाल.
पाठवणार ना? जरुर पाठवा.
खूप खूप धन्यवाद मित्रांनो ! पुन्हा एकदा पुढच्या “मन की बात” मधे अवश्य भेटूया.
खूप धन्यवाद.
(Release ID :135946)