For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

रविवार, ३१ जानेवारी, २०१६

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” या कार्यक्रमाद्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद

नवी दिल्ली, 31-1-2016

माझ्या प्रिय देशवासियांनो, 2016 सालातील  ही पहिलीच “मन की बात” आहे. “मन की बात” ने असे धरुन ठेवले आहे, असे धरुन ठेवले आहे की, कोणतीही गोष्ट दृष्टीस पडली, कोणताही विचार आला की तो तुम्हाला सांगण्याची इच्छा होते. काल मी पूज्य बापूना श्रध्दांजली  वाहण्यासाठी राजघाटावर  गेलो होतो.  शहिदांना नमन करण्यासाठी हा दरवर्षी होणारा कार्यक्रम  आहे. ठिक 11 वाजता 2  मिनिटांसाठी मौन पाळून, देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या, प्राणसर्वस्व अर्पिणाऱ्या महापुरुषांसाठी, वीर पुरुषांसाठी, तेजस्वी तपस्वी  लोकांसाठी श्रध्दा व्यक्त करण्याची ही  एक संधी असते.  परंतु जर आपण पाहिले, आमच्यापैकी काही लोक आहेत, ज्यांनी  हे केलेले नाही.  तुम्हाला नाही  वाटत की हा स्वभाव बनला पाहिजे, या गोष्टीला  आम्ही आपले राष्ट्रीय कर्तव्य समजायला हवे ? मला याची जाणीव  आहे की माझ्या “मन की बात” ने हे  होणार नाही.

परंतु जे मी काल अनुभवले, वाटले की ते तुमच्याशीसुध्दा बोलावे आणि हीच गोष्ट आहे जी देशासाठी आपल्याला जगण्याची प्रेरणा देते. आपण कल्पना तर करु शकाल, प्रत्येक वर्षी  30 जानेवारी रोजी ठिक 11  वाजता सव्वाशे कोटी देशवासी 2 मिनिटांसाठी मौन पाळतात. तुम्ही कल्पना करु शकता की या घटनेत किती मोठी ताकद असू  शकेल ?  आणि ही गोष्ट खरीच आहे की, आमच्या शास्त्रातही म्हटले की –

“संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम”

“आम्ही सर्व एकत्र  चालावे, एकत्र बोलावे, आमची वने एक होवोत”, हीच राष्ट्राची  खरी ताकद आहे आणि या शक्तीला  प्राण देण्याचे काम अशा संघटना करतात.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वी मी सरदार पटेलांचे विचार  वाचत होतो. त्यावेळी काही गोष्टींकडे माझे लक्ष गेले आणि त्यांची एक गोष्ट मला खूपच आवडली. खादीच्या संदर्भात सरदार पटेलांनी म्हटले आहे की हिंदुस्थानचे स्वातंत्र्य खादीमध्येच आहे, हिंदुस्थानची परंपराही खादीचीच. हिंदुस्थानात जिला आम्ही  परम धर्म मानतो, ती अहिंसा खादी मध्येच आहे आणि हिंदुस्थानातील शेतकरी, ज्यांच्यासाठी आपण इतकी भावना दर्शवितो, त्यांचे कल्याणसुध्दा खादीमध्येच आहे.  सरदार   साहेब  सरळ भाषेत साधी गोष्ट  मुख्यत्वाने सांगत  असत. 

त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे खादीचे माहात्म्य सांगितले आहे. मी काल 30 जानेवारीला पूज्य बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त देशात जेवढया खादी आणि ग्रामोद्योगाशी जोडलेल्या  लोकांपर्यंत पोहचू शकतो, त्यांना पत्र लिहून  त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तसे पाहिले तर पूज्य बापू विज्ञानाची  बाजू मांडणारे होते, त्यासाठी मी सुध्दा तंत्रज्ञानाचाच उपयोग केला आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाखो अशा बंधु-भगिनींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. खादी, आता एक प्रतीक (सिम्बॉल) बनले आहे, एक वेगळी  ओळख बनले आहे. आता खादी हे युवा  पिढीचेही  आकर्षण केंद्र बनत आहे. आणि विशेष म्हणजे  “होलिस्टिक हेल्थ केअर” आणि “ऑरगॅनिक”कडे जे लोक वळलेले आहेत, त्यांच्यासाठी तर  हा एक नवा उत्तम उपाय बनलेला आहे. फॅशन”च्या रुपातही आता खादीने आपली जागा घेतलेली आहे आणि खादीशी जोडल्या गेलेल्या  लोकांचे अभिनंदन  करतो की त्यांनी   खादीमध्ये हे नवे स्वरुप  आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. अर्थव्यवस्थेतील  बाजारातही तिचे आपले एक महत्त्व आहे खादीनेसुध्दा, भावनात्मक गोष्टींबरोबर  बाजारातसुध्दा  आपली जागा  बनविणे जरुरीचे झाले आहे.  जेव्हा  मी लोकांना सांगितले की अनेक प्रकारची फॅब्रिक्स आपल्या जवळ उपलब्ध असली  तरी खादीचा प्रसार लोक कल्याणसाठी झाला पाहिजे. ही गोष्ट लोकांच्या गळी उतरु लागली आहे की हा भाई, खादीधारी तर नाही बनू शकत, परंतु जर दहा प्रकारचे कपडे आपल्याजवळ    आहेत तर  आणि एक खादीचा होऊन  जाऊ दे. पण त्याबरोबरच मी जे सांगतोय त्याबद्दल   सरकारी पातळीवरसुध्दा एक सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. पुष्कळ वर्षांपूर्वी सरकारमध्ये खादीचा पुष्कळ उपयोग होत होता. पण हळु हळु आधुनिकतेच्या नावाखाली  हे सगळे नाहीसे होत गेले आणि खादीशी  जोडले गेलेले आमची गरीब लोक बेरोजगार होत गेले. खादीमध्ये  कोटयावधी लोकांना  रोजगार देण्याची ताकद आहे. मागील काही दिवसात रेल्वे मंत्रालय, पोलिस विभाग, भारतीय नौदल, उत्तराखंडचा टपाल विभाग  अशा काही सरकारी संस्थांनी खादीच्या वापरास उत्तेजन देण्यासाठी काही चांगले उपक्रम  (इनिशिएटिव्ह) घेतले. आणि मला सांगितले गेले आहे की सरकारी विभागांच्या  अशा प्रयत्नांमुळे खादीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आणि सरकारच्या आवश्यकता  पूर्ण करण्यासाठी, अतिरिक्त 18 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होईल. 18 लाख मनुष्य दिवस ही एक पुष्कळ मोठी उडी घेतलेली असेल. पूज्य  बापूही नेहमीच तंत्रज्ञानाच्या (अप-ग्रेडशनसाठी) अद्यावततेसाठी पुष्कळच  जागृत होते आणि आग्रहीसुध्दा होते. आणि तेव्हाच तर आमचा चरखा विकसित होत होत येथपर्यंत पोहोचला आहे. अलिकडे सौर ऊर्जेचा वापर करीत चरखा चालवणे, ती चरख्याशी  जोडण्याचा पुष्कळच यशस्वी प्रयोग होत आहे. यामुळे मेहनत कमी होऊन उत्पादन वाढले आणि गुणात्मक परिवर्तनसुध्दा आले. विशेषत:  सौर चरख्यासाठी लोक मला पुष्कळच पत्रे पाठवत असतात. राजस्थानातील  दौसा येथील गीता  देवी, कोमलदेवी आणि बिहारमधील नवादा जिल्हयातील साधना देवी यांनी मला पत्र लिहून सांगितले आहे की, सोलार चरख्यामुळे त्यांच्या जीवनात पुष्कळच परिवर्तन आले आहे. आमचे उत्पन्न दुप्पट  झाले आणि आमचे जे सूत आहे,  त्यांच्याबाबतीतसुध्दा आकर्षण वाढले आहे. या साऱ्या गोष्टी एक नवा उत्साह वाढवणाऱ्या  ठरल्या आहेत. आणि 30 जानेवारीला, पूज्य बापूंचे  आपण जेव्हा स्मरण करतो, तेव्हा मी पुन्हा एकदा सांगेन की एवढे तर अवश्य करा की आपल्या सर्व कपडयांमध्ये एखादा खादीचासुध्दा असू दे. त्याचा आग्रह धरा.

प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी हा राष्ट्रीय सण पुष्कळच उमेदीने आणि उत्साहात आम्ही सर्वांनी साजरा केला. चारही बाजूने, दहशतवादी  काय करतील, या  चिंतेबरोबरच नागरिकांनी हिंमत दाखवली, उत्साह दाखवला आणि  (शानदाररित्या) सर्वांनी प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय सण साजरा केला. परंतु काही लोकांनी नेहमीपेक्षा वेगळया काही गोष्टी केल्या, आणि मला असे वाटते की या गोष्टींकडे लक्ष  देण्यासारख्या आहेत, विशेषत: हरियाणा आणि गुजरात, या दोन राज्यांनी  एक मोठा अनोखा प्रयोग केला. यावर्षी  त्यांनी, प्रत्येक गावात जी सरकारी शाळा आहे, ध्वजवंदनासाठी त्या गावातील जी सर्वात  शिकलेली मुलगी आहे, तिची निवड केली. हरियाणा आणि गुजरातने मुलींचे माहात्म्य वाढविले. शिकलेल्या मुलीला विशेष महत्त्व  दिले.  “मुली वाचवा – मुली शिकवा” हा एक उत्तम संदेश देण्याचा त्यांनी प्रयास केला.  मी दोन्ही राज्यांच्या  या कल्पनाशक्तीबद्दल   त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्व मुलींना शुभेच्छा देतो. त्यांना  ध्वजवंदन, ध्वजारोहण  करण्याची संधी मिळाली. हरियाणात आणखीही एक गोष्ट झाली की, गेल्‍या एक वर्षात ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे, अशा कुटुंबांना 26 जानेवारीच्या निमित्ताने  विशेष निमंत्रित  केले गेले आणि व्हीआयपींमध्ये  पहिल्या रांगेत त्‍यांना स्थान देण्यात आले. हा आपोआपच एक मोठा गौरवाचा क्षण होता. मला या गोष्टींचा आनंद आहे की, मी माझ्या “मुली वाचवा – मुली शिकवा” या योजनेचा प्रारंभ हरियाणातून केला. कारण हरियाणात मुलगे आणि मुलींच्या प्रमाणात पुष्कळच गोंधळाची अवस्था होती. एक हजार मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर पुष्कळच कमी होत गेलेला होता. चिंतेची गोष्ट होती. सामाजिक संतुलन बिघडलेले होते आणि जेव्हा मी हरियाणाची निवड केली तेव्हा मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, नाही, नाही साहेब, तेथे करु नका तेथे तर मोठेच नकारात्मक वातारवरण आहे. परंतु मी काम केले आणि मी आज हरियाणाचे हार्दिक अभिनंदन करतो की, त्यांनी या गोष्टीला आपलीच गोष्ट मानली आणि आज मुलींची जन्मसंख्या पुष्कळच मोठया प्रमाणात वाढत आहे. मी खरोखरच तेथील सामाजिक जीवनातील जो बदल घडून आला आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.

मागील खेपेस “मन की बात” मध्ये मी दोन गोष्टी सांगितल्या. पहिली  म्हणजे एक नागरिक या नात्याने आपण महापुरुषांच्या पुतळयांची स्वच्छता उभारण्यासाठी तर आम्ही मोठे भावुक होतो, परंतु नंतर मात्र आम्ही बेपर्वाई दाखवतो. दुसरी गोष्ट मी सांगितली होती, की प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे तेव्हा आम्ही आमच्या कर्तव्यांबद्दलही जोर लावला पाहिजे, कर्तव्य करत राहायला पाहिजे,  कर्तव्याबद्दलही  चर्चा होणे आवश्यक आहे ! मला आनंद याचा आहे की, देशातील काही भागातील नागरिकांनी पुढकार घेतला, काही सामाजिक संस्था पुढे आल्या, काही शैक्षणिक संस्था पुढे आल्या, काही संत महात्मे पुढे आले आणि सर्वांनी  जेथे जेथे पुतळे आहेत, प्रतिमा  आहेत. तेथे त्यांची स्वच्छता केली, परिसराची सफाई केली. एक चांगली सुरुवात झाली, आणि हे फक्त स्वच्छता अभियान नवहे, तर हे एक सन्‍मान अभियानही आहे. मी प्रत्येकाचा काही उल्लेख करीत नाहीय, पण ज्या बातम्या मिळाल्या आहेत, त्या अतिशय आनंददायी आहेत. काही लोक संकोचाने बातम्या देतही नाहीत. मी त्‍यांना आग्रह करतोय की माय गव्हर्मेंट  या पोटर्लवर आपण केलेल्या पुतळयांच्या  स्वच्छतेबद्दलचे छायाचित्र जरुर पाठवा. जगातील अनेक लोक ते पाहतात आणि त्यांना अभिमान वाटतो त्‍याचप्रमाणे 26 जानेवारीला “कर्तव्य आणि अधिकार” याबद्दल मी लोकांचे विचार मागवले होते  आणि मला आनंद आहे की हजारो माझ्या प्रिय देशबांधवांनो, एका कामासाठी मला तुमची मदत हवी आहे आणि मला विश्वास आहे की, आपण ती कराल. आपल्या देशात शेतकऱ्यांच्या  नावावर पुष्कळ काही बोलले जाते,  असो. मी त्या वादात पडू इच्छित नाही. पण शेतकऱ्यांवरचे सर्वात मोठे संकट आहे. नैसर्गिक आपत्ती. त्यात त्यांची सर्व मेहनत पाण्यात जाते. त्यांचे वर्ष फुकट जाते. त्यांना सुरक्षा देण्यासाठी एक उपायसुध्दा आता लक्षात येऊ लागलाय आणि  मी ती भेट शेतकऱ्यांना दिली आहे. ती म्हणजे, पंतप्रधान पीक विमा योजना. या योजनेची तरफदारी व्हावी  वाहवा व्हावी,  पंतप्रधानांना अभिनंदनपर शुभेच्छा मिळाव्यात यासाठी ही योजना नाहीय. इतकी वर्ष पीक विमा योजनेची चर्चा होतेय पण देशात 20-25 टक्क्यांहून अधिक शेतकरी तिचे लाभार्थी झालेले नाहीत. तिच्याशी जोडले गेलेले नाहीत. येणाऱ्या एक-दोन वर्षात आम्ही देशात 50 टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेशी  जोडून घेऊ? असा संकल्प करु शकतो काय ? होय. फक्त मला यासाठी आपली मदत हवीय. कारण एकदा का शेतकरी पीक विम्याशी जोडले गेले तर संकट काळात त्‍यांना मोठी मदत मिळू शकेल  आणि म्हणूनच पंतप्रधान पीक विमा योजनेस इतकी मान्यता मिळत आहे. कारण ही योजना व्यापक तंत्रज्ञानयुक्त आणि सोपी  बनवली गेली आहे, केवळ इतकेच नाही, पीक कापल्यानंतरसुध्दा, 15 दिवसातही काही झाले, तरीसुध्दा मदतीचे आश्वासन यामध्ये दिलेले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन, त्याची गती अधिक वेगवान कशी होईल, विम्याचे पैसे मिळाल्यास विलंबही होऊ नये या सर्व गोष्टींवर लक्ष दिले गेले आहे. आता सर्वात मोठी गोष्ट/पीक विमा योजनेचे “प्रिमियम” दर/इतके खाली करण्यात आलेले आहेत की, ज्याचा कोणी विचारही केला नसेल! नव्या विमा योजनेत शेतकऱ्यांसाठी प्रिमियमची अधिकतम मर्यादा खरीपांच्या पिकांसाठी 2 टक्के आणि रब्बी पिकांसाठी दीड टक्के असेल. आता मला सांगा, माझा कोणताही शेतकरी बंधु या गोष्टीपासून वंचित राहता कामा नये. तो वंचित राहिल्यास नुकसान होणार की नाही? नाही होणार! तुम्ही शेतकरी  नसालही. परंतु माझी “मन की बात” ऐकत आहात ना? आपण शेतकऱ्यांपर्यंत माझी गोष्ट पोहचवाल? आणि यासाठीच माझी अशी इच्छा आहे की याचा अधिकाधिक प्रचार करावा यासाठी यावेळी मी आपल्यासाठी नवी योजनाही आणली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना लोकांपर्यंत पोहचवा आणि ही गोष्ट खरी आहे की टी.व्ही.वर रेडियोवर माझी “मन की बात” तुम्ही ऐकत  असाल. परंतु नंतर ऐकायचे असेल तर काय ? आता  मी आपल्याला एक नवी भेट देणार आहे. काय आपण आपल्या मोबाईल फोनवरसुध्दा माझी “मन की बात” ऐकू शकता आणि केव्हाही. ती ऐकू शकता ? होय फक्त आपल्याला एवढेच करायचे आहे. एक “मिस कॉल” करा आपला मोबाईल फोनवरुन “मन की बात” साठी मोबाईल फोनचा क्रमांक  निश्चित  करण्यात आला आहे. 8190881908 (आठ एका नऊ शून्य आठ आठ एक नऊ शून्य आठ) आपण मिस कॉल केलात तर त्याच्या प्रसारणा नंतरही “मन की बात” ऐकू शकता. सध्या तर हे हिंदीत आहे परंतु आता लवकरच आपल्या मातृभाषेत “मन की बात” ऐकण्याची संधी मिळेल यासाठी सुध्दा माझी खटपट सुरु आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण तर कमाल केलीत. जेव्हा स्टार्ट अपचा कार्यक्रम 16 जानेवारीला झाला, साऱ्या देशातील तरुणांमध्ये नवी ऊर्जा नवी चेतना, नवा अंदाज,  नवा उत्साह संचारल्याचा मी अनुभव घेतला. लाखोंच्या संख्येने लोकांनी या कार्यक्रमास येण्यासाठी  नोंदणी केली परंतु इतकी जागा नसल्यामुळे, शेवटी विज्ञान भवनात हा कार्यक्रम झाला. आपण पोहचू शकला नाहीत, पण आपण संपूर्ण वेळ ऑनलाईन यात सहभागी झालात. क्वचितच असा  कार्यक्रम आणि इतका  वेळ  लाखोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते, असे हे पुष्कळच दुर्मिळ असते  परंतु  झाले ! आणि मी हे पाहत होतो की “स्टार्ट अप” साठी किती उत्साह आहे. हा सामान्यांचा विचार आहे. स्टार्ट अप  म्हणजे आयटीशी संबंधित असलेल्‍या त्‍यांच्याशी संबंधित होणाऱ्या गोष्टी पुष्कळच  “सॉफिस्टीकेटेड”  कारभार !  स्टार्ट अपच्या या इव्हेंट नंतर हा भ्रम दूर झाला. आयटीच्या  जवळचा स्टार्ट अप तर एक लहानसा हिस्सा आहे. जीवन विशाल आहे, गरजा अनंत आहेत. (काळ अनंत आहे) स्टार्ट  अपसुध्दा  आता अगणित  संधी घेऊन  येत आहे.

मी काही दिवसांपूर्वी  सिक्कीमला गेलो होतो. सिक्कीम आता देशाचा ऑरगॅनिक  स्टेट बनलेला आहे आणि देशभरातील  कृषी  मंत्री  आणि कृषी सचिव यांना मी तिथे निमंत्रित केले होते. मला तिथे दोन युवकांना भेटण्याची संधी मिळाली. आयआयएम शिकून ते आलेले आहेत. एक आहे अनुराग अग्रवाल आणि दुसरी आहे सिध्दी कर्नाणी त्‍यांनी “स्टार्ट अप”पर्यंत  मजल घेतली  आणि ते मला सिक्कीम मध्ये  मिळाले. ते ईशान्य भारतात  काम करीत आहेत,  आणि हर्बल पिकवत  आहेत. ऑरगॅनिक पिकवत आहेत, याचे “ग्लोबल मार्केटिंग” करीत आहेत आहे की नाही कमाल! मागील वेळेस मी माझ्या स्टार्ट अपशी जोडल्या गेलेल्या लोकांना सांगितले की नरेंद्र मोदी   ॲपवर आपले अनुभव पाठवावेत. काहींनी पाठवले आहेत. परंतु आणखी जास्त आले तर मला आनंदच होईल. परंतु जे आले आहेत ते सुध्दा खरोखर प्रेरक आहेत कोणी विश्वास द्विवेदी नावाचे युवक आहेत, त्‍यांनी ऑनलाईन किचन “स्टार्टअप” केले आहे आणि अशा प्रकारचे मध्यमवर्गीय लोक जे रोजी-रोटी मिळवण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी ते ऑनलाईन नेटवर्कींगद्वारे जेवणाचे डबे पोहचवण्याचे काम करतात. कोणी मिस्टर दिनेश पाठक म्हणून आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेषत: जनावरांसाठी जो आहार असतो, ते पशुखाद्य  निर्मिती करण्याची मनाची तयारी  केली आहे. आपल्या देशातील पशुंना जर चांगला आहार मिळाला तर  आपल्याला चांगले दूध मिळेल, आपल्याला चांगले दूध मिळाले, तर आमच्या देशातील युवक ताकदवान होईल ! मनोज गिल्दा, निखिलजी, त्यांनी ॲग्रो-स्टोरेजचे स्टाट्र अप सुरु केले आहे ते सायंटिफिक  फ्रूट्‌स स्टोरेज सिस्टिम  बरोबरच कृषी उतपादनांसाठी बल्क स्टोरेज सिस्टिम विकसित करत आहेत.  असे पुष्कळ प्रकारचे प्रस्ताव आले आहेत. आपण अजूनही पाठवा, मला बरेच वाटेल आणि मला वेळोवेळी “मन की बात” मध्ये किंवा स्टार्टअपची  गोष्ट करावी लागेल, ज्याप्रमाणे मी स्वच्छतेची गोष्ट करतो तशी स्टार्ट अपची गोष्टही.

माझ्या प्रिय देशबांधवानो, स्वच्छतेबरोबर च आता सौंदर्यही जोडले जात आहे. पुष्कळ वर्ष  घाणीविरुध्द नाराजी व्यक्त करीत आहोत परंतु घाण काही हटली नाही आता देशवासियांमध्ये घाणीची चर्चा सोडून “स्वच्छतेबाबतची चर्चा” सुरु झाली आहे, आणि स्वच्छतेचे काम कोठे ना कोठे चालतच राहील. परंतु आता एक पाऊल नागरिकांनी पुढे टाकले आहे. त्यांनी स्वच्छतेबरोबर सौंदर्यही जोडले आहे. एक प्रकारे दूधात साखर आणि ही गोष्ट विशेषत्वाने दृष्टीस पडत आहे  रेल्वे स्टेशनवर, मी पाहत आहे की, आता देशातील काही रेल्‍वे स्थानके जिथे तेथील स्थानिक नागरिक, स्थानिक कलाकार, विद्यार्थी हे आपापले शहर, रेल्वे स्थानके सजवण्याच्या कामास लागले आहेत. स्थानिक कला केंद्रांशी जोडून भिंतीवर पेंटिग ठेवणे, साईन बोर्ड चांगल्या स्वरुपात बनविणे, कलात्मक रुप देणे, लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी काही गोष्टीही  यासाठी  करायला हव्यात, न जाणे काय करत आहेत ? मला सांगितले गेले की, काहींना हजारीबाग स्टेशनवर, आदिवासी महिलांनी तेथील गोहराई हे स्थानक आणि कोहबर आर्टचे डिझाईन  काढून पूर्ण रेल्वे स्टेशन सजविण्यात आले आहे. ठाणे जिल्हयातील 300 हून अधिक स्वयंसेवकांनी (कॉलेरिंयर्सनी) किंग सर्कल स्टेशन सजवले, माटुंगा, बोरिवली, खार येथून, राजस्थानातूनही पुष्कळ बातम्या येत आहेत. सवाई माधोपूर, कोटा, असे वाटू लागले आहे की आमची रेल्‍वे स्टेशन आपल्या परंपरेची ओळख दर्शवू लागली आहेत. आता कोणी खिडकीतून चहा भज्यांच्या गाडीला नाही शोधणार, गाडीत बसून भिंतीवर पाहून येथील वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहतील आणि हा काही रेल्वेचा (इनिशिएटिव्ह) उपक्रम नव्हता की नरेंद्र मोदींचा हा नागरिकांचा उपक्रम होता. पाहा नागरिक करतात ते कसे?  हे मी पाहतो. मला काही प्रतिमाही मिळाल्या आहेत. परंतु माझ्या मनाला वाटत आहे की, आणखी काही प्रतिमा पाहाव्यात, काय आपण, रेल्वे स्थानकाबरोबरच इतर ठिकाणी स्वच्छतेबरोबरच सौदर्यासाठीही प्रयास केले आहेत? काय आपण मला पाठवू शकाल?

जरुर पाठवा. मी तर पाहिनच, बस स्थानकांवर असून शकतात, रुग्णालयात असू शकतात, चर्चच्या आसपास असून शकतात, बाग बगीच्यातही असू शकतात. किती तरी ठिकाणी असू शकतात? ज्यांच्या मनात हा विचार आला आणि ज्यांनी हा उपक्रम सुरु केला आणि ज्यांनी या गोष्टीस पुढे नेलं, त्या सर्वांच अभिनंदन. परंतु हो, आपण मला छायाचित्रे जरुर पाठवावित, मी आपण काय केलेलं आहे ते मी पाहु इच्छितो.

माझ्या प्रिय देशबंधु-भगिनींनो, आपल्यासाठी अभिमान वाटेल अशी एक गोष्ट सांगायची म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत आपला भारत देश एक मोठा समारंभ आयोजित करतो आहे. संपूर्ण दुनिया आपला पाहुणचार घ्यायला येणार आहे. जगातील कित्येक देशांचे युद्धपोत, नौसेनेची जहाजं, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणच्या समुद्र किनाऱ्यावर एकत्र येत आहेत. यावर्षी आंतरराष्ट्रीय नौका ताफा पाहणी (International Fleet Review) भारताच्या समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. जगाची सैन्यशक्ती आणि आपली सैन्य शक्ती यांचा ताळमेळ घालण्याचा हा एक प्रयत्न आहे. एक संयुक्त प्रयोग आहे. मोठी नामी संधी आहे ही. येणाऱ्या काही दिवसात टीव्ही आणि प्रसारमाध्यमांच्या द्वारे याबद्दलची माहिती आपणा सर्वांना मिळत जाणार आहे. कारण जेव्हा एखादा खूपच मोठा कार्यक्रम असतो तेव्हा त्याला सारेच पाठिंबा देतात. भारतासारख्या देशासाठी हा समारंभ महत्वपूर्ण आहे. भारताचा सामुद्रिक इतिहास सोनेरी राहिला आहे. संस्कृतमधे समुद्राला उदधि किंवा सागर म्हटले जाते. याचा अर्थ आहे अथांगता. सीमा आम्हाला वेगवेगळे ठेवत असतील, जमीन एकमेकांपासून विलग करत असेल. पण पाणी आपल्याला जोडत असतं, समुद्र आपल्याला एकमेकांशी जोडून देतो, आपण आपल्याला समुद्राशी जोडून घेऊ शकतो, कुणाशीही जोडून घेऊ शकतो. आमच्या पूर्वजांनी शतकांपूर्वी विश्वभ्रमण करुन जगाशी व्यापार करुन आपल्या या शक्तीचा परिचय करुन दिलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्रज्य असो किवा चौल साम्राज्य. चौल साम्राज्यात सामुद्रिक शक्‍तीच्या बाबतीत त्यांनी आपली म्हणून स्वत:ची एक नवीन ओळख बनवली होती. आपल्या देशात आजही अशी काही राज्ये आहेत की, जिथे समुद्राशी संबंधित अशा अनेक परंपरा जिवंत आहेत. त्या उत्सवांच्या रुपात साजऱ्या केल्या जातात. जेव्हा जग हे भारताचे पाहुणे म्हणून येणार आहे. तेव्हा आपल्या नौदलाच्या शक्तीची ओळख साऱ्यांना होणार आहे. एक चांगली संधी आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळणार आहे.

भारताच्या पूर्वेकडील गुवाहाटीमधेही क्रीडा स्पर्धांचे समारंभ होणार आहे. सार्क देशांचा क्रीडा समारंभ, सार्क देशांमधील हजारो खेळाडू गुवाहाटीच्या भूमीत येत आहेत. खेळांचा माहोल आणि खेळांचा जल्लोष सार्क देशांच्या नव्या पिढीचा गुवाहाटीत होत असलेला हा क्रीडा उत्सव म्हणजे सार्क देशांनी परस्परांशी नातेसंबंध दृढ करण्याची एक चांगली संधी आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, माझ्या मनात जे येतं, जे माझ्या मनात उमटतं ते खुले पणानं मी तुमच्याशी बोलत असतो, हे मी पहिल्यांदाच सांगून ठेवलंय. लवरकच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होतील. मागच्या वेळी “मन की बात” मधे मी परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी काही गोष्टी बोललो होतो. यावेळी माझी इच्छा आहे की, जे विद्यार्थी यापूर्वी परीक्षांमधे यशस्वी झालेत, त्यांनी तणावमुक्त परीक्षांच्या दिवसांसाठी काय काय केलं? त्यांच्या कुटुंबात कसं वातावरण होतं?  त्यांच्या शिक्षकांनी काय भूमिका निभावली? स्वत: त्यांनी कोणते प्रयत्न केले? त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना काय काय सांगितलं? आणि त्यांनी स्वत: काय काय केलं? हे सगळे अनुभव मला पाठवावेत यावेळी अशा विद्यर्थ्यांनी आपले अनुभव मला “नरेंद्र मोदी ॲप”वर पाठवावेत. आणि मी प्रसार माध्यमांनाही विनंती करेन की, या अनुभवांमधल्या चांगल्या गोष्टी येणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये माध्यमांमधून प्रसारित कराव्यात. जेणे करुन देशभरातील विद्यार्थी त्या वाचतील, टीव्हीवर पाहतील आणि त्यांनाही तणावमुक्त परीक्षा कशा द्याव्यात?  हसत-खेळत परीक्षा कशा दिल्या जातात? ह्याची एक औषधीच आपल्या हाती मिळेल. प्रसार माध्यमांचे मित्र ह्यासाठी नक्की मदत करतील, असा मला विश्वास आहे. हां – पण ते तेव्हाच मदत करतील, जेव्हा तुम्ही मला सर्व अनुभव पाठवाल.

पाठवणार ना? जरुर पाठवा.

खूप खूप धन्यवाद मित्रांनो ! पुन्हा एकदा पुढच्या “मन की बात” मधे अवश्य भेटूया.

खूप धन्यवाद.

(Release ID :135946)

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

वाचनात आलेला एक सुंदर संदेश

नील आर्मस्ट्राँग ...., चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव
पण तुम्हा ठाऊक आहे , NASA च्या नियोजित कार्यक्रमात
चंद्रावर पहिले पाऊल कोण ठेवणार होतं? अनेकांना हे ठाऊक
नाही .... मला ही माहीत नव्हतं !!
ती नियोजित व्यक्ति होती, एडविन सी अल्डारिन, अपोलो
मिशन चा पायलट ... तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत
होता, त्याला स्पेस वाॅकिंगचा अनुभव पण होता आणि म्हणुनच
त्याची या मिशनचा पायलट म्हणुन निवड झालेली होती.
नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होता....
त्याची या मिशनचा
को-पायलट म्हणुन निवड झालेली होती.
जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले, त्यांना नासाच्या बेस
स्टेशन कंट्रोल मधुन आदेश मिळाला , "Pilot First".
पण एडविन थबकला,
"काय होईल पुढे ",
"मी उतरल्या बरोबर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ओढला जाऊन
चंद्रभूमीत गडप तर नाही ना होणार, किंवा बाहेर पडल्या
बरोबर जळुन राख ही होऊ शकेल आपली वगैरे वगैरे....."
हा संशयाचा, अडखळण्याचा काळ काही तासांचा नव्हे तर
काही क्षणांचा ...
मधल्या काळात NASA ने पुढचा संदेश दिला, "Co-Pilot Next".
क्षणार्धात नील आर्मस्ट्राँग ने आपले पाऊल चान्द्रभूमीवर ठेवले
...!! आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला
...!!
मानवाच्या विकासाच्या इतिहासाच्या गौरवगाथेचा एक
भाग झाला...!!
हा जागतिक इतिहास बदलला एका क्षणात ....
एडविन कडे जरी गुणवत्ता होती... त्याने विशेष नैपुण्य प्राप्त
केले असल्यानेच त्याची प्राधान्यक्रमावर निवड झालेली
होती ....,
परंतू क्षणभर अडखळल्याने, तो त्या इतिहासाचा भाग होऊ
शकला नाही ...!!
जग फक्त त्यालाच ओळखतं ज्यानं प्रथम धाडस केलं ....
हे एक उत्तम उदाहरण आहे, माणुस भितीने, संकोचाने, करु का
नको या विचारात संधी कशी गमावतो याचं ....
जेव्हा जेव्हा तुम्ही चंद्राकडे बघाल, तेव्हा हे आठवा ...
क्षणभर अडखळणं आपल्याला एका देदीप्यमान विजयाचा,
इतिहासाचा भाग होण्यापासुन दूर ठेऊ शकतं...!!
आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उत्तमोत्तम गुणवत्ता आहे,
प्रश्न आहे तो फक्त क्षणभर अडखळण्याचा ... घाबरण्याचा ...
संकोचाचा ... लाजाळुपणाचा ... तेच आपल्याला अनेकदा
त्या यशप्राप्ती पासुन दूर ठेवतं जे मिळविण्यास आपण पात्र
असतो ...!!
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतात पण आपण विचारायला
घाबरतो, अनेकदा दुसऱ्यांच्या चांगुलपणाला दाद द्यायला
चुकतो, आणि कदाचित अनेकजण हा संदेश पुढे पाठविण्यात ही
चालढकल करतील ....!!
जर आपण चांगल्या व योग्य गोष्टी करायला चुकलो...
अडखळलो... घाबरलो... , तर बहुधा आपण फार मोठी चुक करीत
आहोत नाही का ...???

भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे

सौजन्य : डाॅ. सुषमा कुलकर्णी

असंच एकदा बोलण्याच्या ओघात, कौटुंबीक गप्पांत मी म्हणाले होते, 'त्याचं नि माझं मैत्र आहे.' त्याचं म्हणजे नवऱ्याचं.
त्यावेळी एक मैत्रीण एकदम फुसकारली, 'काय मैत्र? तू मराठीची पीएच.डी. आहेस, तुला मैत्री म्हणायचंय ना?'
'नाही गं, मला 'मैत्र'च म्हणायचं आहे. मैत्री आणि मैत्र यात एका 'इ'काराचा फरक दिसत असला तरी अर्थाच्या दृष्टीने अधिक सखोलता आहे.'
'ती कशी काय?', ती फणकारली.
मैत्री होत असते, ठरवून करता येत नाही आणि मैत्र सहानुभूवाने आपोआप जाणवायला लागतं. ज्ञानेश्वरांनी पसायदानात 'भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे', असं म्हटलं आहे आवर्जून. त्यांना 'मैत्री' हा शब्द माहीत नव्हता की काय? असं वाटतंय का तुला?
ती गप्प झाली आणि मी सांगू लागले. प्रेम जसं आपोआप होतं तशीच मैत्री होते. एक क्षण पुरे मैत्रीला. समान स्वभाव, आवडी-निवडी यातून मैत्री कळीचं अलगद फूल व्हावं तशी होते. सहवासातून, विचारांतून, एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो त्यावेळी मैत्र फुलतं. हे फुलणं जाणीवेच्या पल्याड असतं. 'शब्दांवाचून कळते सारे शब्दांच्या पलीकडले', असं घडतं. मैत्रात देणं, घेणं, मागणं हे काहीच नसतं. असतं ते केवळ संवेदन. त्यासाठी जवळ असण्याची ही गरज नसते, तर असते फक्त एकरूपत्व.
पती-पत्नीचं मैत्र असलं की संसार कसा नेटका, फुलून आलेला, बहरलेला दिसतो. नाही तर असतोच फाटका. पाठीमागून पाहणारासही दुसऱ्याच्या मनातली खळबळ किंवा आनंद कळतो. ते असतं आपापसांतील मैत्र. सख्यभावात मैत्र अनुस्यूत असतं. पत्नीच्या सांगण्यावरून सुदामा श्रीकृष्णाकडे, द्वारकेला गेला; पण काही मागावे असे त्याला वाटलेच नाही. कृष्णाने मैत्रभावाने जाणलं होतं. त्यानं मागितलं नाही, यानं दिलं नाही; पण मिळालं मात्र आपोआप!
असं मैत्र ईश्वराशी जोडलं गेलं पाहिजे आपणा सर्वांचं. जो कोणी त्याच्याजवळ मैत्रभावाने जाईल, त्याच्याशी त्याचं मैत्र जुळतं. मैत्र म्हणजे एकरूपता असं साध्या शब्दांत म्हणता येईल. ईश्वरभक्ताचा 'शब्देविण संवाद' होत असतो, ते असतं मैत्र.
असं मैत्र विश्वात व्हावं, अशी ज्ञानेश्वरांची इच्छा त्यांनी व्यक्त केली. विश्वातील चराचरामध्ये मैत्रभाव निर्माण झाला तर अवघं विश्व सुखानंदाच्या सरोवरात विहार करील.
महनीय श्रेष्ठ व्यक्तींचं वागणं, बोलणं, आचरण सारंच दैदीप्यमान असतं. सामान्य माणसांना त्यापर्यंत जाणं दुरापास्त असतं. विश्वचराचरात मैत्रभाव निर्माण करणं सर्वसामान्यांसाठी सहज साध्य नाही. आपल्या परीनं प्रयत्न करून आपल्यासोबतच्या छोट्याशा परिघात का होईना, मैत्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करावयास काय हरकत आहे.
त्यासाठी आपल्या मनाला समजावलं पाहिजे, की हे मना! तू कुणाचा द्वेष, कुणाची ईर्षा, कुणाशी वैर करू नकोस. हे जर आपल्याला थोड्या प्रमाणात जमलं तर आपण 'मैत्र' शब्दाच्या अर्थाजवळ जाऊ शकू, असा विश्वास वाटतो. मैत्रभावाने विश्व जवळ येऊ शकते.

लेखक/लेखिकेचे नाव माहित नाही . सुंदर अभिव्यक्ती

मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

फौजी म्हणजे………

फौजी म्हणजे फीरता वारा
फौजी म्हणजे वाहता झरा।
फौजी म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।

      फौजी अंगावरील शहारा
      फौजी रात्रीचा पहारा।
       फक्त फौजीच आहे
       सुख अन दु:खाचा सहारा।।

फौजी जन हिताचा नारा
फौजी आहे अनमोल हिरा।
फौजी म्हणजे गुन्हेगारांचा
एक बापच आहे दुसरा।।

       फौजी म्हणजे धाक दरारा
       त्याचाच आहे वचक सारा।
       काहीही करु शकतो पोलीस
       जर असेल तो नितीनं खरा।।

फौजीवर प्रेम करुन पहा

एकदा तरी फौजीवर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।

         जीवाला जीव देईल तुमच्या
         त्याचा हात धरुन पहा।
         त्याचं नाव काळजावर
         एकदातरी कोरुन पहा।।

कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।

          त्याच्या सारख्या यातना
         एकदा तरी सोसुन पहा।
          अनोळखी जगात तुम्ही
           एकटे बसुन पहा।।

दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।

         एकदा तरी फौजीवर
          प्रेम करुन पहा।
          तो रोज मरतो तुम्ही
          एकदातरी मरुन पहा।।

लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
फौजीच्या यातना सोसुन पहा।।

         एकदा तरी फौजीवर
          तुम्ही प्रेम करुन पहा………
   

आवडले तर नक्की शेअर करा
              व मित्रांना ही पाठवा

शनिवार, ९ जानेवारी, २०१६

"नेट न्युट्रॅलिटी'विषयी 24 लाख सूचना-हरकती

सकाळ वृत्तसेवा  शनिवार, 9 जानेवारी 2016 - 10:30 AM IST

मुंबई - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) "नेट न्युट्रॅलिटी‘शी संबंधित "डिफरेन्शिअल डेटा प्राइसिंग‘च्या प्रबंधावर 24 लाख सूचना आणि हरकती आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी नुसत्या फेसबुक "फ्री बेसिक‘ला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या 18 लाख आहे.

ट्रायच्या प्रबंधावर सूचना आणि हरकती दाखल करण्यासाठी गुरुवारपर्यंत (ता. 7) मुदत होती. प्राधिकरणाकडे आतापर्यंतच्या सर्वाधिक अशा 24 लाख सूचना आणि हरकती आल्या आहेत. फेसबुकने ई-मेलद्वारे मोहीम सुरू करत "फ्री बेसिक‘ला पाठिंबा देण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटवर मोहीम सुरू केली होती. तसेच, वृत्तपत्रांतही मोठ्या प्रमाणावर जाहिरातींचा आधार फेसबुकने घेतला. महत्त्वाचे म्हणजे, फेसबुकने "सेव्ह द इंटरनेट फोरम‘च्या ई-मेल सारखीच पद्धत "फ्री बेसिक‘ला पाठिंबा मिळवण्यासाठी वापरली होती. ट्रायकडे फेसबुकने मांडलेल्या प्रतिसादात "फ्री बेसिक‘सारख्या "झीरो रेटेड प्लॅटफॉर्म‘वर बंदी आणू नये, अशी मागणी केली होती. "फ्री बेसिक‘चा उद्देश अधिकाधिक भारतीयांना इंटरनेटवर आणण्याचा आहे, तसेच "इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी‘ भारतभर वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे.

"नेट न्युट्रॅलिटी'विषयी 24 लाख सूचना-हरकती

सकाळ वृत्तसेवा  शनिवार, 9 जानेवारी 2016 - 10:30 AM IST

मुंबई - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) "नेट न्युट्रॅलिटी‘शी संबंधित "डिफरेन्शिअल डेटा प्राइसिंग‘च्या प्रबंधावर 24 लाख सूचना आणि हरकती आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी नुसत्या फेसबुक "फ्री बेसिक‘ला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या 18 लाख आहे.

ट्रायच्या प्रबंधावर सूचना आणि हरकती दाखल करण्यासाठी गुरुवारपर्यंत (ता. 7) मुदत होती. प्राधिकरणाकडे आतापर्यंतच्या सर्वाधिक अशा 24 लाख सूचना आणि हरकती आल्या आहेत. फेसबुकने ई-मेलद्वारे मोहीम सुरू करत "फ्री बेसिक‘ला पाठिंबा देण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटवर मोहीम सुरू केली होती. तसेच, वृत्तपत्रांतही मोठ्या प्रमाणावर जाहिरातींचा आधार फेसबुकने घेतला. महत्त्वाचे म्हणजे, फेसबुकने "सेव्ह द इंटरनेट फोरम‘च्या ई-मेल सारखीच पद्धत "फ्री बेसिक‘ला पाठिंबा मिळवण्यासाठी वापरली होती. ट्रायकडे फेसबुकने मांडलेल्या प्रतिसादात "फ्री बेसिक‘सारख्या "झीरो रेटेड प्लॅटफॉर्म‘वर बंदी आणू नये, अशी मागणी केली होती. "फ्री बेसिक‘चा उद्देश अधिकाधिक भारतीयांना इंटरनेटवर आणण्याचा आहे, तसेच "इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी‘ भारतभर वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान, आता कारवाई कराच: अमेरिका

वॉशिंग्टन : पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात वेळ दवडू नका, असा ‘सल्ला‘ अमेरिकेने आज (शनिवार) पाकिस्तानला दिला. या हल्ल्याशी संबंधितांवर कारवाई करण्यास दडपण आणण्यासाठी आता अमेरिकेनेही पाकिस्तानला काही खडे बोल सुनावले आहेत.


हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानमधील संघटनांचा हात होता, असे पुरावे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिले आहेत. ‘या पुराव्यांवर आधारित कारवाई करू, असे त्यांनी (पाकिस्तान) जाहीररित्या सांगितले आहे. कुठल्याही दहशतवादी संघटनांबाबत सौम्य धोरण नसेल, असेही त्यांनी सांगितले आहे. आता या घोषणांना कृतीची जोड मिळते की नाही, याकडे आमचे लक्ष आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करण्यात पाकिस्तानने चालढकल केली. आता पठाणकोट हल्ल्यातील संबंधितांना पाठीशी घालण्यासाठी पाकिस्तानने लंगडे समर्थन करू नये,‘ अशा स्पष्ट शब्दांत अमेरिकेच्या गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पाकिस्तानला इशारा दिला.

 
अर्थात, ‘ही कारवाई करण्यासाठी पाकिस्तानी सरकारला पुरेसा वेळ दिला पाहिजे, असेही अमेरिकेला वाटते,‘ अशी पुस्तीही त्या अधिकाऱ्याने जोडली. त्याचबरोबर, ‘पूर्वीप्रमाणे पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठीशी घालणार नाही‘ अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.

‘या दहशतवादी हल्ल्यातील म्होरक्‍यांवर ठोस कारवाई झाली नाही, तर पाकिस्तानला कोणतीही नवी लष्करी मदत देण्यामध्येही अडथळे निर्माण होतील,‘ असा सूचक इशारा अमेरिकेने पाक्किस्तानला दिला आहे.

PTI

गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

मोदींनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे

ठाणे - पाकिस्तानने आतापर्यंत आपला विश्‍वासघातच केला आहे,त्याच्याशी आणखी किती काळ चांगल्या भावनेने चर्चा करणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या आधी जी भाषा करीत होते, त्याच भाषेत त्यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणे आवश्‍यक आहे, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. 6) येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात उद्धव बोलत होते. यावेळी "साम‘ वाहिनीचे चंद्रमोहन पुप्पाला (दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार), "सकाळ‘च्या "एसआयटी‘चे तुषार खरात (स्व. प्रमोद भागवत शोधपत्रकारिता पुरस्कार) यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे "सकाळ‘चे निवृत्त प्रतिनिधी सुधीर कोऱ्हाळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव यांना प्रश्‍न विचारले असता ते म्हणाले, की पाकिस्तानने आतापर्यंत आपला विश्‍वासघातच केला आहे. त्यांच्याशी किती काळ चांगल्या भावनेने चर्चा करणार आहोत, असा प्रश्‍न केला. परिस्थिती नियंत्रणात नसेल तर किती काळ चर्चेची वाट बघणार आहोत? त्यांना लवकरात लवकर उत्तर देणे अपेक्षित आहे. निवडणुकीच्या आधी मोदींनी जी भाषा वापरली होती, त्याच भाषेत सडेतोड उत्तर ते देतील, अशी आशा आहे.

पत्रकारांविषयी उद्धव म्हणाले, की हल्लीच्या पत्रकारांनी पथ्ये पाळली तर हल्ल्याची भीती राहणार नाही. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचा आदर्श त्यांनी घेतला, तर पत्रकारावरील हल्ल्यांच्या प्रतिबंधासाठी कायदा करण्याची गरज नाही.‘ आपण पत्रकार संरक्षण कायद्याच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे आहेत. त्यांनी अनेक मोठी खाती विदर्भातल्या मंत्र्यांकडे दिली आहेत. त्यांनी विदर्भाचा विकास करावा; पण महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू नये.

पठाणकोट : एअरबेसच्या गेटवर एका संशयिताला अटक


पठाणकोट, दि. ६ - पठाणकोटमधील एअरबेसच्या मुख्य गेटजवळ बॅग घेऊन फिरणा-या एका संशयित व्यक्तीला लष्कराच्या जवानांनी अटक केली आहे. या अटक केलेल्या संशयित व्यक्तीची लष्कराकडून चौकशी करण्यात येत आहे.

येथील एअरबेसवर हल्ला करणा-या सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आज संध्याकाळी लष्कराने आपले सर्च ऑपरेशन थांबविले. त्यानंतर काही तासानंतर एअरबेसच्या मुख्य गेटजवळ बॅग घेऊन फिरणा-या एका संशयित व्यक्तीला अटक केली असून त्याची लष्कर कसून चौकशी करत आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी एअरबेसवर हल्ला केला. याला प्रत्युत्तर देत लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात लष्कराचे सात जवानही शहीद झाले. दरम्यान, या हल्ल्याची चौकशी एनआयएकडून करण्यात येत आहे. 

[ऑनलाइन लोकमत]

गुरुदासपूरमध्ये शोधमोहीम सुरू


गुरुदासपूर : पंजाबवरील अतिरेकी हल्ल्याचे सावट अद्यापही कायम आहे. राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील तिबरी या छावणी भागात लोकांनी लष्कराच्या पोशाखातील दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली टिपल्यानंतर बुधवारी येथे अलर्ट जारी करण्यात आला. यानंतर लगेच पोलीस व लष्कराने शोधमोहीमही हाती घेतली.

तिबरी हे छावणी क्षेत्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गावकऱ्यांनी तिबरीच्या आजूबाजूला लष्कराच्या वेशातील दोघांना संशयास्पद स्थितीत फिरताना पाहिले.

गावकऱ्यांकडून याबाबत सूचना मिळताच, पोलिसांनी लष्कराला माहिती दिली. यानंतर या संपूर्ण भागात संयुक्त शोधमोहीम सुरू झाली. तूर्तास या छावणी क्षेत्रात अती सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)

पठाणकोट : असा झाला खात्मा

पठाणकोट : पठाणकोट एअरबेसवरील सर्व सहा अतिरेकी ठार झाले असले तरी बुधवारीही सुरक्षा दलांचे ‘सर्च आॅपरेशन’सुरूच होते. सहाही अतिरेकी सतत गोळीबार आणि हातगोळे डागत असतानाच राष्ट्रीय सुरक्षा गार्डने (एनएसजी) गार्डस् व लष्कराच्या मदतीने त्यांचा खात्मा करण्यासाठी पावलोपावली ‘सर्जिकल आॅपरेशन’ राबवले. २५० मीटरच्या टप्प्यात अतिरेक्यांना घेरण्याची एनएसजीची योजना होती आणि ती यशस्वी ठरली.

अतिरेकी हल्ल्यानंतर चार दिवस ‘ओलिस’ राहिलेल्या पठाणकोट हवाईतळावर अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. याशिवाय अतिरेकी हल्ल्याच्या तपासाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अधिकाऱ्यांच्या मते, पुढील एक वा दोन दिवस ते सुरू राहण्याची शक्यता आहे. अतिरेक्यांना ठार करणे अतिशय आव्हानात्मक होते. कारण एकीकडे सुरक्षा दलास एअरबेसवरील कुटुंबे, हवाईदलाची संपत्ती आणि इमारतींना धक्का लागू द्यायचा नव्हता, तर दुसरीकडे अतिरेक्यांना एका विशिष्ट भागात घेरून ठार करायचे होते. यासाठी गार्डस्, हवाईदलाचे विशेष दल आणि लष्कराने विशिष्ट ठिकाणी प्रत्येक पावलागणिक सर्जिकल आॅपरेशन राबवले आणि सहाही अतिरेक्यांना कंठस्नान घातले. या आॅपरेशनमध्ये देशाने आपले सात जवानही गमावले. (वृत्तसंस्था)

पठाणकोट हवाईतळावर अतिरेक्यांविरुद्ध राबवण्यात आलेले अभियान सर्वाधिक यशस्वी असल्याचा दावाही भाजपने केला.

भाजप सचिव श्रीकांत शर्मा म्हणाले की, पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा फोन आला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी बोलून दाखवली. मुंबई अतिरेकी हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानकडून अशी कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. मोदींनी पाकिस्तानकडे पठाणकोट हल्ल्याप्रकरणी निर्णायक कारवाई करण्याची मागणी केली. शरीफ यांनीही त्यांना कारवाईचे आश्वासन दिले, असे ते म्हणाले.

नगरमध्ये युद्धाचा थरार!

  • अहमदनगर : पायदळाच्या सूचनांवर बॉम्बगोळ्यांचा वर्षाव करून शत्रूला उद्ध्वस्त करणारे आधुनिक तंज्ञत्रानयुक्त रणगाडे, त्यांच्या मदतीला हवाई हल्ले अन् जवानांची चढाई अशा वातावरणात के. के. रेंज परिसरात प्रत्यक्ष युद्धासारखा थरार रंगला.

    येथील एसीसी अ‍ॅण्ड एस व एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण केंद्रातर्फे बुधवारी सकाळी अहमदनगरपासून १५ किमीवरील खारेकर्जुनेच्या माळरानावर हा फायर डेमो पार पडला. सुमारे दहा चौरस किलोमीटरचा परिसर दोन तासांत बेचिराख झाला. पायदळ व रणगाडाचालक यांचा नेमका समन्वय, चालत्या रणगाड्यातून शत्रूच्या हालचाली टिपत एकाच वेळी जमिनीवर व हवेतही केलेला अचूक मारा यातून भारतीय सैन्याची सज्जता, साहस आणि पराक्रमाचा प्रत्यय आला.

    प्रारंभी पायदळाने शत्रूच्या दिशेने लपतछपत कूच करायची, शत्रू निशाण्यावर आल्यानंतर मागे असलेल्या रणगाडा सैन्याशी (सपोर्ट फायर) समन्वय साधून क्षेपणास्त्रांनी शत्रूचे अड्डे उद्ध्वस्त करायचे, गरज भासलीच तर हवाई हल्ल्यासाठी हेलिकॉप्टर, सुखोई लढाऊ विमाने सज्ज, असा युद्धाचा प्रत्यक्ष थरार पाहून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

    आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅण्ड स्कूलचे कमांडंट मेजर प्रवीण दीक्षित, मॅकेनाईन्ड इन्फट्री रेजिमेंट सेंटरचे ब्रिगेडिअर व्ही. एस. वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे युद्धाचे प्रात्यक्षिक झाले. प्रात्यक्षिकानंतर रणगाडे, क्षेपणास्त्रे तसेच युद्धात वापरण्यात येणाऱ्या बंदुका, दारूगोळा उपस्थितांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला होता. (प्रतिनिधी)

[Lokmat]

बुधवार, ६ जानेवारी, २०१६

'ट्विट'ची मर्यादा 10 हजारपर्यंत वाढणार?

नवी दिल्ली - मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर लिहिण्यासाठी असलेली 140 शब्दांची मर्यादा लवकरच 10 हजार अक्षरांपर्यंत वाढणार असल्याची माहिती तंत्रविषयक वृत्त देणाऱ्या एका ऑनलाईन संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

ट्‌विटर वापरणाऱ्या युजर्सना सध्या केवळ 140 शब्दांमध्ये व्यक्त होण्याची सुविधा आहे. मात्र ही मर्यादा 10 हजार अक्षरांपर्यंत वाढविण्याबाबत ट्‌विटर विचार करत असून ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. मात्र याबाबतची नक्की तारीख अद्याप निश्‍चित केलेली नाही. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी म्हणजेच मार्चअखेरपर्यंत ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे. शब्दमर्यादा वाढल्यानंतर ट्‌विटरच्या टाईमलाईनमध्ये कोणताही बदल होणार नाही. सध्याप्रमाणेच सुरुवातीचे 140 शब्द दिसतील आणि त्यानंतर पुढील मजकूर वाचण्यासाठी क्‍लिक करावे लागेल. दरम्यान याबाबत ट्‌विटरने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

पठाणकोट: लष्कराऐवजी एनएसजीस पाचारण का?

नवी दिल्ली - पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर येथून जवळच असलेल्या लष्कराच्या तुकड्यांना तातडीने पाचारण करण्याऐवजी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या (एनएसजी) कमांडोंना थेट दिल्लीहून येथे आणण्याच्या सरकारच्या निर्णयावर लष्कर व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वर्तुळांमधून विषादपूर्ण आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे वृत्त आज (बुधवार) सूत्रांनी दिले.

"आमच्यापैकी कोणाचाही सरकारच्या या निर्णयावर प्रथमदर्शनी विश्‍वास बसला नाही. पठाणकोट भागामध्येच लष्कराच्या दोन इन्फंट्री डिव्हिजन्स आणि दोन आर्मर्ड ब्रिगेड्‌स तैनात आहेत. शिवाय लष्कराच्या उत्तर विभाग मुख्यालयाशिवाय लष्कराच्या तीन मुख्य तुकड्यांची मुख्यालयेही येथून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर आहेत. या सर्व तुकड्यांना दहशतवादविरोधी मोहिमेचा चांगला अनुभव आहे. मात्र लष्करास पाचारण करण्याऐवजी काही एनएसजी कमांडो बोलाविण्यामध्ये सरकारने महत्त्वपूर्ण वेळ वाया घालवला,‘‘ असे कठोर मत लष्करातील पठाणकोटपासून जवळच तैनात असलेल्या एका ब्रिगेडियर अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

पॅराकमांडो दलामधील निवृत्त अधिकारी आणि सुरक्षा तज्ज्ञ लेफ्टनंट जनरल प्रकाश कटोच यांनीही पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनेवर टीका केली आहे.

एनएसजी दल हे विशिष्ट लक्ष्याचा भेद करण्यासाठी वापरले जाते. एका भागामधील लक्ष्य हुडकून काढून ते नष्ट करण्यासाठी एनएसजी वापरात आणले जात नाही. पठाणकोटसारख्या ठिकाणी प्रथम दहशतवाद्यांना हुडकून काढून ठार मारण्यासंदर्भातील मोहिम राबविणे आवश्‍यक होते. अशा कामासाठी लष्कर हाच सर्वोतम पर्याय आहे. एनएसजी पाठविण्यात काही गैर नाही; मात्र अशा वेळी नेमक्‍या आज्ञा असणे आवश्‍यक आहे. बीएसएफ, एनएसजी, लष्कर यांना एकाचवेळी एकाच लक्ष्याचा भेद करण्यासाठी आज्ञा देणे योग्य नाही. पठाणकोटसंदर्भातील उपाययोजनेबात अधिक नियोजन आवश्‍यक होते,‘‘ असे कटोच म्हणाले.
याखेरीज, लष्कर व हवाई दलाशी संबंधित अनेक अधिकाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयावर आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

[वृत्तसंस्था]

पठाणकोट जवळील गुरुदासपूर येथे "हाय अलर्ट'

गुरुदासपूर - पंजाब राज्यामधील गुरुदासपूर जिल्ह्यामध्ये लष्कराच्या गणवेशामधील दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर अत्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लष्कराकडून या भागामध्ये मोठी शोधमोहिम राबविण्यात येत आहे. लष्करी छावणीचा भाग असलेल्या टिब्रीमध्ये लष्करी गणवेशामधील दोन व्यक्तींकडून संशयास्पद वर्तन आढळून आले. पोलिसांनी तत्काळ याची माहिती लष्करास कळविल्यानंतर या भागामध्ये संयुक्त शोधमोहिम सुरु करण्यात आली.
गुरुदासपूर येथे गेल्या वर्षामधील (2015) जुलै महिन्यात दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला चढविण्यात आला होता. पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरुदासपूर भागामध्येही अत्यंत सावधानता बाळगण्यात येत आहे.

एमपीएससी : सामान्य अध्ययनाची तयारी

मित्रांनो, येत्या १० एप्रिलला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे. 

वसुंधरा भोपळे | January 4, 2016 3:47 AM 

येत्या १० एप्रिलला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन पेपर २ अर्थात सीसॅट या पेपरचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि अभ्यासाची व्यूहनीती यासंबंधीचे मार्गदर्शन-

 

मित्रांनो, येत्या १० एप्रिलला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे. राज्याच्या प्रशासनामध्ये स्वत:चा ठसा उमटविण्याचे ध्येय बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच मुख्य परीक्षेसाठी संधी प्राप्त होत असल्यामुळे ही परीक्षा महत्त्वाची ठरते. या परीक्षेमध्ये प्रत्येकी २०० गुणांचे एकूण दोन पेपर असतात. त्यांपकी सामान्य अध्ययन पेपर १ बद्दल यापूर्वीच्या लेखात माहिती घेतलीच आहे. इथे आपण सामान्य अध्ययन पेपर- २ म्हणजेच उरअळ CSAT ( Civil services Aptitude Test) बाबत माहिती घेऊ या.

पेपरचे स्वरूप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१३ पासून राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप बदलून सामान्य अध्ययन या पेपरसोबत सीसॅटचा पेपर समाविष्ट केला आहे. या पेपरमध्ये एकूण २०० गुण व ८० प्रश्न समाविष्ट असतात. प्रत्येक प्रश्नाला अडीच गुण असतात. सर्वसाधारणपणे मराठी आणि इंग्रजी भाषेतील उताऱ्यांवर ५० प्रश्न तसेच गणित व बुद्धिमत्ता आणि माहितीचे आकलन या विभागावर २५ प्रश्न असतात आणि निर्णयक्षमता, संभाषण कौशल्य या विभागावर ५ प्रश्न असतात. यापकी उताऱ्यांवरील प्रश्न आणि गणित, बुद्धिमत्तेवरील प्रश्नांसाठी ऋणात्मक गुण पद्धतीचा (Negative Marking) अवलंब केला जातो. तर निर्णयक्षमता, संभाषणकौशल्य या विभागातील प्रश्नांसाठी ऋणात्मक गुणपद्धती वापरली जात नाही. या पद्धतीमध्ये प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांसाठी बरोबर असणाऱ्या एका प्रश्नाचे गुण वजा केले जातात. परीक्षेचा अभ्यासक्रम आकलनक्षमता, संभाषणकौशल्य, तर्क अनुमान आणि विश्लेषणक्षमता, निर्णयक्षमता, सामान्य बुद्धिमानक्षमता, मूलभूत अंकगणित, माहितीचे आकलन, मराठी व इंग्रजी आकलनक्षमता. हा अभ्यासक्रम साधारणपणे खालील तीन टप्प्यांत विभागता येईल-

 

आकलन क्षमता :

या विभागामध्ये उतारे आणि त्यावरील प्रश्नांचा समावेश असतो. हे उतारे मराठी तसेच इंग्रजी या दोन्हीही भाषांमध्ये असतात. (अपवाद फक्त मराठी व इंग्रजी आकलनक्षमता. या विभागांतर्गत येणारे उतारे एकाच भाषेत असतात.) उतारे आणि उताऱ्यावरील प्रश्न सोडविण्याचे एक मूलभूत तंत्र असते. सर्वसाधारणपणे पाहिले असता उताऱ्यावरील प्रश्न हे खालील प्रकारचे असतात- उताऱ्याला योग्य शीर्षक द्या किंवा उताऱ्याचा मुख्य आशय स्पष्ट करा. उताऱ्यामध्ये दिलेली वस्तुनिष्ठ माहिती शोधा. लेखकाचा दृष्टिकोन स्पष्ट करा. उताऱ्यावरून योग्य तो निष्कर्ष काढा. उताऱ्यामध्ये उल्लेखित म्हणी, वाक् प्रचार, अवघड शब्द यांचा अर्थ सांगा. असे प्रश्न सोडवण्यासाठी खालील दोन तंत्रांपकी एका तंत्राचा वापर करता येतो-

तंत्र-१ :

प्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवणे. या तंत्राचा वापर करताना विद्यार्थ्यांनी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत- उताऱ्यातील प्रत्येक वाक्याचा अर्थ समजल्याशिवाय पुढच्या वाक्याकडे जाऊ नये. उताऱ्यामधील ज्या वस्तुनिष्ठ माहितीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, ती अधोरेखित करावी. उतारा वाचताना त्याचा सारांश लक्षात घ्यावा. उताऱ्याचे पूर्ण आकलन झाल्यानंतर प्रश्नांकडे वळवावा.

तंत्र- २ :

प्रथम प्रश्न वाचून नंतर उतारा वाचणे. या तंत्राचा वापर करताना विद्यार्थ्यांनी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत- प्रथम प्रश्न वाचताना थेट उत्तर शोधण्याचा प्रयत्न न करता प्रश्नाचे नेमके स्वरूप समजून घ्यावे. प्रश्नामधील असे काही महत्त्वाचे शब्द अधोरेखित करावेत, ज्यांच्या मदतीने नंतर उतारा वाचताना त्यातील महत्त्वाच्या ओळी अधोरेखित करता येतील. जेव्हा एखाद्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नाचा संदर्भ उतारा वाचताना येतो, तेव्हा अशा प्रश्नाचे उत्तर लगेच नमूद करावे. यानंतर जेव्हा संपूर्ण उतारा वाचून होईल तेव्हा आशयाशी निगडित असणारे प्रश्न सोडवणे सुलभ होते. सीसॅटचा पेपर सोडवताना आकलनक्षमता या विभागाला जास्तीत जास्त ६० ते ७० मिनिटेच देता येतात. या ठरावीक वेळेमध्ये जवळपास १० ते ११ उतारे वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. यासाठी ठरावीक वेळेत उतारे सोडविण्याचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे, तसेच वाचनाचा वेग वाढणे आवश्यक आहे.

संदर्भग्रंथ :

सिनर्जी पब्लिकेशनचे मराठी आकलनक्षमता, इंग्रजी उताऱ्यांसाठी अरिहंत पब्लिकेशनचे English Comprehaension या पुस्तकांतील उताऱ्यांचा सराव करावा. बुद्धिमापन व अंकगणित : या विभागातील प्रश्न सोडवताना घातांक, सरासरी, शेकडेवारी, नफा-तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, काळ-काम-वेग, वेग-वेळ-अंतर, सरळव्याज, चक्रवाढव्याज, कालमापन, इनपुट-आऊटपुट, तर्कशास्त्र, बठकव्यवस्था, माहितीचे आकलन या घटकांना सरावादरम्यान अधिक महत्त्व द्यावे. या घटकांवर आधारित साधारणपणे २५ प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त ३० मिनिटे मिळू शकतात. त्यामुळे पेपर सोडवताना त्याचे भान राहण्यासाठी या घटकांचा जास्तीत जास्त सराव करणे गरजेचे आहे. संदर्भपुस्तके : विजेता पब्लिकेशनचे सीसॅटचे पुस्तक, वा. ना. दांडेकर यांची गणित व बुद्धिमत्तेची पुस्तके, पंढरीनाथ राणे यांचे क्लृप्त्या आणि सूत्रे हे पुस्तक किंवा या घटकांचा समावेश असणारे कोणतेही पुस्तक वापरता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्तीत जास्त सराव होय.

निर्णयक्षमता :

या विभागातील प्रश्नांद्वारे उमेदवार त्याच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या कशा प्रकारे हाताळतो, तसेच नागरी सेवांमध्ये काम करताना येणाऱ्या समस्यांना सोडवण्याची त्याची क्षमता, नीतिमत्ता व मूल्ये या गोष्टी तपासण्याचा आयोगाचा हेतू आहे. हे प्रश्न सोडवताना खालील गोष्टींचा विचार करावा. दिलेल्या समस्येमध्ये उपलब्ध असलेली संसाधने उदा. मानवी संसाधन, वित्तीय संसाधने, नसíगक संसाधने दिलेल्या समस्येमध्ये समाजातील समाविष्ट घटक एक अधिकारी / सामान्य व्यक्ती म्हणून नीतिमूल्ये, पारदर्शकता, जबाबदारी, प्रामाणिकपणा, सहानुभूती, कर्तव्ये. शेवटी अंतिम उत्तरापर्यंत येताना दिलेली समस्या पूर्णपणे समजावून घेऊन उपलब्ध पर्यायांचा समस्येला अनुरूप संबंध लावावा. उत्तरांचा प्राधान्यक्रम निश्चित करून अचूक उत्तरापर्यंत यावे. अशा प्रकारे आपल्या अभ्यासाची व्यूहरचना प्रारंभीच करून जास्तीत जास्त सराव चाचण्या सोडवून विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवण्याचे स्वत:चे तंत्र विकसित करावे. आयोगाचे पेपर सुमारे ४८ ते ५६ पानांचे असतात. यावरून आयोगाचा उद्देश हाच आहे, की विद्यार्थ्यांला ८० व्या प्रश्नापर्यंत पोहोचू द्यायचे नाही. याचा विचार केल्यास विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जमेच्या बाजू पाहून जे घटक स्वत:ला अवघड जाणार असतील ते परीक्षेच्या वेळी प्रामाणिकपणे बाजूला ठेवले आणि आपल्या उत्तरांची अचूकता वाढवली तर सीसॅटमध्ये जास्तीत जास्त गुण मिळविणे निश्चितच शक्य आहे.

अभ्यासाचा श्रीगणेशा

अभ्यासाचा श्रीगणेशा करताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आयोगाच्या अपेक्षांचे विश्लेषण केले पाहिजे. आयोग विद्यार्थ्यांशी केवळ तीन माध्यमांतून संवाद साधत असतो- अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, निकाल. या तीन माध्यमांतून आयोगाने दिलेला संदेश विद्यार्थ्यांच्या ध्यानात आला की, अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते. आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमावरून नेमका अभ्यास कोणता करायचा हे लक्षात येते; परंतु किती खोलात जाऊन अभ्यास करायचा हे ठरविण्यासाठी जुन्या प्रश्न पत्रिकांचा योग्य तो आधार घ्यावा लागतो. त्या आधारे आपण आपल्या अभ्यासाची व्यूहनीती ठरवू शकतो. परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी मात्र आपल्याला जुने निकाल मार्गदर्शक ठरतात. या निकालांचे विश्लेषण केले असता प्रत्येक पेपरमध्ये जर ५० टक्के गुण मिळाले तर आपण महाराष्ट्रात पहिले येऊ शकतो याचे आकलन होते आणि साधारणपणे आपले लक्ष्य ५० ते ६० टक्क्यांपर्यंत निर्धारित करता येते. या विश्लेषणामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असणारी ‘सीसॅट’बाबतची भीती कमी होऊन विद्यार्थी गोडीने अभ्यासाचा प्रारंभ करू शकतात.

First Published on January 4, 2016 3:47 am

[Loksatta]

आरोपींना गोळ्या घालण्याचे अधिकार द्या! दिल्लीचे पोलीस आयुक्त बस्सी यांची मागणी

दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी

दिल्ली पोलीस दिल्ली सरकारला उत्तर देण्यास बांधील नाहीत हे ‘सुदैव’ असल्याचेही पोलीस आयुक्त

एक्स्प्रेस वृत्तसेवा

नवी दिल्ली  महिलांविरुद्धच्या गुन्ह्य़ातील आरोपींना फासावर लटकविण्याचे अथवा गोळ्या घालून ठार मारण्याचे अधिकार जर घटनेने दिले तर दिल्ली पोलीस ते अधिकार पूर्ण क्षमतेने जागीच अमलात आणतील, असे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. दिल्लीत महिलांविरुद्धच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले, त्या संदर्भाने ते दिल्ली पोलिसांच्या वार्षिक पत्रकार परिषदेत बोलत होते. दिल्ली पोलीस दिल्ली सरकारला उत्तर देण्यास बांधील नाहीत हे ‘सुदैव’ असल्याचेही पोलीस आयुक्त म्हणाले. जनतेने मागणी केल्यानुसार आम्ही कारवाई करू शकत नाही. लोकशाही समाजव्यवस्थेत आम्हाला कायद्याचे पालन करून कारवाई करावी लागते, अन्यथा समाजव्यवस्थाच कोलमडून पडेल, असेही बस्सी म्हणाले. प्रत्येक मुलीला किमान तीन आरोपींना लोळविता आले पाहिजे इतपत त्यांनी प्रशिक्षित व्हावयास हवे, असेही ते म्हणाले.

First Published on January 5, 2016 3:32 am

[Loksatta]

"त्रुटी' राहिल्यानेच दहशतवादी हल्ला

national

पठाणकोट - सुरक्षाव्यवस्थेत काही "त्रुटी‘ राहिल्यामुळेच दहशतवाद्यांना हवाईतळावर हल्ला करणे शक्‍य झाल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज मान्य केले. हवाईतळावरील सर्व सहा दहशतवादी मारले गेले असून, त्यांच्याकडे पाकिस्तानात तयार केलेली शस्त्रे होती, असेही त्यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

हल्ला झालेल्या हवाईतळाची पाहणी केल्यानंतर संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईनंतर सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, शोधमोहीम अद्यापही जारी असल्याचे त्यांनी सांगितले. हवाईतळावर आता कोणताही दहशतवादी असण्याची शक्‍यता नसली तरी शोधमोहीम संपेपर्यंत ठोसपणे काही सांगणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. तसेच, शोधमोहीम उद्या (ता. 6) सकाळपर्यंत चालणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या सर्व सात जवानांना "हुतात्मा‘ मानून, युद्धात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या सवलतींप्रमाणेच या जवानांच्या कुटुंबीयांनाही सर्व फायदे मिळतील, असे पर्रीकर यांनी जाहीर केले. हल्ला करताना दहशतवाद्यांजवळ चाळीस ते पन्नास किलो गोळ्या, बॉंब आणि अत्याधुनिक ग्रेनेड लॉंचर असा शस्त्रसाठा होता, अशी माहिती त्यांनी दिली. दहशतवादी तळापर्यंत कसे पोचले, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना पर्रीकर म्हणाले,""मला काही त्रुटी दिसत आहेत. मात्र, सुरक्षेच्या बाबतीत तडजोड झाली असेल, असे मला वाटत नाही. तपास पूर्ण झाल्यावर सर्व बाबी स्पष्ट होतील.‘‘ सुरक्षाविषयक सर्व गोष्टी उघड करता येणार नसून, काही मुद्दे तपासापुरतेच मर्यादित ठेवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांकडील शस्त्रे पाकिस्तानी बनावटीची होती, असेही त्यांनी सांगितले.

हुतात्मा झालेल्या जवानांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल अभिमान व्यक्त करत पर्रीकर यांनी, त्यापैकी फक्त एकालाच थेट कारवाईत दहशतवाद्यांकडून वीरमरण आले, तर उर्वरित जण दुर्दैवी घटनांमुळे मारले गेल्याचे सांगितले. हवाईतळावरील सर्व उपकरणे, शस्त्रे आणि नागरिक सुरक्षित असून, फक्त दहशतवादी लपून बसले होते, त्या इमारतीचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. तपास करणाऱ्या सर्व संस्थांचे त्यांनी कौतुक केले.


नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

हवाईतळाच्या मोठ्या परिसरात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेला कारवाई करताना प्राधान्य देण्यात आले होते. प्रचंड मोठ्या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना मारताना सामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी फार काळजीपूर्वक कारवाई करावी लागली. ही अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक कारवाई असल्याचेही ते म्हणाले.


मनोहर पर्रीकर म्हणाले...

- सहा दहशतवादी ठार, तळावर आता दहशतवादी नाहीत, शोधमोहीम उद्यापर्यंत चालणार

- चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानांना युद्धात प्राण गमावल्याचा सन्मान आणि फायदे देणार

- चौकशीनंतर सुरक्षेतील त्रुटी दूर करणार

- दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत सीमा सुरक्षा दलाकडून अहवाल मागविला

- दहशतवाद्यांकडील काही सामग्री पाकिस्तानी बनावटीची

- हल्ल्याबाबतची योग्य माहिती आणि पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्त ः पीएमओ

[वृत्तसंस्था]

तपासात मदत करण्याचे शरीफ यांचे आश्‍वासन

नवी दिल्ली - पठाणकोट हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे पूर्ण सहकार्य असेल, असे आश्‍वासन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या शरीफ यांनी आज दूरध्वनीवरून मोदी यांच्याशी चर्चा केली. शरीफ यांनी या वेळी पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि तातडीने कारवाई करण्याचे आश्‍वासन मोदींना दिले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी काल पाकिस्तानला काही महत्त्वाचे पुरावे देत त्यावर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. पाकिस्ताननेही हे पुरावे तत्काळ न नाकारता योग्य पावले उचलण्याचे आश्‍वासन दिले.

पंतप्रधान मोदींनीही शरीफ यांना याप्रकरणी तत्काळ कृती आवश्‍यक असल्याचे सांगितले. शरीफ यांच्याशी बोलताना मोदी यांचा आवाज धारदार झाला होता, असे सूत्रांनी सांगितले आहे.

[यूएनआय]

चर्चा न थांबण्यासाठी प्रयत्न सुरू

नवी दिल्ली - पठाणकोटमधील हल्ल्याचा परिणाम भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेल्या चर्चेच्या प्रक्रियेवर होऊ नये, यासाठी दोन्ही देशांमधून प्रयत्न सुरू आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याप्रकरणी कोणतेही भाष्य न करता निर्णयाची सर्व जबाबदारी नेत्यांवर सोडली असून, पाकिस्ताननेही चर्चा प्रक्रिया सुरूच ठेवण्याचे आवाहन केले आहे.

भारतामध्ये दहशतवादी हल्ले अथवा घुसखोरी झाल्यानंतर दोन देशांमधील शांतता प्रक्रियेला खीळ बसल्याचा इतिहास आहे. हल्ल्यामागे पाकिस्तानातीलच काही घटक असल्याचे पुरावे देऊनही पाकिस्तान सरकारने ते नाकारले होते. यंदा मात्र त्यांच्या या भूमिकेत बदल झाला आहे. पठाणकोटमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून घुसखोरी केली आणि त्यांनी पाकिस्तानस्थित सूत्रधाराशी चर्चाही केल्याचे भारताचे म्हणणे आहे. पाकिस्तानने ही बाब लगेचच नाकारली नसून, भारताने दिलेल्या पुराव्यांची छाननी सुरू असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनीही पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासीर खान जांजुआ यांच्याशी चर्चा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही पठाणकोटमधील कारवाई संपूर्ण झाल्यानंतरच पुढील धोरण ठरविणार असल्याचे सांगितले आहे. पाकिस्ताननेही तीव्र शब्दांत हल्ल्याचा निषेध केला आहे.

[यूएनआय ]

जलालाबाद;भारताच्या वाणिज्य कार्यालयावर हल्ला

जलालाबाद - अफगाणिस्तानातील जलालाबाद शहरातील भारतीय वाणिज्य कार्यालयाजवळ आज कमी शक्तिशाली बॉंबचा स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अफगाणिस्तानातील भारताशी संबंधित ठिकाणांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे.

कचऱ्याच्या पिशवीत ठेवलेल्या कमी शक्तिशाली बॉंबचा स्फोट झाला, अशी माहिती भारतीय दूतावासातील सूत्रांनी दिली. या स्फोटात कोणीही जखमी झालेले नाही असे सांगण्यात आले. जलालाबाद येथील भारतीय वाणिज्य कार्यालयापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात बॉंब आणि शस्त्रास्त्रांचा साठा आढळून आला आहे.

जलालाबाद येथील भारतीय वाणिज्य कार्यालयाच्या परिसरातच पाकिस्तान आणि इराणची वाणिज्य कार्यालयेही आहेत. आज झालेल्या स्फोटात भारतीय वाणिज्य कार्यालय लक्ष्य करण्यात आले नव्हते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. या स्फोटात कोणाला लक्ष्य केले होते ते अद्याप समजले नसले तरी स्फोट झाला तेव्हा पोलिसांच्या वाहनांचा ताफा या परिसरातून जात होता, अशी माहिती अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांताच्या राज्यपालांच्या प्रवक्‍त्याने दिली. कचऱ्याच्या पिशवीत बॉंब लपविण्यात आला होता, असेही या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले. आजच्या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील भारताशी संबंधित कार्यालयावर हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. मजार-ए-शरीफ येथील भारताच्या वाणिज्य कार्यालयावर शनिवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जलालाबाद येथील भारताच्या वाणिज्य कार्यालयावरही काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तान दौऱ्याला आठ दिवस पूर्ण होत नाहीत तोच दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आहे.

[वृत्तसंस्था]

"एनएसजी'ने वापरली अत्याधुनिक शस्त्रे

नवी दिल्ली - हवाई दलाच्या पठाणकोट तळावर घुसलेल्या दहशतवाद्यांचा निःपात करण्यासाठी "नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड‘च्या (एनएसजी) "ब्लॅक कॅट‘ कमांडोंना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा वापर करावा लागला. सुमारे तीनशे कमांडो या कारवाईत सहभागी झाले होते. धुमश्‍चक्रीत सात जवान हुतात्मा झाले, तर सहा दहशतवादी ठार झाले.

पठाणकोटच्या तळावर दहशतवादी घुसल्यानंतर एक जानेवारीला दिल्लीच्या पालम तळावरून सुमारे 160 कमांडोंची पहिली तुकडी हवाई दलाच्या विमानाने पठाणकोटला रवाना झाली. या संघर्षात दलाचे 21 जवान जखमी झाले. दलाच्या बॉंबशोधक पथकाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल ई. के. निरंजन यांना प्राण गमवावे लागले. दोन आणि तीन जानेवारीला प्रत्येकी 80 "ब्लॅक कॅट‘चा समावेश असलेल्या दोन तुकड्या पठाणकोटला रवाना झाल्या, असे सूत्रांनी सांगितले. या तुकड्याही संघर्षात सहभागी झाल्या.

"एनएसजी‘चे युनिट हरियानातील मनेसर येथे असून, कोणत्याही क्षणी निघण्यासाठी हे दल सज्ज असते. पठाणकोटकडे कमांडो पाठविण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने "एनएसजी‘ मुख्यालयाला केली आणि मुख्यालयाने लगोलग तसा आदेश मनेसरला पाठविला. कमांडोंची पहिली तुकडी महानिरीक्षक (कारवाई) मेजर जनरल दुष्यंत सिंह यांच्या नेतृत्वाखाली होती, तर महासंचालक आर. सी. तायल रविवारपासून पठाणकोटमध्ये तळ ठोकून होते.

दहशतवाद्यांबरोबरच्या संघर्षात "एनएसजी‘ कमांडोंनी "एमपी-5‘ ऍसल्ट रायफल, "ग्लोक‘ पिस्तुले, कर्नर शॉट बंदुका आणि दरवाजे उडविण्यासाठी आधुनिक दारूगोळ्याचा वापर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी अशा शस्त्रास्त्रांचा वापर झाला होता. कमांडोंच्या मदतीसाठी सहा बॉंबशोधक श्‍वानही मदतीला देण्यात आले होते. पठाणकोट तळाचा परिसर मोठा असल्यामुळे दहशतवाद्यांचा निःपात करण्यासाठी वेळ लागणे साहजिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

[पीटीआय]

शरीफ, कारवाई करा; मोदींची मागणी

पाक पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून चर्चा
नवी दिल्ली - पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या व्यक्ती आणि संस्थांवर पाकिस्तानने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना आज सांगितले. 

हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी आज मोदींशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी आवश्‍यक असलेली माहिती भारताने पाकिस्तानला दिल्याचेही मोदी यांनी शरीफ यांच्या निदर्शनास आणून दिले. पठाणकोट हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे पूर्ण सहकार्य असेल, असे आश्‍वासन शरीफ यांनी या वेळी मोदी यांना दिले. 

सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या शरीफ यांनी आज दूरध्वनीवरून मोदी यांच्याशी चर्चा केली. शरीफ यांनी या वेळी पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि तातडीने कारवाई करण्याचे आश्‍वासन मोदींना दिले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी काल पाकिस्तानला काही महत्त्वाचे पुरावे देत त्यावर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. पाकिस्ताननेही हे पुरावे तत्काळ न नाकारता योग्य पावले उचलण्याचे आश्‍वासन दिले.

पंतप्रधान मोदींनीही शरीफ यांना याप्रकरणी तत्काळ कृती आवश्‍यक असल्याचे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

[UNI]

आता निमलष्करी दलांतही "महिलाराज'

देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या दोन्ही निमलष्करी दलांत कॉन्स्टेबल पदासाठीच्या 33 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार असून, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल आणि भारत- तिबेट सीमा पोलिस दलामध्ये महिलांचा वाटा 15 टक्के असणार आहे. यामुळे देशातील संरक्षण यंत्रणेत खऱ्या अर्थाने महिलासत्ता येणार असल्याचे बोलले जाते.

गृहमंत्रालयाची परवानगी

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमधील महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या उद्देशाने गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कॉन्स्टेबल पदाच्या 33 टक्के जागांवर महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास परवानगी दिली आहे. गृहमंत्रालयाच्या वतीने तसे अधिकृत पत्रकच प्रसिद्ध करण्यात आले आहे, यासाठी समान आरक्षण प्रणालीचा वापर केला जाईल.

सक्षमीकरण समितीचा अहवाल

हिला सक्षमीकरण समितीच्या सहाव्या अहवालामध्ये या आरक्षणाची शिफारस करण्यात आली होती, यामुळे निमलष्करी दलास सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त होईल, असे जाणकारांचे म्हणणे होते. केंद्रीय राखीव पोलिस दल हे जगातील सर्वांत मोठे निमलष्करी दल असून, प्रामुख्याने नक्षली भागातील मोहिमांसाठी ते तैनात केले जाते.

महिलांचे प्रमाण

गृहविषयक संसदीय स्थायी समितीने दिल्ली पोलिस दलामधील महिलांच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली होती, दिल्ली पोलिसांतील महिलांचे प्रमाण केवळ नऊ टक्के असल्याचे या समितीला आढळून आले होते. हे प्रमाण 33 टक्‍क्‍यांवर नेले जावे, असे समितीचे म्हणणे होते. याची केंद्रानेही गांभीर्याने दखल घेतली होती.

सरकारची संमती

भारत सरकारने 20 मार्च 2015 रोजी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांतील पोलिस दलांतील अराजपत्रित पदासांठी (कॉन्स्टेबल ते उपनिरीक्षक) महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्यास मान्यता दिली होती, त्यामुळे या पदांवर महिला अधिकाऱ्यांची नेमणूक आवश्‍यक असल्याचे स्थायी समितीने म्हटले आहे.

ताकद

9 लाख  निमलष्करी दलांतील कर्मचारी

20 हजार  महिला कर्मचारी कार्यरत

6,300  "सीआरपीएफ‘मधील महिला कर्मचारी

 

[Sakal]

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

पठाणकोटमधील गोळीबार बंद- मनोहर पर्रीकर

 

नवी दिल्ली- पठाकोटमधील गोळीबार बंद झाला असला तरी दहशतवाद्यांविरोधात पुढील दोन दिवस शोधमोहिम सुरू राहणार आहे, असे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत सांगितले.


पर्रीकर म्हणाले, ‘पठाणकोटमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या कारवाई दरम्यान 6 दहशतवादी ठार झाले असून, यामधील दोन दहशतवाद्यांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळले आहेत. दहशतवाद्यांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस शोधमोहिमेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे.‘

 
‘जवानांनी दहशतवाद्यांना एका भागात रोखल्यामुळे हवाई दलाचे जास्त नुकसान झालेले नाही. यामुळे जवानांचे अभिनंदन करतो. सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड केली नाही. दहशतवाद्यांच्या चौकशीनंतर त्यांची माहिती मिळू शकेल. त्यांच्याकडे काही पुराव्याला मदत करणाऱ्या वस्तू मिळाल्या आहेत,‘ असेही पर्रीकर म्हणाले.

[वृत्तसंस्था]

पठाणकोट हल्ला शरीफ-मोदी यांच्यात फोनवर चर्चा

 

नवी दिल्ली- पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज (मंगळवार) दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
शरीफ श्रीलंकेच्या दौऱयावर आहेत. शरीफ यांनी आज दुपारी साडेतीन वाजता मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी यांनी दहशतवादाविरोधात चिंता व्यक्त करत कारवाईची मागणी केली.
दरम्यान, पठाणकोटमधील हल्यातील चौकशीला पाकिस्तानचा पूर्णपणे पाठिंबा राहील, असे आश्वासन शरीफ यांनी मोदींना चर्चेदरम्यान दिले.

 

[वृत्तसंस्था]

हुतात्मा कर्नल विरोधात प्रतिक्रिया देणारा अटकेत

 

मलप्पुरम (केरळ)- पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यानंतर बॉम्ब निकामी करताना हुतात्मा झालेले कर्नल निरंजन इ कुमार यांच्या विरोधात प्रतिक्रिया देणाऱया एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुतात्मा कर्नल निरंजन यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अन्वर सिधीक (वय 24) याने फेसबुकवर निरंजन यांच्याविरोधात प्रतिक्रिया नोंदविली होती. सिधीक याने नोंदविलेली प्रतिक्रिया सोशल नेटवर्किंगवर शेअर होत होती. अनेकांनी या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर सिधीक विरोधात तक्रार दाखल करून आज सकाळी अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

[वृत्तसंस्था]

अफगणिस्तानात दूतावासाच्या इमारतीजवळ स्फोट

काबूल (अफगणिस्तान)- भारत, पाकिस्तान व इराणचे दूतावास असलेल्या इमारतीजवळ आज (मंगळवार) सकाळी स्फोट झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती प्रातांच्या राज्यपालांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलालाबादमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाच्या इमारतीपासून 400 मिटर अंतरावर स्फोट झाला. परिसर सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. या हल्ल्याबाबत अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही.
दरम्यान, उत्तर अफगणिस्तानातील मझर-ए-शरीफ या शहरातील भारतीय दुतावासाजवळ रविवारी दहशतवादी हल्ला झाला होता.

 

[वृत्तसंस्था ]

दहशतवाद्यांना घरात घुसून मारा- अक्षय कुमार

 नवी दिल्ली - पठाणकोटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अभिनेता अक्षय कुमार व्यथित झाला असून त्याने ‘दहशतवाद्यांना घरात घुसून मारा‘ अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अक्षय म्हणाला, "मला या अडचणीवर अंतिम तोडगा सापडत नाही. पण ते आपल्या देशात घुसले आणि त्यांनी आपल्या जवानांना मारले. मी म्हणेल की, त्यांना घुसून मारा. या हल्ल्याचा थेट पाकिस्तानशी संबंध जोडू नये, ज्यामुळे दोन्ही देशातील शांतता प्रक्रियेवर परिणाम होईल‘ दरम्यान पाकिस्तानने दहशतवादाचा सामना करण्यासाठी आम्ही भारतासोबत असल्याचे म्हटले असल्याचे म्हटले आहे. तर "सीमेपलिकडून होणारी दहशतवादी कृत्ये न थांबल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल‘, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

[वृत्तसंस्था]

'पठाणकोट हल्ल्याची पाकिस्तानला पूर्वकल्पना'

मंगळवार, 5 जानेवारी 2016 - 01:30 PM IST

 

नवी दिल्ली- पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजित असून, त्याबद्दलची माहिती पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांना आधीपासून होती, असे भारतीय गुप्तहेर संघटनांनी म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या शांतता प्रक्रियेला पाकिस्तानच्या लष्कराचा विरोध असल्याचे वृत्तही एका वृत्तवाहिनीने दिली आहे. पाकिस्तानमध्ये नुकतीच एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास हरकत नाही. परंतु, पाकिस्तानी लष्कर देशातील दहशतवादी संघटनांच्या विरोधात कोणतीही कारवाई करणार नाही, असे पाकचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी पंतप्रधान नवाझ यांनी स्पष्ट केले होते.


यावेळी ज्या संघटनांचा संदर्भ देण्यात आला त्याच संघटनांनी भारताविरोधात आपली मोहीम सुरू केली आहे. पठाणकोटमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी रावळपिंडीतील नूर खान हवाई दलाच्या तळावर याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते. असे वृत्तपत्राने म्हटले आहे की, दहशतवाद्यांकडून या तळावर कमीत कमी चारवेळा मॉक ऑपरेशन करण्यात आले होते. तसेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहवालपूरमध्ये देखील त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले होते.

 

[Sakal]