नवी दिल्ली- पठाकोटमधील गोळीबार बंद झाला असला तरी दहशतवाद्यांविरोधात पुढील दोन दिवस शोधमोहिम सुरू राहणार आहे, असे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत सांगितले.
पर्रीकर म्हणाले, ‘पठाणकोटमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या कारवाई दरम्यान 6 दहशतवादी ठार झाले असून, यामधील दोन दहशतवाद्यांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळले आहेत. दहशतवाद्यांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस शोधमोहिमेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे.‘
‘जवानांनी दहशतवाद्यांना एका भागात रोखल्यामुळे हवाई दलाचे जास्त नुकसान झालेले नाही. यामुळे जवानांचे अभिनंदन करतो. सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड केली नाही. दहशतवाद्यांच्या चौकशीनंतर त्यांची माहिती मिळू शकेल. त्यांच्याकडे काही पुराव्याला मदत करणाऱ्या वस्तू मिळाल्या आहेत,‘ असेही पर्रीकर म्हणाले.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा