नवी दिल्ली - पठाणकोटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अभिनेता अक्षय कुमार व्यथित झाला असून त्याने ‘दहशतवाद्यांना घरात घुसून मारा‘ अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अक्षय म्हणाला, "मला या अडचणीवर अंतिम तोडगा सापडत नाही. पण ते आपल्या देशात घुसले आणि त्यांनी आपल्या जवानांना मारले. मी म्हणेल की, त्यांना घुसून मारा. या हल्ल्याचा थेट पाकिस्तानशी संबंध जोडू नये, ज्यामुळे दोन्ही देशातील शांतता प्रक्रियेवर परिणाम होईल‘ दरम्यान पाकिस्तानने दहशतवादाचा सामना करण्यासाठी आम्ही भारतासोबत असल्याचे म्हटले असल्याचे म्हटले आहे. तर "सीमेपलिकडून होणारी दहशतवादी कृत्ये न थांबल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल‘, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा