नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात निवृत्त जवानांच्या वन रॅंक, वन पेन्शनबाबत दिलेली आश्वासने सव्वा वर्षे होत आली, तरी तशीच अधांतरी आहेत. फक्त मते मिळविण्यासाठी त्यांनी प्रचारात आश्वासने दिली होती का हा प्रश्न निर्माण झाला असून, मोदी सरकारकडून देशाच्या जनतेचा, शेतकऱ्यांचा, निवृत्त जवानांचा भ्रमनिरास झाला आहे, असे स्पष्ट मत समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज व्यक्त केले.
येत्या ऑगस्टपासून वन रॅंक, वन पेन्शन व भूसंपादन विधेयकासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आदी विविध राज्यांत मेळावे होतील व ऑक्टोबरला रामलीला मैदानावर जय जवान, जय किसान मेळावा होईल, असेही हजारे यांनी जाहीर केले. या वेळी मोदी सरकारच्या मंत्र्यांच्या घरासमोर भजन आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. मोदी सरकार सत्तेवर येताच दिलेल्या आश्वासनांऐवजी भूसंपादनासारख्या भलत्याच मुद्यांची संशयास्पद घाई करीत आहेत. लोकपाल विधेयक राष्ट्रपतींची सही होऊन तयार असूनही मोदी सरकार त्याचे नावही काढत नाही, असेही हजारे यांनी सांगितले. दुसरीकडे दिल्लीतील केजरीवाल सरकारही लोकपालाच्या मुद्यावर गप्प आहे. त्यांनाही इगो प्रॉब्लेमची बाधा झाली आहे. तेव्हा खुर्चीचा हा गुणधर्मच आहे काय असे वाटते, असा टोला अण्णा यांनी लगावला. केजरीवाल यांनी आज रात्री भेटण्यास येतो, असा निरोप पाठविला आहे. मात्र, त्यांना मी राजकारणावर चर्चा होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. केजरीवाल यांना केंद्र सरकार कामे करू देत नाही असे वाटत असले, तरी टाळी एका हाताने वाजत नाही, असेही निरीक्षण त्यांनी नोंदविले. जर कलंकित लोकांना तुम्ही तिकिटे देणार असाल, तर इतरांत व तुमच्यात काय फरक आहे, या आपल्या प्रश्नाला केजरीवाल यांच्याकडे तेव्हाही उत्तर नव्हते व आताही नाही, असेही हजारे म्हणाले.
- - वृत्तसंस्था
|
For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com
!doctype>
सोमवार, २७ जुलै, २०१५
माजी सैनिकांसाठी अण्णा हजारे मैदानात
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
सैनिक
रविवार, २६ जुलै, २०१५
एक हुद्द एक निवृत्तीवेतन साठी माजी सैनिकांची दौड
नवी दिल्ली - कारगिल विजय दिनानिमित्त आज (रविवार) माजी सैनिकांनी ‘वन रॅंक वन पेन्शन‘ योजना त्वरित लागू करण्यासाठी धावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
दिल्लीतील धौला कुआँ परिसरातून माजी सैनिकांनी या अनोख्या आंदोलनास सुरवात केली. कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांचे वडील जी. एल. बत्रा यांनी याला हिरवा कंदील दाखविला. माजी सैनिकांच्या या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दोन ऑक्टोबरपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत.
माजी सैनिकांनी यापूर्वी ही योजना लागू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलिले आहे. माजी सैनिकांनी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
| |
[वृत्तसंस्था] |
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
सैनिक
सोमवार, २० जुलै, २०१५
एक हुद्द एक निवृत्तीवेतन : आंदोलन करणारे ताब्यात
अंबाला (हरियाना)- "वन रॅंक वन पेन्शन‘ (ओआरओपी) च्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे 20 हून अधिक माजी सैनिकांना आज (सोमवार) पोलिसांनी ताब्यात घेतले.
गडकरी यांचा ताफा ज्या रस्त्यावरून जाणार होता, त्याठिकाणी आंदोलनकर्ते तयारीत होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले. अंबाला कॅंटोन्मेंटजवळ इंदिरा चौक येथे माजी सैनिकांनी घोषणाबाजी करत "ओआरओपी‘ची अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केली.
[वृत्तसंस्था]
गडकरी यांचा ताफा ज्या रस्त्यावरून जाणार होता, त्याठिकाणी आंदोलनकर्ते तयारीत होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले. अंबाला कॅंटोन्मेंटजवळ इंदिरा चौक येथे माजी सैनिकांनी घोषणाबाजी करत "ओआरओपी‘ची अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केली.
[वृत्तसंस्था]
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
सैनिक
शनिवार, १८ जुलै, २०१५
उपोषणाबाबत अण्णांचे पंतप्रधान मोदींना पत्र
राळेगणसिद्धी - लष्करातील माजी अधिकाऱ्यांना "वन रॅंक-वन पेन्शन‘ त्वरित लागू करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले. मागणी मान्य न झाल्यास दिल्लीत 2 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पत्रात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे, की या संदर्भात 7 जुलै रोजी पाठविलेल्या पत्राला आपल्या कार्यालयाकडून उत्तर आले नाही. निवडणुकीच्या काळात आपण "वन रॅंक-वन पेन्शन‘ योजना लागू करण्याचे दिलेले आश्वासन एक वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आदेश देऊनही आपण या मागणीचा विचार केला नाही. संसदेत निवडून आलेल्यांना मात्र वारेमाप सवलती व पगार दिले जातात. आपले उपोषण कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसेल किंवा कोणत्याही पक्षाचे असणार नाही.
Labels:
२०१५,
अण्णा हजारे,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या
गुरुवार, १६ जुलै, २०१५
चलो रामलीला - अण्णा हजारे
‘वन रॅंक वन पेन्शन‘साठी 2 ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा
राळेगणसिद्धी - माजी सैनिक व सैनिकांच्या वीरपत्नी यांच्यासाठी "वन रॅंक वन पेन्शन‘ योजना त्वरित लागू न केल्यास दोन ऑक्टोबरपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज दिला.
राळेगणसिद्धी - माजी सैनिक व सैनिकांच्या वीरपत्नी यांच्यासाठी "वन रॅंक वन पेन्शन‘ योजना त्वरित लागू न केल्यास दोन ऑक्टोबरपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज दिला.
माजी सैनिकांच्या 28 संघटनांचा पाठिंबा असलेल्या दिल्लीतील "युनायटेड फ्रंट ऑफ एक्स सर्व्हिसमेन‘ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत हजारे यांची आज दुपारी बैठक झाली. त्यानंतर हजारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे आंदोलन असेल. त्यापूर्वी 26 जुलै रोजी दिल्ली येथे सैनिकांची रॅली काढणार आहोत. नंतर "जंतरमंतर‘वर कारगिल दिनानिमित्त हुतात्मा सैनिकांच्या वीरपत्नींचा सन्मानही करण्यात येईल. त्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये दीड ते दोन महिने जनजागृती रॅली काढणार असून, दोन ऑक्टोबरला रामलीला मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल.‘‘
माजी सैनिकांसाठी होणाऱ्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा व नंतर भूसंपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सैनिकांनीही पाठिंबा द्यावा, असे आवाहन हजारे यांनी केले.
[सकाळ वृत्तसेवा]
Labels:
२०१५,
अण्णा हजारे,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
सैनिक
गुरुवार, ९ जुलै, २०१५
एक हुद्द एक निवृत्तीवेतन : माजी लष्करी अधिकाऱ्यांसाठी लवकरच 'गोड बातमी'
नवी दिल्ली- ‘वन रँक, वन पेन्शन‘च्या मागणीसाठी देशभरात निदर्शने करणाऱ्या लष्करातील माजी अधिकाऱ्यांसाठी लवकरच एक ‘गुड न्यूज‘ मिळेल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
‘वन रँक, वन पेन्शन‘ची अंमलबजावणी करावी यासाठी लष्करातील माजी अधिकारी जून 2014 पासून निदर्शने करीत आहेत. निवृत्त झालेल्या लष्करी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन सध्या त्यांच्या निवृत्तीच्या वेळी वेतन आयोगाच्या लागू असणाऱ्या शिफारशींनुसार निश्चित केले जाते. यामुळे एकाच पदावर काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात तफावत राहते.
‘वन रँक, वन पेन्शन‘ लागू केल्यास लष्करातून अगोदर निवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि जवानांना त्याच पदावरून त्यांच्यानंतर अधिक सेवा देऊन निवृत्त होणाऱ्यांएवढेच निवृत्तीवेतन मिळेल.
‘वन रँक, वन पेन्शन‘ची अंमलबजावणी करावी यासाठी लष्करातील माजी अधिकारी जून 2014 पासून निदर्शने करीत आहेत. निवृत्त झालेल्या लष्करी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन सध्या त्यांच्या निवृत्तीच्या वेळी वेतन आयोगाच्या लागू असणाऱ्या शिफारशींनुसार निश्चित केले जाते. यामुळे एकाच पदावर काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात तफावत राहते.
‘वन रँक, वन पेन्शन‘ लागू केल्यास लष्करातून अगोदर निवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि जवानांना त्याच पदावरून त्यांच्यानंतर अधिक सेवा देऊन निवृत्त होणाऱ्यांएवढेच निवृत्तीवेतन मिळेल.
[वृत्तसंस्था]
Labels:
२०१५,
एक पद एक निवृत्तीवेतन,
बातम्या,
सैनिक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)