राळेगणसिद्धी - लष्करातील माजी अधिकाऱ्यांना "वन रॅंक-वन पेन्शन‘ त्वरित लागू करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले. मागणी मान्य न झाल्यास दिल्लीत 2 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पत्रात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे, की या संदर्भात 7 जुलै रोजी पाठविलेल्या पत्राला आपल्या कार्यालयाकडून उत्तर आले नाही. निवडणुकीच्या काळात आपण "वन रॅंक-वन पेन्शन‘ योजना लागू करण्याचे दिलेले आश्वासन एक वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आदेश देऊनही आपण या मागणीचा विचार केला नाही. संसदेत निवडून आलेल्यांना मात्र वारेमाप सवलती व पगार दिले जातात. आपले उपोषण कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसेल किंवा कोणत्याही पक्षाचे असणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा