For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

सोमवार, २७ मार्च, २०१७

चंदूसाठी देशाची प्रार्थना देवानं ऐकली...

Indian solider Chandu Chavan's brother Bhushan

भारत-पाकिस्तान सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची नुकतीच सुटका झाली. चार महिने ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांचा भाऊ भूषण हा देखील भारतीय सैन्यात जवान आहे. चंदू पाकमध्ये अटकेत असताना इकडे भारतात भावाची तगमग सुरू होती. भूषण यांनी हा अनुभव शेअर केलाय eSakal.com चे प्रतिनिधी संतोष धायबर (santosh.dhaybar@esakal.com) यांच्यासोबत...

लष्करात कर्तव्य बजावत असताना म्हणजे 29 सप्टेंबर 2016 रोजी चंदूला पाकिस्तानने पकडल्याचे समजले अन् पायाखालची वाळूच सरकली. काय करावे काय नको समजेनासे झाले. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. टीव्हीवरच्या बातम्यांवरून नातेवाईकांना माहिती समजली. फोन सुरू झाले. काही वेळानंतर चंदूबाबत आजीलाही समजले. आजीला धक्का सहन झाला नाही. हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिने प्राण सोडला. एका बाजूला भावाला पकडले, दुसऱया बाजूला आजीचे निधन झाले. बहिणीची प्रसुती आणि चार महिन्यांची गर्भावती असलेली पत्नी. सर्व बाजूंनी संकटं आली होती. परंतु, धीर एकवटला आणि परिस्थितीला सामोरे जात राहिलो.

पाकच्या ताब्यात असलेला चंदू आणि आजीचे निधनामुळे काय करावं, समजत नव्हतं. परंतु, भावाला सोडवायचंच हा ध्यास घेतला. सतत पाठपुरावा करत होतो. देशपातळीवर अनेकांच्या भेटीगाठी घेत होतो. चंदू नक्की भारतात परतणार, हे प्रत्येकजण सांगत होता. परंतु, जोपर्यंत त्याला पाहात नाही तोपर्यंत काही खरं नव्हतं. नको नको ते विचार मनात येत होते. वेळ द्या, इथेच चंदूला आणणार, असे संरक्षण राज्यमंत्री भामरे साहेबांनी घरात सांगितले होते. त्यांनी ते खरं करून दाखवले. भामरे साहेब आमच्यासाठी देवदूत आहेत. आमच्याकडून त्यांचे उपकार आयुष्यभर फिटू शकणार नाहीत.

चार महिन्यांच्या काळामध्ये अनेकांनी पाठिंबा दिला होता. ठिकठिकाणी धार्मिक विधी सुरू होते. अनेकजण पैशांच्या मदतीसाठीही पुढे येत होते. परंतु, मला केवळ माझा भाऊ सोडून काहीच दिसत नव्हते. चंदू कशाही अवस्थेत आला तरी त्याला आयुष्यभर सांभाळीन पण तो लवकरात लवकर यावा, हेच वाटत होतं.

चंदू पकडला गेल्यानंतर गावामध्ये सुन्न वातावरण होतं. गावामध्ये कोणताही सण साजरा केला जात नव्हता. गावातील प्रत्येक घरात फक्त बातम्यांचेच चॅनेल लावले जात होते. गावातील नागरिक एकतर टीव्हीपुढे नाहीतर देवळात बसलेले दिसायचे. परिसरात ठिकठिकाणी जप सुरू होते. गावकरी धार्मिक विधी करत होते. एका विद्यार्थीनीने तर नवरात्रात चंदूच्या सुटकेसाठी उपवास केले होते. शाळेच्यावतीने प्रार्थना करण्यात येत होती. बोरविहीर गावातील 99 विद्यार्थी व शिक्षक असे सर्वजण मिळून दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला आले होते. परंतु, काही कारणास्तव भेट होऊ शकली नव्हती. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते.

लष्करात सेवा बजावत असताना अचानक एका व्यक्तीनं जवळ येत 'भाऊ लवकरच परतणार' असं सांगितलं. त्या व्यक्तीनं अचानक सांगितल्यामुळे अंगावर काटा उभा राहिला. त्या व्यक्तीचा शब्द अखेर खरा ठरला आहे. प्रयत्नांती परमेश्वर या भावनेनं शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलो; हार मानलीच नाही. सगळ्या बाजूंनी प्रयत्न सुरू होते. यश आलं...देशाची प्रार्थना देवाला ऐकावी लागली.

चंदू अमावस्येला गेला अन् पोर्णिमेला परतला...
पाकिस्तानने चंदूला पकडले तो दिवस अमावस्येचा होता. भारतात परतला तो दिवस पोर्णिमेचा होता. यामुळे आमचा चंदू अमावस्येला गेला अन् पोर्णिमेला परतलला असेच म्हणावे लागेल. चंदू गेला त्याच्या दुसऱया दिवशी बहिणीला मुलगा झाला आणि तो परतला आणि मला मुलगी झाली. मुलीच्या जन्मानं आमच्या घरात पुन्हा आजीने जन्म घेतला आहे, असंच वाटत आहे. गेल्या चार महिन्यांच्या काळात खूप काही सोसले. परंतु, शेवटपर्यंत आजोबा खचले नाही. फक्त... आज आजी पाहिजे होती.

'डॉन'चेही आभार..
चंदू पकडल्याचे वृत्त पाकिस्तानमधील आघाडीचे वृत्तपत्र 'डॉन'ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले. 'डॉन'ने हे वृत्त प्रसारित केले नसते तर चंदूचा ठावठिकाणाच लागला नसता. शिवाय, भारतातील सर्वच प्रसारमाध्यमांनी शेवटपर्यंत चंदूसाठी मोठी साथ दिली. 'डॉन'बरोबरच या सर्वच प्रसारमाध्यमांचे आम्ही आभार मानतो.

संतोष धायबर

Esakal

शनिवार, २५ मार्च, २०१७

देवळाली प्रवरात शहिद दिनी क्रांतिकारकांना अभिवादन

कामगारांनी संघटीत झालेपाहिजेः संसारे

पॉइंटर - न्याय हक्कासाठी लढा द्यावा- शेख

राहुरी फॅक्‍टरी - राहुरी तालुक्‍यातील देवळालीप्रवरा येथेगुरुवारी जिल्हा शेतमजूर संघटनेच्या वतीनेशहिद दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. शरद संसारे, माजी सैनिक शरद चव्हाण, प्रभाकर महांकाळ, याकुब शेख, विलास उंडे, याकुब शेख, दिलीप गुलदगड, बी. डी. खंडागळे यांच्या हस्ते भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा शेतमजूर संघटनेचेज्येष्ठ नेते लहानू जाधव होते. 23 मार्चला क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरु शहिद झाले होते.

त्यांना शहिद दिनी अभिवादन करण्यात येते.

शरद संसारे म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व संघटीत झाल्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळूशकले. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 70 वर्षे पूर्ण झाली तरी ही मुलभूत प्रश्नांसाठी शेतमजूर, कामगार आणि कष्टकरी संघटीत होऊ शकलेले नाहीत. स्वत:चा आणि कुटुंबाचा रोजगाराच्या दृष्टीने, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करायचा असेल तर संघटीत झाले पाहिजे.

शेतमजूर संघटनेच्या मदिना शेख म्हणाल्या, आपण शहिद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा आदर्श घेऊन न्याय हक्कासाठी लढा दिला तरच आपण शहिददिनी अभिवादन करण्यास पात्र ठरू. लक्ष्मण वाघ, रंगनाथ दुशिंग, बाबुलाल पठाण, ज्ञानेश्वर जाधव, हसन शेख, शकील सय्यद, सुभद्रा जाधव, हमीदा शेख, सुन्नाबी शेख, आशा माळी यावेळी उपस्थित होते.

अहिंसेत मोठी ताकद - अण्णा हजारे

पुणे - हिंसेने कोणताही प्रश्‍न सुटत नाही. अहिंसेत मोठी ताकद आहे, हे आम्ही केलेल्या वेगवेगळ्या काळातील आंदोलनातून सिद्ध झालेले आहे. तरूणांनी अहिंसेचा मार्ग निवडावा, मी त्यांच्या पाठीसी उभा राहीन असे समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटल आहे. ऑल बोडो स्टुडंट्स युनियन आणि सरहद्द संस्थेच्या वतीने आसाम मधील बोरोगारी या नियोजित आदर्श गावाला अण्णा हजारे यांच्या हस्ते दोन लाख रूपयाची मदत देण्यात आली. त्यावेळी हजारे बोलत होते, यावेळी सरहद्दचे संस्थापक संजय नहार, प्रमोद बोरो, गोविंद वासूमतारी, संजय शहा, प्रशांत तळणीकर त्रउपस्थित होते.

Dailyhunt

पदवी प्रमाणपत्रावर फोटोसोबत आधार नंबर बंधनकारक

 

नवी दिल्ली, दि. 24 - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांच्या पदवीवर ओळख पटवण्यासाठी फोटोसह आधार नंबर बंधनकारक केला आहे. याबाबतचा अध्यादेश यूजीसीनं सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या नावे पाठवला आहे. याबाबतची माहिती देताना यूजीसीचे सचिव डॉ. जसपाल संधू यांनी सांगितले की, विद्यार्थ्याची ओळख पटवण्यासाठी त्याचा फोटो आणि आधार नंबर पदवी प्रमाणपत्रावर असला पाहिजे. यामुळे मार्कशीटच्या सुरक्षिततेसोबत त्याची ओळख पटवण्यामधील अडचणी दूर होतील.
सचिवांनी सांगितलं की, प्रमाणपत्रावर शैक्षणिक संस्थेचं नाव, कोणत्या प्रकारात शिक्षण पूर्ण केलं (पूर्ण वेळ कि अर्धवेळ) याबाबतचीही माहिती असली पाहिजे.

यासाठी यूजीसीने कुलगुरुंना अध्यादेश पाठवला आहे. यामध्ये पदवी प्रमाणपत्रावर देण्यात येणारी माहिती खरी असावी, असंही नमुद केलं आहे. कारण, संबंधित व्यक्तीला त्याच्या पदवी प्रमाणपत्राची विविध कामांसाठी आयुष्यभर गरज असते. त्यामुळे आधार नंबर आणि फोटो दिल्यास सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात समानता आणि पारदर्शकता राखली जाईल.

गुन्हेगारांच्या निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदी का घालू नये ? - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. 24 - गुन्हेगारांच्या निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून उत्तर मागितलं आहे. न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करत उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. कोणत्याही प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीच्या निवडणूक लढण्यावर आजन्म बंदी का घालण्यात येऊ नये अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे. याप्रकरणी 18 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या न्यायालयाकडून दोषी आढळलेल्या व्यक्तींच्या निवडणूक लढवण्यावर घालण्यात आलेली बंदी सहा वर्ष आहे. याच मुद्याला आव्हान देत दिल्ली भाजपा प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयातील वकिल अश्विनी कुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे.

याचिकेतून त्यांनी दोषी आढळलेल्यांवर आजन्म बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासोबतच अश्विनी उपाध्याय यांनी लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी इतर कर्मचा-यांशी संबंधित फौजदारी खटल्यांना एका वर्षात निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय गठीत केलं जावं अशी मागणी केली आहे.

या दोन्ही मुद्यांवर निवडणूक आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत सहमती दर्शवली आहे. राजकारणात गुन्हेगारांचा प्रवेश रोखण्यासाठी हे असं करणं गरजेचं असल्याचं आयोगाने सांगितलं आहे. निवडणूक लढण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आणि कमाल वय मर्यादाच्या मागणीवर हा मुद्दा कायद्याच्या चौकटीत येत असून यासाठी घटनेत दुरुस्ती करणं गरजेचं असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

अत्यंत गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी अशी शिफारस निवडणूक आयोगानेही केली होती. आयोगाने कायदा मंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात खोटे शपथपत्र देणा-या उमेदवारांनाही अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. गंभीर गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या आमदार व खासदारांना तत्काळ अपात्र घोषित करावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने आपल्या शिफारशी सरकारकडे पाठवल्या होत्या.

लोकमत

114 रक्‍तदात्यांची रक्‍तदान करून शहिदांना आदरांजली

हुतात्मा दिन : वंदे मातरम संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम
दापोडी, दि. 24 (वार्ताहर)- देशाकरिता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या 86 व्या स्मृतिदिनानिमित्त वंदेमातरम संघटनेने आयोजित केलेल्या रक्‍तदान शिबिरात 114 रक्‍तदात्यांनी रक्‍तदान करुण शहिदांना आदरांजली वाहिली.
पूना ब्लड बॅंकेच्या सहकार्याने आगरवाल धर्मशाळा येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन आगरवाल समाज खडकी विभागाचे अध्यक्ष दिपक आगरवाल व वंदेमातरम संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी संघटनेचे प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच, खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दत्ता सावंत, फ्रान्सिस डेव्हीड, रवींद्र बोजवारे आदी उपस्थित होते.

वंदे मातरम संघटनेच्या वतीने मागील 26 वर्षांपासून हा समाजाभिमुख उपक्रम राबवला जात आहे. शहीद दिनानिमित्त रक्‍तदान शिबिरात शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण आदरांजली वाहण्यात आली. सकाळी दहापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत 114 दात्यांनी रक्‍तदान केले. रक्‍तदान शिबिरात सहभाग घेणाऱ्या रक्‍तदात्याचा या वेळी संघटनेच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रक्‍तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अशा या सामाजिक उपक्रमास सर्वांनी हातभार लावून सामाजिक कर्तव्य व बांधिलकी जपली पाहिजे, असे संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे व प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा या वेळी म्हणाले.
पूना ब्लड बॅंकेचे मिलिंद भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांचे या वेळी मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल सोनवणे, आनंद रेड्डी, राजेश राजपूत, सेल्वराज ऍन्थोनी. राजेश काकडे, सतीश बटेल्लु, राजेश बागनाईक, विकी सारसर व योगेश आडबल यांनी परिश्रम घेतले.

भविष्यात केवळ 'आधार' हेच एकमेव ओळखपत्र

 

भविष्यात केवळ ‘आधार’ हेच एकमेव ओळखपत्र अस्तित्वात असेल. व्होटर आयडी, पॅनकार्ड हे सर्व ओळख पत्र बाद होऊन सर्व कारणांसाठी आधार कार्ड सक्तीचे असणार आहे. कोणत्याही भारतीय व्यक्तीची संपूर्ण ओळख या एकाच कार्डाच्या माध्यमातून केली जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली. प्राप्तीकर भरताना आधार कार्ड नंबर देणे अनिवार्य केले असून जीएटी लागू होण्याबरोबरच १ जुलै पासून हा नियम लागू होण्याची शक्यता आहे. लोकसभेत खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना जेटली उत्तर देत होते.  वित्तीय विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकारने वित्तीय विधेयकात तब्बल ४0 सुधारणा सुचवल्या आहे.

प्राप्तीकर परतावा अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या सुधारणेचाही समावेश आहे. सरकार येत्या जुलैपासूनच हा नियम लागू करण्याच्या विचारात आहे.

     

Dailyhunt

भगतसिंग यांना पाकिस्तानात श्रद्धांजली

लाहोर : भारतीय स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ८६ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी पाकिस्तानात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या तिघांच्या अन्यायकारक हत्येबद्दल ब्रिटनच्या महाराणींनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आणि शिक्षणतज्ज्ञांनी या निमित्ताने केली.

भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनने लाहोरच्या फव्वारा चौकात गुरुवारी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिन्ही स्वातंत्र्यसैनिकांना याच चौकात २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. ब्रिटनच्या महाराणींनी शादमान चौकाचा दौरा करून, या तिघांच्या हत्येबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी उपस्थितांनी केली.

या कार्यक्रमात एक ठराव संमत करण्यात आला. महाराणींनी अन्यायकारक हत्येबद्दल आर्थिक भरपाई देण्याशिवाय भारत-पाकिस्तानची, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांची माफी मागायला हवी, असे कार्यकर्त्यांनी या ठरावात म्हटले आहे. या वेळी भगतसिंग यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी कॅनडा आणि भारतातून दूरध्वनीवरून भाषणही केले. या कार्यक्रमाला धार्मिक कट्टरवाद्यांकडून धोका असल्यामुळे लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शहर पोलिसांनी कार्यक्रमाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविली होती. (वृत्तसंस्था)

'आम्ही शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचे साहस आणि त्यांचे बलिदान विसरणार नाही. सिंग यांचा आवाज प्रत्येक साम्राज्यवादी सरकारविरुद्ध घुमत राहील, असे भगतसिंग फाउंडेशन पाकिस्तानचे अध्यक्ष अब्दुल्ला मलिक यांनी म्हटले.

शादमान चौकाचे 'शहीद भगतसिंग चौक' असे नामकरण न केल्याबद्दल त्यांनी पंजाब सरकारवर टीकाही केली. भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांसारखे लोक कधीकधीच जन्मतात. त्यांचे बलिदान कायम स्मरणात राहील, असे फाउंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज कुरेशी यांनी म्हटले.

आधार जोडणी न केल्यास डिसेंबरनंतर पॅन क्रमांक होणार अवैध?

नवी दिल्ली : येत्या ३१ डिसेंबरनंतर पॅन कार्ड क्रमांकास आधार क्रमांक जोडणे बंधनकारक करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. या जोडणी अभावी तुमचा पॅन क्रमांकच अवैध ठरू शकतो. आधार विस्तार व्यापक करण्यासाठी केंद्र सरकार हे पाऊल उचलत आहे.

सूत्रांनी सांगितले की, सध्या सर्व करदात्यांना तसेच प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांना पॅन क्रमांक बंधनकारक आहे. ओळखीचा पुरावा म्हणूनही अनेक जणांकडून पॅनकार्डचा वापर केला जातो.

तथापि, सरकारच्या म्हणण्यानुसार, अनेक पॅन कार्डे खोटी व बोगस माहिती देऊन मिळविण्यात आली आहेत. आधार कार्ड जोडणी केल्यास बनावट पॅन क्रमांक आपोआप रद्द होतील. डिसेंबरनंतर ती अवैध ठरविण्याचा सरकारचा विचार आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, पॅनला आधारशी जोडण्यासाठी सरकारने ३१ डिसेंबर ही तात्पुरती अंतिम तारीख ठरविली आहे. या वर्ष अखेरपर्यंत आधार नोंदणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तारीख ठरविण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, आजघडीला १.0८ अब्ज भारतीयांनी आधार नोंदणी केली आहे.

स्टेंट बँक आॅफ इंडियाचे मुख्य समूह आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी सांगितले की, ९८ टक्के प्रौढ नागरिकांकडे आधार कार्ड असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या वर्ष अखेरची मुदत व्यवहार्य ठरते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शुक्रवार, २४ मार्च, २०१७

पहिल्या गोरखा बटालियनचे द्विशताब्दी वर्ष साजरे

नवी दिल्ली - ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या नऊ गोरखा बटालियनपैकी पहिल्या बटालियनचे यंदा द्विशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या बटालियनची स्थापना 1817 मध्ये करण्यात आली होती. द्विशताब्दी वर्षानिमित्ती सिकंदराबाद येथे 16 मार्च 2017 रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बटालियनमधील जवानांनी दिलेल्या सेवेबद्दल अनेक मोठे, महत्वपूर्ण आणि मानाचे पुरस्कार या बटालियनला मिळाले आहेत. अनेक "व्हिक्‍टोरिया क्रॉस', पाच "महावीर चक्र' आणि सतरा 'वीरचक्र' मिळवणाऱ्या लष्करी जवान, अधिकाऱ्यांनी गेल्या दोन शतकात बटालियनलाही गौरव प्राप्त करुन दिला.

या बटालियनच्या रेजिमेंटसनी देशात डेराबाबा नानक, जम्मू आणि काश्‍मीर याबरोबरच अफगाणिस्तान, फ्रान्स, उत्तर आफ्रिका, बर्मा अशा विविध देशांमधूनही कर्तव्य बजावले.
द्विशताब्दी वर्षानिमित्त या बटालियनच्या एका पथकाने लडाख क्षेत्रातले कांगडी शिखर (6,153 मीटर उंची) सर करण्याचा विक्रम केला. तसेच मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. या बटालियनच्या माध्यमातून आत्तापर्यंत 32 हजार नेपाळींनी भारतीय लष्करात सेवा बजावली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचे काम या बटालियनने केले. बटालियनच्या द्विशताब्दी समारोहामध्ये नेपाळमधून 500 पेक्षा जास्त निवृत्त जवान उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमाला पंजाबचे माजी राज्यपाल, जनरल बी. के. एन. छिब्बर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे विचार जोपासा

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आवाहन ः शहीददिनी राजगुरुंना अभिवादन
राजगुरूनगर, दि. 23 (प्रतिनिधी) -देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची प्रत्येक नागरिकाने आठवण ठेवून त्याच्या विचारांची जोपासना केली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांनी राजगुरुनगर येथे केले.
हुतात्मा राजगुरू पुण्यतिथीनिमित्ताने राजगुरुनगर येथील पुणे नाशिक महामार्गावरील बस स्थानकाजवळील हुतात्मा राजगुरू यांचा अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अभिनेते विक्रम गोखले बोलत होते. तालुक्‍यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी येथील हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, हुतात्मा राजगुरूचे वारसदार सत्यशील राजगुरू, खेडचे प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार सुनील जोशी, पोलीस उपअधीक्षक राम पठारे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे, उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर, खेड पंचायत समितीचे सभापती सुभद्रा शिंदे, आंबेगाव तालुका सभापती उषा कानडे, मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे, खेड तालुका कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस, राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष किरण आहेर, शिवसेनेच्या शिरूर विभागाच्या संपर्कप्रमुख विजया शिंदे, जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, हुतात्मा राजगुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टेपाटील, नंदकुमार एकबोटे, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, कोंडीभाऊ टाकळकर, मुकुंदराव आवटे, कालिदास वाडेकर, शिवसेनेचे प्रकाश वाडेकर, महेंद्र घोलप, कोंडीभाऊ निमसे, बी. एम. सांडभोर, परेश खांगटे, सतीश गोरडे, मधुकर गिलबिले, संदीप जाधव, राजगुरुनगर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, तालुक्‍यातील विविध शाळांचे विद्यार्थी, एनसीसीचे महाविद्यायीन विद्यार्थी, भारत स्वाभिमान संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना अभिनेते विक्रम गोखले म्हणाले, राज्यातील जनतेला विनंती आहे कि, ज्या क्रांतिकारकांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान दिले त्यांच्याबद्दल खरोखरच आस्था असेल, आदर असेल, अशा क्रांतीकारकांची आयुष्यभर आठवण ठेवून त्यांच्या विचारांचे आचरण केले पाहिजे. फक्त त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी एकत्र येऊन त्यांची आठवण ठेवणे चुकीचे आहे. केवळ एका दिवसापुरते त्यांना अभिवादन करणेही चुकीचे आहे. या क्रांतीकारकांना दररोज अभिवादन करण्याची सुरुवात राजगुरुनगर येथील नागरिकांनी केली पाहिजे. विशेषतः युवकांनी याचे अनुकरण केले पाहिजे. केवळ एका दिवसाचा हा कार्यक्रम नसून आयुष्यभरासाठी हा उपक्रम सर्वांनी पुढे चालू ठेवला पाहिजे. त्यांचे देशाबद्दल असलेले आचार-विचार याचा अंगीकार करून ते आचरणात आणले पाहिजेत, देशातील तरुणांनी ते अवगत करावेत.
निधी मिळाल्यास काम सुरू करणार
तहसीलदार सुनील जोशी यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. हुतात्मा राजगुरू यांचे राष्ट्रीय स्मारकाच्या काम सुरु करण्यासाठी निधीची तरतूद होत नाही यासाठी वरिष्ठस्तरावर प्रयत्न सुरु असून सुमारे 78 कोटींचा आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. याकामासाठी निधीची तरतूद झाल्याबरोबर उर्वरित कामाला सुरुवात केली जाणार आहे.

Dailyhunt

सावधान! आधारची माहिती लीक होतेय.

नवी दिल्ली :सावधान तुमचे नाव, फोटो, जन्म तारीख, बँक खाते क्रमांक अशी आधार कार्डशी संबंधित असलेली तुमची वैयक्तिक माहिती गूगलवर लीक  होत आहे. हे कोणा हॅकरच काम नसून सरकारच्या एका वेबसाईटवरुनच ही माहिती जगजाहीर होत असल्याच समोर आल आहे. एका ट्विवटर युझरने ही बाब निदर्शनास आणून दिली असून या माहितीच्या आधारे आधार कार्डचा दुरुपयोग होऊ शकतो, असा इशाराही त्याने दिला आहे. विशेष म्हणजे आधार कार्डच्या वेबसाईटवरुन ही माहिती लीक होत नाही, तर मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवरुन गूगलवर ही माहिती डाऊनलोड करता येत आहे. सरकारच्या अनेक योजनांसाठी आधार कार्ड जोडणे आवश्यक असते. यामुळे विविध मंत्रालयांच्या वेबसाईटवरही आधारकार्डशी संबंधित  ही माहीती उपलब्ध असते.

आधार कायदा २०१६ नुसार आधारसाठी देण्यात आलेला व्यक्तीचा डेटा सार्वजनिक होता कामा नये. पण तरीही ही माहिती लीक झाल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. ‘दी वायर’ने दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरापूर्वी डेटा रिसर्चर श्रीनिवास कोडाली यांनी एका वेबसाईटवरुन ५-६ लाख नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे सांगितले होते. यात नागरिकांचे फोटो, आधार क्रमांक, जात, लिंग अशी माहिती होती, असे ते म्हणाले होते.
पण त्याची कोणी दखल घेतली नव्हती.

 

सामना

'भीम' ऍपच्या प्रसारसाठी भाजप सुरु करणार नवीन अभियान

नवी दिल्ली - भीम ऍपच्या प्रसारासाठी तसेच सामान्य नागरिकांमध्ये कॅशलेस व्यवहारांसंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी भाजपकडून नवीन योजना सुरु करण्यात येणार आहे. योजनेचे स्वरूप अद्याप समजू शकले नसले तरी येत्या आंबेडकर जयंतीपासून या नवीन योजनांची सुरुवात करण्यात येणार असल्याचे पक्षाचे कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितले.
अलिकडेच दिल्ली येथील भाजप मुख्यालयात पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार करत असलेले काम सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले. तसेच भीम ऍप आणि कॅशलेस व्यवस्थेचे फायदे सांगत यासंबंधी लोकांमध्ये जागरुकता आणणे गरजेचे असल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या या बैठकीनंतर कार्यमंत्री अनंत कुमार यांनी पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांना सरकारचे काम सामान्य जनतेपर्यंत पोहाविण्याचे आवाहन केले आहे. तसेच येत्या आंबेडकर जयंतीला भीम ऍपच्या प्रसारासाठी नवीन योजना देखील सुरु करणार असल्याचे सांगितले.

 

Daily hunt.

पेन्शन ठरवण्याचा हक्क संसदेलाच

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली

खासदारांचे पेन्शन किती असावे, कोणत्या खासदाराला ते मिळू शकते, हे ठरवण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. राज्यघटनेने निसंदिग्धपणे स्पष्ट केले आहे की संसदेशी संबंधित कोणत्या बाबींवर किती व कसा खर्च करावा हा अधिकार फक्त संसदेला आहे. दुसरी कोणतीही संस्था त्यावर अधिकार गाजवू शकत नाही, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरूण जेटलींनी राज्यसभेत केले.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी लोकप्रहरी नामक स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर भाष्य करताना, ८0 टक्के खासदार करोडपती आहेत, असा उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ देत राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला.

त्याचे उत्तर देताना न्यायालयाचा उल्लेख न करता जेटली यांनी वरील विधान केले.

स्वयंसेवी संस्थेने खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनवर आक्षेप नोंदवणारी याचिका दाखल केली आहे. खासदारकीची मुदत संपल्यावर माजी खासदारांना मिळणारे पेन्शन व भत्ते रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, कारण राज्यघटनेतील अनुच्छेद १४ मधे नमूद केलेल्या समानतेच्या तत्वाच्या ते विरोधात आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

आवश्यक कायदा मंजूर केल्याशिवाय खासदारांना कोणताही लाभ मिळवून देण्याचा संसदेला अधिकार नाही. सध्या माजी खासदार व आमदारांना मिळणाऱ्या पेन्शनचा नियमात कोठेही उल्लेख नाही. एक दिवसासाठी जरी कोणी खासदार बनला तर आयुष्यभर पेन्शन मिळण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. इतकेच नव्हे तर त्याच्या पत्नीलाही हा अधिकार मिळतो. राज्यांच्या राज्यपालांनादेखील तसा अधिकार नाही. खासदारांसोबत त्यांच्या एका कर्मचाऱ्याला अथवा सहकाऱ्याला मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा आहे. सामान्य जनतेकडून कररूपाने गोळा झालेल्या पैशांवर हा एक प्रकारे भारच आहे. हायकोर्ट, सुपी्रम कोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींना देखील ही सुविधा उपलब्ध नाही, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

LOKMAT

बुधवार, २२ मार्च, २०१७

लष्करी भरती प्रक्रियेचे पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे

नवी दिल्ली : लष्करी भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याप्रकरणी केंद्र सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत दिली. पेपरफुटी फक्त पुणे विभागात झाली आहे आणि या प्रकरणाच्या तपासकामावर संबंधित लष्करी अधिकारी लक्ष ठेवून आहेत, असेही भामरे म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणावर ते बोलत होते.

भविष्यात पेपर फुटू नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आहे. प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीने अंबाला, चेन्नई आणि जयपूरमध्ये लष्करी भरती प्रक्रियेची परीक्षा घेणार असल्याचे भामरे यांनी राज्यसभेत सांगितले.

परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी होणार होती, मात्र पेपर फुटल्याचे लक्षात येताच भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्याची माहिती भामरे यांनी दिली. पेपरफुटीची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला (ठाणे क्राईम ब्रँच) मिळाली होती. मिळालेल्या माहितीआधारे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गोवा, नागपूर आणि पुणे येथे छापे टाकले होते, असे भामरे यांनी सांगितले.

पेपरफुटीच्या मुद्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली. पेपरफुटी प्रकरणाचा संबंध त्यावेळचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गोव्याशी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरशी असल्याच्या मुद्याकडे खासदार संजय राऊत यांनी लक्ष वेधले. लष्करी भरतीचा पेपर फुटणे हे लष्कराच्या सुरक्षा यंत्रणेचे अपयश असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.

पेपरफुटी प्रकरणी स्थानिक पातळीवर पोलीस चौकशी करत आहेत तसेच लष्करी अधिकाऱ्यांनीही उच्चस्तरिय चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून पेपर फोडणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितले. परीक्षेच्या आयोजन प्रक्रियेत नेमकी कुठे गडबड झाल्यामुळे पेपर फुटला हे तपासले जात आहे, असे भामरे म्हणाले.

मध्य प्रदेशमध्ये झालेला व्यापमं घोटाळा आणि लष्कर भरती प्रक्रियेदरम्यान झालेली पेपरफुटी या दोन्हीत साम्य असल्याचे काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी सांगितले. हा एक मोठा कट असल्याचे ते म्हणाले.

सामना

आता एक्स्प्रेसच्या तिकिटात करा राजधानीतून प्रवास

नवी दिल्ली, दि. 21 - आता भारतीय रेल्वेच्या नव्या योजनेनुसार एक्सप्रेस किंवा मेलचे तिकीट खरेदी केल्यानंतरही राजधानी किंवा शताब्दी ट्रेनमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. रेल्वेने 1 एप्रिलपासून एक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेनुसार कोणत्याही ट्रेनसाठी खरेदी करण्यात आलेल्या वेटिंगच्या तिकिटाच्या बदल्यात त्याच मार्गावरील दुसऱ्या ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट दिली जाईल.

तिकीट बुक करताना पर्यायी ट्रेनमधून प्रवास करण्याचा पर्याय निवडणाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे. या योजनेमधून साध्या मेल/एक्स्प्रेसचे तिकीट खरेदी करणाऱ्यांना त्याच मार्गावरून जाणाऱ्या सुपरफास्ट, राजधानी आणि शताब्दी सारख्या ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे.

सुरुवातीला ही योजना ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्यांना लागू केली जाईल. त्यानंतर तिकीट खिडकीवरून तिकीट खरेदी करणाऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट केले जाईल.

या योजनेंतर्गत दुसऱ्या ट्रेनमध्ये जागा उपलब्ध झाल्यावर उरलेली रक्कम परत केली जाणार नाही, तसेच दुसऱ्या ट्रेनचे तिकीट महाग असले तरी त्याची अतिरिक्त रक्कम वसूल केली जाणार नाही. त्यामुळे या योजनेतून रेल्वेला रद्द झालेल्या तिकिटांसाठी द्यावा लागणारा 7 हजार 500 कोटी रुपयांचा परतावा वाचेल.

या योजनेबाबत रेल्वेचे अधिकारी म्हणाले की, या योजनेंतर्गत आम्हाला दोन गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक म्हणजे वेटिंग तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना सीट उपलब्ध करून देणे आणि दुसरी म्हणजे काही ट्रेनमधील रिकाम्या जागांची समस्या सोडवणे. त्यामुळे या योजनेचा सामान्य प्रवाशांना कसा लाभ मिळतो हे पाहावे लागेल.

लोकमत

रोख व्यवहारांवर २ लाखांची मर्यादा

नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या मूळ अर्थसंकल्पातील तरतुदीत सुधारणा करून रोखीच्या व्यवहारांवर तीन लाखांऐवजी दोन लाख रुपयांची कमाल मर्यादा घालण्याचा नवा प्रस्ताव सरकारने लोकसभेत मांडला आहे.

अर्थसंकल्पासोबत मांडलेल्या मूळ वित्त विधेयकात निरनिराळ्या प्रकारच्या तब्बल ४० दुरुस्त्या प्रस्तावित करणारे विधेयक जेटली यांनी मंगळवारी लोकसभेत मांडले. विरोधकांनी अशा प्रकारे विविध दुरुस्त्यांची मोट बांधून एकच सुधारणा विधेयक मांडणयास विरोध केला. मात्र, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी विरोधकांनी उपस्थित केलेले तांत्रिक आक्षेप अमान्य केले आणि वित्तमंत्र्यांनी सुधारित वित्त विधेयक मांडण्यास अनुमती दिली.

या ४० दुरुस्त्यांपैकी एक दुरुस्ती रोखीच्या व्यवहारांवर कमाल मर्यादा घालण्याशी संबंधित आहे. मूळ वित्त विधेयकात ही मर्यादा तीन लाख रुपयांची प्रस्तावित करण्यात आली होती. आता ही दोन लाख रुपयांची करण्याचे प्रस्तावित आहे. या सुधारित मर्यादेचा भंग करून जेवढ्या जास्त रकमेचा रोखीचा व्यवहार केला जाईल, तेवढाच दंड आकारण्याची तरतूद यात आहे, असे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी टिष्ट्वट करून स्पष्ट केले.

हे सुधारित वित्त विधेयक संसदेत मंजूर झाल्यावर, रोखीच्या व्यवहारांवरील दोन लाख रुपयांची कमाल मर्यादा येत्या १ एप्रिलपासून लागू होईल.

या ४० दुरुस्त्यांमध्ये कंपनी कायदा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा, परकीय चलन नियमन कायदा, 'ट्राय' कायदा व माहिती तंत्रज्ञान कायदा अशा विविध कायद्यांमध्येही काही सुधारणा करण्याची तरतूद आहे. याचा वित्त विधेयकाशी काही संबंध नाही. या दुरुस्त्याही वित्त विधेयकात घुसडून सरकार त्या 'मनी बिल' म्हणून मागच्या दरवाज्याने मंजूर करून घेऊ पाहात आहे, असा आक्षेप तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल व क्रांतिकारी समाजवादी पक्ष यासारख्या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

दहशतवादाचा नवा धोका

ईशान्य हिंदुस्थानपासून मुंबईपर्यंत दहशतवादाचा धोका तसा जुनाच आहे . मात्र आता दिल्या गेलेल्या दोन ऍलर्ट नी दहशतवादाच्या नव्या धोक्याचीही जाणीव करून दिली आहे . हा केवळ जाता जाता केलेला इशारा नाही हे सरकार , सुरक्षा यंत्रणा , रेल्वेपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांनीच समजून घ्यायला हवे .

आपल्याकडे दहशतवादी हल्ल्याचे ‘हाय ऍलर्ट’ अधूनमधून दिले जातच असतात.

विशेषतः स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच दहशतवादी पकडले जातात आणि दहशतवादी हल्ला ‘विफल’ वगैरे केला जातो. मात्र आता तसे काही नसतानाही एकापाठोपाठ एक असे दोन ऍलर्ट देण्यात आले आहेत. त्यापैकी एक आहे मोठय़ा संख्येने दहशतवादी हिंदुस्थानात घुसल्याचा आणि दुसरा आहे हिंदुस्थानी रेल्वेच्या घातपातासंदर्भात. हे दोन्ही इशारे वेगळ्या अर्थाने चिंताजनक आहेत. एकतर ईशान्य हिंदुस्थानात हजारोंच्या संख्येने दहशतवादी घुसणे गंभीर आहे. शिवाय पश्चिम बंगाल या नेहमीच्या मार्गाबरोबरच आसाम आणि त्रिपुरा या दोन राज्यांचाही घुसखोरीसाठी वापर करणे ही दुसरी चिंताजनक गोष्ट आहे. पुन्हा ही माहिती बांगलादेश सरकारनेच दिली आहे. आता शेजारी राष्ट्राचे ‘कर्तव्य’ त्या देशाने पार पाडले म्हणून त्यांचे आभार मानायचे की हिंदुस्थानात शिरण्याआधीच या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे किंवा कंठस्नान घालण्याचे ‘कर्तव्य’ बजावले नाही म्हणून त्या देशाला दोष द्यायचा? खरे म्हणजे धर्मांध मुस्लिम आणि विविध इस्लामी दहशतवादी संघटना यांच्या कचाट्यात बांगलादेशही भरडला जात आहे. त्यामुळे तो स्वतःच ‘ऍलर्ट’ राहिला असता तर ते त्यांचेही भलेच झाले असते आणि

हिंदुस्थानसमोर संकट

उभे ठाकले नसते. अर्थात, आता हे घुसखोर दहशतवादी काय किंवा हिंदुस्थानी रेल्वेला ‘घातपात’ घडवून आणण्याच्या प्रयत्नात असलेले दहशतवादी काय, दोघांचीही कार्यपद्धती बदलली असल्याने हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणांनाही वेगळ्या पद्धतीने विचार करणे भाग आहे. कारण बांगलादेशातून घुसलेल्या दहशतवाद्यांचा संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानात मोठा हिंसाचार घडविण्याचा इरादा असावा. एकट्या आसाममध्येच सहा महिन्यांत ‘जेएमबी’ या संघटनेचे ५४ दहशतवादी ताब्यात घेण्यात आले आहेत. ज्या दहशतवाद्यांनी आता हिंदुस्थानात घुसखोरी केली आहे त्यात याही संघटनेचा समावेश आहे. हे सर्व लक्षात घेऊनच केंद्र आणि त्या त्या राज्य सरकारांना उपाय योजावे लागणार आहेत. दुसरा ऍलर्ट मुंबई, मुंबईची लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांसंदर्भात आहे. वास्तविक मुंबई आणि मुंबईची लोकल सेवा यांना असलेला दहशतवादाचा धोका जुनाच आहे. आजवर अनेक मुंबईकरांचे अशा हल्ल्यात बळी गेले आहेत. मात्र ताज्या इशाऱ्यानुसार दहशतवाद्यांची कार्यपद्धती वेगळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथेही सरकार, सुरक्षा यंत्रणा आणि सामान्य प्रवासी अशा सगळ्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. मध्यंतरी हिंदुस्थानी रेल्वेगाड्यांचे अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न झाले ते याच नव्या कार्यपद्धतीनुसार. पाटणा-इंदूर रेल्वेचा मोठा अपघात वगळता इतर प्रयत्न सुदैवाने असफल ठरले. शमशुल हुदा या दहशतवाद्याच्या अटकेमुळे

रेल्वेच्या घातपाती अपघातांमध्ये

पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’चाच हात असल्याचेही उघड झाले. मात्र नेहमीच्या बॉम्बस्फोटांपेक्षा रेल्वे रुळांना ‘घातपात’ करून, रूळ कापून, त्यावर अवजड वस्तू ठेवून उपनगरी रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे ‘अपघात’ घडवून आणण्याचे व त्यासाठी भिकारी, गर्दुल्ले यांचा वापर करण्याचे दहशतवाद्यांचे प्रयत्न आहेत. हिंदुस्थानी रेल्वेचा पसारा आणि महाप्रचंड जाळे लक्षात घेता या सर्व हालचालींवर नजर ठेवणे, त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे आणि घातपाताचा प्रयत्न असफल करणे, रेल्वेमार्गावर ‘गस्ती पथके’ ठेवणे या सर्व उपायांवरही मर्यादाच आहेत. तरीही रेल्वे सुरक्षा दलांसह स्थानिक पोलीस, होमगार्ड, राखीव मनुष्यबळ यांचा यासंदर्भात कसा वापर करता येईल हे पाहायला हवे. रेल्वेमार्गांच्या आजूबाजूला महिनोन् महिने पडून राहणारे सामान, भंगार, जुने रेल्वे रुळ, पोलादी खांब या वस्तूच उद्या घातपातासाठी ‘साधन’ म्हणून वापरल्या जाऊ शकतात. त्याची ‘साफसफाई’ लवकर कशी करता येईल याचा विचार व्हायला हवा. सध्या दोन्ही रुळांवर अडथळा आला तरच सिग्नल लाल होतो, त्याऐवजी एका रुळावर अडथळा आला तरी सिग्नल कसा लागेल यादृष्टीने तांत्रिक सुधारणा रेल्वेने करायला हवी. ईशान्य हिंदुस्थानपासून मुंबईपर्यंत दहशतवादाचा धोका तसा जुनाच आहे. मात्र आता दिल्या गेलेल्या दोन ‘ऍलर्ट’नी दहशतवादाच्या नव्या धोक्याचीही जाणीव करून दिली आहे. हा केवळ ‘जाता जाता केलेला इशारा’ नाही हे सरकार, सुरक्षा यंत्रणा, रेल्वेपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांनीच समजून घ्यायला हवे.

Dailyhunt

मंगळवार, २१ मार्च, २०१७

'भ्रष्ट नेत्यांसाठी बंद करा निवडणुकीची दारे'

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने राजकारणातून गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीवर निवडणूक लढवण्यास आजन्म बंदी घालण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला असून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील मागण्या योग्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिका अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगाने राजकारणातून गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी सुचविलेल्या मागण्यांची सरकारने दखल न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. खासदार किंवा आमदार यांच्यावरील प्रलंबित खटल्यांचा निकाल एका वर्षात लावावा आणि त्यामध्ये दोषी ठरलेल्यांना राजकारणात येण्यावर आजन्म बंदी घालावी, ही याचिकाकर्त्यांची मागणी वैमनस्यातून करण्यात आलेली नाही, असे आयोगाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

दरम्यान, पुढील आठवड्यात आता याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या कक्षेनुसार गुन्ह्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि दोन वर्षांची शिक्षा झालेल्या राजकारण्यांना कारागृहातून सुटल्यापासून ते पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी असल्यामुळे सध्या निकोप आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीच्या पक्रियेतील अडथळे कायम आहेत. मात्र, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा केल्यास निकोप आणि निष्पक्ष निवडणुका घेता येणे शक्य होईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. यासाठी आम्ही सरकारकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामध्ये राजकारणातून गुन्हेगारीचे उच्चाटन, लाच स्विकारण्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल करणे, पेड न्यूज आणि निवडणुकीच्या ४८ तास अगोदर कोणताही जाहिरात प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता. मात्र, दोषी राजकारण्यांच्याबाबतीत या नियमांचा वेगळ्याचप्रकारे अवलंब करण्यात आला. एखादा राजकारणी दोषी ठरल्यानंतरही त्याला स्वत:चा पक्ष सुरू करता येतो किंवा एखाद्या पक्षाचा पदाधिकारी होता येते. तसेच सहा वर्षांच्या बंदीनंतर त्या व्यक्तीला निवडणूक लढवण्याची किंवा मंत्री होता येते, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.

सर्जिकल स्ट्राईकच्या नायकांचा शौर्य पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या नायकांचा शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करणाऱ्या मेजर रोहित सुरी यांचा कीर्तीचक्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राचे लेफ्टनंट जनरल सुपुत्र राजेंद्र निंभोरकर यांचाही गौरव केला.

देशातील दुसऱ्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व करणाऱ्या मेजर रोहित सुरींना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते मेजर सुरी यांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले. तर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना उत्तर युद्ध सेवेचे मेडल प्रदान करण्यात आहे आहे.

दहशतवाद्यांना पठाणकोट हल्ल्यात सडेतोड उत्तर दिलेले भारतीय वायूसेनेचे अधिकारी गुरसेवक सिंह यांना मरणोत्तर शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत पार पडला.

सिंधू पाणी करार : भारतीय शिष्टमंडळ पाकमध्ये दाखल

माध्यमांचे प्रतिनिधी वाघा सीमेवर आले होते, परंतु त्यांना शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही.

नवी दिल्ली : सिंधू पाणी करारावरील वादांवर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सिंधू आयोगाच्या

नवी दिल्ली : सिंधू पाणी करारावरील वादांवर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सिंधू आयोगाच्या बैठकीसाठी 10 भारतीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज (सोमवार) पाकिस्तानमध्ये दाखल झाले.

पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी वाघा सीमेवर भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. माध्यमांचे प्रतिनिधी वाघा सीमेवर आले होते, परंतु त्यांना शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. तिथून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये हे शिष्टमंडळ भूमार्गानेच राजधानी इस्लामाबादकडे रवाना झाले.

इस्लामाबाद येथे ही दोनदिवसीय बैठक आजपासून (ता. 20) सुरू होत आहे. सिंधू आयोगाचे भारतातील आयुक्त पी. के. सक्‍सेना यांच्या नेतृत्वाखाली दहाजणांचे शिष्टमंडळ या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. या बैठकीमध्ये पाणीवाटप करारानुसार भारताला मिळालेल्या हक्कांची जाणीव पाकिस्तानला करून देण्याचा भारत सरकारचा उद्देश आहे.

वृत्तसंस्था

शनिवार, १८ मार्च, २०१७

पाक पंतप्रधान शरीफ गायत्रीमंत्रात झाले तल्लीन

शरीफ यांनी हिंदूंच्या सणाला उपस्थिती लावत गायत्री मंत्राला दाद दिल्याने पाकिस्तानसह भारतात या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळत असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली/कराची : पाकिस्तानात अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदूंनी होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आवर्जून उपस्थिती लावली. एका युवतीने केलेल्या गायत्री मंत्राच्या गायनाला त्यांनी टाळ्या वाजवून दिली.

शरीफ यांनी हिंदूंच्या सणाला उपस्थिती लावत गायत्री मंत्राला दाद दिल्याने पाकिस्तानसह भारतात या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळत असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानातील हिंदू समुदायाने होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. कराचीमध्ये शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नरोधा मालिनी या तरुणीने आपल्या सुरेल आवाजात गायत्री मंत्राचे पठण करीत उपस्थितांची मने जिंकली.
मुस्लिम स्त्रिया व पुरुषांनी तल्लीन होऊन ऐकत असल्याचे या
व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. शरीफ यांनी लक्ष देऊन तिचे गायन ऐकले आणि शेवटी टाळ्या वाजवून तिला दाद दिली.

शरीफ म्हणाले, "कोणताही संकोच न बाळगता कराचीच्या प्रत्येक भागात होळी साजरी करण्यात येत आहे हे पाहून मला आनंद होत आहे. पाकिस्तानात ठराविक धर्म स्वीकारण्यासाठी कोणीही इतरांना जबरदस्ती करू शकत नाही."

'हॅप्पी होली' म्हणत शरीफ अल्पसंख्यांकाना सर्वसमावेशक संदेश दिला.

सकाळ

काश्‍मीरातील प्रकल्पांना गती; पाकिस्तान संतप्त

kashmir

या प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांना पाकिस्तानने याआधीच विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पांमुळे जागतिक बॅंकेच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या पाणीवाटप कराराचा भंग होत असल्याचा कांगावाही पाककडून करण्यात आला आहे

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यामधील एकूण 15 अब्ज डॉलर्स किंमतीच्या जलविद्युत प्रकल्पांच्या निर्मिती प्रक्रियेस केंद्र सरकारकडून वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे पाकिस्तानला काश्‍मीर खोऱ्यातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर नकारात्मक परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र पाकच्या या "भीती'कडे भारताने दुर्लक्ष केले आहे.

भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय न दिल्यास भारत-पाकमधील पाणीवाटप करारावर "परिणाम' होणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर जम्मु काश्‍मीर राज्यामधील वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांच्या कामांना आता गती मिळाल्याचे वृत्त संवेदनशील मानले जात आहे.

या प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांना पाकिस्तानने याआधीच विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पांमुळे जागतिक बॅंकेच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या पाणीवाटप कराराचा भंग होत असल्याचा कांगावाही पाककडून करण्यात आला आहे. या पाण्यावर पाकिस्तानमधील 80% शेती अवलंबून आहे.

जम्मु काश्‍मीर राज्यातील 1,856 मेगावॅट क्षमतेचा सावलकोट येथील प्रकल्प हा या प्रकल्पांमधील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याआधी काही वर्षे लागणार आहेत. मात्र या प्रकल्पास मान्यता देण्यात आल्यामुळे दोन देशांमधील राजनैतिक तणाव आणखी वाढणार आहे. या प्रकल्पांमुळे जम्मु काश्‍मीरमधील जलविद्युतनिर्मिती तिपटीपेक्षाही जास्त प्रमाणात वाढणार आहे.

पाकिस्तानमधील पाणी पुरवठ्यावर "नियंत्रण' आणत भारत पाकवर राजनैतिक दबाव आणू शकेल, अशी शक्‍यता गेल्या काही वर्षांत परराष्ट्र संबंध तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, या प्रकल्पांना गती देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर पाकिस्तानकडून संताप प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

वृत्तसंस्था

प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांवर भर देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली, 16-3-2017 : 15 मार्च 2017 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 ला मंजूरी देण्यात आली. आरोग्याच्या दृष्टीने वाटचाल करणाऱ्या प्रत्येकाला प्रतिबंधात्मक आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.  त्या अंतर्गत सर्व नागरिकांना परवडण्याजोग्या दर्जेदार आरोग्य सुविधा प्रदान करण्याची तरतूद आहे. 

या धोरणात सकल देशांतर्गंत उत्पादनातील सार्वजनिक आरोग्य सुविधांवर केला जाणारा खर्च 2.5 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून एकात्मिक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्यावर भर दिला जाईल. आजारांवर उपचार करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाय योजना तसेच बालके आणि स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठीही या धोरणात विशेष तरतूद आहे.

ग्रामीण आणि दुर्लक्षित क्षेत्रांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहभागाला सहाय्यभूत ठरणारे हे धोरण आहे. दर्जेदार आरोग्य यंत्रणा विकसित करण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य प्राधिकरण स्थापन करण्याचेही या धोरणात प्रस्तावित आहे.

PIB

समानसंधी आयोग विधेयकाचा मसुदा आंतरमंत्रालयीन सल्लामसलतीसाठी जारी

नवी दिल्ली, 16-3-2017 : सरकारी तज्ञ गटाचा अहवाल आणि परिक्षणावर आधारीत समानसंधी आयोग विधेयकाचा मसुदा आंतरमंत्रालयीन सल्लामसलतीसाठी जारी करण्यात आला आहे. सच्चर समितीच्या शिफारशींना अनुसरुन दुर्बल घटकांच्या तक्रारींना न्याय मिळवून देण्यासाठी समानसंधी आयोगाची रचना आणि कार्ये निश्चित करण्याच्या दृष्टीने सरकारने एका तज्ञ गटाची स्थापना केली होती. त्या तज्ञ गटाने या मसुद्यासंदर्भातील अहवाल तयार केला.

अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमांतर्गत 11 मंत्रालये-विभागांच्या 24 योजना-कार्यक्रम अल्पसंख्याक विभागातर्फे राबवले जातात. मंत्रालयाच्या www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर याचे तपशील उपलब्ध आहेत.

अल्पसंख्याक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

PIB

ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर होण्याची गरज - गडकरी

मुंबई, 16-3-2017 : मुंबईतील वेलिंगकर संस्थेच्या ‘वी स्कूल’च्या पदवीदान समारंभाला केंद्रीय रस्ते परिवहन, राष्ट्रीय महामार्ग आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या पदवीधर विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी संबोधित केले. पैसे कमावणे दुय्यम असून, आयुष्याचे ध्येय पैसा कमावणे इतकेच असू नये. विद्यार्थ्यांनी नाविन्य, संशोधन आणि दृष्टीकोनाला प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले.


नवीन तंत्रज्ञान आणि शोधांच्या माध्यमातून समाजात वेगाने बदल होत आहेत. मात्र आर्थिक बलाशिवाय देशाला आकार देणे अशक्य आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करण्याच्या कामी इंजिनाची भूमिका बजावावी, असे आवाहन गडकरी यांनी केले. तळागाळातील शाळांचा आणि तेथील विद्यार्थ्यांचा दाखला त्यांनी दिला. विद्यार्थी, शिक्षक, शालेय वातावरण तसेच अभ्यासाच्या अनुपलब्धतेमुळे ग्रामीण भागातील शाळांची स्थिती बिकट असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी जागतिक मानक प्राप्त वेलिंगकर संस्थेचे त्यांनी कौतुक केले.

उद्योग आणि राजकारणात मानवी नाती ही सर्वात मोठी क्षमता असते. वेगाने निर्णय घेणे आवश्यक असते. गोव्यात निवडणुकांनंतर राज्यपालांसमोर बहुमत सिद्ध करण्यासाठी किती वेगाने घडामोडी झाल्या, याचे उदाहरणही गडकरी यांनी दिले.

मुंबईतील वांद्रे-वरळी सागरीसेतु, 52 पुल आणि 55 उड्डाण पुल बांधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाला होता. ही सर्व कामे निर्धारित तारखेपूर्वी पूर्ण करण्यात आली, किमान खर्चात त्यांचे बांधकाम झाले. परिणामी, वितरीत निधीतील काही कोटी रुपयांची बचत झाली आणि ते पैसे इतर कामी वापरता आले. तीव्र राजकीय इच्छाशक्ती, योग्य दृष्टीकोन, जलद निर्णय आणि सांख्यिक कामासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन यांची सांगड घालूनच सार्वजनिक कामे केली पाहिजेत, असे ते म्हणाले.
नेतृत्वाचा अभाव, चुकीची आर्थिक धोरणे आणि कुप्रशासन या कारणांमुळे आपला देश हा गरीब लोकसंख्येचा श्रीमंत देश आहे. विद्यार्थ्यांनी गरीबांप्रती सहानुभूतीची भावना बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. समाजात काम करतांना कर्तव्य आणि प्रशासन यांच्यात अडथळे आल्यास नियम मोडू नका, मात्र लोक हितासाठी ते वाकवता येतील, असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार अतुल मारपकवार, वेलिंगकर संस्थेचे प्राध्यापक प्रा.उदय साळुंखे, माधुरीताई मिसाळ यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि पालकही या समारंभाला उपस्थित होते.
PIB

शुक्रवार, १७ मार्च, २०१७

सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली - मोदी सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ केली आहे. २ टक्के महागाई भत्ता वाढविण्याच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

काल कॅबिनेटची बैठक पार पडली या बैठकीत हा महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे देशभरातील ५० लाख कर्मचा-यांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच महागाई भत्तात वाढ करण्यात आली होती. मात्र, महागाई भत्ता कमी असल्याचे कामगार संघटनांतर्फे म्हटले जात होते. त्यानंतर आता महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ १ जानेवारी २०१७ पासून लागू होईल.

महागाई भत्ता हा देशातील मूलभूत वस्तू आणि सेवा यांच्या वाढत्या किमतींच्या हिशोबात ठरतो. वर्षातील १२ महिन्यांच्या महागाई दराच्या सरासरीनुसार महागाई भत्त्यात वाढ निश्चित केली जाते. तीन ते चार महिन्याआधी महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती आणि आता पून्हा दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

दत्तक मूल घेणार्‍या महिला कर्मचार्‍यांची मातृत्व रजा दुप्पट

मुंबई, दि. 16 - वय एक वर्षापेक्षा कमी असलेलं मूल दत्तक घेणार्‍या महिला कर्मचार्‍यांच्या मातृत्व रजेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील मूल दत्तक घेणार्‍या महिला कर्मचार्‍यांना 90 दिवसांऐवजी 180 दिवसांची विशेष रजा देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने प्रसुती रजेप्रमाणेच 180 दिवसांची विशेष रजा मूल दत्तक घेणार्‍या केंद्रीय कर्मचारी महिलेला देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर आता राज्य सरकारमधील कर्मचारी महिलांबाबतही अर्थ मंत्रालयाने हाच निर्णय घेतला आहे. मूल दत्तक घेतल्याच्या तारखेपासून ही रजा लागू होईल.
महत्त्वाचं म्हणजे, एक वर्षापर्यंतचं मूल दत्तक घेतलेल्या ज्या महिला कर्मचारी सध्या 90 दिवसांच्या विशेष रजेवर आहेत, त्यांनाही आता 180 दिवसांपर्यंत विशेष  रजा लागू होईल.

दोनपेक्षा कमी अपत्य असलेल्या महिला कर्मचार्‍यांना 180 दिवसांची विशेष रजा लागू राहील. एक अपत्य हयात असलेल्या कर्मचारी महिलेने ही  विशेष रजा घेतल्यानंतर दत्तक मुलासाठी किंवा सरोगसीसाठी असलेली विशेष रजा लागू राहाणार नाही.
विशेष रजेसाठी संबंधित महिला कर्मचार्‍यांना सेवा कालावधीची अट नसेल. मात्र ज्या महिला कर्मचार्‍यांची सेवा दोन वर्षांपेक्षा कमी झालेली आहे, त्यांनी अर्ज  करताना त्यांच्या कार्यालयाला बाँड द्यावा लागेल.
त्यानुसार विशेष रजेवरुन परतल्यानंतर दोन वर्षे सेवेत राहणं अनिवार्य असेल. राजीनामा द्यायचा असेल, तर  तिला विशेष रजा कालावधीतील वेतनाइतके वेतन राज्य शासनाला द्यावं लागेल.

Dailyhunt

नोटाबंदीमुळे जवानांचे हाल, दुर्गम भागातील जवानांच्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार


समुद्रसपाटीपासून वीस हजार फूट उंचीवर असलेल्या सियाचीन तसेच झारखंडमधील नक्षलग्रस्त भागांसारख्या दुर्गम ठिकाणी कर्तव्य बजावणाऱया जवानांना नोटाबंदीचा चांगलाच फटका बसला आहे. बँकांतून नोटा बदलून घेण्याच्या काळात अशा दुर्गम भागात तैनात असणाऱ्या जवानांना रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता आमच्या हक्काच्या पैशांसाठी पण सरकारकडे भीक मागायची का, असा सवाल जवानांकडून केला जात आहे.

नोटाबंदीची घोषणा झाली त्यावेळी सियाचीनसारख्या ठिकाणी तैनात असलेले नायक महेंद्र सिंग यांना तेथील खराब वातावरणामुळे नोटाबंदीची बातमी जवळपास आठवडाभराने कळली.

त्यांच्याजवळ त्यावेळी सहा हजार रुपयांच्या जुन्या नोटा होत्या. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणातून ३० डिसेंबरपर्यंत ज्यांना नोटा बदलता येणार नाहीत त्यांना रिझर्व्ह बँकेत जाऊन नोटा बदलता येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सिंग यांनी मार्च महिन्यातच नोटा बदलण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांनी दहा दिवसांची सुट्टीही घेतली व ते राजस्थानमधील त्यांच्या गावी आले. तेथून ते थेट रिझर्व्ह बँकेत गेले, मात्र तेथे त्यांना नोटा बदलून देण्यास नकार दिला.

असाच प्रकार झारखंडमधील नक्षलग्रस्त भागात घनदाट जंगलात तैनात असलेल्या पंकज सिंग आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अधिकारी राजेश यांच्यासोबतही घडला. आमच्यासारखे जवान जे झारखंडमधील घनदाट जंगलात तैनात असतात. जिथे फोन, रेडिओही चालत नाहीत तिथे आम्हाला नोटाबंदीची खबर कशी काय मिळणार आणि नोटाबंदीबाबत कळलेही असते तरी नोटा बदलून घेण्यासाठी आम्हाला सुट्ट्या दिल्या असत्या का, असा संतप्त सवाल राजेश यांनी सरकारला केला आहे.

आमच्या हक्काच्या पैशासाठी भीक मागायची का?

“ज्यांच्याकडे लाखोने पैसे आहेत अशा एनआरआय लोकांना १०-२० हजार गेले तर काही फरक पडत नाही. पण आमच्यासारख्या जवानांना ३० हजारांहून कमी पगार आहे. त्यामुळे आमच्यासाठी हे पैसे खूप महत्त्वाचे आहेत. आमच्या हक्काच्या पैशांसाठी आम्ही सरकारकडे भीक मागायची का?”
– पंकज सिंग (नक्षलग्रस्त भागातील जवान)

सामना 

घर खरेदीसाठी काढता येणार पीएफमधील ९० टक्के रक्कम

केंद्र सरकार कर्मचारी वर्गाला लवकरच एक खूशखबर देणार आहे. घर खरेदी करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील (ईपीएफओ) ९० टक्के रक्कम काढता येणार आहे. केंद्र सरकारच्यावतीनं नियमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे ईफीएफओधारक कर्मचाऱ्यांना घर खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट करता येणार आहे.

केंद्रीय श्रम मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी संसदेत बोलताना सांगितलं की, सरकार भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ मध्ये संशोधन करत आहे. कायद्यात सुधारणा करुन नवीन नियमावली जारी करण्यात येणार आहे. नवीन नियमानुसार ईपीएफओधारक गृहनिर्माण संस्थेचा सदस्य होत असेल तर त्याला घराच्या खरेदीसाठी स्वत:च्या पीएफ खात्यातून ९० टक्के रक्कम काढता येणार आहे.

पीएफ खात्यातून काढलेली रक्कम त्याला नवीन घर घेण्यासाठी किंवा घराच्या बांधकामासाठी वापरता येणार आहे. नवीन नियमानुसार किमान दहा खातेदारांना मिळून एक गृहनिर्माण संस्था बनवावी लागणार आहे. तसंच ईपीएफओ खातेदाराला आपल्या खात्यातून घराच्या कर्जाचे हप्तेही फेडता येणार आहेत.

अनेक वेळा कर्मचारी वर्ग भाड्याच्या घरात राहात असल्याचं निदर्शनास आलं आहे. तसंच निवृत्तीनंतर कर्मचारी आपला सर्व पैसा घर खरेदीसाठी वापरत असल्याचं दिसून आल्यानं हा निर्णय घेतला जाणार आहे. सध्या कर्मचारी वर्गाच्या पगारातील १२ टक्के आणि काम करत असलेल्या संस्थेकडून १२ टक्के रक्कम पीएफमध्ये जमा होते.

सामना

भाजपाच्या विजयाने चीनची वाढली डोकेदुखी

बिजींग, दि. 16 - नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या दणदणीत विजयाने चीनची चिंता वाढवली आहे. भाजपाच्या विजयामुळे आंतरराष्ट्रीय मुद्यावर भारताची भूमिका अधिक कणखर होईल. भारत तडजोड स्वीकारणार नाही असे ग्लोबल टाइम्सने आजच्या लेखात म्हटले आहे. ग्लोबल टाइम्स हे चीनमधील सत्ताधारी चीनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर भूमिक अधिक कठोर होईल असे ग्लोबल टाइम्सचे मत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय होईल या दुस-या एका बातमीचा लेखात हवाला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूत्रे सांभाळल्यापासून कोणालाही न दुखावण्याच्या भारताच्या धोरणात बदल झाला आहे.

भारताच्या हिताला प्राधान्य देऊन वादग्रस्त मुद्यांवर मोदींची ठाम भूमिका असते.

मोदींनी पुढची निवडणूक जिंकली तर, भारताची कठोर भूमिका यापुढेही कायम राहिल.अन्य देशांबरोबर वादग्रस्त मुद्यांवर भारत तडजोडीची भूमिका स्वीकारणार नाही असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. भारत-चीन सीमेवर पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत दिवाळी सादर करत असल्याचे उदहारण या लेखात दिले आहे.

भारत-चीन सीमा वादावर अजून कोणताही तोडगा दृष्टीपथात आलेला नाही. मोदींच्या राजवटीत भारत-चीन संबंध सुधारले असले तरी, रणनितीक लढाईत मोदींनी चीनला सरशी मिळू दिलेली नाही असे लेखात म्हटले आहे. भारत-चीनमध्ये व्यापारी संबंध एकाबाजूला दृढ होत असले तरी, सीमावादावर दोन्ही देशांची भूमिका अजिबात सौम्य झालेली नाही. सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैनिक अनेकदा परस्परांसमोर आले असून, दोन्ही बाजूंनी आक्रमकता दाखवली आहे.

लोकमत

अहो आश्चर्यम ! आता जीमेलवरून पाठवता येणार पैसे

नवी दिल्ली, दि. 16 - अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना आता जीमेल अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहेत. ग्राहकांच्या आग्रहास्तव गुगलनं हे नवीन फीचर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. विशेष म्हणजे ही सेवा गुगलमार्फत मोफत देण्यात येणार आहे. सध्या तरी हे फीचर अमेरिकेतल्या वापरकर्त्यांसाठी वापरात आणलं आहे. मात्र लवकरच ते सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

'फी-फ्री' नावाच्या या फीचरमध्ये जीमेल अ‍ॅपमधून फोटो किंवा फाईल तुम्हाला सहजगत्या पाठवता येणार असून, त्याच पद्धतीने आता पैसे पाठवणं सहजशक्य होणार आहे. हे पैसे वापरकर्त्यांना स्वतःच्या बँक खात्यातही जमा करता येणार आहेत.

या अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवणे हे ई-मेलमधून एखादी फाईल पाठवण्याइतकं सोपं झालं आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी गुगलनं ऑनलाइन ग्राहकांच्या व्यवहारासाठी अशाच प्रकारचं गुगल वॉलेट हे फीचर लाँच केलं होतं. त्याला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. अँड्रॉइड मोबाईल युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध नसल्यानं त्याला लोकांनी जास्त पसंती दिली नव्हती. जगभरात जीमेलचं जाळं मोठ्या विस्तारत असून, जीमेलचे आजमितीस जवळपास 1 अब्ज वापरकर्ते आहेत. त्यातील 75 टक्के लोक हे मोबाईलच्या माध्यमातून जीमेलचा वापर करतात. तसेच जगभरातल्या स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी 80 टक्के युझर्स हे अँड्रॉइड फोन वापरतात. त्यामुळेच हे फीचर जास्तीत जास्त लोकांच्या पसंती उतरणार असल्याचा गुगलला विश्वास आहे.

नक्षलवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना अक्षयकडून मदत

मुंबई, दि. 16 - बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार नेहमीच त्याच्या कामासाठी, देशभक्ती आणि माणूसकी जपणारा अभिनेता यासाठी ओळखला जातो. त्यांने पुन्हा एकदा देशावर असलेले प्रेम दाखवून दिले आहे. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या कुटुंबियांसाठी एक कोटी आठ लाख रुपयांची मदत करण्याचे अक्षय कुमारने जाहीर केले आहे.

गेल्या 11 मार्चला छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सीआरपीएफ यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत सीआरपीएचे 12 जवान शहीद झाले होते. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची आर्थिक मदत अक्षय कुमारकडून करण्यात येणार आहे आहे.

दरम्यान, अक्षय कुमारने याआधी भारतीय लष्कराच्या जवानांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून आले आहे. तसेच, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमार पुढे सरसावला होता. त्याने दुष्काळग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली होती.

लोकमत

गुरुवार, १६ मार्च, २०१७

10वीच्या विद्यार्थ्यांना 2 तास उशिराने मिळाल्या प्रश्नपत्रिका

वाडा, दि. 16 - चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात दहावी परीक्षेचे केंद्र असून आज भूमितीचा पेपर होता. मात्र परीक्षा मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल दोन तास उशिराने प्रश्नपत्रिका आल्याने विद्यार्थांना ताटकळत बसावे लागले. या भोंगळ कारभार प्रकरणाने पालक चांगलेच संतापले आहेत. झालेल्या निष्काळजीपणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सुरू आहे.

तालुक्यातील सर्व केंद्रांच्या प्रश्नपत्रिका वाडा कस्टडीमध्ये जावून घेतल्या जातात. चिंचघर येथे ह.वि.पाटील विद्यालयात सहा शाळांचे 823 विद्यार्थी भूमिती विषयाची परीक्षा देत आहेत. यातील 129 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे तर 211 विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमाचे आहेत.

गुरुवारी सकाळी चिंचघर येथील परीक्षा केंद्रावर वाडा येथील कस्टडीमधून सिलबंद प्रश्नपत्रिका आल्यावर नियोजित वेळेत ठरल्याप्रमाणे लिलाफे उघडण्यात आले असता इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आल्या नसल्याचे केंद्र प्रमुखांच्या लक्षात आले.

त्यानंतर चिंचघर येथील शिक्षण संस्थेचे सदस्य श्रीकांत भोईर व नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन यांनी तातडीने लक्ष घालून केंद्र प्रमुखांकडे चौकशी केली असता ही चूक बोर्डाकडून झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पुढील बेजबाबदारपणा म्हणजे केंद्र प्रमुखांसहवरील सर्वांनी धावाधाव केली असता बोर्डाकडून ऑनलाईन एक प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यानंतर तिच्या एका खासगी दुकानातून पेपरची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या.

ऑनलाइन लोकमत

मंगळवार, १४ मार्च, २०१७

Pakistan Violates Ceasefire for the Second Time in 24 Hours

 

  • In second ceasefire violation in less than 24 hours, Pakistani troops on Monday resorted to mortar shelling and firing by automatic weapons along the Line of Control (LoC) in Pooch district of Jammu and Kashmir, prompting the Army to retaliate.
  • "There was unprovoked ceasefire violation by Pakistan Army in Poonch sector from 0640 hours today, using 82 mm mortars, automatic weapons," a defence spokesman said.
  • Indian Army personnel took positions and responded befittingly to the Pakistani firing, the spokesman said, adding that intermittent firing was going on. There is no casualty on Indian side, he said.

राजकारण्यांनो खबरदार माझ्या पार्थिवास हात लावाल तर

कोल्हापूर जम्मू-कश्मीरमध्ये सेवा बजावणाऱ्या एका जवानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जवानाने भ्रष्ट नेत्यांना लक्ष्य केले आहे. शत्रूबरोबर लढताना वीरमरण आल्यास आपल्या पार्थिवाला या राजकारण्यांनी स्पर्श करु नये हीच आपली शेवटची इच्छा असल्याचे म्हटले आहे. एवढ्यावरच हा जवान थांबला नसून त्याने आपल्या गावात राजकारण्यांविरोधात होर्डिंग्जही लावले आहेत. रणजीत गावडे असे या जवानाचे नाव असून तो कोल्हापूरचा आहे. लष्करात लान्स नायक या पदावर तो कार्यरत आहे.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद होत असल्याने व्यथित झालेल्या रणजीतने व्हिडिओ आणि होर्डिग्जच्या माध्यामातून आपले मनोगत व्यक्त केले आहे.

त्याने चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे गावात राजकारण्यांविरोधात होर्डिंग्ज लावले आहे. जर सेवा बजावताना मला वीरमरण आले तर नीतीमत्ता भ्रष्ट झालेल्या नेते आणि लाचखोर अधिकाऱ्यांनी माझ्या पार्थिवाला हात लावू नये. हीच माझी शेवटची इच्छा आहे. तसेच या भ्रष्ट नेत्यांविरोधात नागरिकांनी एकत्र यावे असे आवाहन या जवानाने होर्डिंग्जमधून केले आहे.

सामना

राजकारण्यांनो खबरदार माझ्या पार्थिवास हात लावाल तर

कोल्हापूर जम्मू-कश्मीरमध्ये सेवा बजावणाऱ्या एका जवानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जवानाने भ्रष्ट नेत्यांना लक्ष्य केले आहे. शत्रूबरोबर लढताना वीरमरण आल्यास आपल्या पार्थिवाला या राजकारण्यांनी स्पर्श करु नये हीच आपली शेवटची इच्छा असल्याचे म्हटले आहे. एवढ्यावरच हा जवान थांबला नसून त्याने आपल्या गावात राजकारण्यांविरोधात होर्डिंग्जही लावले आहेत. रणजीत गावडे असे या जवानाचे नाव असून तो कोल्हापूरचा आहे. लष्करात लान्स नायक या पदावर तो कार्यरत आहे.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद होत असल्याने व्यथित झालेल्या रणजीतने व्हिडिओ आणि होर्डिग्जच्या माध्यामातून आपले मनोगत व्यक्त केले आहे.

त्याने चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे गावात राजकारण्यांविरोधात होर्डिंग्ज लावले आहे. जर सेवा बजावताना मला वीरमरण आले तर नीतीमत्ता भ्रष्ट झालेल्या नेते आणि लाचखोर अधिकाऱ्यांनी माझ्या पार्थिवाला हात लावू नये. हीच माझी शेवटची इच्छा आहे. तसेच या भ्रष्ट नेत्यांविरोधात नागरिकांनी एकत्र यावे असे आवाहन या जवानाने होर्डिंग्जमधून केले आहे.

सामना

सुकमातील रक्तपात !

अफाट लष्करी सामर्थ्य, एवढ्या फौजा, निमलष्करी दले सारे काही असताना हिंदुस्थानसारखा महाकाय देश मूठभर नक्षलवाद्यांचा रक्तपात हतबलपणे पाहतो, असेच चित्र देशवासीयांनी गेली अनेक वर्षे पाहिले. सुकमामध्ये १२ जवानांचे प्राण घेणाऱ्या ताज्या नक्षली हल्ल्यानंतर तरी हे चित्र बदलायला हवे!

सुकमातील रक्तपात !

शनिवारी सकाळी अवघा देश उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल टीव्हीवर बघण्यात दंग असताना तिकडे छत्तीसगडगध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे बारा जवान नक्षलवाद्यांच्या भयंकर हल्ल्यात शहीद झाले.

छत्तीसगडमधील सुकमा जिल्हा गेल्या काही वर्षांत जणू नक्षलवाद्यांचे नंदनवनच बनला आहे. नक्षलवादी दाट जंगलातून कधीही येतात, जवानांवर, निरपराध लोकांवर हल्ले चढवतात आणि रक्तपात करून झाल्यावर बंदुका नाचवीत निघूनही जातात. असे हल्ले झाल्यानंतर मोठी कुमक जंगलात पाठवायची, शहीद जवानांची शव गोळा करायची आणि राज्यकर्त्यांनी श्रद्धांजल्या अर्पण करायच्या हे सारेच आता सगळ्यांच्या सरावाचे झाले आहे. आताही वेगळे काही घडले नाही.

छत्तीसगडमध्ये जवानांच्या रक्ताचा सडा पाडून नक्षलवादी पसार झाले आणि जवानांवर आपल्याच सहकाऱ्यांची पार्थिव वाहून नेण्याची वेळ आली. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ल्यासाठी सुकमा जिल्हाच टार्गेट केला आहे. या जिह्याच्या भेज्जी आणि इंजरम या दोन गावांदरम्यान रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे. या मार्गाच्या सुरक्षेची आणि तिथे काम करणाऱ्या लोकांच्या जीविताची काळजी घेण्याची जबाबदारी सीआरपीएफच्या बटालियनवर सोपविण्यात आली होती.

एकंदर ११२ जवान या गस्ती पथकात सहभागी होते. सकाळच्या सुमारास रस्त्याची तपासणी करून रस्ता खुला करण्यासाठी  जवानांचे हे पथक निघाले असतानाच रस्त्यालगतच्या घनदाट झाडीत लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी डाव साधला. पेरून ठेवलेल्या भूसुरुंगांचे अनेक स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी जवानांच्या संपूर्ण पथकाला घेरले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जवान आधी गोंधळले. मात्र जिवाची पर्वा न करता अंगावर गोळ्या झेलतच जवानांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले. तुंबळ धुमश्चक्रीनंतर जवानांनी नक्षलवाद्यांच्या टोळक्याला पिटाळून लावले खरे, पण जाता जाता अनेक जवानांच्या रायफली आणि राखीव दलाचे रेडिओ सेट नक्षलवाद्यांनी पळवले. या भयंकर हल्ल्यात राखीव दलाचे बारा जवान धारातीर्थी पडले.

यात महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. मात्र दुर्दैव असे की निवडणूक निकालांच्या कोलाहलात जवानांनी घनदाट जंगलात दाखविलेले शौर्य आणि त्यांचे हौतात्म्य हरवून गेले. या भयंकर हल्ल्याचे वार्तांकन निकालांपुढे खुजे ठरले. वास्तविक गेल्या काही दिवसांत दहशतवाद थांबला, कश्मिरातील दगडफेक थांबली आणि नक्षलवादी हल्ले बंद झाले असे आभासी चित्र देशवासीयांच्या मनावर बिंबवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू होता.

तथापि यापैकी काहीही थांबलेले नाही, हे गेल्या दोन महिन्यांत वारंवार स्पष्ट झाले. सुकमा जिल्ह्यातील ताजा नक्षली हल्ला हे तर नक्षलवाद थांबल्याच्या बाजारगप्पांवर ओतलेले झणझणीत अंजनच म्हणावे लागेल. इस्लामी दहशतवादाप्रमाणेच माओवाद्यांच्या नक्षली कारवायांनी देश पोखरण्याचे काम सुरू आहे, हे वास्तव आहे. ते नाकारण्यापेक्षा निरपराधांवर आणि आपल्या जवानांवर उठणारे हात कलम करून रक्ताला चटावलेल्या या चळवळीची चुळबूळ कायमची कशी संपुष्टात आणता येईल, या दृष्टीने आता विचार व्हायला हवा.

नक्षलवादी हल्ल्यांचे आणि त्यात गेलेल्या बळींचे सरकारी आकडे अस्वस्थ करणारे आहेत. गेल्या बावीस वर्षांत १३ हजारांहून अधिक लोकांचे बळी नक्षलवाद्यांनी घेतले आहेत. यामध्ये तीन हजार जवान आणि दहा हजार निरपराध लोक मारले गेले. मागच्या तीन वर्षांतही ५१० सामान्य लोक आणि सुरक्षा दलांचे २१२ जवान नक्षली हल्ल्यात मरण पावले.

महाराष्ट्रासह छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दहा राज्यांतील एकंदर २०० जिल्हे आजघडीला नक्षलग्रस्त आहेत. आता तर जंगलांमधून बाहेर पडलेले नक्षली संघटनांचे कमांडर मोठ्या शहरांमध्ये आपली पाळेमुळे रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोरगरीबांची दिशाभूल करून त्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र देणाऱ्या नक्षली चळवळीचे संकट इस्लामी दहशतवादापेक्षाही मोठे आहे. अफाट लष्करी सामर्थ्य, एवढ्या फौजा, निमलष्करी दले सारे काही असताना हिंदुस्थानसारखा महाकाय देश मूठभर नक्षलवाद्यांचा रक्तपात हतबलपणे पाहतो, हे चित्र देशवासीयांनी गेली अनेक वर्षे पाहिले.

सुकमामध्ये १२ जवानांचे प्राण घेणाऱ्या ताज्या नक्षली हल्ल्यानंतर तरी हे चित्र बदलायला हवे!

Dailyhunt

रविवार, १२ मार्च, २०१७

मिळकतकर थकबाकीदार नसावा शेजारी

अन्यथा संपूर्ण सोसायटीच वेठीस, पाणीपुरवठा सील होणार

पुणे - मिळकतकराचा थकबाकीदार नसावा शेजारी अशी म्हणायची वेळ पुणेकरांवर येणार असून ज्या सोसायट्यांमध्ये मिळकतकराची बाकी असणारे सदस्य असतील तेथील पाणीपुरवठा शुक्रवारपासून सील होणार आहे. एवढेच नाही तर त्यांना क्‍लब हाऊस आणि इतर सुविधांपासूनही वंचित रहावे लागणार आहे. राज्यशासनाने 31 मार्चपुर्वी शहरातील 90 टक्के करवसूलीचे टार्गेट महापालिकेला बंधनकारक केले आहे. शिवाय याचा थेट परिणाम महापालिका आयुक्तांच्या केआरएवर होणार असल्याने या थकबाकीदारांना हा पठाणी हिसका दाखविण्याचा अफलातून निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे एकप्रकारे थकबाकीदारांना महापालिकेच्या भरणा काऊंटरवर पाठविण्याची जबाबदारी एकप्रकारे संपूर्ण सोसायटीवर आली आहे.

दरम्यान, शहरात एक लाख80 हजार 11 थकबाकीदार मिळकतधारक असून त्यांनी सुमारे 1360 कोटी रुपयांचा मिळकतकर थकविला आहे. या सर्वांना महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यात नोटीसा बजावल्या होत्या. थकबाकी वसूल करण्यासाठी तब्बल 500 ते 600 कर्मचाऱ्यांची फौजही महापालिकेने नियुक्त केली आहे. शहरात तब्बल 8 लाख 42 हजार मिळकती आहेत. त्यांचा वार्षिक कर तसेच थकबाकी मिळून तब्बल 2300 कोटींची कर मागणी 2016-17 या आर्थिक वर्षासाठी होती. त्यातील केवळ 1064 कोटी रूपयेच कर वसूल झाला आहे. त्यातच राज्यशासनाने शहरातील वाढत्या नागरिकरणाच्या समस्या सोडवून नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या कर मागणीच्या 90 टक्के कर वसूल करण्याची अट महापालिका आयुक्तांच्या की रिझल्ट एरिया (केआरए) मध्ये घातलेली आहे. अन्यथा आयुक्तांच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये या थकबाकीची नोंद होणार आहे. त्यामुळे महापालिकेने आता नोटीसा बजावूनही थकबाकीदार जुमानत नसल्याने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले.

संपूर्ण सोसायटीच वेठीस शहरात व्यावसायिक मिळकतींबरोबरच मोठया प्रमाणात रहिवासी मिळकतींचाही कर थकलेला आहे. अनेकदा घरात कोणीच नसल्याने त्यांना थकबाकीच्या नोटीसा मिळत नाहीत. तर एखादे घर बंद असल्यास ते सील करता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून ज्या सोसायटयांमध्ये घरांचा कर थकलेला आहे. अशा सोसयटयांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबधित सभासदांना कर भरण्याच्या सूचना देण्याची विनंती केली होती. त्यानंतरही अनेक हजारो रहिवासी मिळकतींचा कर थकीतच आहे. त्यामुळे जर एखाद्या थकबाकीदारचे घर बंद असल्यास आता प्रशासनाकडून थेट सोसायटीचे अथवा स्वतंत्र घर असल्यास त्या घराचे नळजोड तोडले जाणार आहे. या शिवाय जर सोसायटी मध्ये 50 टक्के पेक्षा अधिक थकबाकीधारक असल्यास अशा सोसायटीचे क्‍लब हाऊस, स्विमिंग पूल , गार्डन तसेच इतर ऍमेनिटी सुविधा सिल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

परिक्षामुळे बॅंडची झाली पंचाईत
महापालिकेने थकबादीदारांच्या दारात बॅंड वाजविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सध्याच्या थकबाकीदारांमध्ये मोठया प्रमाणात शाळांच्या इमारतींचाही कर थकीत आहे. त्यामुळे हे बॅंड पथक शाळाच्या आवारात जाऊन बॅंड वाजवित आहे.मात्र, त्याच वेळी या शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरू असल्याने या पथकाला माघारी फिरावे लागत आहे. परिक्षांमुळे बॅंड धारकांच्या झालेल्या या पंचाईतीचा गैरफायदा घेत परिक्षांमुळे बॅन्ड पथक परत जात असल्याने या शाळांकडून कर भरण्याकडे पाठ फिरविली जात असल्याचे करसंकलन विभागाकडून सांगण्यात आले.

Dailyhunt

धुळ्यात परतताच जवान चंदू चव्हाणला अश्रू अनावर

धुळे, दि. 12 - पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण अखेर धुळ्यात परतला आहे. खुद्द संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः त्याला घेऊन धुळ्यात परतले. बोरविहिर या आपल्या गावी आल्यानंतर चंदू चव्हाणला अश्रू अनावर झाले.
मृत आजीच्या आठवणीने चंदू चव्हाणचे डोळे पानावले. अगोदर आजीच्या अस्थिंचं विसर्जन करणार असल्याचं त्याने सांगितलं. चंदू जोपर्यंत परत येत नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थिंचं विसर्जन करणार नाही, असं चंदूच्या भावाने सांगितलं होतं. चंदू पाकच्या तावडीत गेल्याचं वृत्त कळताच आजीचं धक्क्यानं निधन झालं  होतं. बोरविहिर गावातील महिलांचे चंदूला पाहून डोळे पानावले. धुळ्यात पोहचल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नमन करुन चंदू गावी रवाना झाला.

त्यापूर्वी धुळ्यात त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Dailyhunt

सुकुमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात महाऱाष्ट्रातले तीन जवान शहीद

image

छत्तीसगडमधील सुकमा जिल्हयात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात शहिद झालेल्या १२ जवानांमध्ये महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. मंगेश बालपांडे( भंडारा) नंदकुमार आत्राम( चंद्रपूर) प्रेमदास मेंढे (वर्धा) अशी त्यांची नावे आहेत. हे तीनही जवान विदर्भातील असून आज त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहेत. तेथे लष्करी इतमानाने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सुकमा जिल्ह्यातील भेज्जी गावालगत कोताचेरुच्या जंगलात शनिवारी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १२ जवानांना वीरमरण आले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. या तिघांचे पार्थिव आज सकाळी हेलिकॉप्टरने नागपूरला आणण्यात आले. तिथून ते त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहे. तिथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शहिदांना श्रध्दांजली वाहणार आहेत.

सामना 

आजीच्या अस्थींचे विसर्जन : माझा भारत महान -चंदू चव्हाण

नाशिक : भारतीय सेनेने पाकव्याप्त भागात केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर भारतीय सेनेचा जवान चंदू चव्हाण हा गेल्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानच्या सीमेत अनावधानाने गेला होता. सदर वार्ता ऐकून त्याच्या आजी लिलाबाई (६५) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आजीच्या अस्थींचे चव्हाण याने रविवारी दुपारी नाशिकच्या गोदापात्रातील रामकुंडात विसर्जन केले.

नाशिकच्या शेजारील धुळे जिल्ह्यातील बोरविहिर येथील रहिवासी असलेला चंदू हा सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी जम्मू काश्मिरमधील पुंछ सेक्टरमध्ये कार्यरत होता. सप्टेंबर महिन्यात चंदू चुकून पाकच्या हद्दीत गेला यानंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी त्याला कैद करत अंधारकोठडीत डांबले होते.

शनिवारी प्रथमच तो बोरविहिर या मुळ गावी आला. त्यानंतर आज दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास चंदू आपल्या भावासह मामा, आत्याबहीण आदि नातेवाईकांसोबत आजीच्या अस्थी विसर्जनासाठी गोदाकाठावर पोहचला. आजीचे लिलाबाई पाटील (६५) यांच्या अस्थींचे विसर्जन चंदू याने रामकुंडाजवळील अस्थीकुंडात केले. यावेळी चंदू यांनी हंबरडा फोडला. चंदू यांना अश्रू अनावर झाले होते. अस्थी विसर्जनानंतर चव्हाण यांनी रामकुं डात उतरून आंघोळ केली. यानंतर चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी एक ते दीड मिनिटे संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अश्रू अनावर होत होते. चंदू याने भावनिक होत 'माझा भारत महान आहे. या देशाच्या लोकांनी व सैन्याने मला दिलेले प्रेम मी विसरु शकणार नाही.' यावेळी चंदू यांची आत्याबहीण मंगल पाटील यांनीही भारत सरकार व संरक्षण खात्याचे आभार मानत सरकार व सेनेच्या संयुक्त प्रयत्नामुळे आमचा चंदू पुन्हा मायदेशी परतू शकला, असे सांगितले.

Dailyhunt

नवा भारत घडवण्याचा संकल्प करूया - मोदी

नवी दिल्ली, दि. 12 - उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नवा भारत घडत असून, तो विकासाच्या बाजूने आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. जनतेने नवा भारत घडवण्यासाठी संकल्प करावा आणि त्यासाठी नरेंद्र मोदी मोबाइल अॅपवरून त्याबाबत आपली कटिबद्धता व्यक्त करावी, असे आवाहन मोदींनी केले.

आज सकाळी मोदींनी ट्विटरवरून भाजपाला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर ट्विटरवरून आपले सविस्तर मतप्रदर्शन केले. त्यात ते म्हणाले, एक नवा भारत घडत आहे, ज्याच्या जवळ 125 कोटी भारतीयांची ताकद आणि क्षमता आहे. हा भारत विकासाच्या बाजूने आहे, ते पुढे म्हणतात की 2022 मध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करू तेव्हा आपण असा भारत घडवला पाहिजे, ज्या भारतावर गांधीजी, सरदार पटेल आणि बाबासाहेब आंबेडकरांना गर्व असेल.

भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये विखुरलेल्या विरोधकांना धोबीपछाड देत शनिवारी अभूतपूर्व विजय मिळविला होता. 403 सदस्यीय राज्य विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाने तीन चतुर्थांश म्हणजे तब्बल 325 जागा जिंकून राज्यात एकहाती सत्ता काबीज केली. या निवडणुकीत सपा-काँग्रेस युती आणि बसपाचा दारुण पराभव झाला. युतीला 55 तर बसपाला केवळ 19 जागा जिंकता आल्या.

 

A new India is emerging, which is being powered by the strength & skills of 125 crore Indians. This India stands for development.

— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2017

When we mark 75 years of freedom in 2022, we should have made an India that will make Gandhi Ji, Sardar Patel & Dr. Babasaheb Ambedkar proud

— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2017

लोकमत

लष्करी व शासकीय इतमामात शहीद महादेव तुपारे यांना अखेरचा निरोप

कोल्हापूर, दि. 12 - अमर रहे... अमर रहे, शहीद जवान महादेव तुपारे अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदे्मातरम अशा गगनभेदी घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान महोदव तुपारे यांना चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील शिवराज हायस्कूलच्या पटांगणावर लष्करी व शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.

यावेळी शहीद महादेव तुपारे यांच्या पार्थिवास राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. याबरोबरच खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉ.

अमित सैनी, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांनीही शहीद महोदव तुपारे यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी शहीद महादेव तुपारे यांचे वडील पांडुरंग तुपारे, आई सुमन तुपारे, पत्नी रुपा तुपारे आणि मुलगा प्रितम आणि औंश यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

शहीद महादेव तुपारे यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव आज सकाळी मूळ गावी महिपाळगड येथे आणण्यात आले. प्रथम त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. वडील पांडुरंग तुपारे, आई सुमन तुपारे, पत्नी रुपा तुपारे, मुलगा प्रितम आणि औंश तसेच नातेवाईक आणि जनसमुदायांनी साश्रुनयनांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यानंतर महिपाळगड गावातून शहीद महादेव तुपारे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. अंत्ययात्रेच्या मार्गावर दोन्ही बाजूला रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या व रस्त्याचा मध्य मार्ग विविध फुलांच्या पाकळ्यांनी सजवला होता. गावातील प्रत्येक चौकात महादेव तुपारे अमर रहे.. वीर जवान तुझे सलाम अशा घोषणांचे बॅनर्स लावण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिला, आबालवृध्द, तरूण मुले, मुली शहीद महादेव तुपारे यांच्या पार्थिवावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत होते.

शहीद महादेव तुपारे यांचे पार्थिव महिपाळगड येथील शिवराज विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित जनसमुदायाच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी लष्करी व पोलीस दलातील जवानांनी शहीद जवान महादेव तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाच्या शोकभावना अनावर झाल्या. राष्ट्रध्वज शहीद जवान महादेव तुपारे यांचे वडील पांडुरंग तुपारे यांच्या हाती लष्कराच्यावतीने अर्पण करण्यात आला. यावेळी राज्य शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तसेच कुटुंबियांनी शहीद जवान महादेव तुपारे यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली अर्पण केली.

शहीद जवान महादेव तुपारे यांचे पार्थिव महिपाळगड येथील शिवराज विद्यालयाच्या पटांगणावर खास तयार केलेल्या आणि फुलांनी सजविलेल्या चौथऱ्यावर आणण्यात आले. यावेळी वडील पांडुरंग तुपारे यांनी शहीद जवान महादेव तुपारे यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन अखेरचा निरोप दिला. लष्कराच्या 8 जवानांच्या तसेच पोलीस दलाच्या 8 जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद महादेव तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर शहीद जवान महादेव तुपारे यांचे बंधु कुंडलिक तुपारे यांनी शहीद जवान महादेव तुपारे यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला. यावेळी अमर रहे... अमर रहे शहीद महादेव तुपारे अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम अशा शोकाकुल घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

राज्य शासनाच्या वतीने 8 लाखाची मदत ..पालकमंत्री चंद्रकांत पाटील

शहीद जवान महोदव तुपारे हे कोल्हापूरचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात महाराष्ट्र शासन सहभागी असून शासन पूर्णपणे त्यांच्या कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने शहीद जवान महोदव तुपारे यांच्या कुटुंबियांना 8 लाखाची मदत प्राधान्याने दिली जाईल, याबरोबरच केंद्र शासनाकडूनही मदत मिळेल. लेह लडाखमधील दराज सेक्टरमध्ये ते सेवा बजावत असतांना प्रचंड बर्फवृष्टीत सापडून त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मृतात्म्यास सदगथी लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापुरकर-चौगुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुभाष सासने, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर,गट विकास अधिकारी एस.डी. सोनवणे, लेफ्टनंट कर्नर कावेरीअप्पा, सैनिक कल्याण विभागाचे सुभेदार मेजर शेळके, पोलीस निरिक्षक महावीर सकळे, गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, सग्राम कुपेकर, राजेश पाटील, गोपाळ पाटील, सरपंच दशरथ भोसले, उपसरपंच अशोक कदम यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी शासकीय, पोलीस व लष्करी अधिकारी, जवान आणि कोल्हापूर जिल्हयातील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

Dailyhunt

मनोहर पर्रीकरांची घरवापसी! गोव्यात भाजपाचे सरकार?

पणजी, दि. 12 - मोदींच्या मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी असलेल्या मनोहर पर्रीकर यांची घरवापसी होणार आहे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होणार असतील तरच पाठिंबा देऊ, अशी अट गोव्यातील स्थानिक पक्ष आणि अपक्षांनी घातल्याने पर्रीकर यांनी संरक्षण मंत्री सोडून गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पर्रीकरांनी मगोप, गोवा फॉरवर्ड ब्लॉक आणि अपक्षांसोबत राज्यपालांची भेट घेत गोव्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यामुळे गोव्यात काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्यानंतरही भाजपाचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे.

आज महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड ब्लॉक या दोन स्थानिक पक्षांच्या प्रत्येकी तीन आमदारांनी आणि दोन अपक्ष आमदारांनी मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पाठिंबा दिला.

त्यानंतर मनोहर पर्रिकर यांनी राज्यपालांची भेट घेत सरकारस्थापनेचा दावा केला.

काल लागलेल्या विधानसभेच्या निकालांमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह भाजपच्या अनेक मातब्बर मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र कुठल्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी चुरस निर्माण झाली होती. त्यात मगोपाच्या सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड ब्लॉकच्या विजय सरदेसाई यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने भाजपा सत्तास्थापनेजवळ पोहोचला आहे.

दरम्यान, "आम्ही राज्यपालांची भेट घेतली, त्यांच्याकडून आमंत्रण मिळण्याची अपेक्षा आहे. सत्ता स्थापनेचं आमंत्रण मिळाल्यानंतर आम्हाला पाठिंबा देणा-यांसोबत चर्चा करून शपथ घेण्याची तारीख ठरवू," असे मनोहर पर्रिकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तर "मनोहर पर्रिकरांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा अजून दिलेला नाही, गोव्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याआधी त्यांना राजीनामा द्यावा लागेल, " असे नितीन गडकरी म्हणाले.

लोकमत

Jobs and Career

Indian Government Jobs - www.indgovtjobs.in

Link to Indian Government Jobs - Today Employment News


Diploma Fresher Jobs 2017 (5000 Govt Vacancies Opening)

Posted: 10 Mar 2017 08:10 AM PST

Government Public Sector Unit (PSU) Navaratna Companies looking fresh and experienced Diploma Holders in various engineering fields: Electrical, Mechanical, Electronics, Civil, Computer Science,...

Engineer Jobs 2017 (1000 Govt Vacancies Opening)

Posted: 10 Mar 2017 07:56 AM PST

Engineering Graduates, who pursing final year or recently completed engineering degree holders get your discipline wise suitable Government jobs - latest recruitment / vacancy details here....

Fresher Jobs 2017 (20,000 Govt Vacancies Opening)

Posted: 10 Mar 2017 07:39 AM PST

Fresher and Final Year Graduate / Diploma / ITI Students get latest Indian Government Jobs vacancy openings in this post. IndGovtJobs Blog everyday updating New Govt Jobs for Fresh Graduates, Fresh...

Ferro Scrap Nigam Limited Recruitment 2017 Assistant General Manager

Posted: 10 Mar 2017 07:27 AM PST

Ferro Scrap Nigam Limited (FSNL) (A Government of India Undertaking) is looking for experienced candidates for requirement of Executives in the discipline of "Personnel and Administration"....

Private Bank Jobs Openings 2017

Posted: 10 Mar 2017 07:16 AM PST

Private Sector Banks provide career opportunities for young Graduates for offering various Banking & Financial Services Jobs. Most of the Private Banks does not charge any recruitment fee from...

Federal Bank Recruitment 2017 Apply Online for Specialist Officers

Posted: 10 Mar 2017 07:14 AM PST

Federal Bank, one of India’s leading private sector banks invites applications for the position of Specialist Officer (Trade Finance) in Scale II. Eligible Indian Nationals apply online, the last...

SAIL Recruitment 2017 Apply Online (117 Vacancies Opening)

Posted: 10 Mar 2017 07:00 AM PST

Steel Authority of India Limited (SAIL) Bhilai Steel Plant invites Online applications for recruitment of Operator cum Technician, Attendant cum Technician, Attendant cum Fire Engine Driver and...

Nursing Jobs 2017 (5862 Govt Vacancies Opening)

Posted: 10 Mar 2017 06:58 AM PST

Nursing is one of the best profession in the health care sector. Nursing (Staff Nurse) in India is the practice of care for medical patients. Every year, Lot of Nursing vacancies opening in Indian...

UPPSC Recruitment 2017 Apply Online (4081 Vacancies Opening)

Posted: 10 Mar 2017 06:45 AM PST

Uttar Pradesh Public Service Commission (UPPSC) will hold Combined State / Upper Subordinate Services Examination 2017 for recruitment of various posts for filling up total 251 Vacancies. The last...

Employment News Jobs Highlights - 11th to 17th March 2017 Week

Posted: 10 Mar 2017 06:12 AM PST

Employment News (English) / Rozgar Samachar (Hindi & Urdu) Paper every week issue Job Highlights available in the post. IndGovtJobs Blog every week updating Employment News weekly Issue Job...

UPSC Advertisement No 05/2017 Assistant Engineer, Junior Analyst (15 Vacancies)

Posted: 10 Mar 2017 06:09 AM PST

Union Public Service Commission (UPSC) invites Online Recruitment Applications (ORA) for recruitment of Assistant Engineer and Junior Analyst. The last date for submission of online registration is...