ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आवाहन ः शहीददिनी राजगुरुंना अभिवादन
राजगुरूनगर, दि. 23 (प्रतिनिधी) -देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची प्रत्येक नागरिकाने आठवण ठेवून त्याच्या विचारांची जोपासना केली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांनी राजगुरुनगर येथे केले.
हुतात्मा राजगुरू पुण्यतिथीनिमित्ताने राजगुरुनगर येथील पुणे नाशिक महामार्गावरील बस स्थानकाजवळील हुतात्मा राजगुरू यांचा अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अभिनेते विक्रम गोखले बोलत होते. तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी येथील हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, हुतात्मा राजगुरूचे वारसदार सत्यशील राजगुरू, खेडचे प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार सुनील जोशी, पोलीस उपअधीक्षक राम पठारे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे, उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर, खेड पंचायत समितीचे सभापती सुभद्रा शिंदे, आंबेगाव तालुका सभापती उषा कानडे, मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे, खेड तालुका कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस, राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष किरण आहेर, शिवसेनेच्या शिरूर विभागाच्या संपर्कप्रमुख विजया शिंदे, जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, हुतात्मा राजगुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टेपाटील, नंदकुमार एकबोटे, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, कोंडीभाऊ टाकळकर, मुकुंदराव आवटे, कालिदास वाडेकर, शिवसेनेचे प्रकाश वाडेकर, महेंद्र घोलप, कोंडीभाऊ निमसे, बी. एम. सांडभोर, परेश खांगटे, सतीश गोरडे, मधुकर गिलबिले, संदीप जाधव, राजगुरुनगर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी, एनसीसीचे महाविद्यायीन विद्यार्थी, भारत स्वाभिमान संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना अभिनेते विक्रम गोखले म्हणाले, राज्यातील जनतेला विनंती आहे कि, ज्या क्रांतिकारकांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान दिले त्यांच्याबद्दल खरोखरच आस्था असेल, आदर असेल, अशा क्रांतीकारकांची आयुष्यभर आठवण ठेवून त्यांच्या विचारांचे आचरण केले पाहिजे. फक्त त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी एकत्र येऊन त्यांची आठवण ठेवणे चुकीचे आहे. केवळ एका दिवसापुरते त्यांना अभिवादन करणेही चुकीचे आहे. या क्रांतीकारकांना दररोज अभिवादन करण्याची सुरुवात राजगुरुनगर येथील नागरिकांनी केली पाहिजे. विशेषतः युवकांनी याचे अनुकरण केले पाहिजे. केवळ एका दिवसाचा हा कार्यक्रम नसून आयुष्यभरासाठी हा उपक्रम सर्वांनी पुढे चालू ठेवला पाहिजे. त्यांचे देशाबद्दल असलेले आचार-विचार याचा अंगीकार करून ते आचरणात आणले पाहिजेत, देशातील तरुणांनी ते अवगत करावेत.
निधी मिळाल्यास काम सुरू करणार
तहसीलदार सुनील जोशी यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. हुतात्मा राजगुरू यांचे राष्ट्रीय स्मारकाच्या काम सुरु करण्यासाठी निधीची तरतूद होत नाही यासाठी वरिष्ठस्तरावर प्रयत्न सुरु असून सुमारे 78 कोटींचा आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. याकामासाठी निधीची तरतूद झाल्याबरोबर उर्वरित कामाला सुरुवात केली जाणार आहे.
Dailyhunt
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा