मुंबई, दि. 16 - बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार नेहमीच त्याच्या कामासाठी, देशभक्ती आणि माणूसकी जपणारा अभिनेता यासाठी ओळखला जातो. त्यांने पुन्हा एकदा देशावर असलेले प्रेम दाखवून दिले आहे. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या कुटुंबियांसाठी एक कोटी आठ लाख रुपयांची मदत करण्याचे अक्षय कुमारने जाहीर केले आहे.
गेल्या 11 मार्चला छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सीआरपीएफ यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत सीआरपीएचे 12 जवान शहीद झाले होते. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची आर्थिक मदत अक्षय कुमारकडून करण्यात येणार आहे आहे.
दरम्यान, अक्षय कुमारने याआधी भारतीय लष्कराच्या जवानांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून आले आहे. तसेच, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमार पुढे सरसावला होता. त्याने दुष्काळग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली होती.
लोकमत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा