मंगळवार, 5 जानेवारी 2016 - 01:30 PM IST
नवी दिल्ली- पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजित असून, त्याबद्दलची माहिती पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांना आधीपासून होती, असे भारतीय गुप्तहेर संघटनांनी म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या शांतता प्रक्रियेला पाकिस्तानच्या लष्कराचा विरोध असल्याचे वृत्तही एका वृत्तवाहिनीने दिली आहे. पाकिस्तानमध्ये नुकतीच एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास हरकत नाही. परंतु, पाकिस्तानी लष्कर देशातील दहशतवादी संघटनांच्या विरोधात कोणतीही कारवाई करणार नाही, असे पाकचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी पंतप्रधान नवाझ यांनी स्पष्ट केले होते.
यावेळी ज्या संघटनांचा संदर्भ देण्यात आला त्याच संघटनांनी भारताविरोधात आपली मोहीम सुरू केली आहे. पठाणकोटमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी रावळपिंडीतील नूर खान हवाई दलाच्या तळावर याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते. असे वृत्तपत्राने म्हटले आहे की, दहशतवाद्यांकडून या तळावर कमीत कमी चारवेळा मॉक ऑपरेशन करण्यात आले होते. तसेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहवालपूरमध्ये देखील त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले होते.
[Sakal]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा