नवी दिल्ली - भारताचे दरडोई उत्पन्न 79 हजार 882 रूपयांवर गेले आहे. गेल्या चार वर्षातील ही उच्चांकी स्थिती आहे असे सरकार तर्फे आज संसदेत सांगण्यात आले. देशाचे दरडोई उत्पन्न सन 2011 ते 2014 या अवधीत 67 हजार 594 इतके होते.
या पार्श्वभूमीवर दरडोई उत्पन्नात झालेली ही वाढ लक्षणीय आहे असे सांख्यकी विभागाचे मंत्री विजय गोयल यांनी लोकसभेतील लिखीत उत्तरात सांगितले. गेल्या चार वर्षात 4.6 ते 6.9 टक्के या टप्यांमध्ये नागरीकांच्या दरडोई उत्त्पन्नात वाढ झाल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. देशाच्या दरडोई उत्पन्नाबाबत सदस्यांनी सरकारकडे प्रश्न विचारले होते त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी ही आकडेवारी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा