शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य करणार : राजवर्धनसिंग राठोड
नवी दिल्ली : देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी पुढाकार घेतला आहे. आता 2019 सालापासून शालेय अभ्यासक्रमात 50 टक्के कपातकरुन शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. रग्बी या खेळाचा विश्वचषक भारतात आला आहे. या ट्रॉफीचे नवी दिल्लीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी क्रीडामंत्री बोलत होते. 2022 सालापर्यंत 'साई' (स्पोर्टस् इंडिया) च्या कर्मचार्यांमध्ये कपात करणार आहे. यामधून जो पैसा वाचेल तो खेळाडूंसाठी वापरणार असल्याचे यावेळी क्रीडामंत्री म्हणाले. तसेच शालेय अभ्यासामध्येही 50 टक्के कपात करणार असल्याचे संकेत राजवर्धनसिंग राठोड यांनी दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा