डिजिटल समाविष्ठता
प्रोत्साहनासाठी भारतीय भाषांच्या आवश्यकतेनुसार सॉफ्टवेअर विकासाची आयटी
कंपन्यांना विनंती.
केंद्रीय संदेशवहन आणि माहिती
तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी भारताला जर डिजिटल सोसायटी म्हणून ओळख
द्यायची असेल आणि नवीन तंत्रज्ञानयुक्त भारत बनवायचा असल्यास ‘डिजिटल इंडिया’ ही
संकल्पना राबविणे आवश्यक असल्याचे सांगितले. ते भारतातील मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या
रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मुंबई येथे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सरकारने 2.5 लाख ग्रामपंचायतींना भारत नेट
ऑप्टिक फायबर नेटवर्कने जोडण्याचे काम हातात घेतले आहे. तसेच देशभरातील 1.25 लाख टपाल कार्यालय डिजिटाईझ
करण्यात येणार आहेत.
सरकारने डिजिटाईझ इंडिया प्रकल्पासाठी घेतलेले परिश्रम सांगताना रविशंकर
प्रसाद पुढे म्हणाले की, डिजिटल साक्षरता अभियानाअंतर्गत
प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला तंत्रज्ञान शिक्षण देण्यात येणार आहे. त्यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या समीकरणाची आठवण करून देत म्हणाले की, आयटी (माहिती तंत्रज्ञान)+ आयटी
(भारतीय विशेष कौशल्य)= आयटी (उद्याचा भारत)
रविशंकर प्रसाद म्हणाले की, भारताचे डिजिटल इंडियामध्ये
रुपांतर करतांना, भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीचा
विचार करून 22 कार्यालयीन भाषांसाठी नवीन
तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. ज्याद्वारे आपण संबंधित स्थानिक लोकांपर्यंत हे
अभियान पोहचवू शकू. प्रसाद यांनी मायक्रोसॉफ्टला विनंती केली की, डिजिटल समाविष्ठता आणण्यासाठी
विविध भाषांमध्ये मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर विकसित करावे.
उपस्थित तंत्रज्ञान व्यवसायिकांशी बोलतांना भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे
मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला म्हणाले की, भारतातील तंत्रज्ञानाची सुरुवात
आणि ई-कॉमर्सची सुरुवात ही संपूर्ण जगातील आकर्षक क्षेत्रांमधील एक आहे. त्यांनी
भारतामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांबरोबर काम करण्याची इच्छा बोलून दाखविली आणि लघु
व्यावसायिकांना त्यांच्या व्यावसायिक मार्गदर्शनासाठी दालन खुले केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारतर्फे डिजिटल
इंडियाला पाठिंबा असल्याचे आश्वासन देतांना सांगितले की, ऑनलाईन 42 सरकारी सेवा जनसामान्यांसाठी
देण्यात येणार असून एकल प्लॅटफॉर्मद्वारे सरकार या सेवांची तरतूद करेल. प्रसिध्द उद्योगपती आनंद महिद्र
यांनी नागरिक आणि सरकार यांना जोडण्यासाठी लोकशाहीकरण, तंत्रज्ञानाचे विकेंद्रीकरण
आवश्यक असल्यावर जोर दिला.
‘फ्यूचर अनलिश्ड 2015
परिषद’
ही औद्योगिक नेतृत्व, धोरणकर्ते, माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक
यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान एकत्रिकरण असून याद्वारे भविष्यातील
व्यवसाय आणि तंत्रज्ञान संभाव्यता ओळखता येतील.
PIB Mumbai 05 Nov 2015
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा