कर्नल महाडिक,
माझ हे पत्र आपल्यापर्यन्त पोहोचणार नाही, तरी पण लिहितोय. आपले आभार मानायचे होते. धन्यवाद ! आपण आमच्यासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदाना बद्दल शतशः धन्यवाद.
आमच्या सारखी छोटी माणस एवढंच करू शकतात. तुम्ही तिकडे आमच्यासाठी प्राणार्पण केले, आम्ही मात्र मोदी कसे वाईट आहेत,तुरडाळ कशी महागली,लव जिहाद,घर वापसी,मंदीर मस्जिद,स्मारक कुठे असावे या वर वाद घालत बसलो. कदाचित आमच्यातल्या काहींची वैचारिक ऊँची कधी वाढणारच नाही अस वाटतंय. तुम्ही गेल्याने काहींना काहीच फरक पड़त नाही. आमच् ऑफिस, आमचा व्यवसाय, आमच्या राजकीय कुरघोड्या आणी चिखलफेक, आमची जातीय समीकरण, आमचे हॉटेलिंग, आमच्या ओल्या-सुक्या पार्ट्या काही काही थांबणार नाही. एवढंच काय, आमच्या अतिव्यस्त दिवसात दोन मिनिट थांबुन तुमच्यासाठी दोन अश्रुंची श्रद्धाञ्जलि देण्या इतका पण आमच्याकडे वेळ नसतो. आम्हाला काहीच, कशाचाच फरक पड़त नाही. पण फरक पडेल तुमच्या घरच्यांना, ज्यांनी काळजावार दगड ठेऊन तुम्हाला देशासाठी...आमच्यासाठी... सरहद्दीवर जाऊ दिल. फरक पडेल तुमच्या अर्धांगिनीला. तुम्ही सगळ्यात जास्त अठवताल तुमच्या 11 आणी 5 वर्षाच्या पिल्लांना. बाकी सर्व आपल्या आपल्या खुज्या दुनियेत मशगूल राहणार. हे सर्व सत्य आपल्याला माहीत असताना देखील आपण आमच्यासाठी प्राणाहुती दिलीत.
सलाम तुमच्या त्यागाला, सलाम तुमच्या राष्ट्रभक्तिला, सलाम तुमच्या माता-पित्यांना ज्यांनी असा पुत्र घडविला, सलाम तुमच्या सारख्या तमाम जवानांना.
भारतीय सैनिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा