| ||
स्थळ : मरीन डाईव्ह
वेळ : सकाळी साडे सात वाजता कार्यक्रम : एकता दौड खरे तर आजचा दिवस मुंबईकरांसाठी थोडासा वेगळा होता. कारण आज सकाळी साडे सात वाजता मरीन ड्राइव्ह येथे जमलेला प्रत्येक जण देशाच्या एकात्मतेसाठी धावण्यासाठी आला होता. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन (31 ऑक्टोबर) राष्ट्रीय एकता दिन महणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने प्रशासकीय अधिकारी यांच्यापासून ते महाविद्यालयीन विदयार्थ्यांपर्यंत सर्वजण या एकता दौडमध्ये धावण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाच्या वृत्तांकनासाठी मी ही मरीन ड्राइव्ह येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकता दौड मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकामध्ये असलेला उत्साह आणि दौडमध्ये धावण्याची उत्सुकता दिसत होती. सकाळी सात वाजल्यापासूनच मरीन ड्राइव्ह परिसर माणसांनी गजबजला होता. खरे तर या परिसरात राहणारे दररोज येथे धावण्यासाठी येतच असतात. पण या एकता दौडमध्ये सहभागी झालेले अनेक जण खूप लांबूनही आले होते. साडे सात वाजता उपस्थितांनी दौडमध्ये धावण्यासाठी एक लाईन तयार केली. पाहिली रांग ही वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू होते. यानंतर क्रीडाप्रेमी, शारीरिक शिक्षक, एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट गाईचे विद्यार्थी यांच्यासह या परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालयात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्य, बँकर्स उभे राहिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्यासह मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते. पावणे आठ वाजता राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे आगमन झाले आणि मग राज्यपाल महोदयांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली आणि बरोबर सकाळी आठ वाजता मा. राज्यपाल महोदयांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखविला आणि या दौडचा शुभारंभ झाला आणि मग उपस्थितांनी आपल्या दौडला सुरुवात केली. खरे तर या एकता दौडचे वैशिष्ट्य म्हणजे ही दौड राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी आहे आणि म्हणूनच याला रन फॉर युनिटी असे म्हटले गेले आहे. या दौडला हिरवा झेंडा मा. राज्यपालांनी दाखविल्यानंतर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, मुंबईच्या जिल्हाधिकारी शैला ए यांनी या एकता दौडमध्ये सहभाग घेतला आणि मरीन ड्राइव्ह ते पारसी जिमखाना इथपर्यंतची दौड पूर्ण केली. या दौडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधला उत्साह विशेष लक्ष वेधून घेत होता. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘एकता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. देशाच्या अखंडतेसाठी या दिवशी देशभर ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात येते. सरदार पटेल यांनी देश अखंड ठेवण्यासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत्या 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची जयंती ‘एकता दिवस’ म्हणून साजरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा दिवस राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून देशभर साजरा करण्यात आला आणि या दिवशी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने एकता दौड आयोजित केली होती. मरीन ड्राइव्ह येथील हॉटेल ट्रायडंटपासून ही एकता दौड सुरु झाली आणि तिची सांगता पारशी जिमखाना येथे झाली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व त्यानंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. वल्लभभाई पटेल यांच्या या कामगिरीची माहिती जनतेला व्हावी आणि जनतेला त्यांच्या विचारांपासून आणि कामगिरीपासून प्रेरणा मिळावी म्हणून 31 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. यानिर्णयाच्या अनुषंगाने राज्यभरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या एकता दौड कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईकर राष्ट्राच्या एकतेसाठी कसे धावून जातात याचीच प्रचिती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली....- वर्षा फडके : शनिवार, ३१ ऑक्टोंबर, २०१५
[ Mahanews ]
|
For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com
!doctype>
शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५
चला धावूया राष्ट्राच्या एकतेसाठी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा