नवी दिल्ली - ‘वन रॅंक, वन पेन्शन‘साठी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून, आज पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी लष्करातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आंदोलकांनी "वन रॅंक, वन पेन्शन‘साठी घेतलेली ताठर भूमिका सोडावी, अशी विनंती पंतप्रधानांनी केल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने लष्करातील माजी अधिकारी संतप्त झाले असून, तिन्ही सेनादलाच्या माजी प्रमुखांनी घटनेचा निषेध करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लिहिले आहे.
[यूएनआय]
[यूएनआय]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा