नवी दिल्ली - ‘वन रॅंक वन पेन्शन‘ (ओआरओपी) लागू करण्याच्या मागणीसाठी तीन माजी सैनिकांनी जंतरमंतर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
आमरण उपोषण करणाऱ्या दोन माजी सैनिकांत आज सकाळी आणखी एक माजी सैनिक सहभागी झाले. निवृत्त हवालदार अशोक कुमार चौहान हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. "ओआरओपी‘ योजनेची अंमलबजावणी करण्यात देशातील राजकीय नेतृत्व कमी पडत असल्याचे सांगत दहा माजी लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, ही योजना त्वरित लागू करण्याची मागणी केली आहे. स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात "ओआरओपी‘ लागू करण्याची पुन्हा एकदा ग्वाही दिली होती. मात्र, त्यामुळे समाधान न झालेल्या माजी सैनिकांनी सरकारवरील दबाव वाढविण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा