देशभरातल्या सर्व सरकारी कार्यालयात स्वच्छता पाळली जावी यासाठी आज विशेष स्वच्छ कार्यालय पंधरवडा मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत विशेष संकल्पना घेऊन ही मोहीम राबवण्यात येत आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीतल्या निमार्ण भवन येथे कडुनिंबाचे रोप लावून या मोहिमेचा प्रारंभ केला. तसेच त्यांनी स्वच्छतेचा आढावा घेत या इमारतीची पाहणी केली. स्वच्छता उपक्रमात लक्षणीय सुधारणा झाली असली तरी अधिक सुधारणेला वाव असल्याचे नायडू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितले.
PIB
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा