राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येत्या 24 ते 27 मे 2016 दरम्यान होणाऱ्या आगामी चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्हीला मुलाखत दिली.
‘प्रत्येक देशाचे दहशतवादाप्रती शून्य सहनशीलतेचे धोरण असावे, असा भारताचा विश्वास असून, दहशतवादा विरुद्धची लढाई निर्णायक असावी,’ असे राष्ट्रपतींनी मुलाखतीत सांगितले. भारत आणि चीन हे दोन बहुसांस्कृतिक, बहुवांशिक बलाढ्य देश आहेत. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी हे दोघे एकत्र आले, तर त्याचा नक्कीच प्रभाव पडेल, असा माझा दृढविश्वास आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
PIB
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा