१९९९ साल.....कारगीलमध्ये पाकिस्तानी घुसखोर शिरले होते. त्यांचे नेमके तळ कुठे आहेत हे जाणून घेण्याची ठोस यंत्रणा आपल्याकडे नव्हती. भारताने अमेरिकेकडे अशा यंत्रणेसंबंधी मदत मागितली. आणि अमेरिकेने त्यास नकार दिला. त्या क्षणापासून आपल्या देशात अशी व्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न आपल्या शास्त्रज्ञांनी पाहिले आणि त्या दिशेने प्रयत्नदेखील सुरु केले!!
आज या प्रयत्नांचा अखेरचा टप्पा आपण गाठला. अथक मेहनतीनंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आज सातवा आणि अखेरचा नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. आता भारताकडे जीपीएस आणि ग्लोनास सारखे स्वतःचे साधन असेल.
अत्यंत गौरवाच्या या क्षणी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी अतिशय सूचक उद्गार काढले;
"'अब हमारे रास्ते हम तय करेंगे। कैसे जाना है, कैसे पहुंचना है, ये हमारी अपनी तकनीक के माध्यम से होगा।"
आपल्या साऱ्यांसाठीच हा अभिमानाचा क्षण आहे. या उपक्रमात सामील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि आभारदेखील!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा