नवी दिल्ली - डोकलाम विवादापासून धडा घेऊन आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) सीमाभागात लवकरच एक हवाई दल स्थापन करणार आहे. त्यासाठी हेलिकॉप्टर्स खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आयटीबीपीच्या हवाई दलामुळे सीमाभागात पीएलएच्या सैन्याच्या होणाऱ्या कारवाया आणि आक्रमण यावर वेळेवर नियंत्रण आणता येणार आहे. 3,488किमी लांबीच्या भारत-चीन सीमेच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
हिमालयातील 16 हजार ते 18 हजार फूट उंचावरील सीमाभागाची सुरक्षा आयटीबीपी करू शकणार आहे. आयटीबीपीच्या हवाई दलाचे तळ चडीगड आणि9 बोरझार (गुवाहाती) येथे असतील आणि जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, चीन आणि सिक्किमसह उत्तरपूर्व भागात आयटीबीपीचा पहारा असेल असे आयटीबीपीचे महासंचालक आर के पचनंदा यांनी सांगितले आहे.
खरेदी करण्यात येणारी ट्विन इंजीन हेलिकॉप्टर्स बहुउपयोगी असणार आहेत. त्याच्यात अधिक उंचीवरून उडण्याची क्षमता असून एकाच वेळी 8 ते 10 जवानांना घेऊन जाऊ शकतील. शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा वाहून नेण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी उड्डाण करू शकत असल्याने रेशन पुरवण्यासाठीही ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त आहेत.
भारत-चीन संघर्षानंतर 24 ऑक्टोबर 1962 रोजी आयटीबीपीची निर्मिती करण्यात आली होती. 4 बटालियन्सनी सुरुवात झालेल्या आयटीबीपीमध्य आता 45 सेवा बटालियन्स आणि 4 विशेष बटालियन्स आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा