जम्मू-कश्मीरमधील नागरिकांना आश्वस्त करताना लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी आमचा लढा काश्मिरी जनतेविरोधात नसून, दहशतवाद्यांविरोधात आहे, असे म्हटले आहे. हिंदुस्थानी लष्कर कश्मीरी जनतेच्या विरोधात असल्याचा अपप्रचार केला जात आहे, याचे खंडण करताना रावत यांनी सर्व काश्मिरी लोक दहशतवादी कारवायांमध्ये सामील नाहीत, याची आम्हाला कल्पना आहे. अतिशय थोडे लोक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत. काश्मिरी जनतेच्या मागे लपून बसलेल्या त्या दहशतवाद्यांना शोधून काढून त्यांना संपवणे हे आमचे काम आहे,’ असे रावत म्हणाले.
तसेच, ‘काश्मिरी नागरिकांचा आडोसा घेऊन लपलेले दहशतवादी शोधून त्यांना लक्ष्य करणे, हे लष्कराचे काम आहे,’ असे म्हणत रावत यांनी कश्मीरी जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. इडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना रावत यांनी हे विधान केले आहे. तसेच दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी लष्कराने काश्मीरमध्ये कोर्डन अॅण्ड सर्च ऑपरेशन (कासो) सुरू करण्यात आल्याच्या वृत्ताचे रावत यांनी खंडन केले.
‘आम्ही काश्मीरमध्ये कासो ऑपरेशन सुरू केलेले नाही. कासो ऑपरेशन राबवल्यास त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना त्रास होणार, याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही ठराविक भागातच ऑपरेशन राबवत आहोत. मात्र आम्ही कुठेही कासो राबवलेले नाही,’ असे लष्करप्रमुख रावत म्हणाले.
कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केलेल्या लेफ्टनंट उमर फय्याजच्या हत्येची लष्करप्रमुखांनी निंदा केली. तसेच उमर फय्याज कश्मीरी तरुणांची प्रेरणा असल्याचेही रावत म्हणाले.
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली Dailyhunt
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा