भूतकाळातील कोणाचा धवल प्रराक्रम कोणाच्या कसा कमी येईल हे सांगता येत नाही. अडीचशे वर्षांपूर्वी झालेल्या पानिपतच्या ऐतिहासिक युद्धाच्या स्मृती आजही जागृत ठेवणारे पराक्रमी सदाशिव भाऊंच्या शौर्याने अद्यापही मोहरून जाणारे लोक जेव्हा भेटतात तेव्हा पूर्वजांच्या या कार्याचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही.
तो काळ होता १९६५ च्या युद्धाचा. युद्धाच्या धामधुमीत भारतीय वायू दलाचे एक विमान पानिपतच्या आसपास तांत्रिक बिघाडामुळे उतरवावे लागले होते. विमान उतरले ते नेमके दलदलीच्या जागेत . महत्वाचे म्हणजे या विमानात बराच दारुगोळा होता . त्यामुळे दलदलीत अडकून पडलेले हे विमान कोणत्याही परिस्थिती बाहेर काढून परत ते वायुदलाच्या सेवेत दाखल करण्याची गरज होती . वेळ आणीबाणीची होती . अशाच प्रसंगी सैनिकांचीही कसोटी असते . परिस्थिती अशी होती की मदत मिळविण्यासाठी विमान सोडून जाता येत नव्हते .
तांत्रिक विभाचा प्रमुख या नात्याने मी त्या लढाऊ विमानतला Technical Snag दूर केला होता पण प्रश्न होता दलदलीतून विमान बाहेर काढायचे कसे? त्या वेळेचे वातारण असे होते की आपलीच माणसे आपल्याला शत्रू समाजात होती, संशयाने पाहत होती. विमान बाहेर काढणे मला आणि माझ्या ४ -५ सहकार्यांना अशक्य होते . जवळपास गाव नाही . विमान खेचण्यासाठी ट्रॅकर नाही व अन्य कसलेही जड वाहन नाही .
प्रत्येक क्षण युगासारखा वाटत होता. आमचे विमान अशा रीतीने चिखलात रुतले आहे याची नुसती गंध वार्ता जरी सीमेपलीकडे लागली असती, तर लाख मोलाचे लढाऊ विमान दारुगोळा आणि त्यातून महत्वाचे म्हणजे अमूल्य असे अभियंता आणि तांत्रिक कर्मचारी प्राणास मुकले असते. प्रसंग मोठा बांका होता.
तांत्रिक विभागाचा प्रमुख म्हणून सारी जवाबदारी माझ्यावरच होती. आम्ही जवळपास पहिले तर तेथे जाट लोकांची वस्ती होती. आम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी बोलणारे त्यांची भाषा आम्हाला कळेना त्यातल्या एकाने विचारले “कहाके राहनेवाले हो?”
मी म्हटलो “हम मराठा है महाराष्ट्र के राहनेवाले है” तो “म्हणाला सदाशिव भाऊ के गाव वाले” मी म्हटलो “हा वही के राहनेवाले है”.
एवढे शब्द उच्चरायचा अवकाश, त्याला काय वाटले कुणास ठाऊक त्याने वस्तीवरच्या सगळ्या जाट बांधवाना बोलावले. त्यांना जवळच्या गावात पिटाळून, एकाला ट्रॅकर दुसऱ्याला टायर ट्यूब, तिसऱ्याला साखळ्या एअर कॉम्प्रेसर असे साहित्य आणायला पाठवले.
तासाभरात सर्वजण साहित्या सह आले. मोठ्या ट्यूब दलदलीत रुतवून विमानाच्या पोटाखाली घातल्या कॉम्प्रेसर ने ट्यूब मध्ये हवा भरली विमान वर उचलले जातानाच लांब लचक मुळ्या विमाना खाली घातल्या. दक्षता म्हणून मुळ्या खाली टायर टाकले अन मग ट्रॅक्टर च्या मदतीने ते विमान सपाट जमिनीवर आणले. आम्हाला हायसे वाटले हे सगळे होता होता अंधार पडला. त्यावेळी विमान उडविणे शक्यच नव्हते म्हणून आम्ही रात्री तेथेच मुक्काम केला.
त्या रात्री जाट बांधवांनी सुमारे अडीचशे वर्षा पूर्वी झालेल्या पराक्रमी पानिपत युध्याच्या आठवणी, पोवाड्यातून आमच्या समोर उलगडल्या. पानिपतच्या युद्धाची त्या दैदिप्यमान इतिसाहिक घटनेची जेवढी माहिती त्या जाट बांधवांना होती तेवढी आम्हाला नाही याची तेव्हा लाज वाटली.
७०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे संत नामदेव, इतिहासाला कलाटणी देणारे पराक्रमी सदाशिव भाऊ, इतिहास निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज अशांच्या महाराष्ट्रात जन्मण्याचे भाग्य मला लाभले याचा सार्थ अभिमान वाटला. अन मी पुढच्या कमला लागलो .
वीरकुमार दोशी
वायू सैनिक दल ( सेवानिवृत्त )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा