नवी दिल्ली - "वन रॅंक वन पेन्शन‘ योजनेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी आज देशभरात उपोषणाला सुरवात केली. राजधानी दिल्लीमध्ये जालंधरमधील 55 माजी सैनिकांच्या गटाने जंतर मंतरवर उपोषणाला सुरवात केली.
"वन रॅंक वन पेन्शन‘ या मुद्द्यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लक्ष घालावे, अशीही माजी सैनिकांची विनंती आहे. आज देशभरातील विविध शहरांमध्ये उपोषणला सुरवात झाली असून आमची मागणी पूर्ण होईपर्यंत ते सुरूच राहील, असे कर्नल अनिल कौल (निवृत्त) यांनी सांगितले.
माजी सैनिकांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील आणि त्यांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आधीच केले आहे.
[पीटीआय]
"वन रॅंक वन पेन्शन‘ या मुद्द्यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लक्ष घालावे, अशीही माजी सैनिकांची विनंती आहे. आज देशभरातील विविध शहरांमध्ये उपोषणला सुरवात झाली असून आमची मागणी पूर्ण होईपर्यंत ते सुरूच राहील, असे कर्नल अनिल कौल (निवृत्त) यांनी सांगितले.
माजी सैनिकांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील आणि त्यांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आधीच केले आहे.
[पीटीआय]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा