केंद्र सरकारने "वन रॅंक वन पेन्शन‘ची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेस नेते तथा माजी संरक्षण मंत्री ए.के.ऍन्टोनी बोलत होते. ते म्हणाले की, "गेल्या 4 दशकांपासून मागील सरकारने याबाबत काहीही कारवाई केली नसल्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा मुद्दा निराधार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) मागील सरकार मागील वर्षीच ओआरओपी जाहीर केली होती‘ तसेच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ओआरओपीबाबत आज केलेली घोषणा निराशाजनक असल्याची टीकाही ऍन्टोनी यांनी केली आहे. त्यांनी युपीए सरकारच्या ओआरओपी योजनेत अमूलाग्र बदल केल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा