Pages

पेज

रविवार, २० डिसेंबर, २०१५

मोदींच्या विदेश यात्रा

आधी थोडे मागे जावूया. रशियाच्या विघटना नंतर कोल्डवॉर संपले आणि अमेरिकेला युद्ध सामग्री उत्पादनासाठी कारण मिळेना. तेथूनच अमेरिकेत मंदीचे वारे घोंगावू लागले. रशीयाची अवस्था तर आणखीनच बिकट झाली. उदा. रशियन फायटर विमानाचे इंजिन आणि बॉडी(फुजीलाज) दोन ठिकाणी बनत असे. हे दोन्ही कारखाने दोन वेगवेगळया देशात गेले. याच विमानाची ही दोन्ही अंगे करण्याचे कारखाने भारतात असल्याने दोन्ही देशांना भारतावर अवलंबून राहायची पाळी आली.
.
डॉलरने सोन्याशी नाते तोडले आणि फक्त दादागिरीच्या जोरावर त्याला किंमत राहिली आहे. इराकने तेलाच्या बदल्यात डॉलर आणि पौण्ड घेणे बंद केले आणि युरो व रुबलची किंमत वाढू लागली. सद्दामचा बळी घेवून अमेरिकेने आणि इंग्लंडने आपापली चलने वाचवली.
.
इथे रशीया चीन आणि भारत मिळून अमेरिकेला तोड निर्माण होण्याच्या शक्यतांची चर्चा सुरू झाली.
.
अमेरिकेने त्याला तोड म्हणून चीनला आपला कारखाना बनवला. ब्रांड अमेरिकन, कारखाना चीनमध्ये आणि बाजारपेठ भारत.
.
भारताला उत्पादक देश बनविण्यापासून थांबवणे गरजेचे होते. आणि ते काम भारतातील परदेशी पैशावर आणि माग्सेसे अवार्डवर फुगलेल्या एन्जिओने सांभाळले. भारतातील लोकांकडे क्रयशक्ती आहे आणि क्रयशक्ती असलेल्यांची प्रचंड संख्याही आहे. चीन मधील बहुसंख्यांकडे क्रयशक्ती नाही. आणि उत्पादनाचा खर्च कमी आहे.
.
अचानक भारतीय स्त्रियांमधील सौंदर्य प्रचंड प्रमाणावर वाढले. दरवर्षी एक दोन जगतसुंदऱ्या भारतीय बनू लागल्या. भारतीय बाजारपेठ, चीनमध्ये स्वस्तात बनलेल्या आणि पश्चिमी ब्रांड मुळे महाग झालेल्या वस्तूंनी भरून गेली.
.
उदा. अंगूर मध्ये बनणाऱ्या नाईक आदिदास वगेरे कंपन्यांचे बूट चीन मध्ये दीडदोनशे रुपयात बनू लागले आणि ब्रान्द्च्या नावाखाली भारतात बाराशे ते बारा हजार रुपयात विकले जाऊ लागले.
.
इथे चीन आणखीन एक डाव खेळला. त्याने डॉलरच्या बदल्यात गोल्ड बॉंड मागायला सुरवात केली. जेंव्हा चीन हे बॉंड वाटवू लागेल तेंव्हा फोर्टनॉक्स रिकामी होईल. आणि डॉलरच्या ऐवजी चीनी चलनाचा वापर आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू होईल. या सोन्याचा चीनने आपल्या चालानाशी संबंध जोडला तर ते अजेय होईल.
.
चीनची क्षेत्रीय महत्वाकांक्षा कधीच लपून राहिली नाही. त्याने आपल्या सर्व शेजारी देशांना सामरिक धाकात ठेवायला सुरवात केली. अक्षरशः छळ मांडला.
.
तीबेटनंतर त्याला आता भारतचा लचका तोडायचा होता. नेपाळ आणि बंगला देश्मधून भारतातील माओवाद्याना शस्त्र आणि पैशाची रसद पुरवली जात होती
अरुणाचल पासून आंध्र पर्यंत उभापट्टा त्यांनी पोखरला होता. इथून पूर्वेकडील भारत युद्धात जिंकणे हा त्यांचा डाव आहे. ब्रिगेडीअर महाजन गेली कित्येक वर्षे चीन २०२० ते २०२५ मध्ये भारतावर हल्ला करायची कशी तयारी करत आहे हे सांगत होते. सैनिकी अधिकारी पण सरकारला सांगताच असणार. पण लक्षात कोण घेतो अशी परिस्थिती होती. भारताला उत्पादक देश बनण्य पासून रोखण्याचा हाही एक भाग होता. भारताभोवती आपल्या तळांचा वेढा टाकण्याचे चीनचे उद्योग चालूच होते. मालदीव, लंका, बांगलादेश, एकेक बंदर चीनच्या ताब्यात देत होते.
.
गेल्या पंधरावर्षातील चीनच्या कष्टांवर मोदिनी एका वर्षातच पाणी ओतले.
.
चीन भोवतीच्या सर्व देशांना त्यांनी आपलेसे करून घेतले. चीनच्या उत्तरेला असलेल्या मंगोलियाबरोबरील हातमिळवणी हा तर त्यातील सर्वात मोठा आघात चीन वर होता. चीनच्या प्रसिध्द भिंती या याच देशातील लोकांच्या आक्रमणापासून वाचण्या साठी बांधल्या होत्या. चीनच्या पाकी कारवायांना ही वेसण आहे.
.
व्हीएतनामच्या समुद्रात दोन तेलविहिरी भाड्याने घेवून त्यांच्या रक्षणासाठी म्हणून दोन युद्धनौका चीनच्या समुद्रात आज उभ्या आहेत.
.
लंकेतील चीन्पक्षीय राजपक्षे यांचाच मित्र त्यांच्या विरुध्द गेला आणि त्यांना सर्व विरोधी पक्षांचे समर्थन मिळून ते राष्ट्राध्यक्ष झाले. राजपक्षे यांचे खापर मोदी अजय दोवाल आणि लंकेतील भारतीय राज्दुतावर फोडतात. ते कितीही खरे असले तरी ते कोणीच मान्य करणार नाही. करायचेच नसते. आल्याआल्या लंकेतील बंदरातून चीनची हकालपट्टी झाली. कराराचा भंग केल्याच्या नावावर. चितगांव बंदरही त्यांच्या हातातून गेल्यातच जमा आहे.
.
नेपाळला आपलेसे करत मोदींनी तेथून होणारी माओवाद्यांची रसद तोडली आणि आता बंगलादेशहून होणारीही बंद होईल. इथे पर्रीकरानी खेळलेले डावपेच कशासाठी आहेत हेही महत्वाचे आहे. ते नंतर बघू.
.
मोदींना भारत ही बाजारपेठ न ठेवता उत्पादनाची खाण बनवायची आहे. म्हणूनच स्कील डेव्हलप्मेंट आणि मेक इन इंडिया चे वारे वाहत आहेत.
.
या सगळ्या साठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर, मुख्य म्हणजे रस्ते ही बाजू गडकरी सांभाळताहेत. आणि त्याला खोडा घालण्यासाठी जमीन अधिग्रहणाला विरोध होत आहे. त्याला आणखीन एक पैलू आहे.
.
कॉंग्रेसची एक जुनी पद्धत आहे. जिथे कुठे डेव्हलपमेंट होणार असेल त्याची माहिती गुप्त ठेवली जाते, किंवा गुप्तपणे विकली जाते असे म्हणा. काल्यापैशाच्या आधारे तेथील जमिनी ही माहिती असलेली लोकं स्वस्तात विकत घेवून ठेवतात. मग अनेक वर्षांनी तेथे डेव्हलपमेंट होते. भाव चांगला मिळतो. कित्येक नेत्यांची अक्षरशः हजारो एकर जमीन अशी घेवून ठेवलेली आहे. आता जर गडकरींनी झपाट्याने रस्ते बांधले आणि लगेच त्या भागाचा विकास होऊ लागला तर आणखीन दहा वर्षांनी मिळणारी वाढीव किंमत आज मिळणार नाही. म्हणून त्यांना त्या जागांचा भाव दसपट हवा आहे. शेतकरी वगेरे काही नाही. जमीन अधिग्रहणात या मंडळींच्याच जमिनी सरकारला विकत घ्याव्या लागणार आहेत. आणि त्यांना दसपट भाव हवा आहे. बाकी काही नाही.
.
लवकरच रुपयाला सोन्याचे पाठबळ लाभणार आहे. अगदी सहज. चीनसारखा आटापिटा न करता. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी करण्यात एक वर्ष खर्ची पडले. राज्यसभेतील अडवणूक नसती तर आणखीनही लवकर झाले असते.
.
वर्षभरात मोदी जेव्हढे दिवस परदेश दोर्यांवर होते त्याहूनही थोडे जास्तच दिवस दरवर्षी मनमोहनजी परदेशी असत. पण त्या अर्थ तज्ञाला दहा वर्षात यातील काहीही करता आले नाही हीच खरी शोकांतिका आहे.
.
कम्युनिस्ट तत्वाज्ञानानी जगाचा कोणताही फायदा झाला नाही, खरेतर सगळ्यांना त्रासच झाला. पण आता आपल्या भारतीय अर्थचिंतकामुळे "अनिल बोकील यांच्या मुळे" भारतच काय अन सगळ्या जगात अर्थक्रांती होवून सुबत्ता येईल. सूरवात झालीच आहे. कसे ते पुढच्या वेळी.
 
Shared by  Dhananjay Kesheo Kelkar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा