For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

रविवार, ८ एप्रिल, २०१८

जवानाकडून गरीब विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप

राजेंद्र पाटील बुधवार, 4 एप्रिल 2018

Jalgaon

देशाच्या सीमेवर उभे राहून सरक्षण करणारे अविनाश पाटील हे सुटिवर गावी आले आहेत. गावी आल्यानंतर देखील त्यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायने शाळेत येताना पाहिले. त्यांना चप्पल देण्याचा निश्यय केला.

जळगाव : नांद्रा (ता.पाचोरा) जवळील आसनखेडा येथील जि.प.मराठी शाळेत येथील सिमा सुरक्षा बलातील जवान बाबुलाल दौलत पाटील यांचे चिरंजीव अविनाश बाबुलाल पाटील (बीएसएफ) यांनी आज शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना ज्यांना चपला नाहीत. जे अनवाणी पायाने उन्हाचे चटके सहन करुण शाळेत येतात. अशा गरजु विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप केले. साधारण पन्नास विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला.

देशाच्या सीमेवर उभे राहून सरक्षण करणारे अविनाश पाटील हे सुटिवर गावी आले आहेत. गावी आल्यानंतर देखील त्यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायने शाळेत येताना पाहिले. त्यांना चप्पल देण्याचा निश्यय केला. त्यानुसार आज शाळेतील मुलाना चप्पल वाटप केल्या. चपला भेटल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहेरावरील आनंद पहाण्यासारखा होता.

यावेळी उपसरपंच कैलास पाटील, हिमंत पाटील, विजय पाटील, संभाजी पाटील, डाँ.राजेंद्र बोरसे, सयाजी पाटील, लक्ष्मण पाटील, नांद्रा ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी, पोलीस पाटील किरण पाटील, अंगणवाडी सेविका ,जि.प.शाळेतील मुख्यध्यापक संगिता पाटीलउपशिक्षक नाना पवळ, जयवंत खैरनार, निलीमा चव्हाण, वैशाली पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

http://www.esakal.com/uttar-maharashtra/jawan-distribute-chappals-jalgaon-107453

जवानांसाठी ‘भाभा कवच’ मंगेश सौंदाळकर

barc

मुंबई - डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने हलक्‍या वजनाच्या, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बुलेटप्रूफ जॅकेट्‌सची निर्मिती केली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या जॅकेट्‌सना ‘भाभा कवच’ असे नाव देण्यात आले आहे. ही जॅकेट्‌स आयात करून आणलेल्या महागड्या जॅकेट्‌सपेक्षा मजबूत असतील.

मुंबई - डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने हलक्‍या वजनाच्या, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बुलेटप्रूफ जॅकेट्‌सची निर्मिती केली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या जॅकेट्‌सना ‘भाभा कवच’ असे नाव देण्यात आले आहे. ही जॅकेट्‌स आयात करून आणलेल्या महागड्या जॅकेट्‌सपेक्षा मजबूत असतील.

सध्या जवान वापरत असलेली जॅकेट्‌स दहा किलोपेक्षा अधिक वजनाची आहेत. जड वजनाचे हे जॅकेट घालून सीमेवर दहशतवाद्यांशी दोन हात करताना जवानांना काही अडचणी येतात. हल्ली दहशतवाद्यांनी चिनी बनावटीची, अत्यंत कठीण स्टीलचे आवरण असलेली काडतुसे वापरण्यास सुरवात केली आहे. ती काडतुसे या जॅकेटना छेदून जात असल्याची बाब केंद्रीय गृह विभागाच्या निदर्शनास आली होती. दहशतवादी संघटनांनी काही दिवसांपासून  पोलिस, जवानांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षी जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे ‘जैश’च्या दहशतवाद्यांशी लढताना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पाच जवान हुतात्मा झाले होते. त्याची गंभीर दखल घेत गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जॅकेट्‌सचे वजन कमी करण्याबाबत अणुऊर्जा विभागाच्या सचिवांशी चर्चा केली.

जॅकेटची वैशिष्ट्ये
डॉ. किंशूक दासगुप्ता यांच्या चमूने लेव्हल तीनचे एक, लेव्हल तीन प्लसची दोन जॅकेट्‌स तयार केली.
लेव्हल तीनच्या जॅकेटचे वजन साडेचार किलो तर लेव्हल तीन प्लसच्या जॅकेटचे वजन साडेसहा किलो आहे.
लेव्हल तीन प्लसचे जॅकेट एके-४७ रायफलच्या गोळ्यांचा तसेच चिनी बनावटीच्या काडतुसांचा मारा रोखू शकते.
लेव्हल तीन प्लसच्या पुढील भागात बसविण्यात आलेल्या प्लेटमुळे जवानांना गोळीचा सौम्य झटका बसेल.
जॅकेटचे वजन कमी असल्याने जवानांना गोळीबार करताना अडचणी येणार नाहीत.

http://www.esakal.com/maharashtra/production-bulletproof-jackets-make-india-108117

सोमवार, २ एप्रिल, २०१८

रेशनकार्डाचीही पोर्टेबिलिटी

डॅनियल काळे :08.23 AM

कोल्हापूर - ज्याप्रमाणे मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलता येते म्हणजे पोर्टेबिलिटी करता येते, तशाच प्रकारे यापुढे कोणत्याही शिधावाटप दुकानात तुमचे रेशनकार्ड चालणार आहे. त्यामुळे या राज्यातून दुसऱ्या राज्यात अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर झाले तरीही आधीचे कार्ड रद्द करून नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.

कोल्हापूर - ज्याप्रमाणे मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलता येते म्हणजे पोर्टेबिलिटी करता येते, तशाच प्रकारे यापुढे कोणत्याही शिधावाटप दुकानात तुमचे रेशनकार्ड चालणार आहे. त्यामुळे या राज्यातून दुसऱ्या राज्यात अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर झाले तरीही आधीचे कार्ड रद्द करून नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.

या व्यवस्थेसाठी सरकार एकीकृत व्यवस्थेवर (आयएमपीडीएस) सध्या काम करत आहे. ही पद्धत महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणासह काही राज्यांत अंशतः लागू आहे. अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या माहितीनुसार येत्या दोन वर्षांत ही आयएमपीडीएस नावाची योजना सर्वत्र लागू होणार आहे. त्यासाठी १२७ कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार करणार आहे.

देशव्यापी पोर्टेबिलिटीशिवाय अतिरिक्त डुप्लिकेट रेशनकार्ड रद्द करण्याचेही काम त्याखाली केले जाईल.  सार्वजनिक वितरणप्रणाली राज्याच्या पोर्टल्सला जोडण्याबरोबरच रेशन कार्डचे व्यवस्थापन, वितरण, पुरवठा व रेशन दुकानांच्या स्वयंचलनाचे कामही याअन्वये केले जाईल.

पार्टेबिलिटी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी देशभरातील रेशन दुकानदारांची आणि कार्डांची संख्या पाहिली तर हे खूपच मोठे आव्हान आहे. यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊन गुंता निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सरकारने रेशन दुकानदार, ग्राहकांना  विश्‍वासात घेऊनच ही यंत्रणा अमलात आणावी.
- चंद्रकांत यादव,
रेशन बचाव आंदोलक

रेशन दुकानात आधार सक्तीचे
रेशन दुकानात स्वस्त धान्य मिळविण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत.ज्या कार्डधारकांकडे आधार कार्डच नाही, अशा नागरिकांना ३० जूनपर्यंतच मुदत दिली आहे. या काळात त्यांनी आधार कार्ड काढून घ्यायचे आहे. अन्यथा यापुढे आधार कार्डशिवाय रेशनधान्य मिळणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

 

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर तुमीरकसा गाव झाले प्रकाशमय

अहेरी - तुमरीकसा येथे वीजयंत्रणा सुरू करताना महावितरणचे कर्मचारी.

अहेरी - तालुक्‍यापासून २२ किमीवर असलेल्या अतिदुर्गम व संवेदनशील भागात वसलेल्या तुमीरकसा गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अथक प्रयत्नातून वीज पोहोचली आहे. यामुळे गाव प्रकाशमय झाले आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीपीटीसी)अंतर्गत २०१७-१८ या वर्षाकरिता निधी मंजूर करून अहेरी उपविभागातील गावात वीज पोहोचविण्यासाठी पालकमंत्री आत्राम यांनी पुढाकार घेतला. मागील १५ दिवसांपूर्वीच कासमपल्ली व गुर्जा या गावांत वीजजोडणी करण्यात आली. शनिवारी (ता. ३१) अतिदुर्गम व संवेदनशील भागात पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या तुमीरकसा या  गावात पालकमंत्र्यांचा सूचनेनुसार महावितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक (नागपूर परिक्षेत्र) भालचंद्र खंडाईत व चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी वीजजोडणी केली. तसेच जनतेशी संवाद साधला. या वेळी गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता अशोक मस्के, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे, उपकार्यकारी अभियंता वाशीमकर व कंत्राटदार प्रशांत टिपले उपस्थित होते. तुमीरकसा हे अविकसित गाव असून जाण्यासाठी रस्ता नाही.  पाण्याची सोय नाही. शाळा आहे पण शिक्षक नाही. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत. अशा कठीण परिस्थितीत या गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी विजेचे दर्शन झाले. अवघ्या बावीस घरांची वस्ती असलेल्या या गावातील सर्वच घरांना सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत वीजजोडणी देण्यात आली.

सर्वांना एक एलईडी बल्ब देण्यात आले. ६३ केव्हीए रोहित्र उभारून २.५ उच्चदाब व ०.९० लघुदाब विजेची व्यवस्था करण्यात आली. शंभर टक्‍के आदिवासी लोकवस्ती असलेल्या या गावातील नागरिकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून आदिवासी रेला नृत्य सादर केले. ढोल-ताशाच्या गजरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. या वेळी गावचे सरपंच, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच आलापल्ली व भामरागडचे वीज विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अनेक गावांना प्रतीक्षा
एकीकडे जग संगणक आणि इंटरनेटच्या विश्‍वाशी जोडले जात असताना जिल्ह्यातील अनेक गावांनी अद्याप विजेचा दिवा पाहिलेला नाही. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही त्यांना अंधारात जगावे लागत आहे. तुमरीकसा येथे वीज आली असली; तरी असे अनेक गावे अद्याप विजेपासून वंचित आहेत. या गावांमध्येही तत्काळ वीज पोहोचविण्याची मागणी महावितरण कंपनीकडे करण्यात आली आहे.

Web Title: aheri vidarbha news tumirkasa village electricity

गुरुवार, २२ मार्च, २०१८

निधीची चणचण सज्जतेला मारक

रवी पळसोकर

बुधवार, 21 मार्च 2018

ravi palsokar

सैन्यदलांसाठी आवश्‍यक निधीची तरतूद न केल्याने संरक्षणसज्जतेवर आणि शस्त्रसामग्रीच्या आधुनिकीकरणावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच संरक्षण क्षेत्राच्या गरजांकडे दुर्लक्ष होणे योग्य नाही.

सैन्यदलांसाठी आवश्‍यक निधीची तरतूद न केल्याने संरक्षणसज्जतेवर आणि शस्त्रसामग्रीच्या आधुनिकीकरणावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच संरक्षण क्षेत्राच्या गरजांकडे दुर्लक्ष होणे योग्य नाही.

कें द्रीय अर्थसंकल्पात दरवर्षी संरक्षण क्षेत्राला पाहिजे तेवढ्या निधीची तरतूद कधीच केली जात नाही, हे आजचे वास्तव आहे. भारतासारख्या विकसित होणाऱ्या देशाच्या सर्व क्षेत्रांना आवश्‍यक असला, तरी मुबलक निधी उपलब्ध करणे शक्‍य नसते. परंतु, देशाच्या सीमा व सामरिक उद्देश यांच्या सुरक्षिततेसाठी किमान किती निधी अत्यावश्‍यक आहे यावर नेहमीच वाद होतो आणि नव्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पी तरतूदही याला अपवाद नाही. सैन्यदलांसाठी आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आवश्‍यक निधीची तरतूद केलेली नसल्यामुळे लष्कराच्या शस्त्रसामग्रीच्या आधुनिकीकरणावर विपरित परिणाम होईल, असे परखड मत काही दिवसांपूर्वी संसदेत अहवाल सादर करताना संरक्षणसंबंधी स्थायी समितीने नोंदविले होते. त्याआधी लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सरत चंद यांनी स्थायी समितीसमोर निवेदन करताना, अर्थसंकल्पातील तरतूद इतकी अपुरी आहे की देशाच्या विविध लष्करी तळांचे साधे संरक्षण करण्यासाठीही निधीची कमतरता आहे याकडे लक्ष वेधले होते. ही समस्या गंभीर आहे व असे असूनही मर्यादित तरतूद करण्यामागे काय उद्देश असावा आणि सैन्यदलांच्या मागण्या खरोखर अत्यावश्‍यक आहेत काय यावर जी चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही.

प्रथम तरतुदीच्या आकडेवारीचे विश्‍लेषण आवश्‍यक आहे. संरक्षण क्षेत्रासाठी एकंदर २,७९,३०५ कोटींची तरतूद आहे. यात पेन्शन निधीचा समावेश नाही, हे महत्त्वाचे आहे. एकूण शासकीय खर्चामध्ये हे प्रमाण ११.४४ टक्के आहे व ते एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १.४९ टक्के इतके आहे. तुलनेने पाकिस्तान ‘जीडीपी’च्या ३.४ टक्के रक्कम संरक्षणावर खर्च करतो, तर चीन दोन टक्के. (परंतु, चीनची आकडेवारी त्यांचा एकंदर खर्च पाहता विश्वास न ठेवण्यासारखी आहे.) काही आकडे ठळक उणिवा अधोरेखित करतात. लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या नियोजित १२५ प्रकल्पांसाठी २९,०३३ कोटींची मागणी असताना २१,३८८ कोटी दिलेले आहेत. रोजचे काम चालू ठेवण्यासाठी ४०,०७३ कोटींची मागणी असताना ३०,७८१ कोटींची तरतूद केलेली आहे. उपलष्करप्रमुखांनी या संदर्भात स्पष्टीकरण करताना सांगितले, की देशाच्या शस्त्रसामग्रीच्या अवस्थेची गणती तीन विभागांत होते. ज्यात एक तृतीयांश अत्याधुनिक, एक तृतीयांश साधारण आणि उरलेली कामापुरती, परंतु बदली करण्यासाठी योग्य अशी असते. सध्या आपल्याकडे ही टक्केवारी अनुक्रमे ८-२४-६८ अशी आहे. लष्कराला वाटणारी काळजी वरील आकड्यांवरून समजते. हे सरकारला आणि देशाला स्वीकारण्याजोगे आहे काय?

काही विश्‍लेषक विरुद्ध मताचे आहेत. त्यांचा युक्तिवाद आहे की, सैन्यदलांचा व विशेषतः लष्कराचा ८० टक्‍क्‍यांहून अधिक खर्च पगार आणि रोजच्या कामासाठी होतो व उरलेला निधी नवीन शस्त्रसामग्री खरेदी करण्यासाठी होतो. तोसुद्धा अनेकदा वापरला जात नाही व मुदतीअंती परत केला जातो. हे खरे आहे. आपली सशस्त्र सेना मुबलक मनुष्यबळावर अवलंबून चालते म्हणून नवीन तुकड्या वगैरे स्थापन करताना सैनिकांची कमतरता कधीच भासत नाही. परंतु, शस्त्रखरेदी आणि आधुनिकीकरण याबाबत निर्णय घेण्याला फक्त सैन्यदले जबाबदार नसतात. राजकीय आणि सनदी अधिकारीही खरेदी प्रक्रियेत सहभागी असतात व त्यामुळे प्रत्येक प्रकरण लाल फितीत अडकते. सध्या ‘मेक इन इंडिया’वर बराच जोर आहे. परंतु, खासगी उद्योग क्षेत्राची इच्छा आणि क्षमता असूनही त्यात अपेक्षित प्रगती झालेली नाही व यामुळे शस्त्रास्त्रे आयात करणाऱ्या देशांमध्ये आपला क्रमांक वरचा लागतो. तिथेही काही प्रकल्प वर्षानुवर्षे रखडत आहेत.

या संदर्भात आपले सामरिक धोरण काय आहे हे स्पष्ट नाही. लष्करप्रमुखांनी म्हटले आहे की आपले सैन्य अडीच आघाड्यांवर (पाकिस्तान, चीन व माओवाद्यांसारखे देशांतर्गत अतिरेकी) लढण्यासाठी सज्ज असले पाहिजे. त्यांच्या वक्तव्याला हवाई दल आणि नौदलप्रमुखांनी दुजोरा दिला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी चंडीगड येथे एका परिसंवादात दोन कमांडप्रमुखांनी वेगळी मते मांडली. एक म्हणाले की, पाकिस्तानशी आपल्याला कधी ना कधी बोलावे लागेल. फक्त लष्करी बळ आणि चकमकींनी काश्‍मीरचा प्रश्न सुटणार नाही. दुसऱ्या कमांडप्रमुखांनी म्हटले की, दोन आघाड्यांवर लढणे शहाणपणाचे नाही. आपण चीनबरोबर संबंध सुधारले तर पाकिस्तानवर दबाव येईल व अनेक प्रश्न सोडवता येतील. लष्करप्रमुख आणि त्यांचे दोन सर्वात वरिष्ठ सेनानी यांच्यात वेगवेगळी मते असावीत व ती सार्वजनिक चर्चेत व्यक्त व्हावीत यावरून देशाच्या सामरिक धोरणांबद्दल अनिश्‍चितता आहे, हे स्पष्ट होते. मग आधुनिकीकरणाच्या उद्देशांबद्दलही मतभेद आहेत काय, अशी शंका उत्पन्न होते.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय सैन्यदलांत मनुष्यबळाची कमतरता नाही, परंतु खर्च कमी करण्यासाठी संख्येत घट करण्याचे अनेक उपाय आहेत. या कारणास्तव संरक्षण मंत्रालयाने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली. या समितीने अनेक बदल सुचवले. त्यातले काही आता अमलात आणले जाणार आहेत. मुख्य शिफारशी आघाडीच्या तुकड्यांना मदत करणाऱ्या दलांची (सर्व्हिस युनिट) संख्या कमी करून एकीकरण आणि सुटसुटीतपणा आणणार आहेत. उदा. सैनिकी शेती आणि टपाल सांभाळणाऱ्या तुकड्या, गाड्यांची देखरेख आणि दुरुस्ती करणारे दल व इतर समान कार्यालये. काही अभ्यासक आणखी वेगळ्या मतांचे आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आता देशाचे संरक्षण फक्त भू-सीमा सुरक्षित ठेवण्यापलीकडे आकाशात आणि सागरापर्यंत अधिक विस्तारित असले पाहिजे. नौदल आणि हवाई दल यांची ही प्रमुख जबाबदारी आहे व यासाठी दोन्ही दलांच्या आधुनिकीकरणाला अधिक महत्त्व देणे आवश्‍यक आहे. संभाव्य युद्धस्थिती तिन्ही दलांच्या एकत्रित (जॉइंट) कारवाईवर अवलंबून असेल. परंतु, असे काम करण्याच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी दिसून येतात. त्यासाठी मुख्यालयांच्या संघटना, जबाबदाऱ्या, उत्तरदायित्व यांच्यावर अधिक विचार होऊन निर्णय होणे आवश्‍यक आहे. ठळक उदाहरण म्हणजे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असावा की नाही याबद्दलही एकमत नाही. नजीकच्या काळात युद्ध होण्याची शक्‍यता कमी आहे, तेव्हा संरक्षण क्षेत्रातील त्रुटींकडे नंतर लक्ष देता येईल, अशी सध्या देशाची मनःस्थिती आहे. पण संरक्षणसज्ज राहण्याला पर्याय नाही, हे आपण १९६२ मध्ये शिकलेलो आहोत. पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती नको.

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास भारतीय वायूदल चीनपेक्षा अधिक सक्षम

गेल्यावर्षीही त्यांनी भारतीय वायूसेना अगदी कमी वेळात युद्धाच्यादृष्टीने सज्ज होऊ शकते, असा दावा केला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: March 22, 2018 08:40 PM | Updated: March 22, 2018 08:40 PM

In order to overcome any situation, Indian air force is more capable than China | कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास भारतीय वायूदल चीनपेक्षा अधिक सक्षम

चंदिगढ: एखाद्या खडतर परिस्थितीला तोंड द्यायचे झाल्यास भारतीय वायूदल हे चीनपेक्षा अधिक सक्षम आणि सुसज्ज आहे, असे विधान भारतीय वायूदलाचे प्रमुख बी.ए. धानोआ यांनी केले. ते शुक्रवारी हलवारा येथील वायूदलाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय वायूदल कोणत्याही आव्हानाचा सामना करायला तयार असल्याचे सांगितले. गेल्यावर्षीही त्यांनी भारतीय वायूसेना अगदी कमी वेळात युद्धाच्यादृष्टीने सज्ज होऊ शकते, असा दावा केला होता. 

दरम्यान, चीनकडूनही नुकताच पाकिस्तानशी एक सामरिक करार करण्यात आला. त्यानुसार चीनकडून पाकिस्तानला मिसाईट ट्रॅकिंग सिस्टिमची विक्री करण्यात आली. भारताने गुरुवारी केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर ही बाब उघडकीस आली. या करारामुळे पाकिस्तानला आपला बहुआयामी अण्वस्त्रवाहून क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा कार्यक्रम पुढे रेटता येणार आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेल्या या कराराच्या रकमेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानी सैन्याने या सिस्टिमचा वापर आपल्या एका फायरिंग रेंजजवळ करण्यास  सुरुवात केली आहे.

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

क्रीडा गुणांच्या सवलतीसाठी ऑनलाइन अर्ज बंधनकारक

 

पुणे- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होणाऱ्या खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण दिले जातात. त्यासाठी दहावी व बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने मुख्याध्यापक तथा प्राचार्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी केले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्‍क अधिनियम - 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीवे वाढीव गुण देण्यात येते. त्यासाठी ऑनलाइन पत्रतीने प्रस्ताव सादर करणे आवश्‍यक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज जमा करून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे दि. 15 एप्रिलपर्यंत जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी सांगितले. अर्जासाठी पुढील संकेतस्थळ : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

चीन सीमेवरील आयटीबीपीचे सामर्थ्य वाढणार

ऑल टेरेन व्हेइकलचा होणार समावेश : डोकलाम वादाची पार्श्वभूमी

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर चीनच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी भारत सरकार चीनशी संलग्न असणाऱया विविध भागांमध्ये स्वतःचे सामर्थ्य वाढविण्याची तयारी करत आहे. या तयारीनुसार सर्वात अगोदर आयटीबीपीसाठी 'ऑल टेरेन व्हेइकल'ची खरेदी केली जात आहे. ऑल टेरेन व्हेइकलद्वारे आयटीबीपीचे जवान प्रतिस्पर्धींना प्रत्युत्तर देण्यासाठी सीमा चौक्यांवरून त्यांच्यापर्यंत जलदपणे पोहोचू शकतील.

डोकलाम वादानंतर चीनला लागून असलेल्या सीमेची देखरेख करणाऱया आयटीबीपीने स्वतःची सक्रीयता वेगवेगळय़ा ठिकाणी वाढविली आहे. मागील वर्षी चीनने भारतीय हद्दीत अनेकवेळा घुसखोरीचा प्रयत्न केला होता, ज्याला आयटीबीपीने चोख प्रत्युत्तर दिले होते. आयटीबीपीने चीनची अनेक निर्मितीकार्ये रोखण्यासोबत प्योगिंग भागात चीनकडून होणाऱया कारवाईला जशास तसे उत्तर देखील दिले होते.

3488 किलोमीटर लांबीच्या सीमेवर गस्तीसाठी अनेक ठिकाणी आयटीबीपी सध्या एसयुव्ही वाहनांसोबतच स्नो स्कूटरचा वापर करत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अरुणाचल प्रदेश, सिक्किम, जम्मू-काश्मीरसोबतच अनेक ठिकाणी आयटीबीपी तैनात आहे. तेथील क्षेत्रात आता स्नो स्कूटरद्वारे हिमवाळवंटात गस्त घातली जाते.

भारत-चीन सीमेवरील हिमालय पर्वतरांगेत अत्यंत कमी तापमान असते. अशा ठिकाणी वाहनांनी जाणे अवघड असते. अशा स्थितीत ऑल टेरेन व्हेइकलचा वापर सर्वच ठिकाणी करता येणार आहे. हिम वितळू लागल्यानंतर अशा ठिकाणी वाहनांची ये-जा कठीण ठरते. परंतु ऑल टेरेन व्हेइकल वेगाने एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जाऊ शकेल. या व्हेइकलचे वजन 4800 किलोग्रॅम असून यात 7-8 आयटीबीपीचे कमांडो बसू शकतात.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/chin+simevaril+aayatibipiche+samarthy+vadhanar-newsid-82647977

पाच वर्षाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे 'बाल आधारकार्ड'

नवी दिल्ली : पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधारकार्ड युआयडीआयने जारी केले आहे. हे विशेष आधारकार्ड काढण्यासाठी आई किंवा वडिलांपैकी एकाचा आधार क्रमांक आणि जन्मदाखल्याची आवश्यकता भासणार आहे. लहान मुलांसाठीचे हे विशेष आधारकार्ड काढण्यासाठी बायोमेट्रिक तपशीलांची आवश्यकता भासणार आहे.

A child below 5 years of age gets a blue in coloured Aadhaar known as Baal Aadhaar. When the child becomes 5 yr old, a mandatory biometric update is required. #AadhaarForMyChild pic.twitter.com/5IBZRuo7Tr

- Aadhaar (@UIDAI) February 23, 2018

सर्व प्रकारच्या सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी आता हा दस्तावेज महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती युआयडीआयने ट्विटरद्वारे दिली आहे. दरम्यान संबंधित मुलाने वयाची पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याचे बायोमेट्रीक तपशील अपडेट करावे लागणार आहे. मूल सात वर्षांचे होईपर्यंत जर बायोमेट्रिक अपडेट न केल्यास निळ्या रंगाचे आधारकार्ड आपोआप रद्द होईल.

Dailyhunt

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

'कॅशलेस'ला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समित्यांमध्ये 'ई-नाम'

पुणे - बाजार समित्यांमध्ये कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील संपूर्ण बाजार समित्यांमध्ये "ई-नाम' योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत बाजार आवारात शेतीमालाचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात राज्यातील 30 आणि दुसऱ्या टप्यात तीस बाजार समितीमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. पुण्यातही दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

बाजार समित्यांमध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. या योजनेच्या कामकाजाचा आढावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतला. यावेळी कृषी पणन मंडळ, पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह साठ बाजार समितीचे सभापती व सचिव उपस्थित होते.

ई-नाम योजना बाजार समिती व शेतकऱ्यांच्या हिताची आहे. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करणारे देशातील महाराष्ट्र राज्य हे पहिले ठरले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये यांची अंमलबजावणी तातडीने कशी करता येईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. ज्या बाजार समित्यांमध्ये चांगले काम चालते. त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा तर ज्या बाजार समित्यांचे कामकाज समाधानकारक नाही, त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना यावेळी देशमुख यांनी दिल्या.

अंदमान समुद्रात २२ देशांच्या नौसेनांचा एकत्र सराव

 

येत्या ६ मार्च ते १३ मार्च या काळात अंदमान निकोबार समुद्रात सर्वात मोठा नौसेना युद्धाभ्यास होणार असून यात भारताबरोबर अन्य १७ देशांच्या नौसेना सामील होणार आहेत. पोर्टब्लेअर येथे होत असलेला हा युद्धाभ्यास इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सांगितले जात आहे. हिंद महासागराला लागून सीमा असलेले २२ देश या सरावात त्यांच्या युद्धपोतांसह सामील होत असून यात पाकिस्तानचा समावेश नाही.

या सरावात नौसैनिक युद्ध, नैसर्गिक आपदा या विरोधात एकत्र येण्यासाठी आपसातील ताळमेळ वाढविण्याचे काम करणार आहेत. समुद्री क्षेत्रात बेकायदा होणाऱ्या हालचाली थांबविणे हाही या सरावामागचा उद्देश आहे असे समजते.

काय ! मोबाईलवरून डायरेक्ट प्रिंट पाठवायची ?

तुमच्या कुठे तरी वाचनात येते किंवा तुमचा एखादा टेक्नोसॅव्ही मित्र तुम्हाला सांगतो कि हल्लीचे स्मार्टफोन हे कॉम्पुटर प्रमाणे काम करु लागले आहेत. पुर्वी ज्या छोट्या छोट्या कामासाठी कॉम्पुटर शिवाय पर्याय नव्हता ते काम आता स्मार्टफोन करु लागले आहेत, जसे कि ईमेल करणे , छोटे-मोठे प्रेझेंटेशन करणे, डॉक्युमेंट स्कॅन करणे , आलेल्या ईमेल ला लगेच उत्तर देऊन वेळ वाचवणे किंवा ईमेल फॉरवर्ड करणे आदी. मग जोश जोश मध्ये तुम्हीही एक महागडा स्मार्टफोन खरेदी करता, त्यावर काम सुरुही करता,मात्र अचानक एके दिवशी काही कामानिमित्त एका आॅफीसमध्ये जावे लागते आणि त्याठिकानी तुम्हाला आलेल्या ईमेल चे प्रिंट हवे असते, इमेल तर तुमच्या स्मार्टफोन वर असतो मात्र त्याचे प्रिंट काढायचे कसे ? एक पर्याय म्हणजे तुमचा इमेल एखाद्या प्रिंटर जोडलेल्या काम्पुटर वर उघडने आणि प्रिंट करणे,दुसरा पर्याय म्हणजे सरळ तुमच्या आॅफीस मध्ये परत येऊन तुमच्या काम्पुटरवर इमेलचे आऊटपुट काढुन परत तुमच्या कामासाठी जाणे.तिसरा पर्याय म्हणजे तुमच्या एखाद्या सहकाऱ्याला तो इमेल फॉरवर्ड करणे आणि त्याला इमेलचे प्रिंट काढुन आणायला सांगने. मात्र वरीलपैकी एकही पर्याय आता तुम्हाला शक्य वाटत नाही अशा वेळी तुमच्या डोक्यात विचार येतो कि हा स्मार्टफोन येवढी सगळी कामे करतो मग याला प्रिंटच का काढता येऊ नये ?
निदान आज तुमचे काम तरी अडले नसते.आता मात्र तुमच्या या आर्त हाकेला गुगलच्या अण्ड्राईड ने ओ दिली आहे, होय , आता तुमच्या स्मार्टफोनवरुन तुम्ही थेट प्रिंटरला प्रिंट देऊ शकता.मात्र यासाठी तुमच्या स्मार्टफोन मध्ये अण्ड्राईडची लेटेस्ट आॅपरेटिंग सिस्टम असणे जरुरआहे.गुगलच्या क्लॉऊड प्रिंटींग या तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आला आहे.
काय आहे गुगल क्लाऊड प्रिंट तंत्रज्ञान?
गुगल क्लाऊड प्रिंट या तंत्रज्ञानामध्ये तुमचा प्रिंटर इंटरनेटला कनेक्ट करता येतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही जगभरातून कुठूनही तुमच्या प्रिंटरवर प्रिंट पाठवू शकता, तसेच इतरांनाही तुमच्या प्रिंटरचा अ‍ॅक्सेस देऊ शकता. एवढेच काय तर तुम्ही तुमच्या प्रिंटरवर लॅपटॉप, टॅबलेट किं वा मोबाईलवरून जगभरातून प्रिंट पाठवू शकता. यासाठी तुम्हाला हवे फक्त जी-मेलचे अकाउंट.
गुगल क्लाऊड प्रिंट ही सेवा वापरण्यासाठी बाजारात क्लाऊड रेडी प्रिंटर्ससुद्धा उपलब्ध आहेत.
जर तुमचा प्रिंटर क्लाऊड रेडी नसेल तरी सुद्धा तुम्ही हा प्रिंटर गुगल क्लाऊड प्रिंट साठी वापरु शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रिंटर कनेक्टेड असलेल्या काम्पुटरवर काही सेटिंग कराव्या लागतील. जसे गुगल क्रोम सेटिंगमध्ये जाऊ न शो अ‍ॅडव्हान्स सेटिंगवर क्लिक करा.त्यामध्ये गुगल क्लाऊड प्रिंट सेक्शनमध्ये साईन इन टू गुगल क्लाऊड प्रिंटवर क्लिक करा.त्यानंतर प्रिंटर कन्फर्मेशन मेसेज येतो. त्यावेळी खाली अ‍ॅड प्रिंटर्सला क्लिक करा.अ‍ॅड प्रिंटरला क्लिक केल्यानंतर तुमच्या कॉम्पुटर कनेक्टेड असलेले प्रिंटर तुमच्या जी-मेल अकाउंटला रजिस्टर होतात आणि यू आर रेडी टू स्टार्ट असा मेसेज येतो.त्यानंतर मॅनेज युवर प्रिंटरवर क्लिक केल्यानंतर तुमच्या कॉम्पुटर वर इन्स्टॉल असलेल्या प्रिंटरची यादीच तुमच्यासमोर येते.त्यानंतर तुम्हाला हव्या प्रिंटरवर डबल क्लिक करा कि झाला तो प्रिंटर तुमच्या जी-मेल अकाउंटला इन्स्टॉल.
स्मार्टफोन वर काय सेटिंग कराल ?
सध्या बाजारात अनेक वाय-फाय प्रिंटर उपलब्ध आहेत तो जर तुमच्या कडे असेल तर त्याचे प्लग ईन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टॉल करावे लागेल उदा.एच पी प्रिंट सर्वीस प्लग इन किंवा इप्सन प्रिंट इनबलर आदी.हे प्लग इन गुगल प्ले वर उपलब्ध असतात.तुमच्या कडे ज्या कंपनीचा प्रिंटर असेल तो प्लग इन आॅन केला कि स्मार्टफोन तो प्रिंटर सर्च करेल. एकदा का प्रिंटर सर्च झाला कि तुम्ही त्यावर प्रिंट पाठऊ शकता.
स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये गेल्यावर सिस्टम या भागात प्रिंंटीग असे आॅप्शन आहे.यावर क्लिक केल्यावर क्लाऊड प्रिंट असे आॅप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या वाय-फाय नेटवर्क मध्ये असलेल्या प्रिंटरची लिस्ट तुम्हाला दाखवेल त्यापैकी ज्या प्रिंटर ला प्रिंट पाठवायची आहे तो सिलेक्ट करावा किंवा तुमच्या वर सांगितल्या प्रमाणे तुमच्या जी-मेल च्या अकांऊंट ला जो क्लाऊड प्रिंटर जोडला असेल त्यावर प्रिंट पाठवावी.
यामध्येच तुम्हाला आणखी एक आॅप्शन दिसेल ते म्हणजे सेव टु गुगल ड्राईव .या आॅप्शन चा वापर करुन तुमच्या स्मार्टफोन वरील फोटो,डाक्युमेंट किंवा इतर फाईल तुम्ही गुगल ड्राईव वर सेव करु शकता.

कष्ट, जिद्द व आत्मविश्‍वासाच्या जोरावर मिळते यश

 

बापू बांगर : चालू घडामोडी अध्यापन मार्गदर्शन कार्यशाळा

बारामती । परिस्थिती नेहमी आपल्या बाजूनेच असेल असे समजावण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, आहे त्या परिस्थितीतील संधी शोधून मार्ग काढला पाहिजे. यातूनच यश हे आपल्या हातात येत असते. त्यासाठी कष्ट, जिद्द व आत्मविश्‍वास ठाम असला पाहिजे. याचा अर्थ असा की, तुमच्या हातात यश नक्कीच आहे. त्यामुळे निराश न होता परिस्थितीला सामोरे जायला पाहिजे, असे प्रतिपादन बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी केले आहे. युनिक अकॅडमीच्यावतीने आयोजित केलेल्या चालू घडामोडी अध्यापन मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी परिस्थितीवर मात केलेल्या पुष्पांजली पवार यांचा बापू बांगर व देवा जाधवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक देवा जाधवर, लक्ष्मणराव भोसले, उमेश रूपनवर, बाबुराव पडळकर, वसंत घुले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्याती काळे तर प्रास्ताविक भूमिका वसंत घुले यांनी मांडले.

वृत्तपत्रांचे वाचन करा
चालू घडामोडी हा विषय अत्यंत खोलवर समजून घेतला पाहिजे. देशात व जगात घडणारी प्रत्येक घटना ही चालू घडामोडीतच मोडते. यासाठी वृत्तपत्रांचे वाचन चांगल्या प्रकारे केले पाहिजे. वृत्तपत्रातील बातमीला अनेक कंगोरे असतात हे कंगोरे ज्यांना समजतात त्यांचा दृष्टिकोन हा निरीक्षणवादी बनत असतो. यासाठी महत्त्वाच्या घटना समजून घेतल्या पाहिजेत. सभोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षणही चांगल्याप्रकारे करता आले पाहिजे. यावरून आपण अनेक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवित असतो, असे मत चालू घडामोडीचे अभ्यासक देवा जाधवर यांनी व्यक्त केले.

अपयशातून मिळते चांगली शिकवण!
बदललेला काळ व परिस्थिती समजावून घेतली पाहिजे. ही परिस्थिती तुम्हाला निर्णायक भ्ाूमिकेकडे घेऊन जात असते. ज्यांनी-ज्यांनी परिस्थितीला आवाहन देत उत्तम प्रकारे करिअर केले आहे. तेच आपले मार्गदर्शक असतात. परंतू अपयशी ठरलेले लोकही बरेच काही शिकवून जातात. त्यांना नाकारू नका. त्यांना बरोबर घ्या. चुकांमुळे खूप काही शिकता येते, याचे भानही स्पर्धापरीक्षा करणार्‍यांनी ठेवावे, असे बांगर यांनी यावेळी सांगितले.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/janshakti-epaper-jansha/kasht+jidd+v+aatmavishvasachya+joravar+milate+yash-newsid-82464915

पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल

वृत्तसंस्था बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

clip_image001

नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले असून, यामुळे पासपोर्ट काढणे सोपे होणार आहे. यामध्ये आई-वडिलांची माहिती, जन्म प्रमाणपत्र, विवाहित किंवा घटस्फोटितांसाठीच्या नियांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

जन्म प्रमाणपत्र
ज्यांचा जन्म 26 जानेवारी 1989 किंवा त्यानंतर झाला, त्यांच्यासाठी जुन्या नियमांनुसार जन्माचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य होते. नव्या नियमांनुसार यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता कोणतीही स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जन्म-मृत्यू रजिस्ट्रार किंवा संबंधित प्राधिकरणाने नोंद केलेली जन्म तारीख वैध धरण्यात येईल. याशिवाय मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलेला शाळेचा दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल. याशिवाय पॅन कार्ड, आधार किंवा इ-आधारच्या मदतीने देखील अर्ज करता येणार आहे. वाहन परवाना, मतदान कार्ड यांसारखे ओळखपत्र देखील वैध ठरणार आहे.

आई-वडिलांचे नाव देणे अनिवार्य नाही
नव्या नियमांनुसार, पासपोर्टच्या अर्जामध्ये आई किंवा वडिलांचे नाव देणे अनिवार्य नाही. अर्जदार आता कायदेशीर पालकाचे नाव देऊ शकतो. या नियमामुळे सिंगल पॅरेंट किंवा अनाथ व्यक्तींना दिलासा मिळाला आहे. याशिवाय साधू किंवा संन्यासी त्यांच्या आध्यात्मिक गुरुचे नाव देता येणे शक्य होणार आहे.

कॉलमची संख्या कमी केली
कॉलमची संख्या कमी करण्यात आली असून, ती 15 वरुन 9 करण्यात आली आहे. यामध्ये A, C, D, E, J आणि K कॉलम हटवण्यात आले आहेत.

प्रत सांक्षांकित करण्याच्या प्रक्रियेत बदल (अटेस्टेशन)
जुन्या नियमांनुसार, प्रत्येक कागद नोटरी, कार्यकारी मॅजिस्ट्रेट, प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्याकडून सांक्षांकित करणे बंधनकारक होते. आता अर्जदार एका साध्या कागदावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन) देऊ शकतो.

विवाहित किंवा घटस्फोटित व्यक्ती
विवाह प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. याशिवाय घटस्फोटित व्यक्तींना पती किंवा पत्नीचे नाव देण्याची गरज नाही.

मोबाईल क्रमांक राहणार 10 अंकांचेच

वृत्तसंस्था बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

clip_image001

13 अंकी क्रमांक होणार असून, तो फक्त मशिन टू मशिन (M2M) याअंतर्गत येणाऱ्या उपकरणांमध्येच. इलेक्ट्रिक मीटर्स, स्वाइप मशिन्स आणि कार यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिम कार्डचे नंबर 13 अंकांचे असतील. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल क्रमांक बदलणार नाहीत. त्यांचे मोबाईल क्रमांक 10 अंकीच राहतील.

नवी दिल्ली : सध्या 10 अंकी मोबाईल क्रमांक अस्तित्वात आहेत. मात्र, आता हे क्रमांक बदलून 13 अंकी मोबाईल क्रमांक होणार असल्याच्या चर्चाँना उधाण आले. त्यानंतर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून, सर्व मोबाईलधारकांचे मोबाईल क्रमांक आता 10 अंकीच असणार आहे. त्यामुळे मोबाईलधारकांनी घाबरू जाण्याचे काही कारण नाही.

clip_image002

गेल्या काही दिवसांपासून 10 अंकी मोबाईल क्रमांक 13 अंकांचे होणार असल्याचे वृत्त दिले जात होते. त्यामुळे आपला मोबाईल क्रमांक बदलला जाणार असल्याचे अनेक ग्राहकांना वाटत होते. मात्र, आता या निर्णयामुळे घाबरण्याचे कारण नाही. 13 अंकी क्रमांक होणार असून, तो फक्त मशिन टू मशिन (M2M) याअंतर्गत येणाऱ्या उपकरणांमध्येच. इलेक्ट्रिक मीटर्स, स्वाइप मशिन्स आणि कार यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिम कार्डचे नंबर 13 अंकांचे असतील. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल क्रमांक बदलणार नाहीत. त्यांचे मोबाईल क्रमांक 10 अंकीच राहतील.

clip_image004

दरम्यान, केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून 10 अंकी मोबाईल क्रमांक बदलून १३ अंकी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय १ जुलैपासून या नव्या नियमात बदल करून सर्व ग्राहकांचे क्रमांक आता १३ आकडी असेल, असे सांगितले जात होते. मात्र, हा बदल केवळ मशिन टू मशिन ग्राहकांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अवनीने फायटर प्लेन उडवून रचला नवा इतिहास

वृत्तसंस्था

गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

avani-chaturvedi

नवी दिल्ली - भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी यांनी 'सुपरसॉनिक  फायटर जेट' हे फायटर विमान उडवून नवा इतिहास रचला. 19 फेब्रुवारी रोजी गुजराथच्या जामनगर एअरबेस वरुन त्यांनी मिग- 21 हे विमान उडविले. मिग-21 विमान हवेत उडवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचे प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येते. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते. अवनी जून 2016 पासून हे प्रशिक्षण घेतले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे फाटर विमान उडविण्यासाठी एका वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी जवळपास 15 कोटी खर्च येतो. इतिहासात पहिल्यांदाच महिलेने मिग-२१ हे विमान उडविले. या प्रशिक्षणादरम्यान महिला आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे झुकते माप देण्यात आले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

संरक्षण मंत्रालयाची ७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी

तिन्ही सैन्यदलांसाठी शस्त्रखरेदी

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: February 13, 2018 7:24 PM

निर्मला सीतारामण

संरक्षण मंत्रालयाने ७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. लष्कर, नौदल आणि वायुसेना यातील सैनिकांसाठी या रायफल्स खरेदी केल्या जाणार आहेत. या संदर्भातल्या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. या रायफल्सची किंमत १२,२८० कोटी इतकी असल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संरक्षण विभागाची एक बैठक संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १,८१९ कोटींच्या लाईट मशीन गन्सही विकत घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत स्नाईपर रायफल्सबाबतही चर्चा झाली. ५७१९ स्नाईपर रायफल्सच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या स्नाईपर रायफल्सची किंमत ९८२ कोटी रुपये असल्याचीही माहिती समोर आली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

7th Pay Commission : सरकार करू शकते मोठी घोषणा, इतका वाढवणार पगार

केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी अहे. मोदी सरकार लवकरच त्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करणार आहे. 

7th Pay Commission : सरकार करू शकते मोठी घोषणा, इतका वाढवणार पगार

महत्त्वाचे मुद्दे

  1. सरकार करू शकते मोठी घोषणा, इतका वाढवणार पगार
  2. ५० लाख केंद्रीय कर्मचा-यांना मिळणार याचा मोठा फायदा
  3. एप्रिल महिन्यात करू शकतं सरकार मोठी घोषणा
  4.  

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी अहे. मोदी सरकार लवकरच त्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करणार आहे. एप्रिल २०१८ मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली ही घोषणा करण्याची शक्यता आहे. ही घोषणा केल्यास याचा फायदा ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

किती वाढणार पगार?

सातव्या वेतन आयोगासाठी केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकार सातवा वेतन आयोग लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसापूर्वी पगारवाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं. जर आता पगारवाढीची घोषना झाली तर कर्मचाऱ्यांचा कमीत कमी २४००० रुपये होणार आहे. केंद्रीय कर्मचारी मॅट्रिक्स लेवल १-२मध्ये येतात. त्यामुळे त्यांचीच पगारवाढ होणार आहे. वाढलेला पगार एप्रिल महिन्यापासून येणार अशी शक्यता आहे.

काय आहे आता मागणी?

केंद्रीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यास त्यांचा पगार कमीत कमी ७ हजार रूपये महिन्यांवरून १८ हजार रूपये महिना होणार आहे. तेच फिटमेंट फॅक्टर सुद्धा २.५७ टक्क्यांनी वाढेल. त्यासोबत जास्तीत जास्त पगार ९० हजार रूपयांहून वाढून २.५ लाख रूपये महिना होईल. सातव्या वेतन आयोगांच्या सिफारशींना कॅबिनेटने २९ जून २०१६ मध्येच मंजूरी दिली होती. आता केंद्रीय कर्मचारी मागणी करत आहेत की, त्यांचा पगार १८ हजार रूपये महिन्यांहून वाढवून २६ हजार रूपये करावा.

एकूण किती मिळणार वाढ?

बेसिक वेतनात १४.२७ टक्के आणि भत्यांमध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण वाढ २३.६ टक्के मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर वेतन आणि निवृत्तीवेतनाचा सरकारवर अतिरिक्त १.०२ लाख कोटींचा भार पडणार आहे.

 

http://zeenews.india.com/marathi/india/7th-pay-commission-government-likely-to-announce-salary-hike-for-govt-employees-salary-to-be-increased-soon/411509

देशसेवा करण्याची सुवर्णसंधी, भारतीय नौदलात वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु

नवी दिल्ली - भारतीय नौदलात भरती सुरु असून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे. अर्ज करणा-या उमेदवारांनी 60 टक्क्यांसोबत अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली असणं अनिवार्य आहे. या पदांसाठी तेच उमेदवार अर्ज करु शकतात ज्यांचा जन्म 1 जुलै 1999 ते 2 जानेवारी 1994 दरम्यान झालेला आहे.

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी पदवी किंना त्यासमान पदवी मिळवलेली असल्यास तुम्ही अर्ज करु शकता.

पदांची संख्या - 19

कोणत्या पदांसाठी भरती सुरु आहे -
1. एअर ट्राफिक कंट्रोलर (Air Traffic Controller - ATC)
2. ऑब्झर्व्हर (Observer)
3. पायलट - एमआर (Pilot - MR)
4. पायलट - एमआरव्यतिरिक्त (Pilot - Other Than MR)

भरतीची जाहिरात निघालेली तारीख - 10-02-2018

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 04-03-2018

वयाची अट काय आहे -
उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1994 ते 1 जानेवारी 1998 (ब्रांच 1) / 2 जानेवारी 1995 ते 1 जानेवारी 2000 (ब्रांच - 2,3,4) दरम्यान झालेला असावा.

निवड कशाप्रकारे केली जाणार ?
सर्व्हिस सिलेक्शन बोर्डातील (एसएसबी) मुलाखतीमधील प्रदर्शाननुसार उमेदवारांची निवड केली जाईल

पगार किती असेल ?
उप लेफ्टनंट - 56,100 - 1,10,700 /- रुपये
लेफ्टनंट - 61,300 - 1,20,900 /- रुपये
लेफ्टनंट कमांडर - 69,400 - 1,36,900 /- रुपये
कमांडर - 1,21,200 - 2,12,400 /- रुपये

'महामित्र' ठरले देशात प्रथम क्रमांकाचे 'सोशल' ॲप

मुंबई : विविध समाजमाध्यमांच्या वापरातून विवेकशील समाजनिर्मिती करण्याबरोबरच या समाजमाध्यमांचा विधायक कार्यात सकारात्मक उपयोग करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या 'सोशल मीडिया-महामित्र' उपक्रमाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमास लाभत असलेल्या उदंड प्रतिसादानंतर 'ॲपब्रेन' या संकेतस्थळाने 'महामित्र' ॲपला देशात प्रथम क्रमांकाचे 'सोशल' ॲपचे रॅकिंग केल्याने 'महामित्र'ची लोकप्रियता वाढत चालली आहे.

ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे आता सिद्ध झाले आहे. विधायक संदेशाची देवाण-घेवाण होत असेल तर विवेकी समाज तयार होतो हे सूत्र लक्षात घेऊन या सकारात्मक बाबींसाठी समाजमाध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करणाऱ्या समाजमाध्यमकारांचा गौरव करण्याच्या दृष्टीने 'सोशल मीडिया-महामित्र' उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.

सर्वसाधारपणे प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे त्या भागातील प्रभावी समाजमाध्यमकारांची विविध निकषांच्या आधारे निवड करून त्यांना मा. मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील मिळणार आहे.

या उपक्रमात विशेषत: ग्रामीण भागातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून सर्वस्तरातून समाजमाध्यमकार सहभागी होत आहेत. यामध्ये युवक-युवती अग्रस्थानी आहेत. काल सायंकाळपर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरु राहणार असून 'सोशल मीडिया-महामित्र' उपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.