For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देवू–गडकरी

 

हैदराबाद - पाकिस्तानने सीमेपलिकडून दहशतवादी कृत्ये न थांबविल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

पंजाबमधील पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यांनी फोनवरून पाकिस्तानमध्ये संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशयही गुप्तचर सूत्रांकडून व्यक्त केला आहे.

पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची पद्धती आणि इतर माहितीवरून हा हल्ला जैश-ए-मोहंमद या संघटनेने घडवून आणला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हैदराबाद येथे सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.

गडकरी म्हणाले, की आम्हाला पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. पण, याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असा होत नाही.

भारताविरोधात कारवाईसाठी पाकिस्तान अशा प्रकारची मदत करत असेल, तर आम्हीही चोख प्रत्युत्तर देवू. दहशतवादी सतत सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसत आहेत.

पाकिस्तानला माहिती आहे, की ते भारताविरोधात उघडपणे युद्ध जिंकू शकत नाही. त्यामुळे ते अशा प्रकारची कृत्ये करून निष्पाप नागरिकांचा बळी घेत आहेत.

[वृत्तसंस्था]

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून पठाणकोट येथे सीमेपलिकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निंदा केली

नवी दिल्ली, 4-1-2016

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

पठाणकोट येथे सीमेपलिकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याची त्यांनी कठोर शब्दात निंदा केली आणि या हल्ल्यात झालेल्या जिवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.

राष्ट्राध्यक्ष घनी यांनी मजार-ए-शरीफ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली.

भारतात झालेल्या भूकंपातील जिवित आणि वित्त हानीच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान भारतासोबत असल्याची भावना घनी यांनी व्यक्त केली.
 

सीमेपलिकडून होणारे दहशतवादी हल्ले आणि भूकंप याबाबत अफगाणिस्तान देत असलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष घनी यांचे आभार मानले.

मजार-ए-शरीफ येथील दहशतवादी हल्ला उधळून लावण्यासाठी आणि भारतीय दूतावास आणि त्यातील कर्मचाऱ्‍यांची सुरक्षा कायम राखण्यासाठी अफगाण राष्ट्रीय सुरक्षा दलांनी दाखवलेल्या शौर्य आणि धैर्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. भारत नेहमीच अफगाणिस्तानच्या जनतेबरोबर उभा राहील, अशी भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
 

[PIB]
 
 

पठाणकोट हल्ला : बीएसएफकडून अहवाल मागवला

दहशतवाद्यांनी गुरुदासपूरमध्ये शिरून एका पोलीस अधीक्षकासह सात जणांना ठार मारले होते.

पंजाबमध्ये पठाणकोट येथे जवानांकडून चालू असलेली दहशतवाद्यांची शोधमोहीम

पीटीआय, नवी दिल्ली : सीमेवरील सुरक्षाव्यवस्था भेदून देशात घुसलेल्या दहशतवाद्यांनी पठाणकोटमध्ये हल्ला केल्याच्या घटनेबाबत अहवाल द्यावा, असे गृहमंत्रालयाने पाकिस्तानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) सांगितले आहे. भारत- पाकिस्तानदरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेला खिंडार पाडण्यात आल्याबद्दल गृहमंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला असून, हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्रांनी सज्ज दहशतवादी सीमेपलीकडून भारतात कसे काय घुसले याचे स्पष्टीकरण देण्यास गृहमंत्रालयाने बीएसएफला सांगितले आहे.

अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमा भेदण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात अशाच प्रकारे तीन शस्त्रसज्ज दहशतवाद्यांनी गुरुदासपूरमध्ये शिरून एका पोलीस अधीक्षकासह सात जणांना ठार मारले होते. प्राथमिक अहवालानुसार, पंजाबमधील कुंपण न घातलेल्या एका नाल्याच्या मार्गाने दहशतवादी भारतात शिरले असावेत असा अंदाज असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताची पाकिस्तानला लागून ३३२३ किलोमीटरची सीमा आहे. यापैकी पंजाबमधील ५५३ किलोमीटर आणि जम्मू- काश्मीरमधील १२२५ किलोमीटर सीमेपैकी बहुतांश जागी कुंपण घालण्यात आले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या पंजाबमध्ये १७८, तर जम्मू- काश्मीरमध्ये ९० चौक्या (आऊटपोस्ट) आहेत.

 

‘कारवाई संपल्यावरच भारत-पाकिस्तान चर्चेचा निर्णय’ नवी दिल्ली :

पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर घुसलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेली कारवाई संपुष्टात आल्यानंतरच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठकीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे स्पष्ट केले.जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात भारत आणि पाकिस्तान यांच्यात परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र पठाणकोट येथे दहशतवादी हल्ला झाल्याने नियोजित चर्चेचे भवितव्य काय, असे जेटली यांना विचारले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

 

देशातील अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर -सोनिया गांधी नवी दिल्ली :

देशातील अंतर्गत सुरक्षेची स्थिती ‘गंभीर’ असल्याचे सांगून, दहशतवादाच्या धमक्या निष्प्रभ करण्यासाठी तसेच नागरिक आणि महत्त्वाची ठिकाणे यांना पुरेशी सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याची आशा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. पठाणकोट हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली व्यक्त करतानाच या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबाबत सोनियांनी चिंता व्यक्त केली. दहशतवादविरोधी मोहीम गेल्या ४८ तासांपासून सुरू असल्याचे लक्षात घेता वायुदलाच्या महत्त्वाच्या मालमत्तेची सुरक्षाही चिंताजनक असल्याचे त्या म्हणाल्याचे पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले. 

[PTI][Loksatta]

दहशतवाद्याची बंदूक खेचून त्यालाच कंठस्नान, पठाणकोट हल्ल्यातील शहीद जवानाची शौर्यगाथा

डीएससी जवान जगदीश सिंह यांनी दहशतवाद्यांच्या मागे धाव घेतली आणि एकाला पकडले.

पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळाजवळ गेल्या ५० तासांपेक्षा जास्त वेळेपासून भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री अजूनही सुरू आहे.

पठाणकोट येथे भारतीय हवाई दलाच्या तळावर सुरक्षा दलाचे आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे सात जवान शहीद झाले. पण दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना शहीद झालेल्या जगदीश सिंह या भारतीय जवानाची शौर्य गाथा देशातील प्रत्येकासाठी अभिमानास्पद ठरणारी आहे. पठाणकोट हवाई तळाचे कमांडिंग अधिकारी जे.एस धमून यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सीमेत दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहिम सुरू करण्यात आली होती. शोध मोहिम सुरू असतानाच पठाणकोट परिसरात दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत तीन जवान शहीद झाले. त्यानंतर दहशतवादी खुल्या मैदानात गेले. डीएससी जवान जगदीश सिंह यांनी दहशतवाद्यांच्या मागे धाव घेतली आणि एकाला पकडले. दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि तेवढ्यातच जगदीश यांनी दहशतवाद्याचीच बंदूक हिसकावून त्याला कंठस्नान घातले. यानंतर जगदीश यांनी उर्वरित दहशतवाद्यांचा पाठलाग सुरू केला. मात्र, दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. दरम्यान, पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळाजवळ गेल्या ५० तासांपेक्षा जास्त वेळेपासून भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री अजूनही सुरू आहे. काही तासांपूर्वी हवाई दलाच्या तळावर मोठा स्फोट झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईत पाचवा दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.

[Loksatta]

मंत्र्यांनो, सोशल मिडियाचा अधिकाधिक वापर करा!

नवी दिल्ली - बिहार विधानसभेतील पराभव तसेच नागरीकांमध्ये सरकारी योजनांच्या प्रचार-प्रसाराचा अभाव यामुळे केंद्रिय मंत्र्यांना सोशल मिडियाचा अधिकाधिक वापर करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) केली आहे.
पीएमओने केंद्रिय मंत्र्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. मंत्र्यांनी आपल्या कामकाजाचा लेखाजोखा सोशल मिडियाद्वारे मांडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांमध्ये सरकारची चांगली प्रतिमा निर्माण करून सरकारप्रती नागरिकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत असल्याचे पीएमओने म्हटले आहे. नागरिकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम माहिती आणि प्रसारण मंत्रालय आयोजित करू शकतो असेही आदेशांमध्ये म्हटले आहे. मंत्र्यांचे निर्णय आणि मंत्रालयासंदर्भातील कामकाज नागरिकांपर्यंत पोचावे आणि त्याबाबत नागरिकांच्या प्रश्‍नांना उत्तर देता यावे यासाठी सोशल मिडियाचा वापर करणे आवश्‍यक असल्याचे मोदींचे मत आहे. त्यामुळेच यापूर्वीही मोदी यांनी अशाप्रकारचे सूचना दिल्या होत्या.

[वृत्तसंस्था]

मुंबई विसरलो; पठाणकोटही विसरू!- सिन्हा

नवी दिल्ली - अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळातील परराष्ट्र मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पाकिस्तानशी चर्चेचे गुऱ्हाळ लावताच कामा नये, असा रोखठोक सल्ला सरकारला दिला आहे. "सरकार मुंबईवरील दहशतवादी हल्ला विसरून गेले; तसेच पठाणकोटबाबतही होईल,‘ असे भाकीत करून सिन्हा यांनी स्वपक्षीय भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे. मात्र पाकिस्तानच्या कुरापती, त्यामागे तेथील लष्कराची फूस व त्याच्याही मागील सुप्त जागतिक दबाव या तीन पायांच्या शर्यतीबाबत सिन्हा यांनी मौन बाळगले. 

आपल्या काळात पाकिस्तानशी चर्चेची वकिली करणारे सिन्हा यांनी आता मात्र पाकशी कदापी चर्चा नको, असा सल्ला स्वपक्षीय सरकारला दिला आहे. त्यांनी सांगितले, की वाजपेयी सरकारमध्ये मी केवळ परराष्ट्र मंत्रीच नव्हतो, तर परराष्ट्र व्यवहारांबाबत भाजपचा प्रवक्ताही होतो. दहशतवाद व चर्चा हे एकाच वेळी होऊ शकत नाहीत, असे आम्ही पाकिस्तानमधील मुशर्रफ सरकारला स्पष्टपणे बजावले होते. भारताची तयारी असली तरी चर्चा हवी असेल तर आधी हे दहशतवादी हल्ले थांबवा असे सांगितले होते. पाकिस्तानकडून केवळ माना डोलावल्या जातात; पण अशा प्रस्तावांवर लेखी सहमती कधीही दिली जात नाही याचे "कारण‘ उघड आहे. असे हल्ले करणारे "नॉन स्टेट ऍक्‍टर्स‘ आहेत, आम्ही तरी काय करणार, हा पाकचा शुद्ध ढोंगीपणा आहे. भारताविरुद्ध आग ओकणारा हाफीज सईद पाकच्याच भूमीवरून कारवाया करतो तर त्याला पाकिस्तानच संपूर्ण जबाबदार आहे. 2014 मध्ये नवे सरकार आल्यावर सुषमा स्वराज यांनीही "गोळीबार सुरू असेल तर चर्चा ऐकू येणार नाही,‘ असे सांगून सर्वप्रथम थेट वाजपेयी सरकारचीच भूमिका घेतली होती. पण सरकारने दहशतवादावर आता अचानक भूमिका का बदलली हे गूढ आहे. असे व्हायला नको आहे. कारण पाकसारखा शेजारी असताना भूमिकेतील असे बदल घातक ठरू शकतात, असे सिन्हा यांनी नमूद केले.

सुषमा स्वराज नामधारी?
सिन्हा यांनी स्वराज या परराष्ट्र मंत्री असण्यापेक्षा सागरपार भारतीयांच्या (ओव्हरसीज इंडियन्स) मंत्रीच जास्त असल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, की सुषमा स्वराज अतिशय कार्यक्षम आहेत. मात्र निखळ परराष्ट्र व्यवहारांवर त्यांची किती वक्तव्ये आली? परदेशात संकटात अडकलेल्या भारतीयांची सोडवणूक करण्याचा मुद्दा असेल तेथे त्यांना भूमिका व तीही मर्यादितच दिली जाते.

[सकाळ न्यूज नेटवर्क]

भारत-पाक चर्चा अधांतरी

नवी दिल्ली - पठाणकोटमधील हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 जानेवारीला होणारी परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक रद्द करण्याचा भारत विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेचा आराखडा निश्‍चित करण्यासाठी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे 14 जानेवारीला पाकिस्तानला जाणार असल्याचे नियोजनात ठरले आहे. दुसऱ्या दिवशी ते पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अझीझ अहमद चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार होते. मात्र, दहशतवादी हल्ल्याची सूत्रे पाकिस्तानमध्येच असल्याचा दाट संशय असल्याने ही बैठक रद्द करण्याचा विचार केला जात आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही, भारत-पाक नियोजित चर्चेआधी दहशतवादी हल्ले अथवा इतर काही घटना घडून चर्चा रद्द झाल्याच्या घटना आधी घडल्या असल्याने या चर्चेचे भविष्यही अनिश्‍चित आहे.

पठाणकोट येथील हवाई तळावर शनिवारी सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेली शोधमोहीम अद्यापही सुरूच आहे. हवाईतळावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा असल्याने त्यांनी तग धरला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हल्ल्यानंतर किमान दोन वेळेस तरी सर्व दहशतवादी मारले गेले असल्याचे वृत्त मिळाले होते. मात्र, काही वेळातच पुन्हा गोळीबारांचे आवाज येत तळावर अद्यापही दहशतवादी असल्याचे सिद्ध झाले होते. तसेच, पहिल्या दिवशी मारल्या गेलेल्या चार दहशतवाद्यांनंतरही पाचवा आणि सहावा दहशतवादी मारल्याचे वृत्त प्रसिद्ध होत होते. आज त्यालाही लष्कराकडून दुजोरा मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हल्ला केलेल्या आणि मारल्या गेलेल्या एकूण दहशतवाद्यांच्या संख्येबाबत संभ्रम आहे.

दहशतवाद्यांकडे असलेल्या एके 47 रायफल्स अत्याधुनिक होत्या. हवाई तळाचा परिसर तब्बल दोन हजार एकरांचा असून, यापैकी काही भाग जंगले अणि उंच गवतांनी व्यापला आहे. तसेच, तळावरील कर्मचाऱ्यांची घरेही याच भागात आहेत. त्यामुळेच शोधमोहिमेला वेळ लागत असल्याचे लष्कराने सांगितले आहे.

जिहाद कौन्सिलने घेतली जबाबदारी
या हल्ल्यासाठी जैशे महंमद जबाबदार असल्याचा आरोप होत असतानाच युनायटेड जिहाद कौन्सिल या संघटनेच्या "हायवे स्क्वाड‘ने हा हल्ला केल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. अनेक दहशतवादी संघटनेची मूळ संघटना म्हणून जिहाद कौन्सिलकडे पाहिले जाते. त्यांनी ई-मेलद्वारे एक निवेदन प्रसिद्ध करत ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या या दाव्याबाबत दिल्लीमधील तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.

दिवसभरातील घटना
- हल्लाप्रकरणी "एनएसए‘कडून गुन्हा दाखल
- हुतात्मा गुरुसेवकसिंग यांच्यावर अंबाला जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार
- हुतात्मा लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांच्यावर बंगळूरमध्ये अंत्यसंस्कार
- पठाणकोटमधील शोधमोहिमेसाठी अधिक कुमक मागविली
- पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली

[PTI] [Sakal]

चहाच्या बदल्यात जवानांना वीरमरण

मुंबई - नवाझ शरीफ यांच्याबरोबरचे चहापान हा आमच्या पंतप्रधानांचा खासगी विषय आहे. चहाच्या बदल्यात पठाणकोटला सात जवानांनी मरण पत्करले. त्या वीर जवानांची कुटुंबे आक्रोश करीत आहेत. हे वीर का शहीद झाले? देशाला प्रश्‍न पडला आहे. हे हौतात्म्य का झाले? जवान वीरमरण पत्करत आहेत, पण देश लढत आहे काय? उत्तर द्या!, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

शिवसेनेने आज (मंगळवार) पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेने ‘सामना‘ या मुखपत्रातील अग्रलेखातून पंतप्रधानांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत टीका केली आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की आजही बंदुका आणि तोफांच्या आवाजांनी देशाच्या कानठळ्या बसल्या आहेत आणि तरीही पठाणकोट हल्ल्याचा बदला आपण घेणार नसू तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरील शस्त्रांचे चलत् प्रदर्शन दाखविण्यात अर्थ नाही. हे शस्त्र प्रदर्शन अशा वेळी कुचकामी ठरते. फक्त सहा-सात दहशतवादी घुसवून पाकिस्तानने आपल्याविरुद्ध युद्धच पुकारले आहे. हवाई दलाच्या पंजाबमधील पठाणकोट येथील तळावर मूठभर दहशतवादी जोरदार हल्ला करतात व ७२ तासांनंतरही हे युद्ध संपत नाही. हे प्रकरण फक्त चिंता करण्यासारखे नाही तर आपल्या प्रचंड लष्करी सामर्थ्याचे जे ढोल आपण वाजवत असतो ते ढोल फोडणारा हा भयंकर प्रकार आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत व देशाची अंतर्गत सुरक्षाही साफ कोसळल्याचा हा पुरावा आहे. देशावर हे असे परचक्र आले असताना सरकारविरोधी सूर काढणे योग्य नाही. राजकीय टीका-टिपण्या न करता सरकारी कारवाईस पाठिंबा द्यावा. कारण हा देशाच्या सुरक्षेचा मामला आहे, पण देशाच्या सुरक्षेचा मामला असला तरी राज्यकर्ते गंभीर आहेत काय? हजारो सैनिक, रणगाडे, पंजाबचे पोलीस पठाणकोटला आहेत तरीही फक्त सहा-सात दहशतवाद्यांनी या लष्करी सामर्थ्यास जेरीस आणले. सात जवान या युद्धात शहीद झाले व पन्नासावर घायाळ झाले. हा हिशेब तपासला तर फक्त सहा माथेफिरू दहशतवाद्यांची किंमत चुकवून पाकिस्तानने हिंदुस्थानची अब्रू घालवली आहे. देशाचे संरक्षणमंत्री, पंतप्रधान वगैरे मंडळींनी धडा घ्यावा व सुधारणा कराव्यात असा हा प्रकार आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी अचानक लाहोर यात्रा करताच, ‘काय हा मुत्सद्दीपणा! जग तर थक्क झाले!’ असे सांगितले गेले. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर त्या सगळ्यांची दातखिळी बसली आहे. काँग्रेस राजवटीत असा हल्ला आज झाला असता तर ‘पाकिस्तानवर हल्ला करून धडा शिकवा!’ अशी मागणी झाली असती; पण आज कोणीच बोलत नाही व बलिदान केलेल्या जवानांना फक्त ‘ट्विटर’वर श्रद्धांजली वाहण्याचे राष्ट्रकार्य चालले आहे. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान नव्हते तेव्हाचे त्यांचे एक वाक्य आम्हाला आज आवर्जून आठवते आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मोदी म्हणाले होते, ‘भाई, बंदुक की गोली की गुँज में वार्ता कैसे हो सकती है?’ मोदींनी तेव्हा केलेला हा सवाल रास्तच होता. आम्हाला तेच मोदी हवे आहेत! आजही बंदुका आणि तोफांच्या आवाजांनी देशाच्या कानठळ्या बसल्या आहेत आणि तरीही पठाणकोट हल्ल्याचा बदला आपण घेणार नसू तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरील शस्त्रांचे चलत् प्रदर्शन दाखविण्यात अर्थ नाही. हे शस्त्र प्रदर्शन अशा वेळी कुचकामी ठरते. लपून-छपून येणार्‍या पाकड्या अतिरेक्यांशी लढताना आपल्या जवानांना वारंवार वीरमरण यावे, हे दुर्दैव आहे. आपल्या बहाद्दर सैनिकांची आणखी किती कलेवरे आपल्याच देशात पडलेली पाहायची? जवानांच्या अलौकिक शौर्याचा पुरुषार्थ बाळगतानाच आता पाकिस्तानात फौजा घुसवून दुश्मनांचे काय नुकसान केले ते देशाला सांगा.

[वृत्तसंस्था] [Sakal]

'पठाणकोट हल्लेखोरांवर पाकने कारवाई करावी'

वॉशिंग्टन - पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई करावी, अशी इच्छा अमेरिकेने व्यक्त केली आहे.

पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यांनी फोनवरून पाकिस्तानमध्ये संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशयही गुप्तचर सूत्रांकडून व्यक्त केला आहे. पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची पद्धती आणि इतर माहितीवरून हा हल्ला जैश-ए-मोहंमद या संघटनेने घडवून आणला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बे म्हणाले, की भारताने या हल्ल्याबाबत दिलेल्या पुराव्यांवरून पाकिस्तानने कारवाई करावी. पाकिस्तान सरकारशी याबाबत चर्चा झाली असून, ते आमच्या अपेक्षेनुसार संबंधित दहशतवाद्यांवर कारवाई करतील अशी आशा आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. पाकिस्तान सरकारनेही या हल्ल्याची निषेध करावा. पाकिस्तानने सर्व प्रमुख दहशतवादी संघटनांना लक्ष्य करावे.

[वृत्तसंस्था]

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

फेसबुक वापरणाऱ्या जवानांस लष्कराचा इशारा...

सोमवार, 4 जानेवारी 2016 - 03:07 PM IST

चंडीगड - भारतीय लष्करामधील अधिकारी व जवान; आणि त्यांच्या कुटूंबीयांच्या सोशल मिडियाच्या वापरासंदर्भात लष्करातर्फे मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

फेसबुकवर अश्‍लील छायाचित्रे वा व्हिडिओ न पाहण्याचे; तसेच अज्ञात लोकांकडून आलेल्या "फ्रेंड रिक्वेस्ट‘ न स्वीकारण्याचे निर्देश या नियमावलीद्वारे देण्यात आले आहेत.

फेसबुकवरील एखादे अश्‍लील छायाचित्र हे लष्कराची संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी तयार करण्यात आलेला सापळा असू शकतो, असा इशारा या नियमावलीद्वारे देण्यात आला आहे.

हवाई दलामधील जवान  रणजित के के याला गेल्या आठवड्यात फेसबुकवर सुंदर छायाचित्र असलेल्या एका महिलेस भारतामधील हवाई तळांची संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपांतर्गत ताब्यात घेण्यात आली आहे. रणजित याला ब्रिटनमधील पत्रकार वाटलेली ही महिला प्रत्यक्षामध्ये एका परकीय गुप्तहेर खात्याशी संबंधित होती. या पार्श्‍वभूमीवर लष्कराने ही नियमावली प्रसिद्ध केली आहे.


ही नियमावली पुढीलप्रमाणे -
1. सोशल मिडियावर अश्‍लील संकेतस्थळे, छायाचित्रे पाहु नये
2. सोशल मिडियावर लष्कराच्या गणवेशामधील छायाचित्रे प्रसिद्ध करु नये
3. बक्षिसाची लालुच दाखविणाऱ्या जाहिरातींच्या संकेतस्थळांस भेट देऊ नये
4. लष्करामधील औपचारिक ओळख जाहीर करु नये
5. शस्त्रासहित छायाचित्र प्रसिद्ध करु नये
6. लष्करामधील हुद्दा, विभाग वा सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणाची माहिती उघड करु नये
7. अज्ञातांच्या फ्रेंड रिक्‍वेस्ट्‌स स्वीकारु नये
8. लष्करामधील जवानांच्या आप्तस्वकीयांनी त्यांच्यासंदर्भातील माहिती सोशल मिडियावर प्रसिद्ध करु नये
9. लष्कराशी संबंधित कोणतेही छायाचित्र प्रसिद्ध करु नये
10. संगणक वा लॅपटॉपवर लष्कराशी संबंधित कोणतीही माहिती साठवून ठेवू नये

[वृत्तसंस्था]

"पठाणकोट'मुळे अजित दोवल यांचा चीन दौरा रद्द

बीजिंग - पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवल यांचा चीन दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली. दोवल हे उद्यापासून (मंगळवार) चीनच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण चर्चेस प्रारंभ करणार होते. मात्र या दहशतवादी हल्ल्यामुळे दोवल यांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोवल हे भारत व चीनमधील सीमाप्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेले विशेष प्रतिनिधीही आहेत. यासंदर्भातील चर्चेच्या आत्तापर्यंत 18 फेऱ्या झाल्या आहेत. भारत व चीनमधील सीमाप्रश्‍न आणि अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जिएची यांच्याशी चर्चा करण्यासाठी दोवल यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान दोवल चीनचे पंतप्रधान ली कशियांग यांचीही भेट घेणार होते.


पठाणकोट हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि परराष्ट्र मंत्रालयामधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी संवेदनशील बैठक सुरु आहे. एनएसजी आणि लष्कराच्या कमांडोंनी येथील हवाई तळाच्या संपूर्ण परिसराची झाडाझडती सुरू केली असून, दहशतवाद्यांना कोंडीत पकडले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बलिदान केलेल्या सुपुत्राचा अभिमान: वीरपिता

सोमवार, 4 जानेवारी 2016 - 02:04 PM IST

अंबाला - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांचा सामना करताना हुतात्मा झालेल्या माझ्या मुलाचा मला अभिमान आहे, अशी भावना सुचा सिंग यांनी आज (सोमवार) व्यक्त केली. सुचा सिंग यांचा सुपुत्र व भारतीय लष्करामधील गरुड कमांडो दलाचा जवान गुरसेवक सिंग हा पठाणकोट येथील हल्ल्यादरम्यान हुतात्मा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरसेवक याचे अवघ्या दिड महिन्यापूर्वी लग्न झाले होते. देशासाठी बलिदान केलेल्या आपल्या पुत्राचा सार्थ अभिमान असल्याचे सिंग यांनी यावेळी सांगितले.
"माझा मुलगा हा देशाची सेवा करण्यासाठी हवाई दलामध्ये दाखल झाला होता. त्याने आज त्याचे कर्तव्य पूर्ण केले आहे. मला त्याचा अभिमान आहे. अर्थात, आम्हाला त्याच्या जाण्याने दु:खही झाले आहे. गुरसेवक याच्यापुढे थोर देशभक्‍त व क्रांतिकारक भगत सिंह यांचा आदर्श होता,‘‘ असे शेतकरी असलेल्या सिंग यांनी सांगितले. सिंग यांचा मोठा मुलगाही लष्करामध्ये आहे. सिंग कुटूंब हे मुळचे अंबालामधील गर्नाला गावामधील आहे.
हरयानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गुरसेवकच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्‍त करत गुरसेवक याच्या आप्तस्वकीयांसाठी 20 लाख रुपयांच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरसेवक हा सुमारे सहा वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलात दाखल झाला होता.

[वृत्तसंस्था]

शक्तीशिवाय प्रतिष्ठा नाही - मोहन भागवत

सकाळ वृत्तसेवा

रविवार, 3 जानेवारी 2016 - 06:36 PM IST

पुणे - धर्म, न्याय आणि नीतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हा विचार पुढे नेताना शिवविचार आणि शक्ती यांचा संगम व्हायला हवा, असा नारा देत सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आगामी दिशा "शिवशक्ती संगम‘ कार्यक्रमात रविवारी स्पष्ट केली. शक्तीशिवाय प्रतिष्ठा नाही असे सांगत, देशाला परमवैभवाला नेण्यासाठी संघाशिवाय तरणोपाय नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र विभागातर्फे मुळशी तालुक्‍यातील जांभे, नेरे आणि मारुंजी या गावांच्या सीमेवर आयोजित "शिवशक्ती संगम‘ कार्यक्रमात भागवत बोलत होते. सरकार्यवाह भैयाजी जोशी, पश्‍चिम महाराष्ट्र क्षेत्रीय संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया, प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाह विनायक थोरात व्यासपीठावर उपस्थित होते. संघाच्या सुमारे एक लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी या मेळाव्यात गणवेशासह सहभाग नोंदविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यश रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार, महापालिका, नगरपरिषदा आणि जिल्हापरिषदांचे सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील निमंत्रितही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुमारे 200 फूट रुंद आणि 80 फूट उंच भव्य व्यासपीठावर मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लक्षवेधक होती. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक मा. गो. गोळवलकर गुरुजी यांच्याही भव्य प्रतिमा मांडण्यात आल्या होत्या. नेटक्‍या संयोजनामुळे संघाचे शक्तिप्रदर्शन उत्तरोत्तर खुलत गेले. ध्वजवंदनानंतर घोषाचे दिमाखदार प्रात्यक्षिक झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करत भागवत यांनी सुमारे चाळीस मिनिटे स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांचे विचार स्वयंसेवकांनी मनात रुजवून शक्तीची साधना करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

भागवत यांनी शिवाजी महाराजांचे विचार, दूरदृष्टी आणि सामर्थ्य यांचा दाखला त्यांच्या भाषणात दिला. भागवत म्हणाले, ""संघाचे संघटन तत्त्वनिष्ठ आहे, ते व्यक्तिनिष्ठ नाही, त्यामुळेच तत्त्वांचे अनुकरण करायचे असते. तत्त्वाचे सगुण रूप म्हणून शिवाजी महाराजांकडे आपण पाहतो. म्हणूनच संघाच्या सहा उत्सवांमध्ये शिव-उत्सवाचा समावेश पूर्वीपासूनच आहे. त्यामुळेच संघाचे स्वयंसेवक छत्रपतींच्या चरित्राचे स्मरण करतात. शिव ही शिवत्वाची परंपरा आहे. "सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरम्‌‘ ही देशाची संस्कृती आहे. शिवत्वाचे शाश्‍वत अस्तित्व जगाने ओळखले आहे. मात्र, जगाची रीत शक्ती ओळखणारी असल्याने शिवविचार आणि शक्तीचा संगम आवश्‍यक आहे.‘‘


शक्तीशिवाय प्रतिष्ठा मिळणार नाही, हा मुद्दा विशद करताना ते म्हणाले, ""इंग्रजांच्या राजवटीत आपल्यावर गुलामगिरी लादली गेली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, दोन युद्धे जिंकल्यावर, अणुचाचणी झाल्यावर आपली प्रतिष्ठा जगात वाढत आहे. शक्तिशाली राष्ट्रांच्या वाईट गोष्टींवर चर्चा होत नाही; पण दुर्बल राष्ट्रांच्या चांगल्या गोष्टींनाही किंमत नाही. भारतीय संस्कृतीवर चर्चा फार होते; परंतु देशाची शक्ती वाढते, तेव्हा सत्तेची प्रतिष्ठा वाढते.‘‘

""स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगात देशाची प्रतिष्ठा वाढली. अस्तित्वाची "जात‘ एकच असून, देशातील विविधतेचा स्वीकार करायला हवा. एकमेकांतील भेद विसरून सामाजिक समरसता रहावी, अन्यथा संविधानाचा उपयोग होणार नाही.‘‘

संघाच्या लाखो स्वयंसेवकांची उपस्थिती म्हणजे हे काही प्रदर्शन नाही, तर संघ समाजात सर्वत्र पोचला आहे, त्याचे प्रतीक आहे. या देशाला परम वैभवाला न्यायचे असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पर्याय नाही, असे प्रतिपादन भागवत यांनी केले.

थोरात यांनी प्रास्ताविकात संघाच्या विस्ताराची, सेवाकार्याची आणि वाटचालीची माहिती दिली. 1983 मध्ये पुण्यातच तळजाई येथे झालेल्या शिबिरात 35 हजार स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. शिवशक्ती संगममध्ये एक लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतल्याचे थोरात यांनी सांगितले.

[Sakal]

पठाणकोट हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात

सोमवार, 4 जानेवारी 2016 - 09:41 AM IST

चंदीगड- पाकिस्तानने पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. मात्र संबंधित दहशतवाद्यांनी फोनवरून पाकिस्तानमध्ये संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशयही गुप्तचर सूत्रांकडून व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा दौरा केला होता.


पंजाबमधील पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची पद्धती आणि इतर माहितीवरून हा हल्ला जैश-ए-मोहंमद या संघटनेने घडवून आणला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावर शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रात्रभर शोधमोहीम सुरू होती. या परिसरात आणखी दोन दहशतवादी जिवंत असल्याचे रविवारी दुपारी स्पष्ट झाले आणि त्यांच्याबरोबर सुरक्षा दलांची पुन्हा चकमक सुरू झाली.
कर्नाटकमधील तुमकूर येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या कार्यक्रमाला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पठाणकोट येथील हवाई तळावरच्या सद्य परिस्थितीबद्दल माहिती दिली. ते दोघेही या कार्यक्रमाला दोघेही उपस्थित होते. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

[Sakal]

हुतात्मा ले. कर्नल निरंजन यांचे पार्थिव बंगळूरला

सोमवार, 4 जानेवारी 2016 - 11:27 AM IST

बंगळूर- पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतरच्या कारवाईदरम्यान रविवारी हौतात्म्य आलेले राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या बाँबविरोधी पथकाचे लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांचे पार्थिव आज (सोमवार) सकाळी विमानाने बंगळूरला आणण्यात आले.
दरम्यान, गरुड दलाचे हुतात्मा कमांडो गुरसेवक सिंग यांचेही पार्थिव अंबाला येथील गर्नाला येथे नेण्यात आले आहे. गुरसेवक यांचे पार्थिव पोचल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या उपस्थितांना अश्रू अनावर झाले. 


लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांचे पार्थिव बंगळूर येथील बीईल मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी येथे पार्थिवाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. दुपारी तीन वाजेपर्यंत पार्थिव येथे ठेवून नंतर कुमार यांच्या केरळमधील मूळ गावी अंत्यसंस्कारांसाठी नेण्यात येईल.

[Sakal]

"ऑपरेशन पठाणकोट" आता अंतिम टप्प्यात

सोमवार, 4 जानेवारी 2016 - 01:08 PM IST

पठाणकोट - "व्यूहात्मकदृष्टया अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेला पठाणकोट येथील विमानतळ उध्वस्त करण्याच्या उद्दिष्टाने दहशतवादी येथे आले होते; मात्र या विमानतळावरील सर्व सामग्री व कर्मचारी आता सुरक्षित आहेत,‘ असे भारतीय लष्कराच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने आज (सोमवार) सांगितले.
पठाणकोट येथील हवाई तळ परिसरामध्ये अद्यापी दोन दहशतवादी दडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या दहशतवादी हल्ल्यामध्ये एका अधिकाऱ्यासह सात जवान हुतात्मा झाले असून पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या परिसरामध्ये अद्यापी दडून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी राबविण्यात येत असलेली मोहिम आता अंतिम टप्प्यात असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा दलातर्फे (एनएसजी) स्पष्ट करण्यात आले आहे. पठाणकोट हवाई दलाच्या परिसराच्या निवडक भागामध्ये आता प्रसारमाध्यमांना प्रवेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


पठाणकोट हल्ल्यासंदर्भात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि परराष्ट्र मंत्रालयामधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी संवेदनशील बैठक सुरु आहे. एनएसजी आणि लष्कराच्या कमांडोंनी येथील हवाई तळाच्या संपूर्ण परिसराची झाडाझडती सुरू केली असून, दहशतवाद्यांना कोंडीत पकडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री आणि पहाटे गोळीबार ऐकू आला, मात्र हा गोळीबार शोध मोहिमेचा भाग असू शकतो, असे त्यांनी सांगितले.

[Sakal]

भारताच्या औद्योगिक उत्पादन दरात घट

 

नवी दिल्ली: देशाच्या औद्योगिक उत्पादन क्षेत्राला मोठा झटका बसला आहे. दोन वर्षात प्रथमच भारतीय उत्पादन खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोचला आहे. पीएमआय 50 च्या खाली येत 49.1 वर पोचला आहे. सलग सहाव्या महिन्यात उत्पादनात घट नोंदवण्यात आली आहे.


डिसेंबर महिन्यात पीएमआय 49.1 वर: आज (सोमवार) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यातील 50.3 वरुन डिसेंबरमध्ये पीएमआय कमी होऊन 49.1 वर पोचला आहे. ऑक्टोबर महिन्यात निक्केई खरेदी व्यवस्थापक निर्देशांकाने 25 महिन्यांची नीचांकी पातळी गाठली आहे. उत्पादन क्षेत्रात नवीन कंत्राटे आणि मागणी कमी झाल्यामुळे डिसेंबरमध्ये उद्योगांची गती मंदावली आहे. परिणामी कंपन्यांना उत्पादनाची किंमत कमी करावी लागते आहे.


खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) 50 च्या वर असल्यास उत्पादन वाढत असल्याचे सूचीत करते तर 50च्या खाली असल्यास उत्पादन घटल्याचे सूचीत होते.

[वृत्तसंस्था]

अफगाणिस्तानातील भारतीय वकिलातीवर मोठा हल्ला - वृत्तसंस्था

काबूल - उत्तर अफगाणिस्तानमधील मझार ए शरीफ या देशातील तिसऱ्या सर्वांत जास्त लोकसंख्येच्या शहरामधील भारतीय वकिलातीवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या वकिलातीमधील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती अफगाणिस्तानमधील भारतीय राजदूत अमर सिन्हा यांनी य पार्श्‍वभूमीवर दिली आहे.


या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी येथे जोरदार लढाई सुरु असून यासाठी लष्कराचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. भारतीय लष्कर व अफगाणिस्तानच्या सैन्यातर्फे संयुक्तरित्या ही मोहिम राबविण्यात येत आहे. दहशतवाद्यांची संख्या किमान पाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. बल्ख प्रांताचे गव्हर्नर अत्ता मुहम्मद नूर हे या प्रकरणी विशेष लक्ष देत असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. आत्तापर्यंत दोन दहशतवाद्यांना धाराशयी करण्यात लष्करास यश आले आहे.


दहशतवाद्यांनी काल (रविवार) रात्री वकिलातीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवाद्यांनी वकिलातीच्या दिशेने किमान पाच क्षेपणास्त्रे डागल्याचेही निष्पन्न झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्यापी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.


पठाणकोट या भारतीय हवाई दलाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण हवाई तळावर झालेल्या हल्ल्याच्या एकाच दिवसानंतर अफगाणिस्तानमधील भारतीय वकिलातीस लक्ष्य करणारा हा हल्ला अत्यंत संवेदनशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच आठवड्यात अफगाणिस्तानला भेट देत येथे भारताकडून बांधण्यात आलेल्या संसदेचे अनावरण केले होते. या पार्श्‍वभूमीवर अफगाणिस्तानमधील हा हल्ला भारतीय परराष्ट्र धोरणासमोरील आव्हान मानले जात आहे.

 

[वृत्तसंस्था]

ही मौजमजा परवडणारी आहे?

First Published :04-January-2016 : 00:03:33


बावीस नोव्हेंबर रोजी रविवार होता. त्यानंतर दोन दिवस सरकारी कामकाज झाले. नंतर बुधवारी २५ ला गुरू नानक जयंतीची सुटी.

त्याला जोडून दोन रजा टाकणाऱ्यांना सलग चार दिवस मजा करता आली. त्यात नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा वाया गेला.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चार दिवस काम झाले व सालाबादप्रमाणे सरकार पाच डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशनासाठी रवाना झाले. २३ पर्यंत सरकार तिकडेच. त्यानंतर २४ ते २७ मोठा वीकेंड आला. सगळे ‘थर्टीफर्स्ट’च्या तयारीला लागले. शेवटचा आठवडाही वाया गेला. ४ तारखेपासून सरकार पूर्वपदावर येईल असे मंत्री, अधिकारीच येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत होते. या काळात मंत्रालयात फेरफटका मारला तर दिवाळीसारखी अवस्था होती. थोडक्यात काय तर गेल्या ४५ दिवसांपासून मंत्रालय जवळपास बंद झाल्यात जमा आहे. हे याच वर्षी होते आहे असे नाही. गेल्या अनेक वर्षांची ही परंपराच बनली आहे.

 

नागपूर अधिवेशन डिसेंबरात होते. त्याआधीचा एक आठवडा आणि अधिवेशन संपल्यानंतर ३१ डिसेंबरची पार्टी होऊन सगळे पूर्ववत कामावर येण्यासाठी वर्षातले ३० ते ३५ दिवस दरवर्षी वाया जातात. ही चैन, ही मौज महाराष्ट्राला परवडणारी आहे का, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनात शोधायचे आहे.

 

अधिवेशनातून काही हाती लागले का? तर त्यावर सांगण्यासारखे विरोधकांकडे फार काही नाही व सरकार केलेल्या घोषणांची यादी देण्यात मग्न आहे. दुसरीकडे राज्याच्या डोक्यावर साडेतीन लाख कोटींचे कर्ज आहे. अर्धे राज्य दुष्काळाच्या खाईत आहे. येणाऱ्या दोन महिन्यातच पाण्यासाठी मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हाणामाऱ्या होतील अशी स्फोटक परिस्थिती आहे. मराठवाड्यातल्या अनेक गावांमध्ये आजच टोकाचा असंतोष आहे. पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही, कोणाकडे आश्वासकपणे पाहावे असा दिलासा देणारा चेहरा दिसत नाही, विश्वासाने कोणाच्या खांद्यावर मान टाकून गुदमरलेलं मन मोकळं करावं असा खांदाही मिळेनासा झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांंची संख्या तीन हजारांचा आकडा पार करून गेली आहे. अशी विदारक स्थिती असताना स्वत:स कल्याणकारी राज्य म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राला ही ३० ते ३५ दिवसांची चैन परवडणारी आहे?

 

या काळात ज्यांचे कोणाचे राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात काम पडले असेल त्याला ‘आता अधिवेशन आहे, संपल्यानंतर या’ असे उत्तर ऐकायला मिळाले असेल. ज्याचा अधिवेशनाची काडीचाही संबंध नाही असा शिपाईदेखील हल्ली साहेब, अधिवेशन आहे, नंतर या, साहेब बिझी आहेत... असे साहेबांच्या परस्परच सांगून मोकळा होतानाचे चित्र अनेक कार्यालयांमधून पाहावयास मिळेल.

 

त्यातच गेल्या वर्षभरात सरकारने मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा नवा पायंडा पाडला आहे. त्यामुळे अनेक मंत्री सोमवारी सायंकाळपर्यंत किंवा मंगळवारी सकाळी मुंबईत येतात. मंगळवार-बुधवार मुंबईत. गेला बाजार काहीजण गुरुवारीही थांबतात आणि आपल्या मतदारसंघात निघून जातात. याचा अर्थ सोमवार, शुक्रवार, शनिवार मंत्रालय शांत शांतच असते. दर आठवड्याचे असे तीन दिवस, दिवाळीचे पंधरा-वीस दिवस आणि उत्सवप्रिय महाराष्ट्रात येणारे सण वार आणि त्यासाठीच्या सुट्या यांचा हिशोब यात कोठेही नाही.

 

जाता जाता : सरकारने गरिबांसाठी १० लाख घरे बांधण्याचा संकल्प सोडला, त्याला वर्ष झाले. एकही घर बांधून झालेले नाही. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या सहाव्या मजल्यावरील केबिनची आणि कार्यालयाची मात्र मोठ्या प्रमाणावर डागडुजी चालू आहे. सगळा कारभार पारदर्शक करण्यासाठी म्हणून काचेच्या केबिन केल्या जात आहेत. या कामासाठी आणखी किमान दहा बारा दिवस लागणार आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यालय सध्या तरी जिथे जागा मिळेल तेथून चालू आहे...

- अतुल कुलकर्णी

[Lokmat]

रविवार, ३ जानेवारी, २०१६

हवाई दल तळावर दहशतवादी हल्ला

 

पंजाबातील पठाणकोटमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान; तीन जवान हुतात्मा

पठाणकोट - पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आज केलेला हल्ला भारताने उधळून लावला. सुरक्षा जवानांनी जोरदार प्रतिहल्ला करत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, तर नंतर सुरू झालेल्या शोध मोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याला मारण्यात आले. तत्पूर्वी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले, तर सहा सुरक्षा जवान जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर अल्पकाळातच हा हल्ला झाला आहे.

हवाई तळ उद्‌ध्वस्त करण्याच्या उद्देशाने चार ते पाच दहशतवाद्यांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला केला होता. हे सर्व जण पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा अंदाज लष्करी सूत्रांनी व्यक्त केला आहे. लष्कराने काल रात्री राबविलेल्या शोधमोहिमेनंतर लगेचच हा हल्ला झाला. या भागातील एका पोलिस अधीक्षकाचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाल्याने सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे हवाई तळावरील सुरक्षा कर्मचारी सावध होते. दहशतवाद्यांनी हल्ला करताच त्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले. यामुळे हवाई तळावर घुसण्याच्या इराद्याने हवाई तळाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातून आलेल्या दहशतवाद्यांना तळाच्या बाहेरच्या भागात असलेल्या लंगरपर्यंतच पोचता आले. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा होता. जवानांनी केलेल्या गोळीबारात चार दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात तीन जवानांना वीरमरण आले. यामध्ये हवाई दलाच्या गरुड कमांडो दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. जखमी झालेल्या इतर सहा जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्ला केलेल्या दहशतवाद्यांची संख्या चारपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता असल्याने उर्वरित दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात येत असून या दरम्यानच आणखी एका दहशतवाद्याला शोधून त्याला मारण्यात जवानांना यश आले. यानंतरही पठाणकोट आणि गुरुदासपूर जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी एमआय जातीच्या लढाऊ हेलिकॉप्टरचाही वापर केला जात आहे. या दहशतवाद्याचे पळून जाण्याचे सर्व संभाव्य मार्ग बंद करण्यात आले असून, तो लवकरच हाती लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  

हल्ल्यानंतर...

- हवाई तळावरील सर्व शस्त्रे आणि सामग्री सुरक्षित

- शेजारील राज्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा

- हेरगिरीप्रकरणी अटकेत असलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याची या हल्ल्यासंदर्भात चौकशी करणार

- तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी पठाणकोटमध्ये दाखल

- हैदराबाद, दिल्लीमधील सुरक्षा व्यवस्था वाढविली

- पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल घटनास्थळी

- शोधमोहिमेदरम्यान पुन्हा गोळीबार

नागरिकांमध्ये घबराट

पहाटेच गोळीबाराचे आवाज सुरू झाल्याने आणि काही वेळातच हेलिकॉप्टर्सची घरघर सुरू झाल्याने येथील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. मात्र, दहशतवाद्यांना मारल्याचे वृत्त कळताच त्यांची भीती गेली. पोलिस निरीक्षकाच्या अपहरणानंतर येथे मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आल्याने नागरिकही सावध होते. हल्ल्यानंतरही अनेकांनी आपली दैनंदिन कामे सुरूच ठेवली. हल्ला केलेले दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा संशय असल्याने अनेक नागरिकांनी मोर्चा काढत पाकिस्तानचा निषेध केला.

पाककडून निषेध

पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध व्यक्त केला आहे. दहशतवाद नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, याकामी आम्ही भारताला पूर्ण सहकार्य करू, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

...दुसरा हल्ला

जुलैमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यातील दीनानगर येथे दहशतवादी हल्ला झाला होता. दीड तासात सात हल्ले झाले होते.

वीस वर्षांनी पंजाबमध्ये मोठा हल्ला झाला, ११ तासांच्या एन्काउंटरनंतर दहशतवाद्यांना मारण्यात आले होते.

काय घडले?

पहाटे साडेतीनच्या सुमारास लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांचा हवाई दलाच्या तळावर गोळीबार

जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे ६ तास धुमश्‍चक्री

गुरदासपूरच्या पोलिस अधीक्षकांची कार पळविलेल्या दहशतवाद्यांनीच हा हल्ला केल्याचा संशय

या हल्ल्यानंतर जम्मू काश्‍मीर, हिमाचल आणि चंडीगडकडे जाणारे रस्ते वाहतूक रोखली

हल्ल्यादरम्यान लष्कर, हवाई दल आणि एनएसजी कमांडोंनी मोर्चा सांभाळला. हेलिकॉप्टर, ड्रोन विमानांद्वारेही टेहळणी

दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या बहावलपूरमधून सीमा पार केली. त्यानंतर जम्मू-काश्‍मीरमार्गे पंजाबमध्ये घुसल्याची माहिती

गुप्तचर यंत्रणेने १ जानेवारीला या हल्ल्याबाबतचा इशारा दिला होता.

भारताची प्रगती सहन न होणाऱ्या मानवतेच्या शत्रूंनीच हा हल्ला केला आहे. हा हल्ला रोखणाऱ्या आपल्या जवानांचा आणि सुरक्षा यंत्रणेचा अभिमान वाटतो. कोणत्याही दुष्ट शक्तींना पराभूत करण्यास आपले लष्कर सक्षम आहे, असा विश्‍वास मी देशवासीयांना देतो.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैशे महंमदचा सहभाग नाकारता येणार नाही. पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांशी आम्हाला शांततामय संबंध हवे आहेत. मात्र भारतावर झालेल्या कोणत्याही हल्ल्याला तोडीस तोड उत्तर मिळेल. 

- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानबाबतच्या धोरणाला हे पहिले मोठे आव्हान मिळाले आहे. चर्चा आणि दहशतवादाच्या आपल्या भूमिकेच्या पुढे जाऊन भाजपने विचार करण्याची गरज आहे.

- उमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू- काश्‍मीर

एका बाजूला आमचे सरकार पाकिस्तानशी शांततेच्या गोष्टी करत आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले करण्यात येत आहेत. पठाणकोट हल्ला म्हणजे नरेंद्र मोदींना पाकिस्तान दौऱ्याची दहशतवाद्यांकडून देण्यात आलेली भेट आहे. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे.
- संजय राऊत, शिवसेना खासदार
ही वेळ केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्‍न उपस्थित करण्याची नाही. आम्ही भारतीय सैन्यासोबत आहोत.
- लालूप्रसाद यादव, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष

 

[पीटीआय]