For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

मिरारोड - काश्‍मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना अवघ्या 29 व्या वर्षी वीरमरण आले. कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर गुरूवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मिरारोड येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी "कौस्तुभ राणे अमर रहे'च्या घोषणा नागरिकांनी दिल्या. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील असलेले कौस्तुभ राणे हे मीरारोड येथील रहिवासी होते. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

उत्तर काश्‍मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्‍टरमध्ये दहशतवादी एलओसी (नियंत्रण रेषा) पार करुन घुसखोरी करणार असल्याची माहिती 7 ऑगस्टच्या रात्री उशिरा सैन्याला मिळाली होती. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 29 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह मनदीप सिंग रावत, हमीर सिंग, विक्रम जीत सिंग हे जवान शहीद झाले.

मिरारोड भागात कौस्तुभ राणे लहानाचे मोठे झाले. येथील हॉली क्रॉस शाळेत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. कौस्तुभ यांच्या घरातील कोणीही लष्करात नव्हते. कौस्तुभ यांचे वडील टाटा कंपनीत कार्यरत होते, तर आई ज्योती राणे मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या उत्कर्ष मंदिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आहेत. सध्या दोघेही निवृत्त आहेत.
कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका मुलाला घेऊन गावी गेल्या होत्या, तर आई-वडीलही गावी जायच्या तयारीत होते.

मात्र कौस्तुभ यांच्या शहीद झाल्याच्या वृत्ताने राणे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. यंदा कौस्तुभ यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

इतिहास जमा होणार 'पोस्टमन' हा शब्द

आतापर्यंत तुमच्याकडे टपाल आणणारे पोस्टमन यापुढे हे काम करणार नाहीत. तर टपाल घेऊन येण्याचे काम पोस्टपर्सन करणार आहेत. पोस्टमनचे नाव बदलून त्यांना 'पोस्टपर्सन' असा शब्द देण्यावर सध्या सरकार दरबारी विचार सुरू आहे.

माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीने या नामांतराची शिफारस केली आहे. त्यावर हा बदल करण्याबाबत विचार सुरू असल्याचे टपाल खात्याने समितीला कळविले आहे. तसेच पोस्टमनसाठी हिंदीत असलेला शब्द 'डाकिया' हा लिंग-निरपेक्ष असल्याचेही खात्याने सांगितले आहे.

भाजपचे खासदार अनुराग ठाकुर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. टपाल खात्याच्या अनुदान मागणीवरील आपल्या अहवालात समितीने टपाल पोचविणाऱ्या व्यक्तींसाठी वापरण्यात येणारी शब्दावली मागविली होती. त्यातच पोस्टमनला पर्याय म्हणून पोस्टपर्सन हा शब्द वापरण्याची शिफारस करण्यात आली.

मंगळवारी या समितीचा अहवाल संसदेपुढे ठेवण्यात आला. टपाल खात्यात पोस्टमन आणि पोस्टवुमेन हे दोघेही काम करतात. मात्र पोस्टमन हा शब्द केवळ पुल्लिंगवाचक आहे. त्यामुळे हा शब्द बदलण्यासाठी गरज असल्याचे समितीने म्हटले आहे. डाकिया हा शब्द लिंग-निरपेक्ष असल्याबाबतही समितीने संमती व्यक्त केली आहे.

केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय; वाहतूक पोलिसांना मूळ कागदपत्र दाखवण्याची गरज नाही

नवी दिल्ली - केंद्र सरकारने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि वाहतूक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्र घेऊ नका असा आदेश दिला असल्यामुळे यापुढे आता वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रे सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी फक्त तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे.

वाहतूक मंत्रालयाने वाहतूक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत आदेश दिला आहे की, तपासणीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत वाहतूक पोलीस चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्र जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

वाहतूक पोलीस अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवणे, वाहतूक सिग्नल तोडणे तसंच गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणी कारवाई करत कागदपत्र जप्त करतात. पण ही कागदपत्र अनेकदा पोलिसांकडून गहाळ होतात. अशा वेळी आपली कागदपत्र पुन्हा मिळवण्यासाठी लोकांनी तक्रार करुनही वाहतूक विभाग ती मिळवू शकलेला नाही. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ई डेटाबेसच्या आधारे पोलीस संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची मूळ प्रत जमा करण्याची काहाही गरज नाही.

महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली : 'भारत छोडो' आंदोलन, गोवा मुक्ती, हैद्राबाद मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे सन्मान करण्यात आला. क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या 76 व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

सन्मान झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील देवप्पा खोत, नागपूर जिल्ह्यातील गणपतराव गभणे, परभणी जिल्ह्यातील डॉ.अवधूत डावरे आणि वसंत अंबुरे, मुंबईतील गदाधर गाडगीळ आणि अनंत गुरव, पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, वसंत प्रसादे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वसंतराव माने या स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यसैनिक देवाप्पा खोत हे सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील आहेत. सध्या 99 वर्षाचे आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात श्री.खोत यांनी कुपवाड सेंटर (चावडी) येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहभाग घेतला होता. कुपवाड येथून जवळ असणारे माधवनगर येथे रेल्वेरुळ त्यांनी उद्धवस्त केले होते. तसेच तत्कालीन धुळे कोषागार कार्यालयालाही हानी पोहोचविली होती.

आता वाहनपरवाना पोलिसांना दाखविण्याची नाही गरज !

 

 

Now there is no need to show the vehicle ownership to the police

नवी दिल्ली : वाहतूक पोलिसांकडून अनेकदा वाहनांची कागदपत्रे आणि वाहनपरवानाची मागणी केली जात असे. या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास संबंधित वाहनचालकाला दंड आकारला जात असे. मात्र, आता यापुढे पोलिसांना वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करता येणार नाही.

माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल करण्यात आल्याने आता यापुढे वाहतूक पोलिसांना वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करता येणार नाही. याबाबत परिवहन मंत्रालयानेही अध्यादेश जारी केला असून, यामध्ये डिजिलॉकर किंवा एम- परिवहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत.

यापूर्वी अनेकदा वाहनांची कागदपत्रे, वाहनपरवाना, पीयूसी, इन्शुरन्स कागदपत्रेसोबत ठेवणे शक्य होत नव्हते. यामुळे वाहतूक पोलिसांनी अडविल्यास नाहक त्रास भोगावा लागत होता. तसेच भुर्दंडही भरावा लागत होता. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.

वाहन क्रमांकावरून पोलिस त्यांच्या मोबाईल अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा वाहनचालकांसह पोलिसांनाही होणार आहे.

दरम्यान, एम- परिवहन हे अॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध असून, येत्या 10 दिवसांत ते आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

वृत्तसंस्था 

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना साश्रू नयनांनी निरोप

मुंबई - काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (29) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मीरा रोडच्या वैकुंठपार्क स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

"धीरल सागर' इमारतीबाहेर हुतात्मा राणे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच रांग लागली होती. सकाळी पावणेदहाच्या सुमारास लष्कराच्या सजवलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा निघाली.

अंत्ययात्रा मार्गस्थ होत असताना चौकाचौकांत नागरिक सहभागी होत होते. शीतल नगर परिसरात पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मीरा रोड स्थानक परिसरापर्यंतचा संपूर्ण रस्ता फुलांच्या पाकळ्यांनी सजवला होता. अंत्ययात्रा मार्गस्थ होत असलेले दोन्ही बाजूंकडील रस्ते वाहनांसाठी बंद होते. दुकानदार दुकाने बंद करून अंत्ययात्रेत सहभागी झाले.

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीचे राणे कुटुंब 30 वर्षांपासून मीरा रोड परिसरात राहत आहे. कौस्तुभ यांच्या मागे आई, वडील, पत्नी, बहीण, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. गढवाल रायफल्स युनिटचे दक्षिण-पश्‍चिम कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल चेरीश माथसन यांच्या नेतृत्वाखाली राणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक नवीन बजाज, ठाणे ग्रामीण पोलिस आणि लष्कराच्या तिन्ही दलांच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली.

बहिणींकडून शेवटची राखी
मेजर कौस्तुभ राणे यांना एक लहान सख्खी बहीण व चार चुलत बहिणी आहेत. ते लष्करात गेल्यापासून बहिणी टपालाने राखी पाठवत. काही दिवसांवर आलेल्या राखीपौर्णिमेसाठी आपल्या लाडक्‍या भावाला आता राखी पाठविता येणार नसल्यामुळे त्यांनी कौस्तुभला आवडत असलेले कॅडबरी चॉकलेट व राखीची भेट देत अखेरचा निरोप दिला. ते पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले.

शुक्रवार, २० जुलै, २०१८

जमावाकडून होणारी हत्यासत्रे थांबवण्यासाठी नवीन कायदा करा

सर्वोच्च न्यायालयाची सरकारला सूचना
नवी दिल्ली - देशात जमावाकडून काही व्यक्तींना ठार मारण्याच्या घटना अलिकडच्या काळात घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी संसदेने नवीन कायदा तयार करावा अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज ही सूचना करताना असे प्रकार रोखण्यासाठी तसेच गायींच्या हत्येवरून होणारे हल्ले थांबवण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाहीं जारी केल्या आहेत.

राज्यात कोणालाही कायदा हातात घेऊ न देण्याची जबाबदारी राज्य सरकारांना स्वीकारावी लागेल व असे प्रकार त्यांनी रोखावेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणे ही सर्वस्वी राज्य सरकारांचीच जबाबदारी आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे. लोकांना कायदा हातात घ्यायला लावता कामा नये आणि लोकांनीही स्वताच कायदा असल्याच्या थाटात वागू नये असेही न्यायालयाने सुनावले आहे. जमावाकडून होणारे हल्ल्यांचे प्रकार अलिकडे वारंवार होत आहेत त्या प्रकारांना पोलादी हातानेच रोखले पाहिजे. राज्य सरकारांना या प्रकारांविषयीची जबाबदारी टाळता येणार नाही असेही न्यायालयाने नमूद केले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद असलेला नवीन कायदा संसदेनेही संमत केला पाहिजे अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.

लष्करी विधि महाविद्यालय देशात सर्वोत्कृष्ट होईल

लेफ्ट. जनरल डी.आर. सोनी : विक्रमी वेळेत सुरू झाले कॉलेज

पुणे - फक्‍त पाच महिन्यांत महाविद्यालय सुरू करणे कठीण होते. परंतु, असाध्य गोष्टीदेखील उत्कृष्टपणे साध्य करणे, हीच सैन्याची खासियत आहे. त्यामुळे विक्रमी वेळेत हे लष्करी विधि महाविद्यालय उभारणे साध्य झाले, अशा शब्दांत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी जवानांचे कौतुक केले. तसेच पुढील पाच वर्षांत हे महाविद्यालय हे देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय बनेल, असा विश्‍वासही सोनी यांनी व्यक्त केला.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे सैनिक कल्याण उपक्रमांतर्गत लोणावळा जवळील कान्हे येथे "आर्मी लॉ कॉलेज'चे लेफ्टनंट जनरल सोनी यांच्या हस्ते उद्‌घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायायाधीश डी. जी. कर्णिक, राधा कालियनदास दर्याननी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रेम दर्याननी, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, लॉ कॉलेजचे अध्यक्ष ए. के. शुक्‍ला उपस्थित होते.

सोनी म्हणाले, "मुले ही देशाचे भविष्य आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल असे शिक्षण या महाविद्यालयात दिले जाणार आहे. सुरवातीला 60 मुले याठिकाणी प्रशिक्षण घेतील. सध्या प्रत्येक क्षेत्रात "कॉर्पोरेटायझेशन' होत आहे. अशा स्पर्धेच्या युगात या महाविद्यालयाचे विद्यार्थी टिकून राहावे, यासाठी बी.बी.ए. आणि एल.एल.बी अशाप्रकारचा अभ्यासक्रम देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त संस्थेत क्रीडा सुविधादेखील उभारल्या जाणार आहेत.

कर्णिक म्हणाले, "लष्करी कुटुंबातील मुलांसाठी स्वतंत्र विधि महाविद्यालय सुरू होणे अभिमानाची गोष्ट आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी "त्यांच्या पालकांचे शस्त्र हे बंदूक आहे तर तुमच्याकडे पेन आणि भाषा हे शस्त्र आहे,' ही बाब नेहमी लक्षात ठेवावी. तसेच आपल्या शस्त्रांचा योग्य वापर करावा.'

दर्याननी म्हणाले, "सैन्य दलास उपयुक्त अशाप्रकारे पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी ही जागा देण्यात आली आहे. फक्‍त पाच महिने इतक्‍या कमी वेळात महाविद्यालयाची उभारणी करणे आव्हान होते. पण लष्कराने नियोजनबद्ध पद्धतीने कमी वेळेत काम पूर्णत्वास नेले. या माध्यमातून समाज हा लष्कराच्या सदैव पाठीशी आहे, हाच संदेश द्यायचा आहे.'

सर्वसामान्य विद्यार्थीही घेऊ शकतील प्रवेश

लष्करी विधि महाविद्यालयात सध्या फक्‍त लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. गुणवत्तेच्या आधारावर ही निवड करण्यात आली आहे. मात्र, आगामी काळात संस्थेचा विस्तार करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसोबतच प्रशासकीय पातळीवर विविध बदल केले जातील. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही या संस्थेतून शिक्षण घेऊ शकतील. मात्र त्यांची निवडदेखील गुणवत्तेच्याच आधारावर होणार आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल सोनी यांनी दिली.

Dailyhunt

लष्करात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही

 

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली - लष्करातील सर्व विभाग आणि देशभरातील तळांवर नेमून दिलेल्या शिस्तपालन उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात देशभरातील 12 लाख लष्करी जवानांशी लष्कर प्रमुखांनी संवाद साधला. त्यावेळी शिस्तभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत.

सुरक्षा दलांनी आपल्या उपलब्ध अर्थिक स्रोतांचा न्याय्य मार्गाने उपयोग व्हायलाच पाहिजे. तसेच सुरक्षा दलांना मिलीटरी कॅन्टीनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या किराणा सामान आणि मद्यसुविधेचा गैरवापर केला जाऊ नये. भ्रष्टाचार आणि नैतिक तापटपणाशी संबंधित प्रकरणांची कठोरपणे दखल घ्यायला हवी. अधिकाऱ्यांनी पदोन्नती आणि बढतीसाठी केवळ चकचकीतपणावर विसंबून रहायला नको. जे बढती आणि पदोन्नतीस पात्र आहेत त्यांना योग्य मोबदला मिळेल, अशी हमी देखील लष्कर प्रमुखांनी दिली आहे. पात्र लष्करी अधिकाऱ्यांशिवाय कोणाही निवृत्त अधिकाऱ्यासह सहायक सेवा दिली जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

लष्करातील 12 लाख जवानांच्या शारीरिक सुदृढतेवर लष्कर प्रमुखांनी विशेष भर दिला. जवानांनी आरोग्यास अपायकारक अन्नाचे सेवन करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. शिस्तीचे हे निकष गेल्या काही दशकांपासून अस्तित्वात आहे. लष्कर प्रमुख जन. रावत यांनी या निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बुधवार, १८ जुलै, २०१८

लष्कराचे काश्‍मीरात लोकाभिमुखच धोरण

लष्कर प्रमुखांचा दावा
नवी दिल्ली - जम्मू काश्‍मीरात राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर लष्कराच्या तेथील भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, आमची तेथील भूमिका नेहमीप्रमाणे लोकाभिमुख स्वरूपाचीच आहे असे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे. आमचे तेथील धोरण हे दहशतवाद्यांचा नायनाट करायचा हे आहे. तेथील सामान्य नागरीकांना त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेऊ असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यपाल राजवटीनंतर लष्कराने तेथे आक्रमकपणा स्वीकारला आहे या म्हणण्यात तथ्य नाही असेही त्यांनी आज येथे, पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की राज्यपाल राजवटीनंतर काश्‍मीरातील लष्कराचे धोरण कठोर झाले आहे असे सर्व साधारण चित्र रंगवले जात आहे पण त्यात तथ्य नाही.

लष्करप्रमुखांनी आज येथे बारामुल्ला येथील विद्यार्थ्यांशीही चर्चा केली. त्यात पाच विद्यार्थींनींचाही समावेश होता. काश्‍मीरातील दगडफेक आणि दहशतवादी कारवाया थांबल्या तर आपल्याही परिसराचा दिल्ली किंवा देशातील अन्य मोठ्या शहरांप्रमाणे विकास होऊ शकतो हा संदेश हे विद्यार्थी आता येथून काश्‍मीरात नेतील असा विश्‍वासही जनरल रावत यांनी यावेळी व्यक्त केला

सोमवार, ९ जुलै, २०१८

दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्याला 2 वर्ष पूर्ण; काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक उपाय

श्रीनगर : भारतीय लष्कराने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला 8 जुलै 2016 रोजी कंठस्नान घातले होते. या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शिवाय, इंटरनेट सेवादेखील बंद ठेवली आहे. तर दुसरीकडे, दहशतवाद्यांनी बंदची हाक दिल्यानं आज एका दिवसासाठी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक एस.पी.वैद यांनी सांगितले की, सध्या जम्म काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाहीय. त्यामुळे भाविकांना सुरक्षितरित्या अमरनाथा यात्रा करता यावी, यासाठी आम्ही सर्वेतोपरी प्रयत्न करत आहोत. दहशतवाद्यांकडून रविवारी बंदची हाक देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे एक दिवसासाठी आम्ही यात्रा थांबवली आहे. काश्मीर खोऱ्यातील तणावाची स्थिती पाहता, भाविकांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी बुरहान वानी यांच्या खात्मा करण्याच्या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाई होण्याचा धोका लक्षात घेता श्रीनगर हायवेपासून 300 किलोमीटर परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रन्ट (जेकेएलएफ) चा अध्यक्ष यासीन मलिकलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दक्षिण काश्मीरमधील एका गावात शोधमोहीमेदरम्यान शनिवारी जमावानं सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक केली. यावेळी जवानांनी प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, शोपिया, अनंतनाग आणि पुलवामामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

8 जुलै 2016ला बुरहान वानीचा खात्मा
भारतीय लष्करानं 8 जुलै 2016 ला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरात बुरहान वानीचा खात्मा केला होता. त्राल येथील रहिवासी असलेल्या बुरहान वानीला चकमकीदरम्यान कंठस्नान घालण्यात आले. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय म्हणून ओळखला जायचा. त्याच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी हिंसक निदर्शनं करण्यात आली होती.

रविवार, ८ जुलै, २०१८

दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्याला 2 वर्ष पूर्ण; काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक उपाय

श्रीनगर : भारतीय लष्कराने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला 8 जुलै 2016 रोजी कंठस्नान घातले होते. या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शिवाय, इंटरनेट सेवादेखील बंद ठेवली आहे. तर दुसरीकडे, दहशतवाद्यांनी बंदची हाक दिल्यानं आज एका दिवसासाठी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक एस.पी.वैद यांनी सांगितले की, सध्या जम्म काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाहीय. त्यामुळे भाविकांना सुरक्षितरित्या अमरनाथा यात्रा करता यावी, यासाठी आम्ही सर्वेतोपरी प्रयत्न करत आहोत. दहशतवाद्यांकडून रविवारी बंदची हाक देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे एक दिवसासाठी आम्ही यात्रा थांबवली आहे. काश्मीर खोऱ्यातील तणावाची स्थिती पाहता, भाविकांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी बुरहान वानी यांच्या खात्मा करण्याच्या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाई होण्याचा धोका लक्षात घेता श्रीनगर हायवेपासून 300 किलोमीटर परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रन्ट (जेकेएलएफ) चा अध्यक्ष यासीन मलिकलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दक्षिण काश्मीरमधील एका गावात शोधमोहीमेदरम्यान शनिवारी जमावानं सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक केली. यावेळी जवानांनी प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, शोपिया, अनंतनाग आणि पुलवामामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

8 जुलै 2016ला बुरहान वानीचा खात्मा
भारतीय लष्करानं 8 जुलै 2016 ला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरात बुरहान वानीचा खात्मा केला होता. त्राल येथील रहिवासी असलेल्या बुरहान वानीला चकमकीदरम्यान कंठस्नान घालण्यात आले. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय म्हणून ओळखला जायचा. त्याच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी हिंसक निदर्शनं करण्यात आली होती.

बुधवार, १६ मे, २०१८

मुलासाठी फौजी लढतोय अन्‌ रडतोयही!

सकाळ वृत्तसेवा

मंगळवार, 15 मे 2018

indian-army-soldier

पुणे - फौजी... फौजी... म्हणत आपण सगळे जण मोठ्या अभिमानाने ‘इंडियन आर्मी’चे गुणगान करतो. पुणे तर लष्कराचे दक्षिण मुख्यालय. अनेक पराक्रमी अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेले शहर. पण, याच शहरात एक फौजी आपल्या सात वर्षांच्या पिलाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी गेली आठ दिवस एकाकी ‘लढत’ होता अन्‌ रडतही होता.

काश्‍मीरमधल्या गुलमर्ग येथे ‘ड्यूटी’ करणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) हा सैनिक. वजा दहा अंश सेल्सिअस तापमानात, बर्फामध्ये पाय रोवून देशाची सीमा अभेद्य ठेवणारा हा जवान.

पुणे - फौजी... फौजी... म्हणत आपण सगळे जण मोठ्या अभिमानाने ‘इंडियन आर्मी’चे गुणगान करतो. पुणे तर लष्कराचे दक्षिण मुख्यालय. अनेक पराक्रमी अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेले शहर. पण, याच शहरात एक फौजी आपल्या सात वर्षांच्या पिलाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी गेली आठ दिवस एकाकी ‘लढत’ होता अन्‌ रडतही होता.

काश्‍मीरमधल्या गुलमर्ग येथे ‘ड्यूटी’ करणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) हा सैनिक. वजा दहा अंश सेल्सिअस तापमानात, बर्फामध्ये पाय रोवून देशाची सीमा अभेद्य ठेवणारा हा जवान.

सीमेवर सातत्याने होणाऱ्या ‘फायरिंग’मुळे सुटी मिळणे अवघड. कशीबशी दहा दिवस सुटी घेऊन हा जवान कोल्हापूर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी आला. घरी येताच पिलाला आपल्या छातीशी कवटाळत तो म्हणाला, ‘‘मी आलोय तुला काही होऊ देणार नाही.’’

या फौजीने मुलाच्या उपचारांसाठी पुणे गाठले. सुरवातीला ससून रुग्णालयात आला. तेथे ‘वेटिंग लिस्ट’ होती. पण, फौजीला परत ‘ड्यूटी’वर जायचे असल्याने त्याची पावले खासगी रुग्णालयाकडे वळली. ‘सेंट्रल गव्हर्न्मेंट हेल्थ स्किम’मधून (सीजीएचएस) ही शस्त्रक्रिया करता येणार होती. त्यासाठी त्याने कागदपत्रांची जुळवाजुळव केली. पुण्यातील कर्वे रस्त्यावरील रुग्णालयात तपासण्या झाल्या. तेथे ऑपरेशन करण्याचे ठरले. मुलाला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केले. पण, त्या वेळी ३५ हजार रुपये भरण्याचे फर्मान रुग्णालय प्रशासनाने सोडले. ‘सीजीएचएस’मधून पैसे मिळणार असूनही हे जास्तीचे पैसे का, या फौजीच्या प्रश्‍नाला उत्तर देताना रुग्णालय प्रशासनाने सांगितले, की ‘‘ऑपरेशनसाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च येणार आहे. ते तुमचे ३५ हजार रुपयांमध्ये करत आहोत.’’

या उत्तरावर कोणताही प्रश्‍न न करता फौजी परत गावी आला. चार-पाच दिवसांमध्ये पैशाची जुळवाजुळव केली. जमा झालेले २५ हजार रुपये घेऊन तो परत रुग्णालयात आला. रुग्णालयाने २० हजार रुपये जमा करून घेतले. त्याच्या मुलाचे ऑपरेशन आता झाले आहे. त्याची प्रकृतीही सुधारत आहे. पण, आता फौजी मात्र राहिलेली रक्कम उभारण्यासाठी ‘लढत’ आहे.

...अन्‌ तो मनोमन कोसळला
‘‘तुम्ही ऑपरेशन करा मी पैसे भरतो. मी फौजी आहे. तुमचे सगळे पैसे देतो. पण, जास्तीचे पैसे घेऊ नका.’’ या फौजीच्या वाक्‍यावर प्रशासनाचा कारभार सांभाळणारे डॉक्‍टर म्हणाले, ‘‘तू कोण आहेस हे सांगू नकोस, पैसे भर आणि मुलाचे ऑपरेशन कर.’’ शत्रूचा अचूक वेध घेणारा हा जवान या वाक्‍याने मनातून कोसळला. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. अखेर, दुसऱ्या एका डॉक्‍टरांच्या मध्यस्थीने त्याला तात्पुरता दिलासा मिळाला.

सोमवार, १४ मे, २०१८

३७ वैमानिक देशसेवेत : लष्करी थाटात एव्हिएशन विंग प्रदान

अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत कौशल्याचा वापर करत भारतीय सैन्यदलासाठी उत्कृष्ट योगदान द्यावे. लढाऊ वैमानिकापुढे आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णायक भूमिका बजावण्याचे आव्हान असते, त्यामुळे आपले महत्त्व ओळखून स्वत:ला सिद्ध करत अभिमानास्पद कामगिरी बजवावी, असा गुरुमंत्र ‘आर्मी एव्हिएशन विंग्ज’चे संचालक लेफ्टनंट जनरल कंवलकुमार यांनी दिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: May 13, 2018 12:15 AM | Updated: May 13, 2018 12:15 AM

37 Airliner Country Service: Provided Army Thackeray Avenition Wing | ३७ वैमानिक देशसेवेत : लष्करी थाटात एव्हिएशन विंग प्रदान

नाशिक : अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत कौशल्याचा वापर करत भारतीय सैन्यदलासाठी उत्कृष्ट योगदान द्यावे. लढाऊ वैमानिकापुढे आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णायक भूमिका बजावण्याचे आव्हान असते, त्यामुळे आपले महत्त्व ओळखून स्वत:ला सिद्ध करत अभिमानास्पद कामगिरी बजवावी, असा गुरुमंत्र ‘आर्मी एव्हिएशन विंग्ज’चे संचालक लेफ्टनंट जनरल कंवलकुमार यांनी दिला. ‘हॅप्पी लॅण्डिंग’ या शब्दात देशसेवेत दाखल झालेल्या लढाऊ वैमानिकांना उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.  निमित्त होते गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ हेलिकॉप्टरच्या प्रशिक्षणार्थींच्या २९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे. शनिवारी (दि.१२) सैनिकी ब्रास बॅण्डच्या ‘कदम कदम बढाये जा...’च्या धूनवर ३७ प्रशिक्षणार्थी वैमानिकांनी उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार संचलन करत उपस्थित उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कंवलकुमार यांच्या हस्ते ३७ वैमानिकांसह लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांच्या प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाºया दहा अधिकाºयांना एव्हिएशन विंग, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  यावेळी कंवलकुमार पुढे म्हणाले, धाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक नेहमीच यशस्वी ठरतो. राष्टÑसेवेसाठी ‘एव्हिएशन स्कूल’च्या उत्कृष्ट अशा व्यासपीठावरून तुमचे भारतीय सैन्यदलात आगमन झाले आहे, त्याचा अभिमान बाळगावा. नव्या हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितरीत्या उड्डाण करत चोखपणे आपली कामगिरी बजवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी उपचारार्थ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ विमानचालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थी जवानांना देण्यात आले. या प्रशिक्षणार्थी जवानांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला.
‘आॅपरेशन विजय’मधून युद्धभूमीचा थरार
युद्धजन्य परिस्थितीमध्ये भूदलावरील जवानांना महत्त्वाची मदत देण्यासाठी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे कौशल्य अधोरेखित करण्यासाठी हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी ‘आॅपरेशन विजय’ची झलक उपस्थितांना दाखविण्यात आली. चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने युद्धभूमीवर तत्काळ पॅराशूटद्वारे उतरणाºया सैनिकांसह पोहचणारे जवान, चेतक द्वारे त्यांना पुरविण्यात आलेली रसद आणि शत्रूच्या छावण्यांवर सैनिक हल्ला चढवितात. अल्पवधीत शत्रूवर विजय मिळवून सैनिक आनंदाने तिरंगा फडकावून सलामी देतात. या आॅपरेशनमध्ये जखमी झालेल्या सैनिकांना पुन्हा ‘चेतक’द्वारे सुरक्षितरीत्या युद्धभूमीवरून हलविले जाते.
प्रशिक्षण दृष्टिक्षेपात
१८ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी वैमानिक लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे धडे घेतात. युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर वापराचे कसब, शत्रूवर हवाई हल्ल्याच्या वेळी हेलिकॉप्टरचा वापर, भूदलाला वेळोवेळी विविध आव्हानांचा सामना करत रसद पुरविणे, जखमी जवानांना युद्धभूमीवरून तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविणे अशा अनेकविध बाबींचा तंत्रशुद्ध अभ्यास करत प्रत्यक्षरीत्या सरावातून वैमानिक लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे प्रशिक्षण घेत असतात.
लष्करी थाटात ३७ वैमानिकांसह दहा प्रशिक्षकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र आर्मी एव्हिएशनचे संचालक अतिविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट कंवल कुमार यांनी प्रदान केले.  चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिकांनी रंगलेला ‘कॅट्स’चा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात पार पडला. वैमानिक प्रशिक्षण कालावधीत अष्टपैलू कामगिरी के ल्याबद्दल अभिषेक सिंग यांना सिल्व्हर चित्ता, तर उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून मेजर राज सिंग यांना गौरविण्यात आले.
यांचा झाला गौरव
उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींमध्ये कॅप्टन विवेक आनंद गुप्ता, कॅप्टन बी. के. रेड्डी, कॅप्टन दत्ता यांच्यासह एव्हिएशन प्रशिक्षक मेजर प्रियांक पुरी, मेजर निखिल टेटिया, उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून मेजर राज सिंग यांना गौरविण्यात आले. त्यांना सन्मानपूर्वक विविध स्मृतिचिन्ह व पदक प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी दिली जाणारी ‘सिल्व्हर चित्ता’ ट्रॉफी कॅप्टन अभिषेक सिंग यांनी मिळविली.

रविवार, ८ एप्रिल, २०१८

जवानाकडून गरीब विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप

राजेंद्र पाटील बुधवार, 4 एप्रिल 2018

Jalgaon

देशाच्या सीमेवर उभे राहून सरक्षण करणारे अविनाश पाटील हे सुटिवर गावी आले आहेत. गावी आल्यानंतर देखील त्यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायने शाळेत येताना पाहिले. त्यांना चप्पल देण्याचा निश्यय केला.

जळगाव : नांद्रा (ता.पाचोरा) जवळील आसनखेडा येथील जि.प.मराठी शाळेत येथील सिमा सुरक्षा बलातील जवान बाबुलाल दौलत पाटील यांचे चिरंजीव अविनाश बाबुलाल पाटील (बीएसएफ) यांनी आज शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना ज्यांना चपला नाहीत. जे अनवाणी पायाने उन्हाचे चटके सहन करुण शाळेत येतात. अशा गरजु विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप केले. साधारण पन्नास विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला.

देशाच्या सीमेवर उभे राहून सरक्षण करणारे अविनाश पाटील हे सुटिवर गावी आले आहेत. गावी आल्यानंतर देखील त्यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायने शाळेत येताना पाहिले. त्यांना चप्पल देण्याचा निश्यय केला. त्यानुसार आज शाळेतील मुलाना चप्पल वाटप केल्या. चपला भेटल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहेरावरील आनंद पहाण्यासारखा होता.

यावेळी उपसरपंच कैलास पाटील, हिमंत पाटील, विजय पाटील, संभाजी पाटील, डाँ.राजेंद्र बोरसे, सयाजी पाटील, लक्ष्मण पाटील, नांद्रा ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी, पोलीस पाटील किरण पाटील, अंगणवाडी सेविका ,जि.प.शाळेतील मुख्यध्यापक संगिता पाटीलउपशिक्षक नाना पवळ, जयवंत खैरनार, निलीमा चव्हाण, वैशाली पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

http://www.esakal.com/uttar-maharashtra/jawan-distribute-chappals-jalgaon-107453

जवानांसाठी ‘भाभा कवच’ मंगेश सौंदाळकर

barc

मुंबई - डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने हलक्‍या वजनाच्या, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बुलेटप्रूफ जॅकेट्‌सची निर्मिती केली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या जॅकेट्‌सना ‘भाभा कवच’ असे नाव देण्यात आले आहे. ही जॅकेट्‌स आयात करून आणलेल्या महागड्या जॅकेट्‌सपेक्षा मजबूत असतील.

मुंबई - डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने हलक्‍या वजनाच्या, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बुलेटप्रूफ जॅकेट्‌सची निर्मिती केली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या जॅकेट्‌सना ‘भाभा कवच’ असे नाव देण्यात आले आहे. ही जॅकेट्‌स आयात करून आणलेल्या महागड्या जॅकेट्‌सपेक्षा मजबूत असतील.

सध्या जवान वापरत असलेली जॅकेट्‌स दहा किलोपेक्षा अधिक वजनाची आहेत. जड वजनाचे हे जॅकेट घालून सीमेवर दहशतवाद्यांशी दोन हात करताना जवानांना काही अडचणी येतात. हल्ली दहशतवाद्यांनी चिनी बनावटीची, अत्यंत कठीण स्टीलचे आवरण असलेली काडतुसे वापरण्यास सुरवात केली आहे. ती काडतुसे या जॅकेटना छेदून जात असल्याची बाब केंद्रीय गृह विभागाच्या निदर्शनास आली होती. दहशतवादी संघटनांनी काही दिवसांपासून  पोलिस, जवानांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षी जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे ‘जैश’च्या दहशतवाद्यांशी लढताना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पाच जवान हुतात्मा झाले होते. त्याची गंभीर दखल घेत गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जॅकेट्‌सचे वजन कमी करण्याबाबत अणुऊर्जा विभागाच्या सचिवांशी चर्चा केली.

जॅकेटची वैशिष्ट्ये
डॉ. किंशूक दासगुप्ता यांच्या चमूने लेव्हल तीनचे एक, लेव्हल तीन प्लसची दोन जॅकेट्‌स तयार केली.
लेव्हल तीनच्या जॅकेटचे वजन साडेचार किलो तर लेव्हल तीन प्लसच्या जॅकेटचे वजन साडेसहा किलो आहे.
लेव्हल तीन प्लसचे जॅकेट एके-४७ रायफलच्या गोळ्यांचा तसेच चिनी बनावटीच्या काडतुसांचा मारा रोखू शकते.
लेव्हल तीन प्लसच्या पुढील भागात बसविण्यात आलेल्या प्लेटमुळे जवानांना गोळीचा सौम्य झटका बसेल.
जॅकेटचे वजन कमी असल्याने जवानांना गोळीबार करताना अडचणी येणार नाहीत.

http://www.esakal.com/maharashtra/production-bulletproof-jackets-make-india-108117

सोमवार, २ एप्रिल, २०१८

रेशनकार्डाचीही पोर्टेबिलिटी

डॅनियल काळे :08.23 AM

कोल्हापूर - ज्याप्रमाणे मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलता येते म्हणजे पोर्टेबिलिटी करता येते, तशाच प्रकारे यापुढे कोणत्याही शिधावाटप दुकानात तुमचे रेशनकार्ड चालणार आहे. त्यामुळे या राज्यातून दुसऱ्या राज्यात अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर झाले तरीही आधीचे कार्ड रद्द करून नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.

कोल्हापूर - ज्याप्रमाणे मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलता येते म्हणजे पोर्टेबिलिटी करता येते, तशाच प्रकारे यापुढे कोणत्याही शिधावाटप दुकानात तुमचे रेशनकार्ड चालणार आहे. त्यामुळे या राज्यातून दुसऱ्या राज्यात अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर झाले तरीही आधीचे कार्ड रद्द करून नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.

या व्यवस्थेसाठी सरकार एकीकृत व्यवस्थेवर (आयएमपीडीएस) सध्या काम करत आहे. ही पद्धत महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणासह काही राज्यांत अंशतः लागू आहे. अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या माहितीनुसार येत्या दोन वर्षांत ही आयएमपीडीएस नावाची योजना सर्वत्र लागू होणार आहे. त्यासाठी १२७ कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार करणार आहे.

देशव्यापी पोर्टेबिलिटीशिवाय अतिरिक्त डुप्लिकेट रेशनकार्ड रद्द करण्याचेही काम त्याखाली केले जाईल.  सार्वजनिक वितरणप्रणाली राज्याच्या पोर्टल्सला जोडण्याबरोबरच रेशन कार्डचे व्यवस्थापन, वितरण, पुरवठा व रेशन दुकानांच्या स्वयंचलनाचे कामही याअन्वये केले जाईल.

पार्टेबिलिटी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी देशभरातील रेशन दुकानदारांची आणि कार्डांची संख्या पाहिली तर हे खूपच मोठे आव्हान आहे. यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊन गुंता निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सरकारने रेशन दुकानदार, ग्राहकांना  विश्‍वासात घेऊनच ही यंत्रणा अमलात आणावी.
- चंद्रकांत यादव,
रेशन बचाव आंदोलक

रेशन दुकानात आधार सक्तीचे
रेशन दुकानात स्वस्त धान्य मिळविण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत.ज्या कार्डधारकांकडे आधार कार्डच नाही, अशा नागरिकांना ३० जूनपर्यंतच मुदत दिली आहे. या काळात त्यांनी आधार कार्ड काढून घ्यायचे आहे. अन्यथा यापुढे आधार कार्डशिवाय रेशनधान्य मिळणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

 

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर तुमीरकसा गाव झाले प्रकाशमय

अहेरी - तुमरीकसा येथे वीजयंत्रणा सुरू करताना महावितरणचे कर्मचारी.

अहेरी - तालुक्‍यापासून २२ किमीवर असलेल्या अतिदुर्गम व संवेदनशील भागात वसलेल्या तुमीरकसा गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अथक प्रयत्नातून वीज पोहोचली आहे. यामुळे गाव प्रकाशमय झाले आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीपीटीसी)अंतर्गत २०१७-१८ या वर्षाकरिता निधी मंजूर करून अहेरी उपविभागातील गावात वीज पोहोचविण्यासाठी पालकमंत्री आत्राम यांनी पुढाकार घेतला. मागील १५ दिवसांपूर्वीच कासमपल्ली व गुर्जा या गावांत वीजजोडणी करण्यात आली. शनिवारी (ता. ३१) अतिदुर्गम व संवेदनशील भागात पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या तुमीरकसा या  गावात पालकमंत्र्यांचा सूचनेनुसार महावितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक (नागपूर परिक्षेत्र) भालचंद्र खंडाईत व चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी वीजजोडणी केली. तसेच जनतेशी संवाद साधला. या वेळी गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता अशोक मस्के, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे, उपकार्यकारी अभियंता वाशीमकर व कंत्राटदार प्रशांत टिपले उपस्थित होते. तुमीरकसा हे अविकसित गाव असून जाण्यासाठी रस्ता नाही.  पाण्याची सोय नाही. शाळा आहे पण शिक्षक नाही. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत. अशा कठीण परिस्थितीत या गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी विजेचे दर्शन झाले. अवघ्या बावीस घरांची वस्ती असलेल्या या गावातील सर्वच घरांना सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत वीजजोडणी देण्यात आली.

सर्वांना एक एलईडी बल्ब देण्यात आले. ६३ केव्हीए रोहित्र उभारून २.५ उच्चदाब व ०.९० लघुदाब विजेची व्यवस्था करण्यात आली. शंभर टक्‍के आदिवासी लोकवस्ती असलेल्या या गावातील नागरिकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून आदिवासी रेला नृत्य सादर केले. ढोल-ताशाच्या गजरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. या वेळी गावचे सरपंच, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच आलापल्ली व भामरागडचे वीज विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अनेक गावांना प्रतीक्षा
एकीकडे जग संगणक आणि इंटरनेटच्या विश्‍वाशी जोडले जात असताना जिल्ह्यातील अनेक गावांनी अद्याप विजेचा दिवा पाहिलेला नाही. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही त्यांना अंधारात जगावे लागत आहे. तुमरीकसा येथे वीज आली असली; तरी असे अनेक गावे अद्याप विजेपासून वंचित आहेत. या गावांमध्येही तत्काळ वीज पोहोचविण्याची मागणी महावितरण कंपनीकडे करण्यात आली आहे.

Web Title: aheri vidarbha news tumirkasa village electricity

गुरुवार, २२ मार्च, २०१८

निधीची चणचण सज्जतेला मारक

रवी पळसोकर

बुधवार, 21 मार्च 2018

ravi palsokar

सैन्यदलांसाठी आवश्‍यक निधीची तरतूद न केल्याने संरक्षणसज्जतेवर आणि शस्त्रसामग्रीच्या आधुनिकीकरणावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच संरक्षण क्षेत्राच्या गरजांकडे दुर्लक्ष होणे योग्य नाही.

सैन्यदलांसाठी आवश्‍यक निधीची तरतूद न केल्याने संरक्षणसज्जतेवर आणि शस्त्रसामग्रीच्या आधुनिकीकरणावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच संरक्षण क्षेत्राच्या गरजांकडे दुर्लक्ष होणे योग्य नाही.

कें द्रीय अर्थसंकल्पात दरवर्षी संरक्षण क्षेत्राला पाहिजे तेवढ्या निधीची तरतूद कधीच केली जात नाही, हे आजचे वास्तव आहे. भारतासारख्या विकसित होणाऱ्या देशाच्या सर्व क्षेत्रांना आवश्‍यक असला, तरी मुबलक निधी उपलब्ध करणे शक्‍य नसते. परंतु, देशाच्या सीमा व सामरिक उद्देश यांच्या सुरक्षिततेसाठी किमान किती निधी अत्यावश्‍यक आहे यावर नेहमीच वाद होतो आणि नव्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पी तरतूदही याला अपवाद नाही. सैन्यदलांसाठी आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आवश्‍यक निधीची तरतूद केलेली नसल्यामुळे लष्कराच्या शस्त्रसामग्रीच्या आधुनिकीकरणावर विपरित परिणाम होईल, असे परखड मत काही दिवसांपूर्वी संसदेत अहवाल सादर करताना संरक्षणसंबंधी स्थायी समितीने नोंदविले होते. त्याआधी लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सरत चंद यांनी स्थायी समितीसमोर निवेदन करताना, अर्थसंकल्पातील तरतूद इतकी अपुरी आहे की देशाच्या विविध लष्करी तळांचे साधे संरक्षण करण्यासाठीही निधीची कमतरता आहे याकडे लक्ष वेधले होते. ही समस्या गंभीर आहे व असे असूनही मर्यादित तरतूद करण्यामागे काय उद्देश असावा आणि सैन्यदलांच्या मागण्या खरोखर अत्यावश्‍यक आहेत काय यावर जी चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही.

प्रथम तरतुदीच्या आकडेवारीचे विश्‍लेषण आवश्‍यक आहे. संरक्षण क्षेत्रासाठी एकंदर २,७९,३०५ कोटींची तरतूद आहे. यात पेन्शन निधीचा समावेश नाही, हे महत्त्वाचे आहे. एकूण शासकीय खर्चामध्ये हे प्रमाण ११.४४ टक्के आहे व ते एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १.४९ टक्के इतके आहे. तुलनेने पाकिस्तान ‘जीडीपी’च्या ३.४ टक्के रक्कम संरक्षणावर खर्च करतो, तर चीन दोन टक्के. (परंतु, चीनची आकडेवारी त्यांचा एकंदर खर्च पाहता विश्वास न ठेवण्यासारखी आहे.) काही आकडे ठळक उणिवा अधोरेखित करतात. लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या नियोजित १२५ प्रकल्पांसाठी २९,०३३ कोटींची मागणी असताना २१,३८८ कोटी दिलेले आहेत. रोजचे काम चालू ठेवण्यासाठी ४०,०७३ कोटींची मागणी असताना ३०,७८१ कोटींची तरतूद केलेली आहे. उपलष्करप्रमुखांनी या संदर्भात स्पष्टीकरण करताना सांगितले, की देशाच्या शस्त्रसामग्रीच्या अवस्थेची गणती तीन विभागांत होते. ज्यात एक तृतीयांश अत्याधुनिक, एक तृतीयांश साधारण आणि उरलेली कामापुरती, परंतु बदली करण्यासाठी योग्य अशी असते. सध्या आपल्याकडे ही टक्केवारी अनुक्रमे ८-२४-६८ अशी आहे. लष्कराला वाटणारी काळजी वरील आकड्यांवरून समजते. हे सरकारला आणि देशाला स्वीकारण्याजोगे आहे काय?

काही विश्‍लेषक विरुद्ध मताचे आहेत. त्यांचा युक्तिवाद आहे की, सैन्यदलांचा व विशेषतः लष्कराचा ८० टक्‍क्‍यांहून अधिक खर्च पगार आणि रोजच्या कामासाठी होतो व उरलेला निधी नवीन शस्त्रसामग्री खरेदी करण्यासाठी होतो. तोसुद्धा अनेकदा वापरला जात नाही व मुदतीअंती परत केला जातो. हे खरे आहे. आपली सशस्त्र सेना मुबलक मनुष्यबळावर अवलंबून चालते म्हणून नवीन तुकड्या वगैरे स्थापन करताना सैनिकांची कमतरता कधीच भासत नाही. परंतु, शस्त्रखरेदी आणि आधुनिकीकरण याबाबत निर्णय घेण्याला फक्त सैन्यदले जबाबदार नसतात. राजकीय आणि सनदी अधिकारीही खरेदी प्रक्रियेत सहभागी असतात व त्यामुळे प्रत्येक प्रकरण लाल फितीत अडकते. सध्या ‘मेक इन इंडिया’वर बराच जोर आहे. परंतु, खासगी उद्योग क्षेत्राची इच्छा आणि क्षमता असूनही त्यात अपेक्षित प्रगती झालेली नाही व यामुळे शस्त्रास्त्रे आयात करणाऱ्या देशांमध्ये आपला क्रमांक वरचा लागतो. तिथेही काही प्रकल्प वर्षानुवर्षे रखडत आहेत.

या संदर्भात आपले सामरिक धोरण काय आहे हे स्पष्ट नाही. लष्करप्रमुखांनी म्हटले आहे की आपले सैन्य अडीच आघाड्यांवर (पाकिस्तान, चीन व माओवाद्यांसारखे देशांतर्गत अतिरेकी) लढण्यासाठी सज्ज असले पाहिजे. त्यांच्या वक्तव्याला हवाई दल आणि नौदलप्रमुखांनी दुजोरा दिला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी चंडीगड येथे एका परिसंवादात दोन कमांडप्रमुखांनी वेगळी मते मांडली. एक म्हणाले की, पाकिस्तानशी आपल्याला कधी ना कधी बोलावे लागेल. फक्त लष्करी बळ आणि चकमकींनी काश्‍मीरचा प्रश्न सुटणार नाही. दुसऱ्या कमांडप्रमुखांनी म्हटले की, दोन आघाड्यांवर लढणे शहाणपणाचे नाही. आपण चीनबरोबर संबंध सुधारले तर पाकिस्तानवर दबाव येईल व अनेक प्रश्न सोडवता येतील. लष्करप्रमुख आणि त्यांचे दोन सर्वात वरिष्ठ सेनानी यांच्यात वेगवेगळी मते असावीत व ती सार्वजनिक चर्चेत व्यक्त व्हावीत यावरून देशाच्या सामरिक धोरणांबद्दल अनिश्‍चितता आहे, हे स्पष्ट होते. मग आधुनिकीकरणाच्या उद्देशांबद्दलही मतभेद आहेत काय, अशी शंका उत्पन्न होते.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय सैन्यदलांत मनुष्यबळाची कमतरता नाही, परंतु खर्च कमी करण्यासाठी संख्येत घट करण्याचे अनेक उपाय आहेत. या कारणास्तव संरक्षण मंत्रालयाने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली. या समितीने अनेक बदल सुचवले. त्यातले काही आता अमलात आणले जाणार आहेत. मुख्य शिफारशी आघाडीच्या तुकड्यांना मदत करणाऱ्या दलांची (सर्व्हिस युनिट) संख्या कमी करून एकीकरण आणि सुटसुटीतपणा आणणार आहेत. उदा. सैनिकी शेती आणि टपाल सांभाळणाऱ्या तुकड्या, गाड्यांची देखरेख आणि दुरुस्ती करणारे दल व इतर समान कार्यालये. काही अभ्यासक आणखी वेगळ्या मतांचे आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आता देशाचे संरक्षण फक्त भू-सीमा सुरक्षित ठेवण्यापलीकडे आकाशात आणि सागरापर्यंत अधिक विस्तारित असले पाहिजे. नौदल आणि हवाई दल यांची ही प्रमुख जबाबदारी आहे व यासाठी दोन्ही दलांच्या आधुनिकीकरणाला अधिक महत्त्व देणे आवश्‍यक आहे. संभाव्य युद्धस्थिती तिन्ही दलांच्या एकत्रित (जॉइंट) कारवाईवर अवलंबून असेल. परंतु, असे काम करण्याच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी दिसून येतात. त्यासाठी मुख्यालयांच्या संघटना, जबाबदाऱ्या, उत्तरदायित्व यांच्यावर अधिक विचार होऊन निर्णय होणे आवश्‍यक आहे. ठळक उदाहरण म्हणजे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असावा की नाही याबद्दलही एकमत नाही. नजीकच्या काळात युद्ध होण्याची शक्‍यता कमी आहे, तेव्हा संरक्षण क्षेत्रातील त्रुटींकडे नंतर लक्ष देता येईल, अशी सध्या देशाची मनःस्थिती आहे. पण संरक्षणसज्ज राहण्याला पर्याय नाही, हे आपण १९६२ मध्ये शिकलेलो आहोत. पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती नको.

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास भारतीय वायूदल चीनपेक्षा अधिक सक्षम

गेल्यावर्षीही त्यांनी भारतीय वायूसेना अगदी कमी वेळात युद्धाच्यादृष्टीने सज्ज होऊ शकते, असा दावा केला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: March 22, 2018 08:40 PM | Updated: March 22, 2018 08:40 PM

In order to overcome any situation, Indian air force is more capable than China | कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास भारतीय वायूदल चीनपेक्षा अधिक सक्षम

चंदिगढ: एखाद्या खडतर परिस्थितीला तोंड द्यायचे झाल्यास भारतीय वायूदल हे चीनपेक्षा अधिक सक्षम आणि सुसज्ज आहे, असे विधान भारतीय वायूदलाचे प्रमुख बी.ए. धानोआ यांनी केले. ते शुक्रवारी हलवारा येथील वायूदलाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय वायूदल कोणत्याही आव्हानाचा सामना करायला तयार असल्याचे सांगितले. गेल्यावर्षीही त्यांनी भारतीय वायूसेना अगदी कमी वेळात युद्धाच्यादृष्टीने सज्ज होऊ शकते, असा दावा केला होता. 

दरम्यान, चीनकडूनही नुकताच पाकिस्तानशी एक सामरिक करार करण्यात आला. त्यानुसार चीनकडून पाकिस्तानला मिसाईट ट्रॅकिंग सिस्टिमची विक्री करण्यात आली. भारताने गुरुवारी केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर ही बाब उघडकीस आली. या करारामुळे पाकिस्तानला आपला बहुआयामी अण्वस्त्रवाहून क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा कार्यक्रम पुढे रेटता येणार आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेल्या या कराराच्या रकमेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानी सैन्याने या सिस्टिमचा वापर आपल्या एका फायरिंग रेंजजवळ करण्यास  सुरुवात केली आहे.