Pages

पेज

शुक्रवार, २० जुलै, २०१८

जमावाकडून होणारी हत्यासत्रे थांबवण्यासाठी नवीन कायदा करा

सर्वोच्च न्यायालयाची सरकारला सूचना
नवी दिल्ली - देशात जमावाकडून काही व्यक्तींना ठार मारण्याच्या घटना अलिकडच्या काळात घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी संसदेने नवीन कायदा तयार करावा अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज ही सूचना करताना असे प्रकार रोखण्यासाठी तसेच गायींच्या हत्येवरून होणारे हल्ले थांबवण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाहीं जारी केल्या आहेत.

राज्यात कोणालाही कायदा हातात घेऊ न देण्याची जबाबदारी राज्य सरकारांना स्वीकारावी लागेल व असे प्रकार त्यांनी रोखावेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणे ही सर्वस्वी राज्य सरकारांचीच जबाबदारी आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे. लोकांना कायदा हातात घ्यायला लावता कामा नये आणि लोकांनीही स्वताच कायदा असल्याच्या थाटात वागू नये असेही न्यायालयाने सुनावले आहे. जमावाकडून होणारे हल्ल्यांचे प्रकार अलिकडे वारंवार होत आहेत त्या प्रकारांना पोलादी हातानेच रोखले पाहिजे. राज्य सरकारांना या प्रकारांविषयीची जबाबदारी टाळता येणार नाही असेही न्यायालयाने नमूद केले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद असलेला नवीन कायदा संसदेनेही संमत केला पाहिजे अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.

लष्करी विधि महाविद्यालय देशात सर्वोत्कृष्ट होईल

लेफ्ट. जनरल डी.आर. सोनी : विक्रमी वेळेत सुरू झाले कॉलेज

पुणे - फक्‍त पाच महिन्यांत महाविद्यालय सुरू करणे कठीण होते. परंतु, असाध्य गोष्टीदेखील उत्कृष्टपणे साध्य करणे, हीच सैन्याची खासियत आहे. त्यामुळे विक्रमी वेळेत हे लष्करी विधि महाविद्यालय उभारणे साध्य झाले, अशा शब्दांत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी जवानांचे कौतुक केले. तसेच पुढील पाच वर्षांत हे महाविद्यालय हे देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय बनेल, असा विश्‍वासही सोनी यांनी व्यक्त केला.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे सैनिक कल्याण उपक्रमांतर्गत लोणावळा जवळील कान्हे येथे "आर्मी लॉ कॉलेज'चे लेफ्टनंट जनरल सोनी यांच्या हस्ते उद्‌घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायायाधीश डी. जी. कर्णिक, राधा कालियनदास दर्याननी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रेम दर्याननी, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, लॉ कॉलेजचे अध्यक्ष ए. के. शुक्‍ला उपस्थित होते.

सोनी म्हणाले, "मुले ही देशाचे भविष्य आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल असे शिक्षण या महाविद्यालयात दिले जाणार आहे. सुरवातीला 60 मुले याठिकाणी प्रशिक्षण घेतील. सध्या प्रत्येक क्षेत्रात "कॉर्पोरेटायझेशन' होत आहे. अशा स्पर्धेच्या युगात या महाविद्यालयाचे विद्यार्थी टिकून राहावे, यासाठी बी.बी.ए. आणि एल.एल.बी अशाप्रकारचा अभ्यासक्रम देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त संस्थेत क्रीडा सुविधादेखील उभारल्या जाणार आहेत.

कर्णिक म्हणाले, "लष्करी कुटुंबातील मुलांसाठी स्वतंत्र विधि महाविद्यालय सुरू होणे अभिमानाची गोष्ट आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी "त्यांच्या पालकांचे शस्त्र हे बंदूक आहे तर तुमच्याकडे पेन आणि भाषा हे शस्त्र आहे,' ही बाब नेहमी लक्षात ठेवावी. तसेच आपल्या शस्त्रांचा योग्य वापर करावा.'

दर्याननी म्हणाले, "सैन्य दलास उपयुक्त अशाप्रकारे पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी ही जागा देण्यात आली आहे. फक्‍त पाच महिने इतक्‍या कमी वेळात महाविद्यालयाची उभारणी करणे आव्हान होते. पण लष्कराने नियोजनबद्ध पद्धतीने कमी वेळेत काम पूर्णत्वास नेले. या माध्यमातून समाज हा लष्कराच्या सदैव पाठीशी आहे, हाच संदेश द्यायचा आहे.'

सर्वसामान्य विद्यार्थीही घेऊ शकतील प्रवेश

लष्करी विधि महाविद्यालयात सध्या फक्‍त लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. गुणवत्तेच्या आधारावर ही निवड करण्यात आली आहे. मात्र, आगामी काळात संस्थेचा विस्तार करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसोबतच प्रशासकीय पातळीवर विविध बदल केले जातील. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही या संस्थेतून शिक्षण घेऊ शकतील. मात्र त्यांची निवडदेखील गुणवत्तेच्याच आधारावर होणार आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल सोनी यांनी दिली.

Dailyhunt

लष्करात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही

 

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली - लष्करातील सर्व विभाग आणि देशभरातील तळांवर नेमून दिलेल्या शिस्तपालन उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात देशभरातील 12 लाख लष्करी जवानांशी लष्कर प्रमुखांनी संवाद साधला. त्यावेळी शिस्तभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत.

सुरक्षा दलांनी आपल्या उपलब्ध अर्थिक स्रोतांचा न्याय्य मार्गाने उपयोग व्हायलाच पाहिजे. तसेच सुरक्षा दलांना मिलीटरी कॅन्टीनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या किराणा सामान आणि मद्यसुविधेचा गैरवापर केला जाऊ नये. भ्रष्टाचार आणि नैतिक तापटपणाशी संबंधित प्रकरणांची कठोरपणे दखल घ्यायला हवी. अधिकाऱ्यांनी पदोन्नती आणि बढतीसाठी केवळ चकचकीतपणावर विसंबून रहायला नको. जे बढती आणि पदोन्नतीस पात्र आहेत त्यांना योग्य मोबदला मिळेल, अशी हमी देखील लष्कर प्रमुखांनी दिली आहे. पात्र लष्करी अधिकाऱ्यांशिवाय कोणाही निवृत्त अधिकाऱ्यासह सहायक सेवा दिली जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

लष्करातील 12 लाख जवानांच्या शारीरिक सुदृढतेवर लष्कर प्रमुखांनी विशेष भर दिला. जवानांनी आरोग्यास अपायकारक अन्नाचे सेवन करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. शिस्तीचे हे निकष गेल्या काही दशकांपासून अस्तित्वात आहे. लष्कर प्रमुख जन. रावत यांनी या निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बुधवार, १८ जुलै, २०१८

लष्कराचे काश्‍मीरात लोकाभिमुखच धोरण

लष्कर प्रमुखांचा दावा
नवी दिल्ली - जम्मू काश्‍मीरात राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर लष्कराच्या तेथील भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, आमची तेथील भूमिका नेहमीप्रमाणे लोकाभिमुख स्वरूपाचीच आहे असे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे. आमचे तेथील धोरण हे दहशतवाद्यांचा नायनाट करायचा हे आहे. तेथील सामान्य नागरीकांना त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेऊ असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यपाल राजवटीनंतर लष्कराने तेथे आक्रमकपणा स्वीकारला आहे या म्हणण्यात तथ्य नाही असेही त्यांनी आज येथे, पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की राज्यपाल राजवटीनंतर काश्‍मीरातील लष्कराचे धोरण कठोर झाले आहे असे सर्व साधारण चित्र रंगवले जात आहे पण त्यात तथ्य नाही.

लष्करप्रमुखांनी आज येथे बारामुल्ला येथील विद्यार्थ्यांशीही चर्चा केली. त्यात पाच विद्यार्थींनींचाही समावेश होता. काश्‍मीरातील दगडफेक आणि दहशतवादी कारवाया थांबल्या तर आपल्याही परिसराचा दिल्ली किंवा देशातील अन्य मोठ्या शहरांप्रमाणे विकास होऊ शकतो हा संदेश हे विद्यार्थी आता येथून काश्‍मीरात नेतील असा विश्‍वासही जनरल रावत यांनी यावेळी व्यक्त केला

सोमवार, ९ जुलै, २०१८

दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्याला 2 वर्ष पूर्ण; काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक उपाय

श्रीनगर : भारतीय लष्कराने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला 8 जुलै 2016 रोजी कंठस्नान घातले होते. या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शिवाय, इंटरनेट सेवादेखील बंद ठेवली आहे. तर दुसरीकडे, दहशतवाद्यांनी बंदची हाक दिल्यानं आज एका दिवसासाठी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक एस.पी.वैद यांनी सांगितले की, सध्या जम्म काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाहीय. त्यामुळे भाविकांना सुरक्षितरित्या अमरनाथा यात्रा करता यावी, यासाठी आम्ही सर्वेतोपरी प्रयत्न करत आहोत. दहशतवाद्यांकडून रविवारी बंदची हाक देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे एक दिवसासाठी आम्ही यात्रा थांबवली आहे. काश्मीर खोऱ्यातील तणावाची स्थिती पाहता, भाविकांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी बुरहान वानी यांच्या खात्मा करण्याच्या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाई होण्याचा धोका लक्षात घेता श्रीनगर हायवेपासून 300 किलोमीटर परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रन्ट (जेकेएलएफ) चा अध्यक्ष यासीन मलिकलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दक्षिण काश्मीरमधील एका गावात शोधमोहीमेदरम्यान शनिवारी जमावानं सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक केली. यावेळी जवानांनी प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, शोपिया, अनंतनाग आणि पुलवामामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

8 जुलै 2016ला बुरहान वानीचा खात्मा
भारतीय लष्करानं 8 जुलै 2016 ला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरात बुरहान वानीचा खात्मा केला होता. त्राल येथील रहिवासी असलेल्या बुरहान वानीला चकमकीदरम्यान कंठस्नान घालण्यात आले. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय म्हणून ओळखला जायचा. त्याच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी हिंसक निदर्शनं करण्यात आली होती.

रविवार, ८ जुलै, २०१८

दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्याला 2 वर्ष पूर्ण; काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक उपाय

श्रीनगर : भारतीय लष्कराने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला 8 जुलै 2016 रोजी कंठस्नान घातले होते. या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शिवाय, इंटरनेट सेवादेखील बंद ठेवली आहे. तर दुसरीकडे, दहशतवाद्यांनी बंदची हाक दिल्यानं आज एका दिवसासाठी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक एस.पी.वैद यांनी सांगितले की, सध्या जम्म काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाहीय. त्यामुळे भाविकांना सुरक्षितरित्या अमरनाथा यात्रा करता यावी, यासाठी आम्ही सर्वेतोपरी प्रयत्न करत आहोत. दहशतवाद्यांकडून रविवारी बंदची हाक देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे एक दिवसासाठी आम्ही यात्रा थांबवली आहे. काश्मीर खोऱ्यातील तणावाची स्थिती पाहता, भाविकांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी बुरहान वानी यांच्या खात्मा करण्याच्या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाई होण्याचा धोका लक्षात घेता श्रीनगर हायवेपासून 300 किलोमीटर परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रन्ट (जेकेएलएफ) चा अध्यक्ष यासीन मलिकलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दक्षिण काश्मीरमधील एका गावात शोधमोहीमेदरम्यान शनिवारी जमावानं सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक केली. यावेळी जवानांनी प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, शोपिया, अनंतनाग आणि पुलवामामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

8 जुलै 2016ला बुरहान वानीचा खात्मा
भारतीय लष्करानं 8 जुलै 2016 ला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरात बुरहान वानीचा खात्मा केला होता. त्राल येथील रहिवासी असलेल्या बुरहान वानीला चकमकीदरम्यान कंठस्नान घालण्यात आले. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय म्हणून ओळखला जायचा. त्याच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी हिंसक निदर्शनं करण्यात आली होती.